Sunday, December 21, 2025
Home Blog Page 500

स्मृती इराणी यांच्याकडून राहुल गांधींचे कौतुक; राजकीय चर्चाना उधाण

smriti irani rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसच्या कट्टर विरोधक आणि एकेकाळी थेट राहुल गांधी (Rahul Gandhi) याना होमपीच असलेल्या अमेठीमधून पराभूत करणाऱ्या भाजप नेत्या स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी आता चक्क त्याच राहुल गांधींचे कौतुक केलं आहे. आता राहुल गांधींचे राजकारण बदलले आहे. सध्या राहुल गांधी हे वेगळे राजकारण करत आहेत. तुम्हाला आवडो किंवा न आवडो ही गोष्ट वेगळी असं स्मृती इराणी यांनी अगदी मनमोकळेपणाने सांगितलं. स्मृती इराणी यांनी पत्रकारांच्या पॉडकास्ट टॉप अँगल या कार्यक्रमात विविध विषयांवर थेट भाष्य केलं.

स्मृती इराणी म्हणाल्या, राहुल गांधी जातीच्या राजकारणातही ते अत्यंत जपून बोलत आहेत. राहुल यांनी संसदेत टी-शर्ट घातला तर तरुण पिढीला काय संदेश जाईल हे त्यांना माहीत आहे. यासोबतच त्यांनी भाजपला सावध करत राहुल यांनी उचललेले कोणतेही पाऊल चांगले, वाईट किंवा बालिश आहे, अशा गैरसमजात राहू नये, पण आता ते वेगळे राजकारण करत आहेत असं म्हंटल. स्मृती इराणी यांनी एकप्रकारे राहुल गांधी यांचे कौतुक केलं आहे. कट्टर विरोधक असलेल्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांची स्तुती केल्यांमुळे राजकीय चर्चाना उधाण आलं आहे.

दरम्यान, स्मृती इराणी यांनी 2019 मध्ये राहुल गांधी यांचा अमेठी मतदारसंघातून पराभव केला होता. सातत्याने गांधी कुटुंबाविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या नेत्या म्हणून देशभरात त्यांची ओळख आहे. परंतु २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र अमेठीच्या जनतेने स्मृती इराणी याना नाकारलं. भलेही याठिकाणी राहुल गांधी पुन्हा निवडणुकीला उभे राहिले नाहीत मात्र काँग्रेस खासदार किशोरी लाल शर्मा यांनी स्मृती इराणी यांचा पराभव करत 2019 मधील राहुल गांधींच्या पराभवाचा वचपा काढला.

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी ! 30 ऑगस्ट पर्यंत वाहतुकीत बदल , काय आहे पर्यायी मार्ग ?

मुंबई म्हणजे राज्याचा आर्थिक केंद्रबिंदू. मुंबईत खूप मोठ्या घडामोडी घडत असतात. रोज नवनवीन कार्यक्रम आखले जातात. सद्या मुंबईत “ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२४ ‘ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतुकीची समस्या उद्भवू नये याकरिता मुंबई वाहतूक विभागाकडून एक महत्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया…

ग्लोबल फिनटेक 2024 हा हाय प्रोफाईल कार्यक्रम जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर मध्ये आयोजित केला आहे. त्यामुळे 30 ऑगस्ट पर्यंत या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. म्हणूनच परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते. त्यामुळे 30 ऑगस्टपर्यंत दररोज सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत बीकेसी मध्ये गर्दी वाढण्याची शक्यता आहे. परिणामी या भागातून जाणाऱ्या वाहनांना पुढे जाण्यास वेळ लागेल प्रवाशांनी विलंब टाळण्यासाठी या तासांमध्ये बीकेसी मार्गावरून प्रवास करू नये अशी माहिती वाहतूक पोलिसांच्या कडून देण्यात आली आहे.

काय आहेत पर्यायी मार्ग?

28 ते 30 ऑगस्ट या कालावधीमध्ये जिओ वर्ल्ड कॉन्वेंशन सेंटर बीकेसी इथे आयोजित करण्यात येत असलेल्या कार्यक्रमामुळे बीकेसी मध्ये सकाळी नऊ ते रात्री आठ या वेळेमध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांची ये जा अपेक्षित आहे. असे वाहतूक पोलिसांनी सांगितले तसेच प्रवाशांनी बीकेसी मार्ग टाळून जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड, सांताक्रुज चेंबूर लिंक रोड आणि ईस्टरन फ्री वे यासारखे पर्याय मार्ग वापरावेत असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

नक्की काय आहे ग्लोबल फिनटेक फेस्ट

ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024 ही पेमेंट्स कौन्सिल ऑफ इंडिया, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि फिनटेक कन्वर्जन कौन्सिल यांच्याद्वारे दरवर्षी आयोजित केली जाणारी सर्वात मोठी परिषद आहे. पाचवा ग्लोबल फिन्टेक्स 28 ते 30 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये बीकेसी येथे होत आहे. ग्लोबल फिनटेक्स 2024 इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय परराष्ट्र मंत्रालय वित्तीय सेवा विभाग रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण यांच्याद्वारे सादर केला जाणार आहे.

भारताची फिरकीपटू अडकली पुराच्या पाण्यात; NDRF ने केली सुटका

RADHA YADAV STUCK IN WATER

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरातमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी नदी नाले ओसंडून वाहत आहेत. वडोदरामध्येही, अनेक भागात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालं आहे. विश्वामित्री नदीचे पाणी शहराच्या खालच्या भागात भरले आहे. कडा तोडून पाणी निवासी भागात पोहोचले आहे. गुजरातच्या या पूरस्थितीत भारताची स्टार फिरकीपटू राधा यादव (Radha Yadav) अडकली. मात्र NDRF पथकाने तिची सुखरूप सुटका केली. तिने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

राधाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक स्टोरी शेअर केली. त्यात तिने म्हंटल, आम्ही खूप वाईट परिस्थितीत अडकलो आहोत. आम्हाला वाचवण्यासाठी #एनडीआरएफचे खूप खूप आभार. राधा यादवपूर्वी इरफान पठाण वडोदरा येथील लोकांना घरात राहण्याचे आवाहन केलं आहे. पूरस्थिती असलेल्या नागरिकांनी आपल्या घरात सुरक्षित रहा असं इरफान पठाणने म्हंटल होते.

दरम्यान, बुधवारी, देवभूमी द्वारका, जामनगर, राजकोट आणि पोरबंदर या सौराष्ट्र विभागातील जिल्ह्यांमध्ये 12 तासांच्या कालावधीत 50 मिमी ते 200 मिमी पाऊस पडला. द्वारका जिल्ह्यातील भानवड तालुक्यात सर्वाधिक 185 मिमी पाऊस झाला. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) गुरुवारी सौराष्ट्रातील जिल्ह्यांच्या निर्जन भागांमध्ये अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. वडोदरा शहरातील घरांमध्ये आणि छतावर अडकलेल्या लोकांची नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) चाय माध्यमातून सुटका करण्यात आली आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.गेल्या तीन दिवसांत मुसळधार पावसामुळे 26 जणांचा आपले प्राण गमवावे लागले आहेत. राजकोट, आनंद, महिसागर, खेडा, अहमदाबाद, मोरबी, जुनागढ आणि भरूच या जिल्ह्यांतील अनेकांचा मृत्यू झाला आहे.

बाब्बो!! क्रेडिट कार्डवर खरेदी केली गगनचुंबी इमारत; कोण आहे हा पठ्ठ्या

Credit Card Jonathan Wener

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रेडिट कार्ड (Credit Card) तर तुम्हाला माहिती असेलच.. क्रेडिट कार्डवर आपण भरपूर खरेदी करत असतो. शॉपिंग करणे, नवनवीन वस्तू खरेदी करणे, लाईट बिल किंवा अन्य कोणतेही बिल भरणे या सर्व गोष्टी क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शक्य होतात. मात्र तुम्ही असं कधी ऐकलं आहे का, कि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून चक्क एक गगनचुंबी इमारतच खरेदी करण्यात आली. होय हे खरं आहे. कॅनडामधील अब्जाधीश जोनाथन बॅनर (Jonathan Wener) यांनी हि करामत केली आहे. फोकस यूट्यूब चॅनेलला फायनान्सवरील बिग शॉटला दिलेल्या मुलाखतीत जोनाथन बॅनर यांनी स्वतःच याबाबत माहिती दिली आहे.

खरं तर आकडेवारीनुसार सांगायचं झाल्यास, जगभरात क्रेडिट कार्डचा सर्वाधिक वापर कॅनडा मधील लोक करत आहेत. कॅनडाच्या एकूण लोकसंख्येनुसार जवळपास 82.74 टक्के लोक क्रेडिट कार्ड वापरतात. यावर बोलत असतानाच जोनाथन बॅनर यांनी मी तर क्रेडिट कार्डवर इमारतच खरेदी केल्याचे सांगून टाकलं. जेव्हा बॅनरला रॉयल ट्रस्ट क्रेडिट कार्ड कंपनीची इमारत 6.5 दशलक्ष डॉलर्समध्ये खरेदी करण्याची संधी मिळाली, तेव्हा त्याने रॉयल ट्रस्टचे गोल्ड क्रेडिट कार्ड वापरून पैसे दिले. जोनाथन याना या क्रेडिट कार्ड व्यवहारावर 2 टक्के फायदा झाला. जोनाथन बॅनरने सांगितलं कि, ते जे क्रेडिट कार्ड वापरतात ते खरेदीवर 1 टक्के सूट देते तसेच क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी त्यांना एक महिन्याचा अवधी मिळत असे.

क्रेडिट कार्ड म्हणजे काय?

क्रेडिट कार्ड हे एक आर्थिक साधन आहे जे तुम्हाला तुमच्या सर्व आर्थिक व्यवहारांवर क्रेडिट मिळवू देते. सोप्या भाषेत, क्रेडिट कार्ड हे एक कर्ज साधन आहे जे तुम्हाला आत्ताच वस्तू खरेदी करण्यास आणि नंतर पैसे देण्याची परवानगी देते. 2023 मध्ये वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या अहवालानुसार, कॅनडामधील बहुतेक लोक जगात क्रेडिट कार्ड वापरतात. इस्त्राईल, आइसलँड, हाँगकाँग, जपान, स्वित्झर्लंड, दक्षिण कोरिया, नॉर्वे युनायटेड स्टेट्स (यूएसए) आणि फिनलँड यासारख्या देशांमध्ये क्रेडिट कार्ड वापरले जातात.

Student Suicides Report : विद्यार्थ्यांच्या आत्महत्येत महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांपेक्षाही जास्त संख्या

Student Suicides Report

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रासाठी आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येत (Student Suicides Report) महाराष्ट्र राज्य देशात आघाडीवर आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) च्या आकडेवारीच्या आधारे, “विद्यार्थी आत्महत्या: एक महामारी स्वीपिंग इंडिया” या नावाच्या अहवालात बुधवारी वार्षिक आयसी 3 परिषद आणि एक्सपो 2024 दरम्यान जाहीर करण्यात आले. या अहवालात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. महत्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांपेक्षाही विद्यार्थी आत्महत्येचं प्रमाण हे जास्त आहे.

महिला विद्यार्थ्यांच्या आत्महत्या 7 टक्क्यांनी वाढल्या- Student Suicides Report

आयसी३ संस्था ही एक बिगर सरकारी संस्था असून जगभरातील शालेय शिक्षण संस्थांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्याचे काम या संस्थेकडून केले जाते. आयसी 3 इन्स्टिट्यूटने सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, “गेल्या दोन दशकांत विद्यार्थ्यांच्या आत्महत्या दरवर्षी 4 टक्के दराने वाढत आहेत. जे राष्ट्रीय सरासरीपेक्षा दुप्पट आहे. 2022 मध्ये, पुरुष विद्यार्थ्यांनी एकूण विद्यार्थ्यांपैकी 53 टक्के आत्महत्या केली. 2021 ते 2022 दरम्यान पुरुष विद्यार्थ्यांच्या आत्महत्येत 6 टक्क्यांनी घट झाली तर महिला विद्यार्थ्यांच्या आत्महत्या 7 टक्क्यांनी वाढल्या. (Student Suicides Report)

विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटनेमुळे लोकसंख्या वाढीचा दर आणि एकूणच आत्महत्येच्या ट्रेंडला मागे टाकले जात आहे. गेल्या दशकात, 0-24 वर्षांच्या मुलांची लोकसंख्या 582 दशलक्ष वरून 581 दशलक्षांवर गेली आहे, तर विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची संख्या 6,654 वरून 13,044 पर्यंत वाढली आहे, ”असे आयसी 3 संस्थेने संकलित केलेल्या अहवालात नमूद केले आहे. भारतात 15 ते 24 वर्षे वयोगटातील सातपैकी एका तरुणांना नैराश्य आणि असंतोषाची लक्षणे समाविष्ट आहेत. धक्कादायक म्हणजे, सर्वेक्षण केलेल्यांपैकी केवळ 41 % लोकांना आधार घेण्याची गरज वाटली. या अहवालात असे दिसून आलं आहे की महाराष्ट्र, तमिळनाडू आणि मध्य प्रदेशात विद्यार्थ्यांच्या आत्महत्या सर्वाधिक आहेत . देशभरातील विद्यार्थ्यांच्या एकूण आत्महत्येच्या प्रमाणात एक तृतीयांश आत्महत्या याच ३ राज्यात होत आहेत.दक्षिणेकडील राज्ये आणि युनियन प्रांतमध्ये विद्यार्थी आत्महत्येचं प्रमाण 29% आहेत.

.. तर अफझलखानसारखं राणेंच्या पोटाचं ऑपरेशन करावं का? राऊतांचा जोरदार प्रहार

sanjay raut narayan rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्धव ठाकरे यांनी स्वत:च्या वडिलांचा पुतळा देखील सरकारच्या खर्चाने उभारला आहे, असा घणाघात केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केल्यानंतर आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राणेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्यावरून यांच्या पोटात दुखत असेल तर अफझलखानप्रमाणे यांच्या पोटाचं ऑपरेशन करावा का? असा सवाल संजय राऊतांनी केला. यावेळी संजय राऊतांनी (Sanjay Raut) देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा हल्लाबोल केला. कालच्या प्रकाराची देवेंद्र फडणवीसांना गृहमंत्री म्हणून लाज वाटली पाहिजे असं राऊतांनी म्हंटल. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, बाळासाहेब ठाकरे हे फक्त उद्धव ठाकरेंचे वडील नाहीत तर महाराष्ट्राचा बाप आहे. नारायण राणे हे बाळासाहेब ठाकरेंबद्दल इतकी नमकहरामी करणार असतील तर मला वाटत यासारखे दुर्दैव नाही. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी नारायण राणेंना मुख्यमंत्रीपद दिले, सर्व पदे दिली, प्रतिष्ठा दिली त्यांच्या पुतळ्यापर्यंत तुम्ही येत असाल तर मला असं वाटत उद्याचे जोडो मारो आंदोलन योग्य आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्यावरून यांच्या पोटात दुखत असेल तर अफझलखानप्रमाणे यांच्या पोटाचं ऑपरेशन करावा का? असा सवाल संजय राऊतांनी केला. ज्याने महाराष्ट्राला स्वाभिमान दिला, अस्मिता दिली, लढायला शिकवलं त्या बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्यासंदर्भात प्रश्न निर्माण करताय?कुठे फेडाल हे पाप असं म्हणत संजय राऊतांनी नारायण राणे यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

दरम्यान, नारायण राणे यांनी काल राजकोट किल्य्यावर पोलिसांवर आरेरावी केली, त्यावरून संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष केलं. महाराष्ट्रातील संस्कृती आणि संस्कार फडणवीसांच्या काळात पूर्णपणे उद्धवस्त झालेला आहे. मालवणामध्ये जे झालं तो महाराष्ट्राच्या गृहखात्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. कालच्या प्रकाराची देवेंद्र फडणवीसांना गृहमंत्री म्हणून लाज वाटली पाहिजे. पोलिसांची प्रतिष्ठा ते राखू शकले नाहीत. खुले आम भरस्त्यावर पोलिसांची वर्दी फाड्याचा प्रयत्न झाला. पोलिसांच्या तोंडावर थुंकण्याचा प्रयत्न काल झाला, मग या सर्व गोष्टींचे गृहमंत्री समर्थन करतात का ? असा सवाल संजय राऊतांनी केला. काय तर बोलण्याची स्टाइल आहे त्यांची. मग आम्ही बोलतो तर आमच्यावर का गुन्हे दाखल करता? असं म्हणत संजय राऊत यांनी फडणवीसांवर आपला संताप व्यक्त केला.

अश्विनने निवडली ऑल टाइम बेस्ट IPL XI; या खेळाडूला केलं कॅप्टन

R Ashwin all time IPL XI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा दिग्गज ऑफ -स्पिनर रवीचंद्रन अश्विनने (R. Ashwin) आपली ऑल टाइम बेस्ट IPL XI संघाची निवड केली आहे. आर अश्विनने आपल्या संघात दिग्गज खेळाडूंना स्थान दिले आहे. यामध्ये ६ फलंदाज, २ अष्टपैलू फिरकीपटू आणि ३ जलदगती गोलंदाजांचा समावेश आहे. भारताचा सर्वोत्तम कर्णधार महेंद्रसिंघ धोनीच्या (MS Dhoni) गळ्यात अश्विनने कर्णधारपदाची माळ घातली आहे. अश्विन स्वतः धोनीच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष क्रिकेट खेळला आहे.

अश्विनच्या संघात कोणाकोणाला स्थान –

आर अश्विनने आपल्या टाइम टाइम बेस्ट IPL XI मध्ये सलामीवीर म्हणून रोहित शर्मा आणि विराट कोहली या २ महान फलंदाजांना निवडलं आहे. विराट आणि रोहित हे २००८ पासून म्हणजे आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून खेळत आहेत. दोन्ही खेळाडूंनी आयपीएल मध्ये खोऱ्याने धावा काढल्यात. तिसऱ्या क्रमांकावर अश्विनने मिस्टर आयपीएल नावाने प्रसिद्ध असलेल्या सुरेश रैनाची निवड केली आहे. सुरेश रैना हा आयपीएल इतिहासातील सार्वकालीन महान खेळाडू म्हणून गणला जातो. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अश्विनने सूर्यकुमार यादव आणि एबी डिव्हिलिअर्स या दोन्ही ३६० डिग्री फलंदाजांना पसंती दर्शवली आहे. कोणत्या परिस्थितीत सामना खेचून आणण्याची क्षमता या दोन्ही खेळाडूंमध्ये आहे.

अश्विनने अष्टपैलू खेळाडू म्हणून रशीद खान आणि सुनील नारायण या २ फिरकीपटू खेळाडूंना संधी दिली आहे. दोन्ही खेळाडू आपल्या टिच्चून गोलंदाजीसाठी ओळखले जातात तसेच ऐनवेळी जोरदार फटकेबाजी करण्याची क्षमता सुद्धा रशीद खान आणि सुनील नारायणमध्ये हे संपूर्ण जगाने बघीतले आहे. यानंतर अश्विनने आपल्या संघात ३ जलदगती गोलंदाजाची निवड केली आहे. यामध्ये जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा आणि भुवनेश्वर कुमार यांचा समावेश आहे. यातील भुवनेश्वर कुमार हा सुरुवातीला चेंडू स्विंग करण्यात माहीर आहे तर दुसरीकडे जसप्रीत बुमराह आणि लसिथ मलिंगा हे दोन्ही यॉर्कर किंग डेथ ओव्हर मधेय संघासाठी फायदेशीर ठरतील.

अशी आहे अश्विनची ऑल टाइम बेस्ट IPL XI-

रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, सूर्यकुमार यादव, एबी डीव्हिलियर्स, महेंद्रसिंग धोनी (कॅप्टन आणि विकेटकीपर), रशीद खान, सुनील नारायण , भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा

सरपंचाचे मानधन वाढणार; गिरीश महाजन यांची मोठी गॅरेंटी

honorarium of the sarpanch

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गावचा कारभारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरपंचांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील सर्व सरपंचाच्या मानधनात वाढ करण्यात येणार असल्याची ग्वाही ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. ग्रामपंचायतीच्या (Gram Panchayat) संदर्भातील विविध मागण्यांसाठी गेल्या काही दिवसापासून अखिल भारतीय संरपंच परिषदेच्या (Akhil Bhartiya Sarpanch Parishad) वतीनं मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरु होते. त्या आंदोलनाला यश आलं असं म्हणावं लागेल.

सरपंचाचे मानधन वाढावं, सरपंचांना 15 हजार रुपये, उपसरपंचाला 10 हजार रुपये तर ग्रामपंचायत सदस्याला 3 हजार रुपयांचे मानध मिळावे, ग्रामपंचायतीला जास्तीत जास्त निधी मिळावा यांसारख्या विविध मागण्या करत अखिल भारतीय संरपंच परिषदेच्या वतीने आंदोलन सुरु होते. यानंतर सरकारकडून मंत्री गिरीश महाजन यांनी सरपंच्यांच्या शिष्टमंडळाशी संवाद साधत आंदोलनाला बसलेल्या सरपंच्याच्या सर्व मागण्या मान्य केल्या. महाजन यांच्या मध्यस्थीनंतर सरपंचांचे आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. सरपंचांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव आठवड्यात मान्य करणार असल्याची माहिती मंत्री महाजन यांनी दिलीय.

सरपंचाच्या मागण्या नेमक्या काय?

सरपंचांना 15 हजार रुपये, उपसरपंचाला 10 हजार रुपये तर ग्रामपंचायत सदस्याला 3 हजार रुपयांचे मानध मिळावे
मुंबईत सरपंच भवनची स्थापना करावी
ग्रामपंचायत संदर्भातील सर्व घटकांना विमा, पेन्शन, निश्चित वेतन लागू करावे
ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पद एकत्रित करुन पंचायत विकास अधिकारी म्हणावे
ग्रामरोजगार सेवकाची नेमणूक पूर्णवेळ करुन वेतनिश्चिती करावी
ग्रामपंचायतींना स्वायत्त संस्थेचा अधिकार देऊन विकासकामे करण्याचा अधिकार द्यावा
संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आकृतिबंधात आणावे
यावलकर समितीचा अहवाल लागू करावा
संगणक परिचालकांचा भार ग्रामपंचायतीऐवजी शासनाने उचलावा

शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर अजित पवार गटाने घेतला मोठा निर्णय; महायुतीत खळबळ

shivaji maharaj statue ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा खाली कोसळल्यानंतर (Shivaji Maharaj Statue Fell Down) शिवप्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण सुद्धा गरम झालं असून विरोधात असलेली महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. महाविकास आघाडीकडून येत्या १ सप्टेंबर पासून जोडो मारो आंदोलन पुकारण्यात आलं आहे. मात्र एकीकडे विरोधक आक्रमक असतानाच आता महायुतीतील घटक असलेल्या अजित पवार गटानेही (Ajit Pawar Group) आपल्याच सरकारच्या विरोधात भूमिका घेत निषेध आंदोलन करणार आहे. त्यामुळे महायुतीत खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ठाण्यात गुरुवारी निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला हे अत्यंत वेदनादायी अन् मनाला संताप आणणारे आहे. या दुर्घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी व भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत याची खबरदारी घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गुरुवार, दिनांक २९ ऑगस्ट, २०२४ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १२ या वेळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, तलावपाळी, ठाणे येथे ‘मूक आंदोलन’ करण्यात येणार आहे, अशी भूमिका पक्षाकडून मांडण्यात आली आहे. तसेच अजित पवार गट राजकोट किल्ल्यावर जात मूक आंदोलन करणार आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी याबाबत पत्र काढलं आहे. महायुतीतील घटक पक्षानेच अशी भूमिका घेतल्याने भाजप आणि शिंदे गटाचं टेन्शन वाढलं आहे.

दरम्यान, शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर अजित पवारांनी जाहीर सभेत महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी सुद्धा मागितली. यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्या सर्वांच्या चौकशा केल्या जातील.पण मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतो. मी याबाबत महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेची माफी मागतो. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वाचे दैवत आहेत. मात्र, त्यांचा पुतळा अशा प्रकारे कोसळणे हे सर्वांना धक्का बसणारे आहे. यामध्ये जे कोणी दोषी असतील मग ते कोणीही असूद्या. वरिष्ठ अधिकारी असुद्या किंवा कंत्राटदार असुद्या. त्या कंत्राटदाराला तर काळ्या यादीत टाकलं पाहिजे”, असं अजित पवार यांनी म्हटलं होते.

Union Cabinet : देशभरात 12 औद्योगिक स्मार्ट शहरे उभारली जाणार; महाराष्ट्रातील ‘या’ शहराचा समावेश

Union Cabinet : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज (२८) झालेल्या केंद्रीय कॅबिनेट बैठकीमध्ये एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी, उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा आणि गुजरातमधील धोलेरा प्रमाणे विविध राज्यांमध्ये 12 नवीन औद्योगिक शहरे उभारली जाणार आहेत. या प्रकल्प अंतर्गत 28 हजार 602 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून यामुळे थेट दहा लाख लोकांना रोजगार (Union Cabinet) मिळणार आहे.

अर्थसंकल्पात सरकारने उत्पादनाला चालना देण्यासाठी राज्ये आणि खाजगी क्षेत्राच्या भागीदारीत किंवा जवळपास 100 शहरांमध्ये ‘प्लग अँड प्ले’ औद्योगिक पार्क विकसित करण्याची घोषणा केली होती.

8 शहरे आधीच तयार होत आहेत (Union Cabinet)

मिळालेल्या माहितीनुसार आठ शहरे आधीच अंमलबजावणीच्या विविध टप्प्यात आहेत. गुजरातमधील धोलेरा, महाराष्ट्रातील अरिक (औरंगाबाद), मध्य प्रदेशातील विक्रम उद्योगपुरी आणि आंध्र प्रदेशातील कृष्णापट्टणम या शहरांच्या वसाहतीसाठी आधारभूत पायाभूत सुविधा विकसित करण्यात आल्या असून आता उद्योगांसाठी भूखंड वाटपाचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे, इतर चार औद्योगिक शहरांमध्ये देखील, सरकारचे विशेष युनिट वाहन रस्ते जोडणी, पाणी आणि वीजपुरवठा यासारख्या मूलभूत पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या प्रक्रियेत (Union Cabinet) आहेत.

या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये रेल्वेच्या तीन पायाभूत प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय मंत्रिमंडळाने कृषी निधीमध्ये वाढ केली आहे. ॲग्री इन्फ्रा फंड 2020 मध्ये सुरू झाला त्याचा निधी एक कोटी रुपये होता. याशिवाय २३४ शहरांमध्ये एफ एम रेडिओ सुविधा सुरू करण्यास मंत्रिमंडळांना मान्यता दिली आहे. यासाठी 730 वाहिन्यांचा लिलाव करण्यात येणार आहे.

रोजगाराची संधी (Union Cabinet)

नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडोर डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत या क्षेत्रामध्ये अनेक महत्त्वाच्या रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. नियोजित औद्योगीकरणाद्वारे सुमारे दहा लाख लोकांसाठी प्रत्यक्ष नोकऱ्या आणि 30 लाख लोकांपर्यंत अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

12 नवीन औद्योगिक स्मार्ट शहरे (Union Cabinet)

  • राजपुरा, पटियाला
  • खुरपिया, उत्तराखंड
  • आग्रा, उत्तर प्रदेश
  • प्रयागराज, उत्तर प्रदेश
  • गया, बिहार
  • दिघी बंदर, महाराष्ट्र
  • जोधपूर पाली मारवाड
  • कोपर्थी, तेलंगणा
  • झहीराबाद, तेलंगणा
  • ओरवाकल आंध्र प्रदेश
  • पल्लकड, केरळ
  • J&K किंवा हरियाणातील शहरांची नावे अद्याप उघडकीस नाहीत.