Saturday, December 27, 2025
Home Blog Page 413

महाराष्ट्र पोलिसांसाठी मोठी बातमी; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्या सुट्ट्या रद्द

Police

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेले आहेत येत्या 20 नोव्हेंबर रोजी यांनी निवडणुका होणार आहेत त्यामुळे आता राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी होताना दिसत आहेत. राजकीय पक्ष आणि त्यांची राजकारण करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे प्रशासकीय कामांना वेग आलेला आहे. या निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. परंतु पोलिसांच्या कामात मात्र वाढ होणार आहे. कारण आता मुंबई सह राज्यात पोलीस दलात असलेल्या पोलिसांची आठवड्याची सुट्टी तसेच इतर रजा देखील रद्द करण्यात आलेल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. याबाबत पोलीस महासंचालक कार्यालयाने गुरुवारी एक परिपत्रक जारी केलेले आहे. आणि त्यात या गोष्टी सांगितलेल्या आहे. या रजा बंदीमधून वैद्यकीय रजा आणि अत्यावश्यक कारणांच्या रजा वगळण्यात आलेल्या आहे.

येत्या विधानसभा निवडणुकीत काही अनुचित घटना घडू नये. तसेच सतर्कतेचे आदेश पोलीस महासंचालक कार्यालयातून जारी करण्यात आलेले आहेत. आणि त्याच कारणाने सगळ्या सुट्ट्या पोलिसांचा रद्द करण्यात आलेल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी पोलीस बंदोबस्त कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी तसेच निवडणूक प्रक्रिया प्रक्रियेसाठी पोलीस बंदोबस्त करण्यासाठी हे आदेश पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक आणि अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत.

याच कारणामुळे निवडणूक पार पडेपर्यंत पोलीस अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सुट्ट्यांशिवाय कोणत्याही सुट्ट्या घेणार नाही. असा आदेश पोलिसांना देण्यात आलेला आहे. मतदान सभेच्या निवडणुकीसाठी पालिका आयुक्तांकडे मुंबई उपनगर आणि मुंबई शहर या दोन्ही जिल्ह्यांसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे. याबाबतची बैठक देखील घेण्यात आलेली आहे. यावेळी मुंबई शहर आणि उपनगरात एकूण पेक्षा जास्त मतदार आहे. ज्या नागरिकांची अजूनही मतदार नोंदणी झालेली नाही. त्यांना नोंदणीत दुरुस्ती बाकी आहे. त्यांना 19 ऑक्टोबर पर्यंत मुदत असल्याचे देखील सांगण्यात आलेले आहे. यावर्षी महाराष्ट्रात 288 जागांसाठी निवडणुका होत आहेत. 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर 23 तारखेला मतमोजणी होऊन निकाल देखील जाहीर होणार आहे.

Pan Card Rules | पॅनकार्ड बाबत ‘ही’ चूक पडू शकते महागात; भरावा लागणार 10 हजारांचा दंड

Pan Card Rules

Pan Card Rules | भारतीय नागरिकांसाठी पॅन कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे असे कागदपत्र आहे. या पॅन कार्डवर तुमचा दहा अंकी एक नंबर असतो. त्याला युनिक आयडेंटिफिकेशन अल्फा न्यूमरिक नंबर असे म्हणतात. त्याला पॅन क्रमांक असे म्हणतात. यामध्ये तुमचे नाव, जन्मतारीख,वडिलांचे नाव, जोडीदाराचे नाव, फोटो, क्रमांक असतो बँकिंग कामांमध्ये पॅन कार्डचा (Pan Card Rules) खूप वापर केला जातो.

अनेक कामांमध्ये आपल्या ओळखीचा पुरावा किंवा जन्मतारखेचा पुरावा म्हणून पॅन कार्ड सादर केले जाते. परंतु अनेक वेळा लोक हे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड बनवतात. जे कायदेशीर रित्या योग्य आहे की नाही? हे आणि त्यांना माहीत नसते आणि त्यामुळे त्यांच्यावर दंड पद्धतीने कारवाई केली जाते.

आयकर नियम | Pan Card Rules

आयकर नियमानुसार कलम 139 A 7 नुसार कोणतीही व्यक्ती एका पेक्षा जास्त पॅन कार्डसाठी अर्ज करू शकत नाही. किंवा एकापेक्षा जास्त पॅन कार्ड वापरू देखील शकत नाही. परंतु जर चुकून एखाद्या व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड आढळले. तर ते कायदेशीररित्या गुन्हा आहे. अशावेळी त्या नागरिकांना दंड देखील होऊ शकतो.

किती दंडवत होतो?

तुम्ही जर एकापेक्षा जास्त पॅन कार्ड वापरत असाल, तर तुम्हाला दंड होऊ शकतो. आयकर कायद्याच्या कलम 172 B यांच्या अंतर्गत जर एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असेल तर तुम्हाला 10 हजार रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो जो मूल्यांकन अधिकाऱ्याद्वारे निर्धारित केला जातो.

पॅन कार्डचे महत्व | Pan Card Rules

पॅन कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. करदात्यांसाठी महत्त्वाचे कागदपत्रे आहे. पॅन कार्डवर तुमचे सगळे आर्थिक व्यवहार असतात. ज्याद्वारे सरकार तुमच्या पैशांच्या देवाण-घेवाण निश्चित तपासणी करत असते. यावेळी आयकर भरताना पॅन कार्ड महत्त्वाचे असते. पण आयकर विभागाने आता पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्याचे सक्तीचे केलेले आहे. त्यामुळे बँकिंग व्यवहारांमध्ये जास्त पारदर्शकता येते.

सणासुदीच्या काळात विकले जातात बनावट ड्रायफ्रूट्स; अशाप्रकारे करा खऱ्या बदामाची पारख

Almonds

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिवाळीचा सण अगदी तोंडावर आलेला आहे. दिवाळीनिमित्त आपल्या घरात अनेक गोडधोड पदार्थ होत असतात. नवीन रेसिपी देखील होत असतात. या सगळ्यांमध्ये बदामाचा वापर देखील मोठ्या प्रमाणात केला जातो. तसेच दैनंदिन आयुष्यात देखील बदाम हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. बदामामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड, विटामिन ई यांसारखे पोषक तत्व असतात. त्यामुळे आपल्या आरोग्याला खूप फायदा होतो. सणासुदीच्या काळातही बदाम मोठ्या प्रमाणात खरेदी केले जातात. परंतु आजकाल प्रत्येक गोष्टीमध्ये भेसळ वाढलेली आहे. आणि अनेक लोक बदामामध्ये भेसळ करत आहेत. त्यामुळे ग्राहकांना बदामाचे शुद्धता ओळखणे खूप गरजेचे असते. ड्रायफ्रूट्स खरेदी करताना देखील तुम्हाला चांगले बदाम आणि निकृष्ट दर्जाचे बदाम हे ओळखता आले पाहिजेत. आज आपण बाजारात खरे बदाम ओळखण्याच्या पाच ट्रिक्स जाणून घेणार आहोत.

बदामाचा रंग

बदामाचा रंग ही त्याची मूळ ओळख असते. बदामाला नैसर्गिक रंग प्राप्त होतो. बदामाचा रंग हा हलकासा तपकिरी असतो. जो बदामाच्या विविधतेवर आणि पिकण्याच्या अवस्थेवर देखील अवलंबून असते. परंतु कृत्रिम बदामावर वेगळ्या रंगाचा लेप लावला जातो. ज्यामुळे बारामती रंग अगदी गडद किंवा काळा दिसतो. त्यामुळे सणासुदीच्या काळात बदाम विकत घेताना. तुम्ही या गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

वॉटर टेस्ट

खरे आणि नैसर्गिक बदाम पाण्यात टाकले की, पाण्यात बुडतात. तसेच काही काळ ते पाण्यात बुडतात. तर नकली बदाम हे पाण्याच्या वर तरंगत राहतात. म्हणजेच खऱ्या बदामांमध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता असते. त्यामुळे त्यांची घनता वाढते आणि ते पाण्यात बुडतात. परंतु खोट्या बदामांमध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता नसल्याने ते वर पृष्ठभागावरच तरंगतात.

बदाम हातावर रगडून बघा

तुम्ही जर बदाम हातावर रगडला आणि त्यातून रंग निघू लागला. तर तो बदाम कृत्रिम पद्धतीने बनवलेला असतो. तसेच त्या पदावर पाणी शिंपडले तर पावडर देखील दिसते. त्यामुळे तुम्ही बदाम घेताना ते बदाम हातावर रगडून बघा.

पेपर टेस्ट

तुम्ही बदाम खरेदी करताना बदामाचे शुद्धता तपासण्यासाठी त्या बदामांना कागदात गुंडाळा आणि बदामावर दाब द्या. त्यावेळी त्या बदामामधून तेल निघते. आणि कागद थोड्या वेळात गुळगुळीत होतो. परंतु जर बनावट बदाम असेल, तर त्या कागदावर कोणत्याही प्रकारचे तेल येणार नाही तो कागद कोरडाच राहील.

वासाने ओळखा

बदाम खरेदी करताना त्याची गुणवत्ता तपासणी खूप गरजेचे असते. यावेळी तुम्ही तो बदाम तोडू शकता आणि त्याचा सुगंध घेऊ शकता. जर त्यातून गोड आणि सुगंध तेलकट सुगंध आला, तर तो बदाम चांगला आहे. परंतु त्यातून तसा कोणताही सुगंध येत नसेल,तर तो बदाम कृत्रिम पद्धतीने तयार केलेला असतो.

Anganwadi Bharti 2024 | अंगणवाडी मुख्यसेविकांसाठी होणार मोठी भरती; भरली जाणार इतकी पदे

Anganwadi Bharti 2024

Anganwadi Bharti 2024 | आम्ही नेहमीच तुमच्यापर्यंत नोकरीच्या विविध संधी पोहोचवत असतो. आज देखील अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता राज्यातील महिलांसाठी नोकरीची एक सुवर्णसंधी आहे. महिलांसाठी सरकारी नोकरीची संधी आहे. ती म्हणजे आता महिला आणि बाल विकास विभाग अंतर्गत अंगणवाडी मुख्य सेविका पदासाठी एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत गट क संवर्गातील सरळ सेवा भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. 14 ऑक्टोबर पासून ही भरती प्रक्रिया चालू झालेली आहे. तसेच 3 नोव्हेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव | Anganwadi Bharti 2024

महिला व बालविकास विभाग अंतर्गत अंगणवाडी मुख्य सेवकांची पदे भरली जाणार आहेत.

एकूण रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत अंगणवाडी मुख्य सेविका या पदाच्या 102 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

मासिक वेतन

या भरती अंतर्गत निवड झालेल्या अंगणवाडी सेविकांना 35 हजार 400 ते 1 लाख 12 हजार 400 रुपये एवढे वेतन मिळेल.

किती अंगणवाड्यात पदे भरली जाणार

या भरती अंतर्गत राज्यातील 25 अंगणवाड्यासाठी मुख्य पर्यवेक्षिका पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 21 ते 28 वर्षे दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.

अर्ज शुल्क | Anganwadi Bharti 2024

या भरतीचा अर्ज करण्यासाठी सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रुपये फी आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 900 रुपये एवढी फी आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख

14 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

3 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

‘या’ सवयींमुळे हाडे होतात कमकुवत; आजच जीवनशैलीत करा हे बदल

Bones

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपली हाडे ही आपल्या शरीराचा एक अत्यंत महत्त्वाचा असा भाग आहे. आपली हाडे जर तंदुरुस्त असतील, तर आपण कुठलेही काम अगदी सहजपणे करू शकतो.परंतु वाढत्या वयानुसार हाडे कमकुवत होत जातात. म्हणजेच वयानुसार हाडांची कमता कमी होते आणि आपल्याला अगदी साध्या साध्या गोष्टी करायला देखील खूप मेहनत घ्यावी लागते. किंवा हाडांचा त्रास सुरू होतो. परंतु अशा काही चुका आहेत, ज्या तुम्ही तारुण्यांमध्ये करता. ज्यामुळे उतार वयामध्ये तुम्हाला हाडांच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आता आपण अशा कोणत्या चुका आहेत? ज्या तुम्ही जास्त केल्याने तुमच्या हाडांवर त्याचा परिणाम होतो?, हे जाणून घेणार आहोत.

खूप गोड खाणे

जास्त साखर खाल्ल्याने तुमचे वजन वाढतेच पण हाडे कमकुवत होऊ शकतात. जेव्हा आपण गोड खातो तेव्हा आपल्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. या वाढलेल्या रक्तातील साखरेमुळे कॅल्शियम शोषण्यास अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे हाडे कमकुवत होतात. याव्यतिरिक्त, अतिरिक्त वजन हाडांवर अतिरिक्त दबाव टाकते, ज्यामुळे हाडांच्या आजारांचा धोका वाढतो.

खूप मीठ खाणे

आजकाल आपले व्यस्त जीवन आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आपली हाडे कमकुवत झाली आहेत. विशेषतः मिठाचे अतिसेवन हाडांसाठी अत्यंत हानिकारक आहे. मीठामध्ये असलेले सोडियम शरीरातून कॅल्शियम बाहेर टाकते, ज्यामुळे हाडे कमकुवत होतात. त्यामुळे तुमच्या आहारातील मिठाचे प्रमाण कमी करून तुम्ही हाडे मजबूत करू शकता..

ऑक्सलेट खाद्यपदार्थ खाणे

तुम्हाला चॉकलेट, केक, पेस्ट्री आणि कुकीज यांसारख्या स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घ्यायला आवडेल, पण त्यात असलेले ऑक्सलेट तुमच्या हाडांसाठी हानिकारक असू शकतात हे तुम्हाला माहीत आहे का? ऑक्सॅलेट्स कॅल्शियमचे शोषण रोखून तुमची हाडे कमकुवत करू शकतात, म्हणून तुम्हाला मजबूत हाडे हवी असल्यास हे लक्षात ठेवा.

सूर्यप्रकाश न घेणे

केवळ टॅनिंगसाठीच नाही तर हाडांच्या आरोग्यासाठीही सूर्यस्नान खूप महत्त्वाचे आहे? सूर्यकिरण आपल्या शरीरात व्हिटॅमिन डी तयार करतात, जे कॅल्शियम शोषण्यास मदत करतात. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होतात आणि ऑस्टियोपोरोसिससारख्या आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे रोज काही वेळ उन्हात बसणे खूप गरजेचे आहे.

तळलेले पदार्थ खाणे

तळलेले अन्न खाण्याच्या आवडीमुळेही हाडे कमजोर होतात. तळलेल्या पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात ट्रान्स फॅट असते ज्यामुळे कॅल्शियम शोषण्यात अडथळा येतो. त्यामुळे हाडे कमकुवत होतात आणि ऑस्टिओपोरोसिससारख्या आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे निरोगी हाडांसाठी तुम्ही तुमच्या आहारातून तळलेले पदार्थ कमी करावेत.

Weather Update | मुंबई, ठाण्यासह ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस; जाणून घ्या आजचा हवामानाचा अंदाज

Weather Update

Weather Update | ऑक्टोबर महिना सुरू झालेला आहे. आणि या वर्षी पावसाचा संकट अजूनही कायम आहे. ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस चालू झालेला आहे. आणि या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान होताना दिसत आहे. काही ठिकाणी तापमानात देखील वाढ होत आहेत. मुंबईमध्ये कमाल तापमान हे 32 डिग्री सेल्सिअस एवढे आहे. तसेच ठाण्यात मात्र हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात ऊन सावलीचा खेळ हा चांगला चालू झालेला आहे. हवामान विभाग या पावसाबद्दल नेहमी सर्वांच्या अंदाज व्यक्त करत असतात. अशातच हवामान विभागाने या पावसाबद्दल माहिती दिलेली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज म्हणजे 17 ऑक्टोबर रोजी पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये या आठवड्याच्या शेवटपर्यंत चांगलाच पाऊस (Weather Update) पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे कोकणात देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. कोकणामध्ये भात कापणीला आलेले आहेत. त्यातच हा पाऊस आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झालेली दिसत आहे.

कोकणासोबतच नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यात देखील पुढचे दोन दिवस पावसाचे वातावरण राहणार आहे. त्यामुळे हवामान विभागाने या विभागांना अलर्ट दिलेला आहे. या ठिकाणी जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने हे वारे वाहणार आहेत. तसेच विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हा पाऊस येणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे.

सध्या जालना, परभणी, हिंगोली या भागामध्ये पावसाचे स्वरूप थोडेसे कमी आहे. परंतु विकेंडपर्यंत हा पाऊस चांगलाच वाढणार आहे. 18 आणि 19 ऑक्टोबर रोजी हवामान विभागाने गेलो आहे. यावर्षी पाऊस सरासरी खूप पेक्षा जास्त झाला. त्यामुळे सोयाबीन पिकाला देखील या पावसाचा खूप जास्त झटका बसणार आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे कापूस आणि सोयाबीन या पिकांना त्याचा फटका बसला होता. परंतु आता परतीचा पाऊस देखील वाढल्याने पुन्हा एकदा पिकांना याचा फटका बसत आहे.

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी , केंद्र सरकारकडून तब्बल 15 लाखांची मदत

fpo

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेती हे उदरनिर्वाहाचे साधन असून, देशातील करोडो लोक हा व्यवसाय करतात. त्याचबरोबर अनेक जोडधंद्याचे सहाय्य घेतात. शेतकऱ्यांच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून वेळोवेळी विविध योजना राबवल्या जातात. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी भारत सरकारने पीएम किसान एफपीओ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना व्यवसाय उभारणीसाठी तब्बल 15 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. तर या योजनेचा अर्ज कसा करावा हे आज आपण पाहणार आहोत.

एफपीओ योजना

प्रधानमंत्री शेतकरी FPO ( Farmer Producer Organization ) हि योजना शेतकऱ्यांना बळकट करण्यासाठी आणि शेती व्यवसायातून जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी केलेली महत्वाची योजना आहे. यामध्ये शेतकरी उत्पादक संघटना स्थापन करून त्यांना आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत कमीत कमी 11 शेतकऱ्यांची संघटना तयार करून , त्याची नोंदणी केलेली असावी लागते . या संघटनेच्या माध्यमातून शेतीशी संबंधित व्यावसायिक उपक्रम, उत्पादन प्रक्रिया, पॅकिंग आणि मार्केटिंगचे काम केले जाते. या योजनेतून एकत्रित काम केल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन अधिक फायदेशीर ठरू शकते. तसेच या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी चांगले बाजारपेठ उपलब्ध होईल.

अर्ज कसा करावा

या योजनेचा लाभ घेण्यासाठी एकट्या शेतकऱ्याला अर्ज करता येणार नाही. अर्ज करण्यासाठी शेतकरी उत्पादक संघटना (FPO) स्थापन करावी लागते, ज्यात किमान 11 शेतकरी असणे आवश्यक आहे. या संघटनेची नोंदणी करून सरकारकडे अर्ज करावा लागेल. यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी तुम्ही https://www.enam.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी . वेबसाइटवर नोंदणी केल्यानंतर लागणारी सर्व माहिती भरून अर्ज सबमिट करावा लागेल. यासाठी तुम्हाला FPO चे व्यवस्थापक, MD किंवा CEO यांचे नाव, पत्ता, ई-मेल आयडी आणि संपर्क क्रमांक द्यावा लागेल.

शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचवण्यास मदत

शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होऊन , कुटुंबाला आर्थिक स्थिरता मिळेल . तसेच शेतीसाठी चालना मिळेल . शेतकऱ्यांचे उत्पादन विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध होईल. त्यामुळे त्यांना नफा मिळेल. त्याचाच परिमाण शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावेल आणि जास्त कालावधीसाठी फायदा होईल. शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी अशा अनेक योजना केंद्र सरकार राबवत असून, पीएम किसान एफपीओ योजना शेतकऱ्यांना नव्या दिशेने नेण्यास महत्त्वाची ठरणार आहे.

इलॉन मस्कच्या नेतृत्वाखाली एक्समध्ये नवे फीचर्स ; लवकरच पेमेंट ऑप्शन येणार

elon musk twitter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखाली एक्स जे कि पूर्वी ट्विटर म्हणून ओळखले जात होते . ते सतत नव्या फीचर्सवरती भर देताना दिसतात. ज्यामुळे लोकांचे आकर्षण वाढत आहे. या अँपमध्ये कंपनी लवकरच नवीन बदल करणार आहे. या प्लॅटफॉर्मवर पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देणार आहे . हे एक आधुनिक युगाच्या दिशेने टाकलेलं महत्वाचं पाऊल ठरेल .

एक्सवर पेमेंट ऑप्शन दिसणार

तुम्हाला एक्सच्या लेफ्ट-हँड नेव्हिगेशन पॅनेलमध्ये बुकमार्क फीचरच्या खाली पेमेंट हा ऑप्शन दिसेल. हे पेमेंट वॉलेट प्रणालीवर आधारित असेल जे की थेट बँक खात्याशी लिंक असेल. या फीचरमुळे लाखो वापरकर्त्यांना प्लॅटफॉर्मवरूनच आर्थिक व्यवहार करण्याची सोय उपलब्ध होईल. या बदलामुळे लोक लवकरच एक्सवरून पैसे ट्रान्सफर करू शकतील, बॅलन्स तपासू शकतील, आणि ट्रांजेक्शन हिस्ट्री पाहू शकतील.

एक्सचे बदलते रूप

एक्स हे सुरुवातीला फक्त माहिती शेअरिंग करणारे प्लॅटफॉर्म होते . आता त्यामध्ये सातत्याने बदल झालेले दिसून येतात. त्यामध्ये व्हिडिओ, ऑडिओ कॉलिंग, आणि सबस्क्रिप्शनसारख्या सेवांसोबत आता पेमेंटसारखी सेवा देखील मिळणार आहे . त्यामुळे एक्स वापरकर्त्यांसाठी एक व्यापक आणि सुविधाजनक प्लॅटफॉर्म म्हणून उभा राहील.

पब्लिक ट्विट्स आणि चॅटबॉट इंटरॅक्शनचा वापर

कंपनीने आपल्या एआय मॉडेलला ट्रेन करण्यासाठी पब्लिक ट्विट्स आणि चॅटबॉट इंटरॅक्शनचा वापर करण्याची योजना आखली आहे. त्यामध्ये वापरकर्त्यांना त्यांचा डेटा एआयसाठी वापरण्यापासून बाहेर पडण्याचा पर्याय दिला आहे. कंपनीने सेफ्टी हँडलवरून एका पोस्टद्वारे ही सुविधा देणार असून , ज्या वापरकर्त्यांना आपला ट्विट डेटा एआय मोडेल प्रशिक्षणासाठी वापरण्याची इच्छा नाही ते ऑप्ट आउट करू शकतात . त्यांना त्यामधून बाहेर पडण्याचा ऑपशन दिला जाईल .

इनकम टॅक्स विभागाचा मोठा निर्णय ; जलद रिफंड मिळवण्यासाठी प्रगत IEC 3.0 प्रणाली सुरु

ITR Tax

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक लोक इनकम टॅक्स भरताना दिसतात .त्यांना टॅक्स भरल्यानंतर रिफंडच्या बाबतील अनेक अडचणी येतात . त्याचीच दखल घेऊन इनकम टॅक्स डिपार्टमेंटने ई-फायलिंग पोर्टलमध्ये मोठा बदल होणार असल्याचे सांगितले आहे. टॅक्स विभाग लवकरच नवीन IEC 3.0 प्रणाली सुरु करणार आहे. आधीचे IEC 2.0 ( इंटिग्रेटेड ई-फायलिंग अँड सेंट्रलाइज्ड प्रोसेसिंग सेंटर ) याचा कार्यकाळ संपत असून आधीच्या IEC 2.0 ची जागा आता IEC 3.0 घेणार आहे. त्यामुळे करदात्यांसाठी ई-फायलिंग प्रक्रिया अधिक सोयीस्कर होऊन , जलद रिफंड मिळण्यास सोपे जाईल .

प्रगत ई-फायलिंग सुरु

IEC हे प्रगत ई-फायलिंग प्लॅटफॉर्म सुरु केला असून , त्यामध्ये करदात्यांना आपला आयटीआर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने भरता येतो. यामध्ये नियमित फॉर्म जमा करण्याची सुविधा आहे . त्याचसोबत तुम्ही इतर सेवांचा वापर करू शकता. याचा महत्वाचा भाग म्हणजे सेंट्रलाइज्ड प्रोसेसिंग सेंटर (CPC) हा असून , याच्या माध्यमातून ई-फायलिंग पोर्टल आणि इंटिग्रेटेड टॅक्सपेयर डेटा बेसवरून भरलेल्या रिटर्न्सवर प्रक्रिया करते. त्यासोबतच आयईसी प्रकल्प क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी बॅक ऑफिस पोर्टल देखील समाविष्ट आहे , ज्यातून अधिकारी करदात्यांच्या फाइलिंग आणि प्रोसेसिंग डेटामध्ये प्रवेश करू शकतात.

जलद रिफंड मिळण्यास मदत

नवीन IEC 3.0 चा मुख्य उद्देश अधिक प्रगत आणि चांगले व्यवस्थापन उभारण्याचे आहे . या आयटीआर प्रक्रियेत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून गती दिली जाईल, ज्यामुळे करदात्यांना जलद रिफंड मिळण्यास मदत होईल. या नवीन प्रणालीच्या वापरामुळे आधीच्या प्रणालीतील त्रुटी कमी होतील .ज्यामुळे करदात्याला जास्त चांगल्या अनुभव प्राप्त होईल.

करोडो शेतकऱ्यांना सरकारकडून दिवाळी गिफ्ट ! रब्बी पिकांच्या MSP मध्ये वाढ, जाणून घ्या नवीन दर

msp

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने प्रमुख रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किमतीत (MSP) वाढ करण्यास मान्यता दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर केला.

गव्हाच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 150 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 2,275 रुपयांवरून 2,425 रुपये करण्यात आली आहे. तसेच मोहरीच्या दरात 300 रुपयांनी वाढ झाली आहे. त्याचा एमएसपी आता 5,950 रुपये प्रति क्विंटल झाली आहे. हरभऱ्यासाठी एमएसपी 210 रुपयांनी वाढवून 5,650 रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणे आणि विशेषत: आगामी रब्बी हंगामात शेतीच्या उत्पन्नाला आधार देणे हे या निर्णयाचे उद्दिष्ट आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विपणन वर्ष 2025-26 साठी सर्व रब्बी पिकांसाठी ही वाढ करण्यात आली आहे. मसूरच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 275 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. करडईच्या एमएसपीमध्ये 140 रुपये प्रति क्विंटल आणि बार्लीच्या एमएसपीमध्ये 130 रुपये प्रति क्विंटलने वाढ करण्यात आली आहे.