Thursday, December 18, 2025
Home Blog Page 45

Indian Railways : रेल्वे ठेवणार तुमच्यावर नजर!! तब्बल 74 हजार CCTV बसवणार

Indian Railways CCTV

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Indian Railways प्रवाशांच्या सुरक्षेसाठी भारतीय रेल्वेने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वे ७४,००० प्रवासी कोच आणि १५,००० लोकोमोटिव्हमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहे. निवडक कोच आणि लोकोमोटिव्हमध्ये यशस्वी पायलट प्रोजेक्टनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. खरं तर धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत बऱ्याच काळापासून अनेक प्रकरणे समोर येत आहेत. या घटनांचं गांभीर्य लक्षात घेता रेल्वेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या निर्णयामुळे रेल्वेतील गैरप्रकार रोखण्यात येतील अशी आशा रेल्वेला आहे.

कुठे कुठे बसवणार CCTV- Indian Railways

प्रत्येक कोचमध्ये चार डोम -प्रकारचे CCTV कॅमेरे असतील – प्रत्येक प्रवेशद्वारा जवळ दोन कॅमेरे असतील. हे कॅमेरे प्रवाशांच्या कोणत्याही गोपनीयतेला अडथळा न आणता इतर जागा कव्हर करतील. लोकोमोटिव्हमध्ये प्रत्येकी सहा कॅमेरे असतील, जे पुढील, मागील आणि बाजूकडील दृश्यांचे निरीक्षण करण्यासाठी बसवले जातील. रेल्वेत (Indian Railways) बसवले जाणारे सीसीटीव्ही कॅमेरे सर्वोत्तम तांत्रिक विशिष्टतेसह आणि एसटीक्यूसी प्रमाणित असणार आहेत. यासाठी रेल्वेमंत्र्यांनी सर्वोत्तम दर्जाची उपकरणे वापरण्याचा आग्रह धरला आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, १०० किमी प्रतितास किंवा त्यापेक्षा जास्त वेगाने धावणाऱ्या गाड्यांमध्ये आणि कमी प्रकाशातही उच्च दर्जाची चित्रीकरण फीत उपलब्ध होईल, याची खात्री करावी.

रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की सीसीटीव्ही कव्हरेज संघटित गुन्हेगारी आणि किरकोळ चोरीविरुद्ध प्रतिबंधक म्हणून काम करेल. प्रवास करताना प्रवाशांचा आत्मविश्वास वाढवणे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेवर भर देणे हाच यामागील मुख्य उद्देश आहे. रेल्वेमध्ये अनेकदा चोरीच्या मारामारीच्या घटना घडतात अशा घटनांना सुद्धा या नव्या सीसीटीव्ही सिस्टीम मुळे आळा बसेल. प्रवाशांना शिस्त लागेल.

अपघात रोखण्यासाठी AI ची मदत –

दरम्यान, रेल्वेचे अपघात रोखण्यासाठी आता AI ची मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी भारतीय रेल्वे (IR) ने मशीन व्हिजन बेस्ड इन्स्पेक्शन सिस्टम (MVIS) बसवण्यासाठी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (DFCCIL) सोबत सामंजस्य करार (MoU) केला आहे. एमव्हीआयएस हे रस्त्याच्या कडेला तैनात केलेले एक आधुनिक, एआय/एमएल-आधारित तंत्रज्ञान आहे. हि सिस्टीम धावत्या ट्रेनच्या अंडर-गियरचे HD फोटो काढते आणि कोणतेही लटकलेले, सैल किंवा गहाळ पार्ट ऑटोमॅटिक शोधते. जर काही दोष किंवा तांत्रिक बिघाड आढळला तर ही सिस्टीम रिअल-टाइम अलर्ट पाठवते. MVIS च्या अंमलबजावणीमुळे रेल्वे डब्यांची झीज आणि नुकसान यासाठी मशीन-आधारित तपासणी शक्य होईल. तसेच यामुळे मॅन्युअल तपासणीतील चुका दूर होतील.

रेल्वे बोर्डाचे संचालक सुमित कुमार आणि DFCCIL चे GGM जवाहर लाल यांनी रेल भवन नवी दिल्ली येथे औपचारिकपणे सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या सामंजस्य करारांतर्गत, DFCCIL चार MVI युनिट्सची खरेदी, पुरवठा, स्थापना, चाचणी आणि कमिशनिंगसाठी जबाबदार असेल. भारतीय रेल्वे विभागात अशा प्रकारची AI सिस्टीम प्रथमच वापरली जाणार आहे. या नव्या AI तंत्रज्ञानामुळे रेल्वे सुरक्षितता वाढेल, आणि संभाव्य अपघात टाळण्यास मदत होईल अशी आशा आहे.

Train Fire At Tirupati Railway Station : तिरुपती रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस ट्रेनला लागली आग

Train Fire At Tirupati Railway Station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Train Fire At Tirupati Railway Station । तिरुपती रेल्वे स्थानकातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. रेल्वे स्टेशन यार्डमध्ये उभ्या असलेल्या हिसार एक्सप्रेस आणि रायलसीमा एक्सप्रेसच्या डब्यांना आग लागली आहे. ट्रेनच्या २ डब्ब्याना ही आग लागली, मात्र आग लागल्यानंतर, रेल्वे कर्मचाऱ्यांनी बाकीचे डबे यशस्वीरित्या वेगळे केले, ज्यामुळे आणखी कोणतेही नुकसान झाले नाही. ट्रेनच्या डब्यांना आग लागताच एकच गोंधळ उडाला. परंतु महत्वाची बाब म्हणजे या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

नेमकं काय घडलं ? Train Fire At Tirupati Railway Station

हिसार एक्सप्रेस आणि रायलसीमा एक्सप्रेस गाड्या एकमेकांना समांतर उभ्या होत्या. त्यामुळे आग लागली तेव्हा दोन्ही गाड्यांचे डबे एकाच वेळी जळू लागले. महत्वाचं म्हणजे ज्या ट्रेनला आग लागली त्याच्या शेजारील ट्रॅकवर वंदे भारत ट्रेन येत होती, परंतु ती वेळीच थांबवण्यात आली आणि मोठी दुर्घटना टळली. ज्यावेळी आग लागली त्यावेळी हिसार आणि रायलसीमा एक्सप्रेस रिकामी होती. दोन्ही ट्रेन मध्ये कोणीही प्रवाशी नव्हता त्यामुळे कोणतेही नुकसान झाले नाही. मात्र, वंदे भारत ट्रेनला आग लागली असती तर मोठी दुर्घटना घडू शकली असती.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. परंतु आगीचा भडका (Train Fire At Tirupati Railway Station) इतका मोठा होता कि जवळपास १ तास वीजवण्यासाठी लागला. आग आणि धूर इतका तीव्र होता की काही काळ घबराटीचे वातावरण होते. आग विझवल्यानंतर, रेल्वे ट्रॅकवर उभे असलेले जळालेले रेल्वेचे डबे काढण्याचे काम सुरू आहे. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही, परंतु सुरुवातीच्या तपासात आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचा संशय आहे. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून या आगीची अधिक चौकशी सुरु आहे.

या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जुन्या डब्यांमध्ये नियमित देखभाल आणि तांत्रिक तपासणीचा अभाव अशा घटनांना कारणीभूत ठरतायत का असाही प्रश्न यामुळं समोर आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर पावले उचलली जातील अशी ग्वाही रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

Mumbai Central Railway Station : मुंबई सेंट्रलचे नाव बदलणार; मुख्यमंत्र्यांची महत्वाची माहिती

Mumbai Central Railway Station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Central Railway Station । मुंबईतील महत्वाचे रेल्वे स्थानक असलेल्या मुंबई सेंट्रलचे आता नामांतर होणार आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला नाना जगन्नाथ शंकर शेठ’ यांचं नाव देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव सध्या केंद्र सरकारकडे विचाराधीन आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य पावसाळी विधिमंडळ अधिवेशनात याबाबत माहिती दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाल्यानंतर महाराष्ट्रासाठी हि आणखी एक गुड न्यूज म्हणावी लागेल.

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत हा विषय काढला. आपल्या देशात पहिली रेल्वे आणण्याचे काम नाना जगन्नाथ शंकरशेठ यांनी केले. त्यांचे नाव मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनला (Mumbai Central Railway Station) द्यावे, अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात केंद्र सरकारकडे मुंबई सेंट्रल स्टेशनचं नामकरण ‘नाना शंकर शेठ’ यांच्या नावावर करावं असा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. सध्या हा प्रस्ताव निर्णय प्रक्रियेत आहे. त्याचा पाठपुरावा करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनचा भव्य पुनर्विकास सध्या सुरू असून, स्टेशन तयार करताना जो आराखडा तयार करण्यात आला आहे, त्या आराखड्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे अशी माहिती फडणवीसांनी दिली.

मुंबई सेंट्रल स्थानकाचे महत्व – Mumbai Central Railway Station

मुंबई सेंट्रल हे पश्चिम रेल्वेचे एक महत्त्वाचे टर्मिनल आहे, जे मुंबईला देशाच्या विविध भागांशी जोडते. येथून दिल्ली, अहमदाबाद, जयपूर, सूरत, वडोदरा यासारख्या शहरांसाठी दीर्घ पल्ल्याच्या गाड्या धावतात, तसेच राजधानी एक्सप्रेस आणि शताब्दी एक्सप्रेस सारख्या प्रीमियम गाड्यांचेही येथून संचलन होते. मुंबई सेंट्रल स्थानकाचे ऐतिहासिक, वास्तुशास्त्रीय आणि वाहतूकदृष्ट्या मोठं महत्व आहे. हे स्थानक १८ डिसेंबर १९३० रोजी उघडण्यात आले. त्यावेळी ‘Bombay Central’ म्हणून प्रसिद्ध, असलेले हे स्थानक १९९७ मध्ये ‘Mumbai Central’ झाले. दररोज लाखो प्रवासी या स्थानकाचा वापर करतात, विशेषतः उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी….. मुंबई सेंट्रल स्थानक (Mumbai Central Railway Station) हे व्यावसायिक आणि पर्यटक प्रवाशांचे प्रमुख केंद्र आहे त्यामुळे मुंबईच्या दैनंदिन जीवनात आणि अर्थव्यवस्थेत मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाची महत्त्वाची भूमिका आहे.

विमानाला ट्रकची धडक!! मुंबईत घडली दुर्घटना

mumbai airport akasa

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज एक विचित्र घटना घडली आहे. आज सोमवारी दुपारी मुंबई विमानतळावर उभ्या असलेल्या अकासा विमानाला एका मालवाहतूक ट्रकने धडक दिली. या धडकेत विमानाच्या पंखाचे थोडेफार नुकसान झालं आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही . सध्या या घटनेची चौकशी सुरू असल्याची माहिती अकासा एअरच्या प्रवक्त्याने सांगितले.

नेमकं काय घडलं?

अकासा कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, सदर विमान हे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभे होते. त्याच वेळी एक मालवाहतूक करणारा ट्र्क विमानाच्या संपर्कात आला. आणि विमानाला धडक दिली. या धडकेत कर्मचाऱ्यांना किंवा प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. या अपघातामुळे विमानाचे किती नुकसान झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, घटनास्थळावरील एका फोटोमध्ये विमानाचा एक पंख ट्रकमधून किंचित बाहेर पडल्याचे दिसून येते. म्हणजेच थोडं का होईना पण विमानाला फटका बसला आहे.

दरम्यान, भारतीय विमानतळांवर जमिनीवरील अपघातांमध्ये वाढ रोखण्यासाठी वर्षानुवर्षे प्रयत्न केले जात आहेत. डीजीसीएने सहा वर्षांपूर्वी असे आदेश दिले होते की ऑपरेटर्सना वाहने चालविण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि चालकांना एअरसाइड ड्रायव्हिंग नियमांचे आवश्यक ज्ञान आहे याची खात्री करावी लागेल. २०१९ मध्ये जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे: “विमानतळांवर होणाऱ्या घटनांना आळा घालण्यासाठी, डीजीसीएने विमानतळाच्या हवाई मार्गावरील सुरक्षा मानकांचे बेंचमार्क करण्यासाठी एक तपशीलवार चेकलिस्ट विकसित केली आहे… मात्र मागच्या महिन्यातील अहमदाबाद विमान अपघानंतर अनेकदा विमानांचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं… काही उड्डाणे रद्द झाली… विमानांमध्ये सातत्याने तांत्रिक बिघाड दिसत असल्याने विमान प्रवाशी चिंतेत आहेत.

Privatization of ST : ST चे खासगीकरण होणार?? प्रताप सरनाईक यांनी सांगूनच टाकलं

Privatization of ST

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Privatization of ST । मागील काही वर्षापासून राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसचे खासगीकरण होणार अश्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये चिंतेचं वातावरण बघायला मिळाल होते. एसटीचे खासगीकरण झाल्यास संभाव्य फायदा- तोट्यावर सुद्धा अनेकदा चर्चा झाल्याचे पाहायला मिळालं. मात्र आता खुद्द राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनीच याबाबतच स्पष्ट माहिती देत लोकांच्या मनातील संभ्रम दूर केला आहे. कोणत्याही परिस्थितीत एसटीचे खासगीकरण होऊ देणार नाही असं प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं.

MSRTC ही एक स्वायत्त संस्था- Privatization of ST

मुंबईतील परळ बसस्थानकामध्ये कामगार नेते भाई जगताप यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय एसटी कामगार काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांच्या पुढाकाराने कर्मचारी व प्रवाशांसाठी जलशीतकाचे लोकार्पण करताना प्रताप सरनाईक म्हणाले, सुमारे ८३,००० लोकांना रोजगार देणारी राज्य परिवहन संस्था ही सार्वजनिक संस्था राहील. “MSRTC ही एक स्वायत्त संस्था आहे. अशावेळी खाजगीकरणाचा (Privatization of ST) प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेऊ नये असं आवाहन प्रताप सरनाईक यांनी केलं.

ते पुढे म्हणाले, एसटीचा कर्मचारी अत्यंत मेहनती आहे. तो काम करीत असलेल्या ठिकाणी त्याला मूलभूत सोयी – सुविधा पुरविणे ही एसटी प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे. एसटी कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छ शौचालये, योग्य विश्रांतीची जागा आणि अगदी ताजे धुतलेले गणवेश आणि केस कापणे आणि दाढी करणे यासारख्या सौंदर्यप्रसाधनांच्या सेवा देखील लवकरच उपलब्ध होतील. यासाठी लवकरच एका खाजगी एजन्सी नेमण्यात येईल. त्यांच्याकडून विश्रांती गृहाच्या स्वच्छतेबरोबर कर्मचाऱ्यांचे गणवेश स्वच्छ धुऊन इस्त्री करून कर्मचाऱ्यांना देण्याबाबत व्यवस्था करण्यात येणार आहे, शेवटी चांगले वातावरण म्हणजे चांगले काम असं म्हणत एसटी कर्मचाऱ्यांचे कल्याण वाढवल्याने, कर्मचाऱ्यांच्या मुलभूत गरजांकडे अशा प्रकारे लक्ष दिल्यास एमएसआरटीसीची कार्यक्षमता आणि उत्पादन सुधारेल अशी अपेक्षाही प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली.

बच्चू कडूंची मोठी घोषणा!! 24 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन

bachhu kadu chakkajam andolan

अमरावती । शेतकरी कर्जमाफी आणि हमीभावासाठी येत्या २४ तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करणारा असल्याची घोषणा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केली आहे. गेल्या सात दिवसांपासून सुमारे 138 किलोमीटर पायी प्रवास पूर्ण करत बच्चू कडू यांच्या पदयात्रेचा आज देशातील पहिली नोंदणी झालेली आत्महत्या स्व. साहेबराव करपे यांचे गाव चिलगव्हाण येथे समारोप झाला. यावेळी समारोपाच्या भाषणात बच्चू कडू यांनी सरकारवर टीकेची झोड उठवत चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील हे सुद्धा उपस्थित होते.

चिलगव्हाण येथील समारोप भाषणात बच्चू कडू म्हणाले, आपल्याला शेतकरी आणि शेतमजूर या दोघांनाही सोबत घ्यायचं आहे. मेंढपाळ असो वा मच्छीमार असो, या सर्वांचे प्रश्न आपण मांडलेत. आपण असेच काम करत राहिलो तर २ ऑक्टोबरच्या आतच सातबारा कोरा होईल. याचाच भाग म्हणजे २४ तारखेला २ तास आपण संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करू. ते आंदोलन कस करायचे याबाबतची कल्पना मी तुम्हाला फोन करून देईन. परंतु आंदोलनाच्या २ दिवस आधी घरी थांबू नका, कारण पोलीस तुम्हाला पकडून घेऊन जातील. त्यामुळे २ दिवस घरापासून बाहेर रहा आणि २४ तारखेला सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत २ तास संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम करूया.

ते पुढे म्हणाले, आयुष्यात पद आणि मान – सन्मान हेच सगळं काही असं नसतं, आमच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या तरी आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट झाली. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आम्ही एक उपाय सांगितला आहे, पेरणी ते कापणीपर्यंतच सगळा खर्च महात्मा गांधी रोजगार हमी अंतर्गत व्हावा. आता पेरणी ते कापणी पर्यंत जी मजुरी लागते ती मजुरी मनरेगाच्या माध्यमातून कव्हर केली तर शेतकऱ्याचा ६० टक्के खर्च वाचेल. .. त्यामुळे गावातील मजूरही सुखी होईल आणि शेतकऱ्याचा खर्चही वाचेल. तसेच दुर्दैवाने गारपीठ वगैरे जरी आली तरी शेतकऱ्याचं नुकसान हे ४० टक्केच होणार आहे. म्हणजेच नुकसान भरपाईची चिंता राहणार नाही आणि भाव जरी कमी मिळाला तरी शेतकरी फायद्यात राहील असं बच्चू कडू यांनी म्हंटल.

Bullet Train : मुंबईनंतर आता ‘या’ शहराला मिळणार बुलेट ट्रेन; या 9 स्थानकांवर थांबणार

Bullet Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Bullet Train । एकीकडे मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर असताना आता देशाला आणखी एक नवीन बुलेट ट्रेन मिळणार आहे. दिल्ली ते हावडा अशी हि बुलेट ट्रेन असणार आहे. नुकतंच या बुलेट ट्रेनचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्याबाबतचा अहवाल रेल्वे मंत्रालयालाकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्थावित बुलेट ट्रेनचे बांधकाम २ टप्प्यात केले जाईल. पहिल्या टप्प्यात दिल्ली ते वाराणसी दरम्यानचे काम पूर्ण केले जाईल, तर दुसऱ्या टप्प्यात वाराणसी ते हावडा हे काम पूर्ण केले जाईल. या मोठ्या प्रकल्पासाठी एकूण ५ लाख कोटी रुपये खर्च केले जातील. देशाच्या राजधानी पासून पूर्वेकडील भागाला या बुलेट ट्रेन मुळे मोठा फायदा होणार आहे.

कसा असेल रूट – Bullet Train

दिल्ली ते हावडा हि बुलेट ट्रेन (Bullet Train) दिल्ली आणि पश्चिम बंगाल या २ राज्याना जोडण्याचे काम करेल. तसेच या दोन्ही राज्यांदरम्यान येणाऱ्या इतर राज्यातील कनेक्टिव्हिटी सुद्धा सुधारेल. हि बुलेट ट्रेन दिल्लीपासून सुरू होईल. दिल्लीहून निघाल्यानंतर, ट्रेन थेट आग्रा कॅन्टला पोहोचेल. आग्रा कॅन्टनंतर, कानपूर सेंट्रल, नंतर अयोध्या आणि लखनऊ मार्गे वाराणसीला पोहोचेल. वाराणसीनंतर, ती पटनाला पोहोचेल. पाटणा नंतर हि बुलेट ट्रेन पश्चिम बंगाल मध्ये एंट्री करेन आणि शेवटचा स्टॉप असलेल्या हावडा जंक्शनला पोचेल. या बुलेट ट्रेन प्रकल्पाची लांबी 1669 किलोमीटर इतकी राहणार असून ती मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रमाणे ताशी 350 किलोमीटर इतक्या वेगाने धावेल.

साडेसहा तासांचा प्रवास वाचणार

प्रस्तावित बुलेट ट्रेनमुळे (Bullet Train) दिल्ली आणि हावडा (Delhi To Howrah) दरम्यानचा प्रवास वेळ साडेसहा तासांपर्यंत कमी होईल. यामध्ये दिल्ली ते पाटणा (१०७८ किमी) चार तासांचा प्रवास आणि पटणा ते हावडा (५७८ किमी) दोन तासांचा प्रवास समाविष्ट आहे. दिल्लीहून सुटल्यानंतर, बुलेट ट्रेन उत्तर प्रदेशातील ५, बिहारमधील एका आणि पश्चिम बंगालमधील दोन स्थानकांवर थांबेल. दिल्ली, आग्रा कॅन्ट, कानपूर सेंट्रल, अयोध्या, लखनऊ, वाराणसी, पाटणा, आसनसोल आणि हावडा ही 9 स्थानक या बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत विकसित होणार आहेत. रेल्वे या ट्रेनसाठी पाटण्यामध्ये ६० किमीचा एलिव्हेटेड ट्रॅक बांधणार आहे.

शेतकरी एकजुटीसाठी नव्या क्रांतीची सुरुवात; ‘7/12 कोरा कोरा’ यात्रेतून बच्चू कडूंचा 138 किमी पायी प्रवास

Bachhu Kadu Padyatra

अमरावती प्रतिनिधी । शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी गेल्या सात दिवसांपासून सुमारे 138 किलोमीटर पायी प्रवास पूर्ण करत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांची पदयात्रेचा आज समारोप होत आहे. ७/१२ कोरा कोरा या यात्रेच्या माध्यमातून बच्चू भाऊंनी आज शेतकरी एकजुटीसाठी नव्या क्रांतीची सुरुवात केली आहे. शेतकरी एक झाला, जात, पात, धर्म आणि राजकीय विचार बाजूला ठेऊन शेतकरी एकवटला तर त्याला रोखण्याची ताकद कोणातच नाही. म्हणूनच जाती-पातीत आणि वेगवेगळ्या पक्षाच्या झेंड्यांखाली विखुरलेल्या शेतकऱ्याला एकत्र करण्यासाठी बच्चू भाऊंनी ७/१२ कोरा यात्रा काढली आहे. त्यांच्या या यात्रेस गावागावातील शेतकऱ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.

देशाचे पहिले कृषिमंत्री पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापळ ते देशातील पहिली नोंदणी झालेली आत्महत्या स्व. साहेबराव करपे यांचे गाव चिलगव्हाण अशी यात्रा काढून बच्चू भाऊंनी शेतकरी कष्टकरी वर्गाला एक करन नव्या क्रांतीची सुरुवात केली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या भूमीतून ७/१२ कोरा पदयात्रा काढून नाईक साहेबांच्या शेतकरी भिमुक धोरणांची आठवन आत्ताच्या गेंड्याचे कातडे असलेल्या आणि फक्त मोठ्या उद्योगपतींचा नफा पाहणाऱ्या सरकारला करून दिली आहे. ही तर फक्त सुरुवात, ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे. येणाऱ्या काळात बच्चूभाऊ संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत.

सध्या देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. मागील ३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. दर ८ तासांनी १ शेतकरी आत्महत्या करतो आहे. मात्र, फडणवीस साहेब समित्यांवर समित्या नेमून कर्जमाफी पुढे ढकलत आहेत. सरकारला अजून किती शेतकऱ्यांचे मुडदे पडलेले पाहायचे आहेत? असा प्रश्न यामुळे उपस्थित होतो आहे. त्यामुळे सरकारला वठणीवर आणायचे असेल तर शेतकरी एकजुटीशिवाय पर्याय नाही.

म्हणून बच्चूभाऊंच्या या नव्या क्रांतीची सुरवात महाराष्ट्रातील शेतकरी कष्टकरी यांच्या जीवनात आनंद आणण्यासाठी आहे हे लक्षात घेतले पाहिजे. बच्चूभाऊंची लढाई गरीबाच्या घरात पैसे आणण्यासाठी आहे. त्यामुळे आता संपूर्ण कर्जमाफीसह सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय आता थांबायचं न्हाय.

Mhada Lottery 2025 : Mhada अंतर्गत 5,285 घरांसाठी लॉटरी जाहीर; असा भरा अर्ज

Mhada Lottery 2025

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mhada Lottery 2025 । आपल्या हक्काचं घर खरेदी करण्याची मोठी संधी मध्यमवर्गीयांसाठी चालून आली आहे. म्हाडा अंतर्गत तब्बल 5,285 घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. हि लॉटरी कोकण विभागा अंतर्गत जाहीर करण्यात आली आहे. म्हाडाच्या या लॉटरीच्या माध्यमातून ठाणे, पालघर, बदलापूर, सिंधुदुर्ग आदी भागांत घरं उपलब्ध होणार आहेत. आजपासून, म्हणजेच 14 जुलै 2025 पासून या लॉटरी साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. तर अर्ज भरण्याची अंतिम तारीख 13 ऑगस्ट 2025 आहे.

लॉटरी 5 घटकांमध्ये विभागण्यात आली – Mhada Lottery 2025

कोकण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली ही लॉटरी पाच घटकांमध्ये विभागण्यात आली आहे.

१) २० टक्के सर्वसमावेशक योजनेंतर्गत ५६५ सदनिका,

२) १५ टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेंतर्गत ३००२ सदनिका,

३) म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेल्या सदनिका आहेत त्या स्थितीत या योजनेंतर्गत १६७७ सदनिका, Mhada Lottery 2025

४) म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेंतर्गत (५० टक्के परवडणाऱ्यास सदनिका) ४१ घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

५) म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेंतर्गत ७७ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

लॉटरीसाठी (Mhada Lottery 2025) स्वीकृत अर्जाची प्रारूप यादी २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.०० वाजता ‘म्हाडा’च्या https://housing.mhada.go v.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रारूप यादीवरील दावे व हरकती नोंदविण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत आहे. त्यानंतर, सोडतीसाठी पात्र अर्जांची अंतिम यादी 1 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6.00 वाजता संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. लॉटरी साठी अर्ज भरताना अर्जदारांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी ०२२ – ६९४६८१०० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी केले आहे.

महत्वाच्या तारखा –

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 13 ऑगस्ट 2025, रात्री 11:59 वाजेपर्यंत

अनामत रक्कम भरण्याची अंतिम तारीख: 14 ऑगस्ट 2025, रात्री 11:59 वाजेपर्यंत

प्रारूप पात्र अर्ज यादी: 21 ऑगस्ट 2025, संध्याकाळी 6:00 वाजता

दावे आणि हरकती सादर करण्याची अंतिम तारीख: 25 ऑगस्ट 2025

अंतिम पात्र अर्ज यादी: 1 सप्टेंबर 2025, संध्याकाळी 6:00 वाजता

दरम्यान, संगणकीय सोडत प्रणाली ही संपूर्णतः ऑनलाईन व पारदर्शक असून यामध्ये कोणत्याही प्रकारे मानवीय हस्तक्षेपास वाव नाही. शिवाय या सदनिकांच्या विक्रीकरिता मंडळाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट नेमलेले नाही. त्यामुळे अर्जदाराने कोणत्याही त्रयस्थ / दलाल / मध्यस्थ व्यक्तीच्या प्रलोभनांना बळी पडू नये असं आवाहन म्हाडा कडून करण्यात आलं आहे.

Amazon Now : Amazon वरून फक्त 10 मिनिटांत होणार डिलिव्हरी

Amazon Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Amazon Now । प्रसिद्ध इ कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon ने क्विक कॉमर्स क्षेत्रात एंट्री मारली आहे. कंपनीने आता अवघ्या १० मिनिटांची डिलिव्हरी करणारी Amazon Now हि सेवा सुरु केली आहे. सध्या देशाची राजधानी नवी दिल्लीत हि सर्व्हिस सुरु करण्यात आली आहे. यापूर्वी ती बंगळुरू मध्ये सुरु करण्यात आली होती. लवकरच या सेवेचा अन्य शहरातही विस्तार होईल. अमेझॉनच्या या निर्णयाचा फटका Zepto, Blinkit आणि Instamart सारख्या कंपन्यांना बसेल असं बोललं जात आहे. या सर्व कंपन्या किराणा सामान, फळे, भाज्या, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, सौंदर्य उत्पादने इत्यादी वस्तू १० ते १५ मिनिटांत पोहोचवण्याचा दावा करतात.

इन्स्टंट डिलिव्हरी मार्केटमध्ये दबदबा वाढणार – Amazon Now

Amazon Now चे उद्दिष्ट ग्राहकांना फक्त १० मिनिटांत दररोजच्या गरजेच्या वस्तू थेट त्यांच्या घरात पोहोचवणे आहे. यामध्ये किराणा, नाश्ता, मांस, वैयक्तिक काळजी उत्पादने आणि ताजी फळे आणि भाज्या यासारख्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. आतापर्यंत Amazon त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी त्यांचे सामान डिलिव्हर करत होते, परंतु आता ते १० मिनिटांत डिलिव्हरी देऊन शहरी ग्राहकांच्या वेगाने बदलणाऱ्या गरजा पूर्ण करू इच्छिते. ही सेवा जलद डिलिव्हरीसाठी विशेषतः डिझाइन केलेल्या स्थानिक डिलिव्हरी हब आणि मायक्रो-हाऊसिंग सिस्टमवर आधारित आहे. या नव्या सेवेच्या माध्यमातून कंपनी वेगाने वाढणाऱ्या इन्स्टंट डिलिव्हरी मार्केटमध्ये आपला दबदबा वाढवण्याचा प्रयत्न करेल.

याबाबत अमेझॉनने म्हटले आहे की बेंगळुरूमध्ये मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे कंपनीला खूप सकारात्मक संकेत मिळाले आहेत. त्यामुळेच आता बंगळुरू पाठोपाठ देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीमध्ये Amazon Now सर्व्हिस सुरू करण्यात आली आहे. लवकरच ही सेवा इतर शहरांमध्येही सुरू केली जाईल. Amazon Now च्या एंट्री मुळे Quick Commerce मार्केट मध्ये स्पर्धा आणखी वाढली आहे.

गेल्या महिन्यात, Amazon ने भारतात त्यांची डिलिव्हरी सेवा आणखी चांगली करण्यासाठी २,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली. या गुंतवणुकीद्वारे, कंपनी आता मोठ्या प्रमाणात डार्क स्टोअर्स उघडणार आहे. हे डार्क स्टोअर्स लहान गोदामांसारखे आहेत, जे शहरांच्या अंतर्गत भागात बांधले जातात ज्यामुळे डिलिव्हरी जलद पद्धतीने करता येते.