Thursday, December 18, 2025
Home Blog Page 46

Privatization of ST : ST चे खासगीकरण होणार?? प्रताप सरनाईक यांनी सांगूनच टाकलं

Privatization of ST

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Privatization of ST । मागील काही वर्षापासून राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसचे खासगीकरण होणार अश्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये चिंतेचं वातावरण बघायला मिळाल होते. एसटीचे खासगीकरण झाल्यास संभाव्य फायदा- तोट्यावर सुद्धा अनेकदा चर्चा झाल्याचे पाहायला मिळालं. मात्र आता खुद्द राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनीच याबाबतच स्पष्ट माहिती देत लोकांच्या मनातील संभ्रम दूर केला आहे. कोणत्याही परिस्थितीत एसटीचे खासगीकरण होऊ देणार नाही असं प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं.

MSRTC ही एक स्वायत्त संस्था- Privatization of ST

मुंबईतील परळ बसस्थानकामध्ये कामगार नेते भाई जगताप यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय एसटी कामगार काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांच्या पुढाकाराने कर्मचारी व प्रवाशांसाठी जलशीतकाचे लोकार्पण करताना प्रताप सरनाईक म्हणाले, सुमारे ८३,००० लोकांना रोजगार देणारी राज्य परिवहन संस्था ही सार्वजनिक संस्था राहील. “MSRTC ही एक स्वायत्त संस्था आहे. अशावेळी खाजगीकरणाचा (Privatization of ST) प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेऊ नये असं आवाहन प्रताप सरनाईक यांनी केलं.

ते पुढे म्हणाले, एसटीचा कर्मचारी अत्यंत मेहनती आहे. तो काम करीत असलेल्या ठिकाणी त्याला मूलभूत सोयी – सुविधा पुरविणे ही एसटी प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे. एसटी कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छ शौचालये, योग्य विश्रांतीची जागा आणि अगदी ताजे धुतलेले गणवेश आणि केस कापणे आणि दाढी करणे यासारख्या सौंदर्यप्रसाधनांच्या सेवा देखील लवकरच उपलब्ध होतील. यासाठी लवकरच एका खाजगी एजन्सी नेमण्यात येईल. त्यांच्याकडून विश्रांती गृहाच्या स्वच्छतेबरोबर कर्मचाऱ्यांचे गणवेश स्वच्छ धुऊन इस्त्री करून कर्मचाऱ्यांना देण्याबाबत व्यवस्था करण्यात येणार आहे, शेवटी चांगले वातावरण म्हणजे चांगले काम असं म्हणत एसटी कर्मचाऱ्यांचे कल्याण वाढवल्याने, कर्मचाऱ्यांच्या मुलभूत गरजांकडे अशा प्रकारे लक्ष दिल्यास एमएसआरटीसीची कार्यक्षमता आणि उत्पादन सुधारेल अशी अपेक्षाही प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली.

बच्चू कडूंची मोठी घोषणा!! 24 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन

bachhu kadu chakkajam andolan

अमरावती । शेतकरी कर्जमाफी आणि हमीभावासाठी येत्या २४ तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करणारा असल्याची घोषणा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केली आहे. गेल्या सात दिवसांपासून सुमारे 138 किलोमीटर पायी प्रवास पूर्ण करत बच्चू कडू यांच्या पदयात्रेचा आज देशातील पहिली नोंदणी झालेली आत्महत्या स्व. साहेबराव करपे यांचे गाव चिलगव्हाण येथे समारोप झाला. यावेळी समारोपाच्या भाषणात बच्चू कडू यांनी सरकारवर टीकेची झोड उठवत चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील हे सुद्धा उपस्थित होते.

चिलगव्हाण येथील समारोप भाषणात बच्चू कडू म्हणाले, आपल्याला शेतकरी आणि शेतमजूर या दोघांनाही सोबत घ्यायचं आहे. मेंढपाळ असो वा मच्छीमार असो, या सर्वांचे प्रश्न आपण मांडलेत. आपण असेच काम करत राहिलो तर २ ऑक्टोबरच्या आतच सातबारा कोरा होईल. याचाच भाग म्हणजे २४ तारखेला २ तास आपण संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करू. ते आंदोलन कस करायचे याबाबतची कल्पना मी तुम्हाला फोन करून देईन. परंतु आंदोलनाच्या २ दिवस आधी घरी थांबू नका, कारण पोलीस तुम्हाला पकडून घेऊन जातील. त्यामुळे २ दिवस घरापासून बाहेर रहा आणि २४ तारखेला सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत २ तास संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम करूया.

ते पुढे म्हणाले, आयुष्यात पद आणि मान – सन्मान हेच सगळं काही असं नसतं, आमच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या तरी आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट झाली. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आम्ही एक उपाय सांगितला आहे, पेरणी ते कापणीपर्यंतच सगळा खर्च महात्मा गांधी रोजगार हमी अंतर्गत व्हावा. आता पेरणी ते कापणी पर्यंत जी मजुरी लागते ती मजुरी मनरेगाच्या माध्यमातून कव्हर केली तर शेतकऱ्याचा ६० टक्के खर्च वाचेल. .. त्यामुळे गावातील मजूरही सुखी होईल आणि शेतकऱ्याचा खर्चही वाचेल. तसेच दुर्दैवाने गारपीठ वगैरे जरी आली तरी शेतकऱ्याचं नुकसान हे ४० टक्केच होणार आहे. म्हणजेच नुकसान भरपाईची चिंता राहणार नाही आणि भाव जरी कमी मिळाला तरी शेतकरी फायद्यात राहील असं बच्चू कडू यांनी म्हंटल.

Bullet Train : मुंबईनंतर आता ‘या’ शहराला मिळणार बुलेट ट्रेन; या 9 स्थानकांवर थांबणार

Bullet Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Bullet Train । एकीकडे मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर असताना आता देशाला आणखी एक नवीन बुलेट ट्रेन मिळणार आहे. दिल्ली ते हावडा अशी हि बुलेट ट्रेन असणार आहे. नुकतंच या बुलेट ट्रेनचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्याबाबतचा अहवाल रेल्वे मंत्रालयालाकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्थावित बुलेट ट्रेनचे बांधकाम २ टप्प्यात केले जाईल. पहिल्या टप्प्यात दिल्ली ते वाराणसी दरम्यानचे काम पूर्ण केले जाईल, तर दुसऱ्या टप्प्यात वाराणसी ते हावडा हे काम पूर्ण केले जाईल. या मोठ्या प्रकल्पासाठी एकूण ५ लाख कोटी रुपये खर्च केले जातील. देशाच्या राजधानी पासून पूर्वेकडील भागाला या बुलेट ट्रेन मुळे मोठा फायदा होणार आहे.

कसा असेल रूट – Bullet Train

दिल्ली ते हावडा हि बुलेट ट्रेन (Bullet Train) दिल्ली आणि पश्चिम बंगाल या २ राज्याना जोडण्याचे काम करेल. तसेच या दोन्ही राज्यांदरम्यान येणाऱ्या इतर राज्यातील कनेक्टिव्हिटी सुद्धा सुधारेल. हि बुलेट ट्रेन दिल्लीपासून सुरू होईल. दिल्लीहून निघाल्यानंतर, ट्रेन थेट आग्रा कॅन्टला पोहोचेल. आग्रा कॅन्टनंतर, कानपूर सेंट्रल, नंतर अयोध्या आणि लखनऊ मार्गे वाराणसीला पोहोचेल. वाराणसीनंतर, ती पटनाला पोहोचेल. पाटणा नंतर हि बुलेट ट्रेन पश्चिम बंगाल मध्ये एंट्री करेन आणि शेवटचा स्टॉप असलेल्या हावडा जंक्शनला पोचेल. या बुलेट ट्रेन प्रकल्पाची लांबी 1669 किलोमीटर इतकी राहणार असून ती मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रमाणे ताशी 350 किलोमीटर इतक्या वेगाने धावेल.

साडेसहा तासांचा प्रवास वाचणार

प्रस्तावित बुलेट ट्रेनमुळे (Bullet Train) दिल्ली आणि हावडा (Delhi To Howrah) दरम्यानचा प्रवास वेळ साडेसहा तासांपर्यंत कमी होईल. यामध्ये दिल्ली ते पाटणा (१०७८ किमी) चार तासांचा प्रवास आणि पटणा ते हावडा (५७८ किमी) दोन तासांचा प्रवास समाविष्ट आहे. दिल्लीहून सुटल्यानंतर, बुलेट ट्रेन उत्तर प्रदेशातील ५, बिहारमधील एका आणि पश्चिम बंगालमधील दोन स्थानकांवर थांबेल. दिल्ली, आग्रा कॅन्ट, कानपूर सेंट्रल, अयोध्या, लखनऊ, वाराणसी, पाटणा, आसनसोल आणि हावडा ही 9 स्थानक या बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत विकसित होणार आहेत. रेल्वे या ट्रेनसाठी पाटण्यामध्ये ६० किमीचा एलिव्हेटेड ट्रॅक बांधणार आहे.

शेतकरी एकजुटीसाठी नव्या क्रांतीची सुरुवात; ‘7/12 कोरा कोरा’ यात्रेतून बच्चू कडूंचा 138 किमी पायी प्रवास

Bachhu Kadu Padyatra

अमरावती प्रतिनिधी । शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी गेल्या सात दिवसांपासून सुमारे 138 किलोमीटर पायी प्रवास पूर्ण करत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांची पदयात्रेचा आज समारोप होत आहे. ७/१२ कोरा कोरा या यात्रेच्या माध्यमातून बच्चू भाऊंनी आज शेतकरी एकजुटीसाठी नव्या क्रांतीची सुरुवात केली आहे. शेतकरी एक झाला, जात, पात, धर्म आणि राजकीय विचार बाजूला ठेऊन शेतकरी एकवटला तर त्याला रोखण्याची ताकद कोणातच नाही. म्हणूनच जाती-पातीत आणि वेगवेगळ्या पक्षाच्या झेंड्यांखाली विखुरलेल्या शेतकऱ्याला एकत्र करण्यासाठी बच्चू भाऊंनी ७/१२ कोरा यात्रा काढली आहे. त्यांच्या या यात्रेस गावागावातील शेतकऱ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.

देशाचे पहिले कृषिमंत्री पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापळ ते देशातील पहिली नोंदणी झालेली आत्महत्या स्व. साहेबराव करपे यांचे गाव चिलगव्हाण अशी यात्रा काढून बच्चू भाऊंनी शेतकरी कष्टकरी वर्गाला एक करन नव्या क्रांतीची सुरुवात केली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या भूमीतून ७/१२ कोरा पदयात्रा काढून नाईक साहेबांच्या शेतकरी भिमुक धोरणांची आठवन आत्ताच्या गेंड्याचे कातडे असलेल्या आणि फक्त मोठ्या उद्योगपतींचा नफा पाहणाऱ्या सरकारला करून दिली आहे. ही तर फक्त सुरुवात, ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे. येणाऱ्या काळात बच्चूभाऊ संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत.

सध्या देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. मागील ३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. दर ८ तासांनी १ शेतकरी आत्महत्या करतो आहे. मात्र, फडणवीस साहेब समित्यांवर समित्या नेमून कर्जमाफी पुढे ढकलत आहेत. सरकारला अजून किती शेतकऱ्यांचे मुडदे पडलेले पाहायचे आहेत? असा प्रश्न यामुळे उपस्थित होतो आहे. त्यामुळे सरकारला वठणीवर आणायचे असेल तर शेतकरी एकजुटीशिवाय पर्याय नाही.

म्हणून बच्चूभाऊंच्या या नव्या क्रांतीची सुरवात महाराष्ट्रातील शेतकरी कष्टकरी यांच्या जीवनात आनंद आणण्यासाठी आहे हे लक्षात घेतले पाहिजे. बच्चूभाऊंची लढाई गरीबाच्या घरात पैसे आणण्यासाठी आहे. त्यामुळे आता संपूर्ण कर्जमाफीसह सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय आता थांबायचं न्हाय.

Mhada Lottery 2025 : Mhada अंतर्गत 5,285 घरांसाठी लॉटरी जाहीर; असा भरा अर्ज

Mhada Lottery 2025

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mhada Lottery 2025 । आपल्या हक्काचं घर खरेदी करण्याची मोठी संधी मध्यमवर्गीयांसाठी चालून आली आहे. म्हाडा अंतर्गत तब्बल 5,285 घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. हि लॉटरी कोकण विभागा अंतर्गत जाहीर करण्यात आली आहे. म्हाडाच्या या लॉटरीच्या माध्यमातून ठाणे, पालघर, बदलापूर, सिंधुदुर्ग आदी भागांत घरं उपलब्ध होणार आहेत. आजपासून, म्हणजेच 14 जुलै 2025 पासून या लॉटरी साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. तर अर्ज भरण्याची अंतिम तारीख 13 ऑगस्ट 2025 आहे.

लॉटरी 5 घटकांमध्ये विभागण्यात आली – Mhada Lottery 2025

कोकण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली ही लॉटरी पाच घटकांमध्ये विभागण्यात आली आहे.

१) २० टक्के सर्वसमावेशक योजनेंतर्गत ५६५ सदनिका,

२) १५ टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेंतर्गत ३००२ सदनिका,

३) म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेल्या सदनिका आहेत त्या स्थितीत या योजनेंतर्गत १६७७ सदनिका, Mhada Lottery 2025

४) म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेंतर्गत (५० टक्के परवडणाऱ्यास सदनिका) ४१ घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

५) म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेंतर्गत ७७ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

लॉटरीसाठी (Mhada Lottery 2025) स्वीकृत अर्जाची प्रारूप यादी २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.०० वाजता ‘म्हाडा’च्या https://housing.mhada.go v.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रारूप यादीवरील दावे व हरकती नोंदविण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत आहे. त्यानंतर, सोडतीसाठी पात्र अर्जांची अंतिम यादी 1 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6.00 वाजता संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. लॉटरी साठी अर्ज भरताना अर्जदारांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी ०२२ – ६९४६८१०० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी केले आहे.

महत्वाच्या तारखा –

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 13 ऑगस्ट 2025, रात्री 11:59 वाजेपर्यंत

अनामत रक्कम भरण्याची अंतिम तारीख: 14 ऑगस्ट 2025, रात्री 11:59 वाजेपर्यंत

प्रारूप पात्र अर्ज यादी: 21 ऑगस्ट 2025, संध्याकाळी 6:00 वाजता

दावे आणि हरकती सादर करण्याची अंतिम तारीख: 25 ऑगस्ट 2025

अंतिम पात्र अर्ज यादी: 1 सप्टेंबर 2025, संध्याकाळी 6:00 वाजता

दरम्यान, संगणकीय सोडत प्रणाली ही संपूर्णतः ऑनलाईन व पारदर्शक असून यामध्ये कोणत्याही प्रकारे मानवीय हस्तक्षेपास वाव नाही. शिवाय या सदनिकांच्या विक्रीकरिता मंडळाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट नेमलेले नाही. त्यामुळे अर्जदाराने कोणत्याही त्रयस्थ / दलाल / मध्यस्थ व्यक्तीच्या प्रलोभनांना बळी पडू नये असं आवाहन म्हाडा कडून करण्यात आलं आहे.

Amazon Now : Amazon वरून फक्त 10 मिनिटांत होणार डिलिव्हरी

Amazon Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Amazon Now । प्रसिद्ध इ कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon ने क्विक कॉमर्स क्षेत्रात एंट्री मारली आहे. कंपनीने आता अवघ्या १० मिनिटांची डिलिव्हरी करणारी Amazon Now हि सेवा सुरु केली आहे. सध्या देशाची राजधानी नवी दिल्लीत हि सर्व्हिस सुरु करण्यात आली आहे. यापूर्वी ती बंगळुरू मध्ये सुरु करण्यात आली होती. लवकरच या सेवेचा अन्य शहरातही विस्तार होईल. अमेझॉनच्या या निर्णयाचा फटका Zepto, Blinkit आणि Instamart सारख्या कंपन्यांना बसेल असं बोललं जात आहे. या सर्व कंपन्या किराणा सामान, फळे, भाज्या, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, सौंदर्य उत्पादने इत्यादी वस्तू १० ते १५ मिनिटांत पोहोचवण्याचा दावा करतात.

इन्स्टंट डिलिव्हरी मार्केटमध्ये दबदबा वाढणार – Amazon Now

Amazon Now चे उद्दिष्ट ग्राहकांना फक्त १० मिनिटांत दररोजच्या गरजेच्या वस्तू थेट त्यांच्या घरात पोहोचवणे आहे. यामध्ये किराणा, नाश्ता, मांस, वैयक्तिक काळजी उत्पादने आणि ताजी फळे आणि भाज्या यासारख्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. आतापर्यंत Amazon त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी त्यांचे सामान डिलिव्हर करत होते, परंतु आता ते १० मिनिटांत डिलिव्हरी देऊन शहरी ग्राहकांच्या वेगाने बदलणाऱ्या गरजा पूर्ण करू इच्छिते. ही सेवा जलद डिलिव्हरीसाठी विशेषतः डिझाइन केलेल्या स्थानिक डिलिव्हरी हब आणि मायक्रो-हाऊसिंग सिस्टमवर आधारित आहे. या नव्या सेवेच्या माध्यमातून कंपनी वेगाने वाढणाऱ्या इन्स्टंट डिलिव्हरी मार्केटमध्ये आपला दबदबा वाढवण्याचा प्रयत्न करेल.

याबाबत अमेझॉनने म्हटले आहे की बेंगळुरूमध्ये मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे कंपनीला खूप सकारात्मक संकेत मिळाले आहेत. त्यामुळेच आता बंगळुरू पाठोपाठ देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीमध्ये Amazon Now सर्व्हिस सुरू करण्यात आली आहे. लवकरच ही सेवा इतर शहरांमध्येही सुरू केली जाईल. Amazon Now च्या एंट्री मुळे Quick Commerce मार्केट मध्ये स्पर्धा आणखी वाढली आहे.

गेल्या महिन्यात, Amazon ने भारतात त्यांची डिलिव्हरी सेवा आणखी चांगली करण्यासाठी २,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली. या गुंतवणुकीद्वारे, कंपनी आता मोठ्या प्रमाणात डार्क स्टोअर्स उघडणार आहे. हे डार्क स्टोअर्स लहान गोदामांसारखे आहेत, जे शहरांच्या अंतर्गत भागात बांधले जातात ज्यामुळे डिलिव्हरी जलद पद्धतीने करता येते.

Air India Flight : एअर इंडियाचा भोंगळ कारभार!! 180 ऐवजी 155 प्रवाशांना घेऊन विमान हवेत उडालं

Air India Flight

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Air India Flight। एअर इंडियाचा आणखी एक भोंगळ कारभार समोर आला आहे. १८० प्रवाशांऐवजी विमान फक्त १५५ प्रवाशांना घेऊनच हवेत उडाले. इतर प्रवाशी तसेच विमानतळावर अडकून पडले. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. आसनांच्या कमतरतेमुळे अनेक प्रवाशांना मुंबईला जाता आले नाही, तर आधीच बुकिंग करूनही सीट न मिळाल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळाली. नेमक वाक्य घडलं ते आपण पाहूयात…

नेमकं काय घडलं? Air India Flight

एअर इंडियाच्या भूजहून मुंबईला जाणाऱ्या विमानामध्ये हा गोंधळ झाला. हे विमान १८० प्रवाशाना घेऊन मुंबईला जाणार होते, १८० तिकिटेही बुक झाली होती. मात्र ऐनवेळी १५५ जणांनाच घेऊन या विमानाने मुंबईच्या दिशेने उड्डाण केलं. यामुळे ज्यांना विमानात बसता आलं नाही त्या प्रवाशांनी गोंधळ केला. प्रवाशांनी एअर इंडिया एअरलाईनवर ‘गैरव्यवस्थापना’चे गंभीर आरोप केले. आगाऊ बुकिंग करूनही जागा मिळाली नाही, तसेच एअर इंडियाने कोणतीही पर्यायी व्यवस्था न केल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी बघायला मिळाली. विमान प्रवास न करता आल्याने प्रवाशांचे पुढचे नियोजनही बिघडलं.

प्रवाशांनी जेव्हा याबाबत एअरलाइन अधिकाऱ्यांशी चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितले की १८० आसने असलेले विमान (Air India Flight) मुंबईला जाण्यासाठी येणार होते, परंतु १५५ आसने असलेले विमान आले. कदाचित विमानात काही समस्या असेल, म्हणून विमान बदलण्याचा निर्णय शेवटच्या क्षणी घेण्यात आला. एअरलाइन अधिकाऱ्यांनी प्रवाशांच्या राहण्याची व्यवस्था एका खाजगी हॉटेलमध्ये केली आहे. तसेच, प्रवाशांना त्यांची फ्लाइट पुन्हा शेड्यूल करण्याची किंवा परतफेड करण्याची ऑफर देण्यात आली आहे.मात्र प्रवाशांचे पुढचं सगळं नियोजन फिस्कटलं आहे. काही जणांना मुंबईतील नातेवाईकांच्या घरी कार्यक्रमानिमित्त जायचं होते, काहींना ऑफिसला कामावर जायचं होते. मात्र ऐनवेळी विमानाने दगा दिल्याने त्यांचं सगळं प्लॅनिंग फिस्कटलं.

दरम्यान, अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाच्या विमानांना (Air India Flight) कायमच कोणता ना कोणता प्रॉब्लेम येताना दिसतोय. अलिकडेच टोकियोहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमान AI357 ला कोलकाता येथे आपत्कालीन लँडिंग करावे लागले… त्यापूर्वीही सलग ३-४ दिवस कुठे ना कुठे एअर इंडियाच्या विमानांचे इमर्जंसी लँडिंग करावं लागलं होते. त्यामुळे एअर इंडियाच्या प्रवासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय.

Fuel Control Switch : विमानाचे इंजिन बंद करणारे फ्युएल कंट्रोल स्विच म्हणजे काय??

Fuel Control Switch

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Fuel Control Switch । नुकतंच अहमदाबाद विमान अपघाताचे कारण स्पष्ट करणारा एक अहवाल समोर आला. या अहवालात असं म्हंटल गेलं आहे कि, उड्डाणानंतर काही सेकंदात दोन्ही इंजिनचे फ्यूएल स्विच बंद झाल्यामुळं इंजिनमध्ये इंधन पोहोचणं थांबलं. त्यामुळे विमान नियंत्रणाबाहेर गेले आणि क्रॅश झाले. कॉकपिटच्या व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये, एका वैमानिकाला विचारताना ऐकू येते की त्याने कटऑफ का केला. दुसऱ्या वैमानिकाने मी कट ऑफ केलं नाही असं उत्तर दिले. दोन्ही वैमानिकांनी अथक प्रयत्न केले खरे, परंतु अपघात रोखण्यात त्यांना यश आलं नाही. परंतु विमानाचे इंजिन बंद करणारे फ्युएल कंट्रोल स्विच म्हणजे काय ? आणि ते कसे काम करते हे तुम्हाला माहितेय का? चला तर मग याबाबत सविस्तर माहिती आज आपण जाणून घेऊयात.

तर मित्रानो, फ्युएल कंट्रोल स्विच (Fuel Control Switch) हे विमानाच्या इंजिनाच्या सुरक्षित आणि कार्यक्षम ऑपरेशनसाठी अत्यंत महत्त्वाचे असते कारण ते हा स्विच इंजिनमध्ये जाणारं इंधन नियंत्रित करतो. म्हणजे इंधन चालू ठेवायचं की बंद करायचं, हे त्यावरून ठरतं. पायलट विमान जमिनीवर असताना इंजिन सुरू करण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी किंवा उड्डाणादरम्यान इंजिनमध्ये बिघाड झाल्यास इंजिन मॅन्युअली थांबवण्यासाठी किंवा रिस्टार्ट करण्यासाठी त्यांचा वापर करतात. परंतु पायलट चुकूनही फ्यूएल स्विच बंद करू शकत नाही, कारण तो सहज किंवा चुकीने बंद होणारा नसतो. या स्विचेसच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या बाजूला ब्रॅकेट देण्यात आलेले असतात. याबरोबरच एक स्टॉप लॉक यंत्रणा देखील देण्यात आलेली असते जी वैमानिकांना स्विच त्याच्या RUN आणि CUTOFF अशा कोणत्याही एका स्थितीवरून दुसऱ्या स्थितीत हलवण्यापूर्वी ते उचलावे लागते.

कुठे असतो फ्युएल स्विच ? Fuel Control Switch

फ्युएल कंट्रोल स्विच सामान्यतः कॉकपिटमधील कंट्रोल पॅनलवर असते. याचे स्वरूप विमानाच्या प्रकारानुसार बदलू शकते, जसे की लीव्हर, बटण किंवा टॉगल स्विच… एअर इंडियाच्या बोईंग 787 विमानात दोन फ्यूएल कंट्रोल स्विच होते. हे दोन्ही स्विच विमानाच्या जीई इंजिन्सशी जोडलेले होते आणि ते थ्रस्ट लिव्हरच्या खाली बसवले होते. हा थ्रस्ट लिव्हर म्हणजे असा हँडल असतो, जो पायलट विमानाच्या इंजिनला किती पॉवर द्यायची हे ठरवण्यासाठी वापरला जातो. हा थ्रस्ट लिव्हर कॉकपिटमध्येच असतो. हा स्विच स्प्रिंगमुळे लॉक केलेला असतो, त्यामुळे तो सहज हलत नाही. वैमानिकाला हा स्विच जर तो चालू किंवा बंद करायचा असेल, तर आधी स्विच (Fuel Control Switch) थोडा वर उचलावा लागतो, आणि मगच तो ‘कट ऑफ’ किंवा ‘रन’ केला जाऊ शकतो.

जातीसाठी -भाषेसाठी एकत्र येणारा शेतकरी, वाढत्या आत्महत्येंवर का एकत्र होऊन लढा उभारत नाही??

bachhu kadu with farmer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात आणि महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढतच चाललं आहे. महाराष्ट्रात तर मागील ३ महिन्यात तब्बल ७६३ शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं. एकीकडे शेतमालाला भाव मिळेना, दुसरीकडे महागाई वाढतच चालली आहे, शेतीसाठी आवश्यक बियाणे, खते, लागवडीच्या किमती वाढल्यात. परिणामी फायदा कमी आणि तोटाच जास्त अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. मात्र कधीकाळी जातीसाठी, भाषेसाठी एकत्र येणार शेतकरी… एखाद्या मिरवणुकीत राडा झाल्यावर ज्याप्रमाणे एकत्र येतो त्याच प्रकारे आत्महत्या रोखण्यासाठी किंवा शेतमालाला भाव देण्यासाठी सरकार विरोधात का एकवटत नाही? आपल्यावर एवढा मोठा अन्याय होऊनही शेतकरी हे सगळं सहन का करतोय?? प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी हाच प्रश्न एका शेतकऱ्याला विचारलं. त्यावर शेतकऱ्याचे दिलेलं उत्तरही नक्कीच विचार करायला लावणारे आहे .

तर शेतकऱ्यांप्रती मनामध्ये कायम तळमळ असणाऱ्या बच्चू कडू यांच्या ‘७/१२ कोरा कोरा’ पदयात्रेला शेतकऱ्याचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आज या यात्रेचा ६ वा दिवस असून बच्चू कडू यांनी थेट मांगीलाल जाधव नावाच्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन संवाद साधला. चांगलं जेवण मिळालं नाही म्हणून आमदाराने मारहाण केली इथं शेतकऱ्यावर रोज इतका अन्याय होतोय तरी शेतकरी शांत का? असा प्रश्न बच्चू कडू यांनी विचारला असता शेतकऱ्यानेच बळीराजा का एकजूट होत नाही याचा उलगडा केला आहे. ते म्हणाले, आजचा शेतकरी हा अनेक पक्षात विभागला गेलाय.. कोणी या नेत्याचा चाहता आहे, कोण दुसऱ्याच पक्षाचा कार्यकर्ता आहे…. कोण जातीत विभागलं, तर कोणी धर्मात अडकलं आहे…. आपल्या न्यायहक्कासाठी एकत्र येण्याऐवजी राजकीय नेत्यांच्याच मागे फिरण्यात शेतकरी पुढे राहिला आणि याच कारणाने अजूनही शेतकऱ्यांची एकजूट महाराष्ट्राला बघायला मिळाली नाही.

दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे विद्यमान मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी यांच्यासारखा नेता केंद्रात असूनही विदर्भात अजूनही सिंचनाची सोय नाही यामुळेही विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असल्याची खंत सदर शेतकऱ्याने बोलून दाखवली. यावर आता उपाय एकच आहे, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मताचा अधिकार दिलाय अन आता भाव नाही तर मत नाही असे म्हणत मांगीलाल जाधव नावाच्या शेतकऱ्याने संताप व्यक्त केला. बच्चू भाऊंचा सामान्य शेतकऱ्यासोबतचा हा संवाद अतिशय बोलका आणि तितकाच महत्वाचा आहे. इतका अन्याय होत असताना देखील शेतकरी शांत आहे म्हणजे त्याच्या मनात राग नाही असे अजिबात नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतून तो राग नक्की दिसेल.

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळाबाबत मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी माहिती

Navi Mumbai Airport

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Navi Mumbai Airport। नवी मुंबईतील विमानतळाचे काम पूर्ण होत आले आहे. आता लवकरच हे विमानतळ कार्यान्वित होईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी नवीन मुंबईत विमानतळ प्रगतीचा आढावा घेतला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत विमानतळावरील सर्व सुविधांची थोडक्यात माहिती दिली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज नवीन मुंबईत विमानतळच्या (Navi Mumbai Airport) प्रगतीचा आढावा घेण्यासाठी मी आणि शिंदे आलो. आता त्याच्या प्रगतीसाठीचं सादरीकरण पाहिलं. रनवे पासून टर्मिनल बिल्डिंग पर्यंतची प्रगती पाहिली. साधारणपणे याची भौतिक प्रगती ९४ टक्के झाली आहे. रनवे सुसज्जित आहे. टर्मिनल बिल्डिंगचं काम झालं. टर्मिनल बिल्डिंगच्या इंटिरियरचं काम चाललेलं आहे. बाहेरच्या सिलिंगचं काम वेगानं करावं लागणार आहे. बॅगेज हँडलिंगची सिस्टिम आम्ही बघितली . अत्यंत चांगली सिस्टिम आहे. यामध्ये बॅगेचा बारकोड ३६ डिग्रीतून भगता येईल. ती योग्य ठिकाणी जाईल अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे.

हा ग्रीन एअरपोर्ट – Navi Mumbai Airport

आम्ही ऑथॉरिटीला सांगितलं आहे कि या एअरपोर्टवर (Navi Mumbai Airport) बॅगेज क्लेम ही व्यवस्था ही जगातील फास्टेट व्यवस्था करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जेव्हा पूर्ण एअरपोर्ट होईल तेव्हा दोन रनवे या क्षमतेने ९ कोटी प्रवाशांसाठी नवी मुंबई एअरपोर्ट सुसज्ज होणार आहे. मुंबईच्या सध्याच्या छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट पेक्षा बराच मोठा एअरपोर्ट होणार आहे. याची वैशिट्य म्हणजे हा ग्रीन एअरपोर्ट आहे. ३७ मेगावॅट ग्रीन वीज वापरली जाणार आहे. याठिकाणी EV अल्टरनेट फ्यूलची वाहने असणार आहे. साष्टनेबल एव्हिएशन फ्युल जे अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे त्याचेही केंद्र हे नवी मुंबई विमानतळ असणार आहे अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

एक मोठी कनेक्टिव्हिटी आपण एअरपोर्ट ला जोडलेली आहे. अटल सेतूवरून कोस्टल रोडचे काम चाललं आहे. हे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. ठाण्यावरून थेट रस्ता बनवण्याचे काम आम्ही लवकरच सुरु करणार आहोत. चारी दिशांनी याठिकाणी येण्याकरता आपण व्यवस्था करत आहोत. मेट्रो, रेल्वे,  वॉटर,  ट्रान्सपोर्ट अशी मोठी  कनेक्टिव्हीटी  केली जाणार आहे.  ज्यामुळे प्रवाशी या विमानतळावर लवकरात लवकर पोचतील असेही फडणवीसांनी सांगितलं.