Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 466

अदानी ग्रुपच्या हाती लागला मोठा प्रकल्प; ‘या’ 4 कंपन्यांना मागे टाकत मिळवला विजय

Adani Group

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आदानी ग्रुपने गेल्या काही वर्षात खूप चांगली प्रगती केलेली आहे. त्यांच्या व्यवसायाची सुसाट गाडी सुटलेली आहे. त्यांच्या वाढत्या व्यवसायामुळे आज आदानी ग्रुपचे मालक गौतम आदानी यांच्या संपत्तीत देखील खूप जास्त वाढ झालेली आहे. त्यांची गणना ही जगातील श्रीमंतांच्या यादीमध्ये होत आहे. आणि आता त्यांच्या या संपत्तीमध्ये आणखीनच भर पडणार आहे. ती म्हणजे आता आदानी समूहाने महाराष्ट्राला 6600 मेगावॅट अक्षय ऊर्जा आणि औष्णिक ऊर्जा पुरवण्याची बोली जिंकलेली आहे. या कंपनीने या प्रकल्पासाठी 4.8 रुपये प्रति युनिट एवढी बोली लावली होती. त्यामुळे हा प्रकल्प आता आदानी समूहाच्या अंडर आलेला आहे.

महाराष्ट्राला काय फायदा होणार ?

हा प्रकल्प अदानी ग्रुपकडे गेल्याने राज्य सरकारला आणि महाराष्ट्रातील नागरिकांना याचा फायदा होण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे. कारण आता आदानी समूहाने पुढील 25 वर्षासाठी अक्षय आणि औष्णिक वीज पुरवठ्यासाठी ही बोली लावलेली आहे. महाराष्ट्र सध्या विजेसाठी जे पैसे देत आहे. त्याच्यापेक्षा एक रुपया कमी महाराष्ट्रातील नागरिकांना उपलब्ध होणार आहे. अशी माहिती आलेली आहे. त्यामुळे राज्यात भविष्यातील अनेक गरजा पूर्ण होण्यासाठी आपल्याला फायदा होणार आहे. आणि जनतेचे पैसे देखील वाचणार आहे.

वीज पुरवठा कधी सुरू होणार?

हाती आलेल्या माहितीनुसार 48 महिन्यांच्या आत हा वीज पुरवठा सुरू करणार आहे. आदानी ग्रुपने बोली लावल्याप्रमाणे संपूर्ण वीज पुरवठ्याच्या कालावधीत 2.70 रुपये प्रति मिनिट दराने सौर ऊर्जा पुरवणार आहे. त्याचप्रमाणे आता कोळशापासून उत्पादन विजेची किंमत ही कोळशाच्या किमतीच्या आधारे असणार आहे . अशाप्रकारे महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीने मार्चमध्ये सूर्यापासून तयार होणारी 5000 मेगा वॅट आणि पुढच्या वर्षीपासून निर्माण होणारी 1600 वीज खरेदी करण्यासाठी निविदा काढलेली आहे. त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी.

हाती आलेल्या माहितीनुसार आदानी ग्रुपने हा प्रकल्प जिंकण्यासाठी प्रतिनिधी 4.8 रुपये एवढी बोली लावली होती. तर दुसरी सर्वात कमी बोली ही जेएसडब्ल्यू एनर्जी यांनी 4.36 रुपये प्रति मिनिट एवढी लावली होती. मागील वर्षी महाराष्ट्रात 4.70 रुपये प्रति युनिट या दराने खरेदी केलेल्या विजेच्या सरासरी किमतीपेक्षाही किंमत कमी आहे. आदानीने लावलेली बोली यापेक्षा 1 रुपये प्रति युनिट कमी आहे. या निविदा प्रक्रिया पुढील 25 वर्षासाठी वीज पुरवठा करण्याचा प्रक्रियेत चार कंपन्यांनी सहभागी घेतला होता.

Pune News : पुण्यात गणेश विसर्जन मिरवणूक काळात वाहतूक व्यवस्थेत बदल ; कुठे कराल पार्किंग ?

pune ganesh visarjan

Pune News : देशभरात मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जातो आहे. दरम्यान उद्या दिनांक १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी असल्या कारणामुळे उद्या गणेश विसर्जन केले जाणार असून विविध शहरात त्यानिमित्त मिरवणूका काढल्या जातात. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या दिमाखात निघते. ही मिरवणूक पाहण्यासाठी आणि मिरवणुकीत सहभाग घेण्यासाठी मिठी गर्दी होते. विसर्जन मिरवणुकीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता वाहतुकी मध्ये बदल करण्यात आले आहेत. मिरवणूक काळात पुण्यातील काही प्रमुख रस्ते बंद असणार आहेत तर काही ठिकाणी पार्किंगची (Pune News) सोय कशी असेल ? चला जाणून घेऊया…

कुठे कराल पार्किंग? (Pune News)

पुण्यातील विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान तेरा ठिकाणी मोटारी आणि दुचाकी लावण्याची व्यवस्था करण्यात आली असून विसर्जन सोहळ्यानिमित्त 13 ठिकाणी वाहने लावण्याची व्यवस्था वाहतूक पोलिसांकडून उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये शिवाजी आखाडा वाहनतळ मंगळवार पेठ, एस एस पी एम एस मैदान, स. प . महाविद्यालय टिळक रस्ता, पेशवे उद्यान सारसबाग, पाटील प्लाझा मित्र मंडळ, दांडेकर पूल ते गणेश मळा, निलायम चित्रपटगृह, संजीवनी वैद्यकीय महाविद्यालय मैदान, कर्वे रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय मैदान, जैन हॉस्टेल मैदान, बीएमसीसी रस्ता, मराठवाडा महाविद्यालय ,नदीपात्र ते भिडे पूल या ठिकाणी नागरिकांना वाहन लावण्याची व्यवस्था करण्यात आली (Pune News) आहे.

हे मार्ग असणार बंद (Pune News)

विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने शहरातील काही प्रमुख रस्ते बंद करण्यात आले आहेत. सकाळी सात वाजल्यापासून ते मिरवणूक संपेपर्यंत हे रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये लक्ष्मी रोड टिळक रोड सह शहरातील प्रमुख रस्ते बंद राहणार आहेत. मात्र आपात्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका, अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी पोहोचण्यासाठी त्वरित मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. बंद असलेल्या रस्त्यांमध्ये लक्ष्मी रोड, टिळक रोड, कुमठेकर रोड, केळकर रोड, शिवाजी रोड, जंगली महाराज रोड, एफसी रोड, कर्वे रोड, प्रभात रोड (Pune News) या रस्त्यांचा समावेश आहे.

ॲप द्वारे मिळणार विसर्जन मिरवणुकीची माहिती

पुण्यातल्या गणेश विसर्जन मिरवणुकीची माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एका ॲपद्वारे मिळू शकेल. गणेश विसर्जनादिवशी ‘माय सेफ पुणे अँप’ द्वारे बंदोबस्त आणि मंडळांची माहिती देखील प्राप्त होणार आहे. वाहनांच्या पार्किंगसाठी जागा, पोलीस मदत केंद्र, पादचारी मार्ग यांची माहिती देखील या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. विसर्जन मिरवणूक मार्ग, बंद रस्ते आणि मंडळाच्या मिरवणुकीबाबत (Pune News) सद्यस्थितीची माहिती या ॲप मधून दिली जाणार आहे.

पवारांमुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅंन्सर; पडळकरांची जळजळीत टीका

Gopichand Padalkar Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आमच्या हातात सत्ता द्या, तुम्हाला महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदललेला दिसेल असं विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एका जाहीर सभेत केलं होते, यावरून भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर टीका केली आहे. ५०-६० वर्षे पवारांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सत्ता होती. त्यावेळी त्यांनी फक्त महाराष्ट्र लुटायचंचं काम केलं आहे, पवारांमुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅंन्सर झाला आहे अशा शब्दात गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे.

पडळकर यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून व्हिडिओ शेअर करत पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवार म्हणतात सत्ता हातात द्या महाराष्ट्राचा चेहरा बदललेला दिसेल. पण मी त्यांच्या अर्ध्या विधानाशी सहमत आहे. महाराष्ट्रचा चेहरा बदलण्याची आवश्यकता देवेंद्रजींनी पूर्ण केली आहे. पवारांमुळे फक्त महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅंन्सर झाला आहे. ५०-६० वर्षे पवारांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सत्ता होती. त्यावेळी त्यांनी फक्त महाराष्ट्र लुटायचंचं काम केलं आहे “छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला आणि हिंदुस्थानला दिलेली तेजाची झळाळी एकट्या पवारांमुळे हरवली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेला अठरापगड जातींचा आणि १२ बलुतेदारांचा महाराष्ट्र ५० वर्षे पवारांनी स्वत:ची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून चालवला. पवार अँड पवार प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आता पवार अँड सुळे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झालाय अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.

जातीजातींमध्ये वाद लावायचा, जातीजातींना झुलवत ठेवायचं आणि प्रस्थापितांची घरं भरण्याचं काम सुरु होतं. त्यामुळे याला कंटाळून महाराष्ट्रातील लोकांनी २०१४ मध्ये परिवर्तन केलं. पवारांचा शासनकाळ हा महाराष्ट्राच्या इतिहासाची फक्त काळी पानं आहेत. त्यांनी फक्त भ्रष्टाचार आणि जातीवाद केला. लोकांच्यात भांडणं लावली. माझी त्यांना विनंती आहे की,आता तुम्ही निश्चिंत आणि निवांत राहा. हरिनामाचा जप करा म्हणजे तुमच्या डोक्यात पुण्य काम करण्याची ईच्छा जागृत होईल. देवेंद्र फडणवीसांनी २०१४ मध्ये आणि आता एकनाथ शिंदेंसोबत महाराष्ट्राला देशात परकीय गुंतवणूकीत पहिल्या क्रमांकावर आणला आहे.

आज महाराष्ट्रातील युवकांच्या हाताला काम मिळत आहे,नवनवीन उद्योग महाराष्ट्रात येत आहेत, महिलांचे सक्षमीकरण होत आहे. पण हीच महाराष्ट्राची प्रगती पवारांना कुठेतरी खुपते आहे. आज महाराष्ट्राला सर्वसमावेशक विकासाचा चेहरा मिळाला आहे. तो बदलवून पवारांना पुन्हा महाराष्ट्रात पुन्हा जातीवाद निर्माण करायचा आहे का? पवारांना महाराष्ट्राला दुबळं करायचं आहे का? दलित ओबीसी अत्याचाराचे नवे अध्याय लिहायचे आहेत का?” असा सवाल गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांना केला आहे.

नवीन सिम कार्ड खरेदी करताना E – KYC अनिवार्य; दूरसंचार विभागाचा नवा नियम

Sim card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नवीन सिम खरेदी करणाऱ्या नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे आता दूरसंचार विभागाने सिम खरेदी करण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि सुरक्षित करण्यासाठी काही महत्वपूर्ण नियम बदल केलेले आहेत. त्यामुळे आता एअरटेल, रिलायन्स, जिओ, बीएसएनएल आणि वोडाफोन आयडिया या कंपनीचे सिम विकत घेताना तुम्हाला काही महत्त्वपूर्ण नियमांचे पालन करावे लागणार आहे. त्यामुळे आता सिम खरेदी करण्याची प्रक्रिया ही पेपरलेस बनलेली आहे. सिम खरेदी करणाऱ्या नागरिकांसाठी ही अत्यंत सोयीची गोष्ट आहे.

दूरसंचार विभागाने आता नवीन नियम काढलेले आहे. त्यानुसार आता युजर्स सिमखरेदी करण्यासाठी किंवा ऑपरेटर बदलण्यासाठी दूरसंचार कंपनीच्या कार्यालयांना भेट देण्याची काहीच गरज नाही. ही प्रक्रिया आता तुम्ही तुमच्या मोबाईलवरून डिजिटल पद्धतीने करू शकता. त्यामुळे तुम्हाला जर नवीन सिम कार्ड विकत घ्यायचे, असेल किंवा पोर्ट करायचे असेल, तर तुम्ही फोटो कॉपी तसेच इतर कागदपत्र दाखल करून ऑनलाईन पद्धतीने तुमचे कागदपत्र व्हेरिफाय करू शकता.

दूरसंचार विभागाने त्यांच्या अधिकृत X हॅण्डलवर ही माहिती दिलेली आहेत. तसेच सिम खरेदी करण्यासाठी लागणारे नवीन नियम देखील शेअर केलेले आहेत. या नवीन बदलांमुळे आता फसवणूक कमी होणार आहे. आणि व्यवस्थित पद्धतीने सगळ्या गोष्टी होणार आहेत. सरकारच्या या डिजिटल इंडिया उपक्रमानुसार पेपरलेस पद्धतीने सगळ्या गोष्टी होणार आहेत. त्यामुळे अनेक गोष्टींपासून सुरक्षितता होणार आहे.

डीओटीने केलेल्या नवीन नियमानुसार आता इ केवायसी आणि ऑटो केवायसी करणे गरजेचे आहे. तसेच युजर्सला कोणत्याही दूरसंचार ऑपरेटरच्या कार्यालयात भेट देण्याची गरज नाही. ते स्वतःच डिजिटल पद्धतीने या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करू शकतात. जसे की प्रीपेड ते पोस्टपेड स्विच करणे. या गोष्टी देखील ऑनलाईन पद्धतीने केल्या जाऊ शकतात. तसेच सिम कार्ड खरेदी करण्याची प्रक्रिया आता कोणतेही फोटोकॉफी शेअर न करता डिजिटल पद्धतीने केली जाऊ शकते. डिजिटल सिस्टीम कागदपत्रांचा गैरवापर करण्याचा काही प्रकार समोर आला होता. हा गैरवापर रोखण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारे बनावट सिम कार्ड जारी करू नये. यासाठी आणि फसवणुकीचा धोका कमी करण्यासाठी आता डिजिटल पद्धतीने सगळ्या गोष्टी होणार आहे.

आधार E – KYC आणि ऑटो kYC म्हणजे काय?

आधार ई केवायसी

आधार ई केवायसी करताना युजर्स डिजिटल पद्धतीने आपल्या आधार कार्ड वापरून सिम कार्ड खरेदी करावे लागणार आहे. यासाठी त्यांना दूरसंचार ऑपरेटरला एक रुपया खर्च करून आपले आधार कार्डचे सगळे तपशील द्यावे लागणार आहेत.

ऑटो केवायसी

युजेसला आता डीजी लॉकर वापरून ऑनलाईन पद्धतीने त्यांचे डॉक्युमेंट्स देता येणार आहे. हे ऑटो केवायसी करण्याची प्रक्रिया ग्राहकांना केवायसी प्रक्रिया स्वतंत्रपणे करण्यास मदत करेल. आणि नवीन सिम देखील अगदी सोप्या पद्धतीने खरेदी करू शकतात.

Toll Tax : Fastag यंत्रणा कालबाह्य होणार ? कसे असेल GPS आधारित टोल संकलन? जाणून घ्या

toll tax

Toll Tax : यापूर्वी तुम्ही टोल नाक्यावर पसे देऊन टोल भरत होता. त्यामुळे बराच वेळ वाया जात होता, टोल नाक्यावर तासंतास वाहनांच्या लांब रांगा लागलेल्या असायच्या. प्रवाशांची हीच गैरसोय टाळण्यासाठी टोल भरण्यासाठी काही वर्षांपूर्वी फास्टॅग प्रणाली कार्यरत करण्यात आली. शिवाय ही फास्टॅग प्रणाली बंधनकारकही करण्यात आली आहे. मात्र आता टोलचं संकलन करण्यासाठी “ग्लोबल नेव्हिगेशन सॅटॅलाइट सिस्टीम” म्हणजेच जीपीएस तंत्रज्ञानावर आधारित टोल संकलन यंत्रणा लागू करण्यात येणार आहे. ही प्रणाली नेमकी काय आहे? त्यामुळे नागरिकांना वाहनधारकांना (Toll Tax) याचा कसा फायदा होणार आहे चला जाणून घेऊयात.

सेन्सर द्वारे वाहनाची नोंद (Toll Tax)

सरकारनं काही मार्गावर जीपीएस आधारित टोल संकलनाला सुरुवात केली आहे. त्यासाठी वाहन नेमके कुठे आहे ? वाहनाने प्रवास किती केला आहे? हे ट्रॅक करण्यासाठी ‘ऑन बोर्डिंग युनिट’ बसवण्यात येणार आहेत. त्याद्वारे वाहनानं किती प्रवास केला त्यानुसार त्याचा टोल आकारला जाणार आहे. हे ऑन बोर्डिंग युनिट गाडीवर बसवण्यात येणार आहे. याची किंमत जर सांगायचे झाल्यास 300 ते 400 रुपयांपेक्षा जास्त असणार नाही. टोल असलेल्या मार्गावर प्रवेश करताना सेन्सर द्वारे या वाहनाची नोंद केली जाईल आणि वाहनाचा प्रवास ट्रॅक केला जाईल. देशभरातल्या राष्ट्रीय महामार्गांची जिओ फेन्सिंग करण्यात येईल भविष्यात नव्या वाहनांमध्ये ऑन बोर्डिंग युनिट बसवूनच मिळू शकतात. (Toll Tax) जुन्या वाहनांमध्ये ते बसवावे लागेल.

कोणाला द्यावा लागेल टोल?

20 किलोमीटर पर्यंत प्रवासावर जीपीएस टोल यंत्रणेमध्ये वाहनांना कोणताही टोल द्यावा लागणार नाही. मात्र त्या पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी टोल द्यावा लागेल. या नव्या यंत्रणेमुळे तीन वर्षात टोल संकलन दुपटीने वाढणार असून 90 हजार किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आहेत. याच महामार्गांवर जीपीएस टोल यंत्रणा लागू करण्याची तयारी सुरू करण्यात आली (Toll Tax) आहे.

प्रवाशांचा वेळ वाचणार (Toll Tax)

सध्याचा विचार केला तर 714 सेकंद सरासरी एका वाहनाला टोल नाक्यावर थांबावे लागते. जीपीएस टूल संकलनासाठी 47 सेकंद एवढाच वेळ लागतो. आठ कोटी रुपयांपेक्षा फास्टॅग भारतात एप्रिल 2024 पर्यंत होते. साहजिकच त्याची संख्या आता वाढली आहे.

स्थानिक रहिवाशांचे काय ? (Toll Tax)

आता तुम्ही असा विचार करत असाल जर तुम्ही स्थानिक रहिवासी असाल आणि वारंवार तुम्हाला महामार्गावरून प्रवास करावा लागत असेल तर तुम्हाला जीपीएस यंत्रणेद्वारे टोल आकारणी होत असताना टोल द्यावा लागेल का ? तर याचे उत्तर असं आहे स्थानिक रहिवासी पत्त्याचे प्रमाणपत्र दाखवून टोल सवलतीसाठी अर्ज करू शकतात. गैरव्यवसायिक वाहनांना पास दिला जातो. जीपीएस यंत्रणेद्वारे 20 km पर्यंत संपूर्णपणे टोल (Toll Tax) माफ असेल त्यामुळे जवळपास राहणाऱ्यांना पासची कटकट मात्र मिटणार आहे.

सध्याचा विचार करता अनेक वाहनांमध्ये जीपीएस उपकरण नाहीत. याशिवाय सर्व मार्गावर ही जीपीएस फेन्सिंग झालेलं नाही. त्यामुळे हे काम पूर्ण होईपर्यंत सध्यातरी फास्टॅग सुरू राहणार आहे. पण प्रायोगिक तत्त्वावर ज्या महामार्गावर जीपीएस टूल सुरू केलेले आहे तिथे फास्टॅगही चालतात.

Jio Recharge Plans : 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह ‘हे’ आहेत Jio चे स्वस्त रिचार्ज प्लॅन

Jio Recharge Plans

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्ही जर जिओचे ग्राहक असाल आणि कमी पैशात जास्त दिवसांचा रिचार्ज प्लॅन (Jio Recharge Plans) शोधत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येणारे काही स्वस्त रिचार्ज प्लॅन बद्दल सांगणार आहोत. या रिचार्ज प्लॅन अंतर्गत ग्राहकांना अनलिमिटेड इंटरनेट, अनलिमिटेड कॉलिंग आणि मेसेजची सुविधा देण्यात येत आहे. एकदम 84 दिवसांसाठी हा रिचार्ज असल्याने सतत रिचार्ज करण्याची कटकट सुद्धा ग्राहकांना नसेल. मग चला तर जाणून घेऊयात, हे रिचार्ज प्लॅन किती किमतींचे आहेत.

जिओचा ४७९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन- Jio Recharge Plans

रिलायन्स जिओच्या 479 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना 84 दिवसांची व्हॅलिडीटी मिळते. या कालावधीत ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग, 1000 एसएमएस, एकूण 6 GB इंटरनेट डेटाचा लाभ घेता येतो. एवढच नव्हे तर एकद का डेटा लिमिट पूर्ण झाले तर मग 64Kbps वेगाने इंटरनेटचा आनंद घेता येईल. याशिवाय JioTV, JioCinema आणि JioCloud इत्यादी अनेक Jio ॲप्सच्या सुविधाही या प्लॅनमध्ये उपलब्ध आहेत.

जिओचा ७९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन-

रिलायन्स जिओचा ७९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन (Jio Recharge Plans) सुद्धा 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये ग्राहकांना दररोज अनलिमिटेड कॉलिंग, 100 एसएमएस, आणि 1.5GB इंटरनेट डेटाचा लाभ घेता येतो. याशिवाय ना JioTV, JioCinema आणि JioCloud सारख्या अनेक Jio ॲप्सची सुविधा देखील वापरकर्त्यांना मिळतात.

जिओचा ८५९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

जिओचा ८५९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅन मध्ये ग्राहकांना दररोज 100 एसएमएस, अनलिमिटेड कॉलिंग आणि 2GB इंटरनेट डेटचा फायदा मिळतो. ज्यांना जास्त इंटरनेटची आवश्यकता आहे अशा ग्राहकांसाठी हा रिचार्ज प्लॅन बेस्ट पर्याय आहे. ग्राहकांना या रिचार्ज प्लॅन सोबत JioTV, JioCinema आणि JioCloud सारख्या अनेक Jio ॲप्सचा आनंद घेता येईल. हा रिचार्ज प्लॅन सुद्धा 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येत असल्याने पुन्हा पुन्हा रिचार्ज करण्याची गरज यूजर्सना नाही.

RRB NTPC Bharti 2024 | रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत तब्बल 11558 पदांसाठी भरती सुरु; अशाप्रकारे करा अर्ज

RRB NTPC Bharti 2024

RRB NTPC Bharti 2024| नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक भन्नाट संधी घेऊन आलेलो आहोत. याचा फायदा अनेकांना होणार आहे. रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे अनेकांची इच्छा असते. आणि ती इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण आता रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. ही भरती गुड ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्टर, चीफ कमर्शियल कम टिकीट कलेक्टर, जुनियर अकाउंट्‍सिस्टंट कम टायपिस्ट, कमर्शियल कम टिकीट कलेक्टर, अकाउंटंट कनिष्ठ लिपिक कम टायपिस्ट, ट्रेन क्लर्क या पदांसाठी आहे या पदांच्या एकूण 11558 जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही CEN 05/ 2024 पदवीधर साठी 13 ऑक्टोबर 2024 आहे तर CEN 05/2024 अंडरग्रॅज्युएटसाठी 20 ऑक्टोबर 2024 ही आहे आता या भरतीचे सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव

गुड्स ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्टर, चीफ कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक, ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट, कमर्शियल कम तिकीट क्लर्क, अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट, कनिष्ठ लिपिक कम टायपिस्ट, ट्रेन क्लर्क

पदसंख्या | RRB NTPC Bharti 2024

या भरती अंतर्गत तब्बल 11558 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे

वयोमर्यादा

CEN 05/2024 पदवीधर साठी – 18 ते 36 वर्ष
CEN 05 / 2024 अंडर ग्रॅज्युएट साठी 18 ते 33 वर्ष

अर्ज शुल्क

या भरतीचा अर्ज करण्यासाठी जनरल कॅटेगिरीतील विद्यार्थ्यांना 500 रुपये एवढी फी आहे, तर एससी, एसटी कॅटेगिरीतील विद्यार्थ्यांना 250 रुपये एवढी फी आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

CEN 05/2024 पदवीधर साठी – 13 ऑक्टोबर 2024
CEN 05 / 2024 अंडर ग्रॅज्युएट साठी – 20 ऑक्टोबर 2024

अंडर ग्रॅज्युएट पोस्ट

  • जूनियर क्लार्क कम टायपिस्ट – 990 जागा
  • अकाउंट क्लार्क कम टायपिस्ट – 361 जागा
  • ट्रेन क्लर्क – 72 जागा
  • कमर्शियल कम टिकीट क्लर्क – 2022 जागा

ग्रॅज्युएट पोस्ट |RRB NTPC Bharti 2024

  • गुड्स ट्रेन मॅनेजर – 3144 जागा
  • चीफ कमर्शियल कम टिकीट सुपरवायझर – 1736 जागा
  • सीनियर कलर कम टाइपिस्ट – 732 जागा
  • जूनियर अकाउंटंट असिस्टंट कम टाइपिस्ट – 1507 जागा
  • स्टेशन मास्टर – 994 जागा

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करताना सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करायची आहे.
  • दिलेल्या तारखेच्या अगोदरच अर्ज करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Bajaj Housing Finance IPO : बजाजच्या IPO ने रचला इतिहास; 15000 चे झाले 32000

Bajaj Housing Finance IPO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बजाज हाऊसिंग फायनान्सच्या IPO ला (Bajaj Housing Finance IPO) गुंतवणूकदारांचा भरगोस प्रतिसाद मिळाला आहे. आज हा आयपीओ शेअर बाजारावर लिस्ट झाला असून गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. बजाज हौसिंग फायनान्सचा IPO तब्बल 114 टक्क्यांच्या बम्पर प्रिमियमवर शेअर बाजारावर लिस्ट झाला आहे. या आयपीओ आपल्याला मिळावा यासाठी अनेक गुंतवणूकदारांनी अक्षरशः देव पाण्यात टाकले होते. आज या आयपीओने दमदार रिटर्न दिल्याने ज्या गुंतवणूकदारांना हा IPO मिळाला आहे त्यांची चांगलीच चांदी झाली आहे असं म्हणता येईल.

150 रुपयांवर लिस्ट- Bajaj Housing Finance IPO

बजाज हाऊसिंग फायनान्सचा IPO 70 रुपयांच्या अप्पर प्राइस बँडवर आला. मात्र आज तो 150 रुपयांवर लिस्ट होते. याचा अर्थ IPO गुंतवणूकदारांना 114.29 टक्क्यांचा लिस्टिंग लाभ झाला. अजूनही या आयपीओची घोडदौड सुरूच असून सध्या त्याची किंमत १५७ रुपये प्रति शेअर इतकी झाली आहे. अनेक तज्ज्ञ सुद्धा बजाज हाऊसिंगच्या शेअरवर समाधानी आहेत. कंपनीचे बिझनेस मॉडेल अतिशय चांगलं आहे त्यामुळे जरी गुंतवणूकदारांनी त्यांचा स्टॉक न विकता होल्ड वर ठेवला तरी नुकसान होण्याची शक्यता नाही असं बोललं जातंय. तसेच, आगामी ४-५ वर्षे गृहनिर्माण क्षेत्रासाठी सुद्धा अतिशय सकारात्मक असून बजाज हाऊसिंगच्या आयपीओला त्याचा फायदाच होण्याची शक्यता आहे.

बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओसाठी तीन दिवसांत तब्बल 89 लाखपेक्षा अधिक अर्ज आले होते. कोणत्याही भारतीय आयपीओसाठी आतापर्यंत हे सर्वाधिक अर्ज आलेले आहेत. बजाज हाउसिंग फायनान्सने IPO द्वारे 6,560 कोटी रुपये उभारण्याची योजना आखली होती. पण, त्याला ३.२४ लाख कोटींची बोली लागली. जेव्हा हा आयपीओ बाजारात आला तेव्हा त्याची प्राईस बँड किंमत 66-70 रुपये प्रतिशेअर निश्चित करण्यात आली होती. या आयपीओच्या एका लॉटमध्ये 214 शेअर होते. म्हणजेच प्रत्येक गुंतवणूकदाराने कमीत कमी 14980 रुपयांची गुंतवणूक करून हा आयपीओ (Bajaj Housing Finance IPO) खरेदी केला होता. आज हा आयपीओ १५० रुपये शेअरवर लिस्ट झाल्याने प्रत्येक शेअरवर गुंतवणूकदारांना 80 रुपयांची कमाई झाली. म्हणजेच 14980 रुपयांचे 32,100 रुपये झालेत. प्रत्येक लॉटवर गुंतवणूकदारांना तब्बल 17,120 रुपयांची बक्कळ कमाई झाली आहे.

Maharashtra School Close | 25 सप्टेंबर रोजी राज्यातील सगळ्या शाळा असणार बंद; हे आहे मोठे कारण

Maharashtra School Close

Maharashtra School Close | राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये अनेक सण आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शाळांना सुट्टी होती. परंतु आता राज्यातील सर्व शाळा 25 सप्टेंबर रोजी बंद होणार आहे. कारण या दिवशी राज्यभरातील प्राथमिक शाळा शिक्षक आंदोलन करणार आहेत. आणि शिक्षकांच्या याच आंदोलनामुळे 25 सप्टेंबर रोजी शाळा बंद ठेवण्यात निर्णय घेण्यात आलेला आहे. शिक्षक संचमान्यतेचा 15 मार्च 2024 मध्ये आणि कंत्राटी शिक्षण भरती तसेच निर्णय हा 5 सप्टेंबर 2024 रोजी काढण्यात आला होता.

सरकारने हे दोन्ही निर्णय वाडी वस्तीवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहेत. त्यामुळे हे निर्णय रद्द करण्यात यावेत. अशी मागणी प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी सरकारकडे केली होती. हे नियम रद्द व्हावे यासाठी शिक्षकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा देखील काढण्यात आला होता. आंदोलन देखील झाले होते. परंतु त्याचा काही फायदा झालेला नाही. त्यामुळे येथे 25 सप्टेंबर रोजी सर्व राज्यातील शाळा बंद ठेवणार आहेत. आणि शिक्षक पुन्हा एकदा सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. यावेळी अनेक ठिकाणी आंदोलन होण्याची देखील शक्यता आहे. पुणे येथे झालेल्या शिक्षण संघटनेच्या बैठकांमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

सरकारने काढलेल्या नवीन धोरणानुसार ज्या शाळेची पटसंख्या 20 किंवा त्यापेक्षा कमी आहे. त्या शाळांमध्ये एकच शिक्षक दिला जाणार आहे. त्यासोबत सेवानिवृत्ती शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने नेमणूक केली जाणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता शाळांचा दर्जा घसरून बंद पडण्याची भीती शिक्षक संघटनेने व्यक्त केलेली आहे. त्यामुळे सरकारचा हा नवीन नियम रद्द व्हावा, यासाठी राज्यातील शिक्षक हे आंदोलन करणार आहेत. सरकारने जर त्यांचा हा निर्णय रद्द केला नाही. तर ग्रामीण भागातील जवळपास 1 लाख 85 हजार विद्यार्थी आणि 29 हजारांपेक्षा जास्त शिक्षकांची भवितव्य अंधारात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे नियम रद्द करावेत, अशी मागणी राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी केलेली आहे. त्यामुळे 25 सप्टेंबर रोजी एक मोठे आंदोलन होणार आहे आणि याकरिता सगळ्यांनी सामूहिक रजा आंदोलन जाहीर केलेले आहे.

IND vs BAN Test 2024 : बांगलादेशच्या कर्णधाराचा टीम इंडियाला इशारा; म्हणे आम्ही जिंकण्यासाठी आलोय

IND vs BAN Test 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि बांगलादेश (IND vs BAN Test 2024) यांच्यात 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिली कसोटी 19 सप्टेंबरपासून चेन्नईत खेळवली जाणार आहे. यासाठी बांगलादेशचा संघ चेन्नईत दाखल सुद्धा झाला असून कसून सराव करत आहेत. याच दरम्यान, बांगलादेशचा कर्णधार नझमुल हसन शांतोने (Najmul Hossain Shanto) टीम इंडियाला इशारा दिला आहे. भारतात आम्ही जिंकण्यासाठी आलोय, पाकिस्तान विरुद्धची कसोटी सिरीज जिंकल्यामुळे नक्कीच आमचा आत्मविश्वास वाढला आहे असं नझमुल हसन शांतोने म्हंटल आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना नझमुल हुसेन शांतो म्हणाला की, आम्हाला माहित आहे की, भारत आमच्यापेक्षा चांगला संघ आहे, टीम इंडियाची क्रमवारी आमच्यापेक्षा चांगली आहे, परंतु आमचा प्रयत्न शेवटच्या दिवसापर्यंत विजय खेचून आणण्याचा आणि भारतीय संघाला सहज जिंकू न देण्याचा असेल. आम्ही फार दूरचा विचार करत नाही मात्र आम्ही अर्थातच जिंकण्यासाठी खेळणार आहोत, चांगली कामगिरी केली तरच यश मिळण्याची संधी असते याची जाणीव आम्हाला असल्याचे नझमुल हुसेन शांतोने सांगितलं. IND vs BAN Test 2024

कसे आहेत दोन्ही संघ : IND vs BAN Test 2024

भारताचा संपूर्ण संघ-

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.

बांगलादेशचा संपूर्ण संघ:

नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन कुमेर दास, मेहिदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, नईम हसन, नाहिद राणा, हसन महमूद, तस्किन अहमद, मोहम्मद. सय्यद खालेद अहमद, जाकेर अली आनिक