Sunday, December 21, 2025
Home Blog Page 521

Monsoon Tips : पावसाळ्यात फर्निचरला आर्द्रता आणि वाळवीपासून वाचवा ; वापरा ह्या 5 टिप्स

Monsoon Tips : पावसाळा कुणाला आवडत नाही? पावसाळ्यातील गारवा हवाहवासा वाटतो. शिवाय बाहेरचे वातावरण देखील हिरवेगार आणि प्रफुल्लित होऊन जाते. मात्र पावसाळ्यात फर्निचरची खास देखभाल करावी लागते. कारण या दिवसात फर्निचरला ओलावा आणि वाळवी लागण्याची भीती असते. त्यामुळे योग्य वेळी काळजी न घेतल्यास वाळवी आणि ओलावा तुमचे सुंदर आणि महागडे फर्निचर खराब करू शकतात. मात्र काही सोप्या टिप्सच्या मदतीने तुम्ही हे फर्निचर बऱ्याच प्रमाणात सुरक्षित ठेवू शकता. चला तर मग जाणून (Monsoon Tips) घेऊया…

फर्निचर स्वच्छ आणि कोरडे ठेवा (Monsoon Tips)

फर्निचर स्वच्छ करण्यासोबतच पावसाळ्यात ते कोरडे ठेवणेही खूप गरजेचे आहे. फर्निचरवर साचलेली धूळ आणि घाण स्वच्छ करण्यासाठी, ओल्या कपड्याने नव्हे तर कोरड्या कपड्याने फर्निचर पुसून घ्या . यामुळे आर्द्रतेची समस्या दूर होईल आणि वाळवी लागण्याचा धोकाही दूर होईल.

नॅप्थालीनचे गोळे वापरा

वळविला दूर ठेवण्यासाठी नेफ्थलीन बॉल्स खूप प्रभावी आहेत. हे गोळे तुम्ही तुमच्या कपाट, ड्रॉवर आणि इतर फर्निचरमध्ये ठेवू शकता. नॅप्थालीन आर्द्रता
नियंत्रित (Monsoon Tips) करते.

अँटी टर्माइटची फवारणी करा

फर्निचरवर अँटी-टर्माइट स्प्रे स्प्रे करा. यामुळे वाळवीचा धोका कमी होईल आणि तुमचे फर्निचरही सुरक्षित राहील. या फवारणीचा वापर विशेषत: ज्या ठिकाणी वाळवी असण्याची शक्यता असते अशा (Monsoon Tips) ठिकाणी करा.

वेंटिलेशनकडे लक्ष द्या (Monsoon Tips)

पावसाळ्यात खोल्यांमध्ये हवा खेळती राहील याकडे लक्ष द्या. यामुळे ओलावा कमी होतो. दिवसा शक्य असल्यास, खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवा जेणेकरुन सूर्यप्रकाश आणि खोल्यांमध्ये हवा खेळती (Monsoon Tips) राहील.

फर्निचर भिंतीपासून दूर ठेवा (Monsoon Tips)

फर्निचर भिंतीपासून थोडे दूर ठेवा, जेणेकरून भिंतीतून येणारा ओलावा थेट फर्निचरपर्यंत पोहोचणार नाही. भिंत आणि फर्निचरमध्ये थोडे अंतर ठेवल्यास ओलाव्याचा प्रभाव कमी होईल आणि वाळवीचा धोकाही (Monsoon Tips) कमी होईल.

Monkeypox | जगभरात वाढला मंकीपॉक्सचा उद्रेक; महाराष्ट्र आरोग्य विभागाने केली नियमावली जाहीर

Monkeypox

Monkeypox | काही वर्षांपूर्वी संपूर्ण जगावर कोरोना या विषाणूचे संकट आले होते. या आजारातून आणि संकटातून देश आता कुठे सावरलेला आहे. तर पुन्हा एकदा जगात मंकीपॉक्स या साथीच्या आजाराने धाड घातलेली आहे. मंकीपॉक्स हा एक साथीचा आजार आहे. त्यामुळे एकमेकांच्या संपर्कात येण्याने या रोगाची लागण वाढते. संपूर्ण जगामध्ये सध्या या रोगाचा धोका वाढलेला आहे. आता याच मंकीपॉक्स रोगाच्या पार्श्वभूमीवर राज्यात देखील शासनाकडून विविध उपाय योजना करण्यात येत आहे. आणि त्याची अंमलबजावणी देखील करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात अजून तरी मंकीपॉक्स (Monkeypox) रोगाचा रुग्ण आढळलेला नाही तरी. देखील आधीपासूनच खबरदारी घेण्यासाठी राज्य आरोग्य विभागाकडून नियमावली देखील जाहीर करण्यात आलेली आहे.

मंकीपॉक्स हा एक साथीचा आजार आहे. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला मंकीपॉक्स हा आजार झाला असेल. आणि त्याच्या संपर्कात जरी तर व्यक्ती आली, तर त्या व्यक्तीला देखील या रोगाची लागण होऊ शकते. जगभरातील अनेक देशांमध्ये सध्या रोगाने आजाराने थैमान घातलेले आहे. महाराष्ट्र राज्यात अजून तरी या आजाराचा रुग्ण सापडलेला नाही. तरी देखील आधीपासून काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून देण्यात आलेले आहे. याबाबतची माहिती आरोग्य विभागाचे उपसंचालक राधा कृष्ण पवार यांनी दिलेली आहे. त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, जर मंकीपॉक्स (Monkeypox) आजाराची लक्षणे दिसली, तर त्वरित रुग्णालयात संपर्क साधावा. त्यामुळे लवकरात लवकर त्यावर उपचार देखील करता येईल. आता मंकीपॉक्स आजाराची नक्की लक्षण काय आहेत? या गोष्टींची माहिती आपण जाणून घेऊया जेणेकरून तुम्हाला देखील याची खूप मदत होईल.

मंकीपॉक्स आजाराची लक्षणे | Monkeypox

मंकीपॉक्स हा एक संसर्गजन्य आजार आहे. मंकीपॉक्स झालेल्या व्यक्तीच्या अंगावर लाल पुरळ येतात. त्याचप्रमाणे त्या व्यक्तीला खूप जास्त त्रास होतो. अत्यंत तीव्रतेचा ताप येतो. घसा खवखवतो, डोकेदुखी होते, अंगदुखी होते त्याचप्रमाणे हात पायांना सूज येते. मंकीपॉक्सची (Monkeypox) लागण झालेल्या रुग्णांच्या घशात जबड्याखाली मांडीवर लाल पुरळ येतात. त्या व्यक्तीला तसेच पाणी घेताना देखील त्रास होतो. हा व्यक्ती जर प्राण्यांच्या संपर्कात आल्यावर त्याला या आजाराची लक्षणे दिसण्यास पाच ते वीस दिवस ल लागू शकतात. सध्या आफ्रिकन देशांमध्ये हा व्हेरिएट मोठ्या प्रमाणात पसरत आहे.

त्या सध्या या आजारासाठी ते उद्रेक झालेला दिसून येत आहे. या आजारामुळे मृत्यूदर सध्या 11% इतका आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात अशी परिस्थिती येऊ नये आणि आली तरी त्यावर नक्की काय यंत्रणा आणता येईल. याबद्दलची खबरदारी आरोग्य विभाग घेत आहे. त्यामुळे तुम्हाला जर वरील कोणतीही लक्षणे आढळली, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधा. आणि त्यावर उपचार चालू करा. तसेच तुम्हालाही लक्षणे दिसल्यास दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात जाणे टाळा.

‘भारताची समस्या वाढणार आहे’; बांगलादेशमध्ये सत्तांतर घडवणाऱ्या विद्यार्थी नेत्याने भारताला दिला इशारा

Nahid Islam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये हिंसक असे वातावरण आहे. आरक्षणावरून बांगलादेशमध्ये खूप मोठा वाद पेटला. आणि त्यातून काही जीवितहानी देखील घडलेली आहे. या सगळ्या परिस्थितीत नंतर बांगलादेश मधील पंतप्रधान शेख हसीना यांनी पदाचा राजीनामा दिलेला आहे. आणि त्या देश सोडून देखील गेलेल्या आहेत. सध्या शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर देशामध्ये मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली एक काळजीवाहू सरकार. संपूर्ण देशाचा कारभार पाहत आहे. बांगलादेशमध्ये सत्तांतरामुळे जे आंदोलन झाले. त्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विद्यार्थी नेत्यांपैकी एका नेत्यांनी नाहीद इस्लाम याने भारताला देखील इशारा दिलेला आहे. त्याबे असे म्हटलेले आहे की, भारत सरकारने बांगलादेशमधील कोणत्याही एका पक्षाला पाठिंबा देणे हे दोन्ही देशांमध्ये कतुटेमागचे एक मोठं कारण असणार आहे. सध्या बांगलादेश मध्ये हा काळजीवाहू सरकार देश चालवत आहे. त्यातील एक माहिती आणि प्रसारक सल्लागार आहे.

बांगलादेश मधील काळजीवाहू सरकारचे मुख्य मोहम्मद युनूस यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधलेला आहे. या संवादनंतर त्याने भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंधाबाबत देखील वक्तव्य केले. त्यांनी सांगितले की भारताचे आमचे आधीपासूनच ऐतिहासिक संबंध आहे. परंतु यात नेहमीच चढउतार येत असतात. हे संबंध दोन देशांमधील आणि दोन लोकांमधील देखील आहे. तसेच भारताचे संबंध हे बांगलादेश मधील एका राजकीय पक्षासोबत आहे. बांगलादेशमधील लोकांसोबत नाही, असे आम्हाला वाटू लागले आहे. कारण भारताने सध्या बांगलादेशसोबत संबंध प्रस्थापित न करता आवामी लीग पक्षासोबत संबंध प्रस्थापित केले आहे. त्यामुळे ही बाब आता भारतासाठी ही समस्या वाढवणारी असणार आहे.

भारत सरकारने आवामी लीग पक्षासोबत संबंध प्रस्थापित केले. आणि त्यांना पाठिंबा दर्शवल्यामुळे मोहम्मद युनूस यांना हे पटलेले नाही. त्यानंतर त्यांनी हे विधान केलेले आह याबाबत त्यांनी भारताला सल्ला देखील दिलेला आहे. यावेळी तो म्हणाला की, कुठल्याही एका पक्षासोबत नाही तर देश आणि त्या देशातील लोकांसोबत संबंध प्रस्थापित करणे आणि ते टिकवणे खूप महत्त्वाचे आहे. ही गोष्ट भारताने देखील समजून घेतली पाहिजे. राजकीय पक्ष येतात जातात. परंतु देश आणि देशासोबत तसेच लोकांसोबतचे संबंध देखील चांगले ठेवले पाहिजे. त्यामुळे येथील लोकांच्या मनात भारतासंदर्भात राग आणि संताप निर्माण झाला आहे. असे देखील त्यांनी सांगितलेले आहे.

MSRTC : लालपरी टाकणार कात ! ताफ्यामध्ये दाखल होणार नव्या 2475 बसेस

MSRTC : राज्यातील ग्रामीण भागाची जीवन वाहिनी असलेली एसटी बसचं आता लवकरच रुपडं पालटणार आहे. राज्याच्या वाड्या वस्त्यांवर आजही प्रवाशांना वेळेत पोहोचवणारी ‘लालपरी’ आता अत्याधुनिक होणार असून राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यामध्ये 2475 नवीन परिवर्तन बसेस दाखल होणार असल्याची माहिती आहे. सध्या याव्य प्रोटोटाईप च्या निर्मितीचं काम सुरू असून ऑक्टोबर मध्ये नवीन बस (MSRTC) ताफ्यामध्ये दाखल होणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार पुणे मुंबई सह अन्य मार्गावर या बसेस प्रवाशांच्या सेवेमध्ये धावणार आहेत. पुणे विभागाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास पुणे विभागाला सुमारे 150 बसेस मिळणार आहेत. एम एस आर टी सी च्या अनेक गाड्या ह्या जुन्या असून काही गाड्यांना देखभालीची मोठी आवश्यकता आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर होता. त्यामुळे अनेक प्रवाशांनी (MSRTC) एमएसआरटीसी कडे पाठ फिरवाल्याचेही दिसून आले.

एवढेच नाही तर याचा परिणाम एम एस आर टी सी च्या आर्थिक गणितावर होताना दिसतोय. मात्र महिला सन्मान आणि अमृत ज्येष्ठ नागरिक अशा योजनांमुळे एसटीच्या प्रवासी संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे गाड्यांच्या संख्येत मात्र घट होत आहे. अशावेळी नवीन बसेस ह्या प्रवाशांसाठीच नव्हे तर एसटी महामंडळासाठी सुद्धा आनंदाची बाब आहे. आत्ताच्या घडीला महामंडळाच्या ताफ्यामध्ये 15800 बसेस आहेत. यातील सुमारे 14000 बस प्रत्यक्ष प्रवासी सेवेत असल्याचे माहिती आहे.

कशी असेल नवी बस? (MSRTC)

  • एसटी महामंडळाच्या या नव्या बसेस नऊ मीटर लांबीच्या असून दोन बाय दोन स्वरूपाच्या आहेत.
  • या बसची प्रवासी क्षमता प्रत्येकी 44 इतकी असेल
  • या एका बसची किंमत सुमारे 38 लाख रुपये आहे.
  • यासाठी 1012 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
  • पहिल्या टप्प्यामध्ये 300 बसेस दाखल होतील आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर बस दाखल होतील.
  • महत्त्वाचं म्हणजे नव्या बस महामंडळाच्या स्वमालकीचे असतील.

खासगी कंपनीला कंत्राट (MSRTC)

या बसेसच्या बाबतीतली आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महामंडळ या बसेसच्या सांगाड्याची खरेदी करून मध्यवर्ती कार्यशाळेत बस बांधणी करते. बांधणी झाल्यावर मध्यवर्ती कार्यालयाकडून विविध विभागांना बसेस वितरण केल्या जातात. मात्र यावेळी कंत्राट देण्यात आलेली खाजगी कंपनीच सांगाड्याची बांधणी करणार आहे. त्यामुळे महामंडळाला जास्त खर्च करावा लागणार असल्याची माहिती आहे.

याबाबत एका माध्यमाला माहिती देताना महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस (मुंबई ) श्रीरंग बर्गे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की नवीन बसेस दाखल होणं प्रवाशांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. (MSRTC) मात्र महामंडळाच्या कार्यशाळा सक्षम असताना गाड्यांचे बांधणी बाहेरच्या कंपनीकडून केली जाणार आहे. असे पुन्हा होता कामा नये महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यशाळेतच नवीन गाड्यांची बांधणी झाली पाहिजे असं मत बरगे यांनी व्यक्त केले.

Home Loan | गृहकर्ज घायचे असेल तर, घरबसल्या YONO ॲपवरून जाऊन घेऊ शकता पात्रता

Home Loan

Home Loan | प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही ना काही इच्छा असतात. काही स्वप्न असतात. अगदी आपण लहान मुलाला जरी विचारले की, त्याची इच्छा काय आहे? तर तो अजिबात विचार न करता त्याच्या दहा-बारा इच्छा सहज सांगून टाकीन. परंतु ही स्वप्न जेवढी बघायची असतात तेवढी पूर्ण देखील करायची असतात. प्रत्येकाच्या स्वप्नांची यादी ही वेगवेगळी असते. परंतु त्या स्वप्नांच्या यादीतील एक गोष्ट मात्र सगळ्यांची सारखी असते. ती म्हणजे स्वतःच घर घेणे. स्वतःच घर घ्यायचे हे अनेकांचे स्वप्न असतं. परंतु आजकाल वाढती महागाई त्याचप्रमाणे घरांचे भाव पाहता अनेकांचे हे स्वप्न पूर्ण होत नाही.

अनेक लोक आपल्या घर गाव सोडून शहरांमध्ये नोकरी करायला जातात. आणि तिथे जाऊन स्वतःचे घर विकत घेण्याचे स्वप्न बघत असतात. परंतु त्यांच्यासाठी ही प्रक्रिया अजिबात स्वस्त नसते. सध्या देशातील अशा अनेक बँका आहेत. ज्यांनी घर खरेदीसाठी गृह कर्जाची (Home Loan) सुविधा देखील लोकांना दिलेली आहे. त्यातच स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांच्या ग्राहकांना घर खरेदी करण्यासाठी खूप कमी व्याजदराने गृहकर्ज देत आहे. जर तुम्ही देखील स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल आणि तुम्हाला घर खरेदी करायचे असेल, तर आजची ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

8. 50 टक्के दराने गृह कर्ज | Home Loan

स्टेट बँक ऑफ इंडिया ही तुम्हाला गृह कर्जाची पात्रता तपासण्यासाठी YONO ॲप देत आहे. या YONO ऍपद्वारे तुम्ही अर्ज करण्याचा सर्वात सोपा मार्ग जाणून घेऊ शकता. यावर तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल. स्टेट बँक ऑफ इंडिया ही सगळ्या देशातील सर्वात मोठी बँक आहे. ही बँक त्यांच्या ग्राहकांना सुरुवातीला 8.50% दराने गृह कर्ज देते. आता या YONO युनो ॲपवर तुमची ग्रह कर्जासाठी पात्रता कशी तपासायची? याची सोपी पद्धत आपण जाणून घेणार आहोत.

गृहकर्ज पात्रता तपासण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी पद्धत

  • तुमच्या मोबाइल फोनमध्ये योनो ॲप उघडा आणि मेनूवर जा आणि कर्जावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला होम लोनवर क्लिक करावे लागेल.
  • पुढील चरणात तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकावी लागेल.
  • आता तुम्हाला तुमचा उत्पन्नाचा स्रोत सांगावा लागेल की तुम्ही नोकरी किंवा व्यवसायातून पैसे कमावता.
  • पुढे तुम्हाला तुमच्या मासिक उत्पन्नाची माहिती द्यावी लागेल.
  • तुमच्याकडे आधीच कर्ज असल्यास, तुम्हाला सध्याच्या कर्जाची माहिती द्यावी लागेल.
  • तुम्ही ही सर्व माहिती देताच, तुमच्या स्क्रीनवर आवश्यक माहितीसह गृहकर्ज अर्जाची पात्रता दिसेल.
  • आता तुम्हाला I am Interested वर क्लिक करावे लागेल.
  • पुढील चरणात तुम्हाला सर्व आवश्यक तपशील भरावे लागतील आणि सबमिट वर क्लिक करा.
  • हे केल्यानंतर, तुमचा ऑनलाइन अर्ज दाखल केला जाईल, त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर बँकेकडून कॉल येईल.

Mumbai Metro : मुंबईतील भुयारी मेट्रोचा पहिला टप्पा सप्टेंबर मध्ये होणार खुला ? जाणून घ्या

Mumbai Metro : मुंबईकरांसाठी आता एक खुशखबर असून मुंबई मेट्रो 3 या मुंबईतील पहिल्या भुयारी मार्गिकेवर बीकेसी ते आरे दरम्यानचा दहा स्थानकाचे काम आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे मेट्रो 3 ची सेवा सप्टेंबर मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबईतील ट्रॅफिकच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुंबई मेट्रोचं जाळं मुंबईमध्ये पसरवलं जात आहे.

त्यातच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन कडून 33.5 किलोमीटर लांबीचा भुयारी मार्गिका प्रकल्प हाती घेण्यात आला असून या मार्गिकेवर 69 स्थानक आहेत. पहिल्या टप्प्यात मात्र दहा स्थानकांमधून मेट्रो धावण्याची माहिती आहे. बीकेसी ते आरे दरम्यान पहिल्या टप्प्यात दहा स्थानके असणार आहेत. या मेट्रोचे वैशिष्ट्य म्हणजे ही स्थानके 22 ते 28 मीटर जमिनीखाली असून मुंबई (Mumbai Metro) विमानतळा जवळील सहार रोड टर्मिनल 1 आणि टर्मिनल 2 ही स्थानके सर्वात जास्त खोलीवर आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार एमएमआरसीने आरडीएसओ पथकाकडून या मेट्रो मार्गिकेची तपासणी करून घेतली आहे. मेट्रोच्या ट्रायल रन देखील झालया आहेत. संपूर्ण 33 किलोमीटर भुयारी मार्ग पुढच्या वर्षी सुरु (Mumbai Metro) होण्याची शक्यता आहे. तर पहिला टप्पा पुढील महिन्यात खुला केला जाऊ शकतो. सध्याच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास तर सध्या मेट्रो मार्गीकेवरील टर्मिनल एक आणि टर्मिनल दोन स्थानकांच्या फिनिशिंगचे काम सुरू आहे. लवकरच त्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

मुंबई मेट्रो 3 मार्गावर कोणत्या स्थानकांचा समावेश (Mumbai Metro)

मुंबई मेट्रो 3 मार्गावर विधान भवन, कप परेड, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसएमटी मेट्रो ,काळबादेवी, गिरगाव, ग्रँड रोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी नेहरू विज्ञान केंद्र, आचार्य अत्रे चौक, वरळी, सिद्धिविनायक, दादर, शितळादेवी मंदिर, धारावी, बीकेसी, विद्यानगरी, सांताक्रुज, विमानतळ ,आंतरराष्ट्रीय विमानतळ, मरोळ नाका, एमआयडीसी, सिप्झ, असतील यापैकी आरे सोडून सर्व स्थानके भूमिगत आहेत.

तर मुंबई मेट्रो तीनच्या पहिला टप्पा जो खुला केला जाईल यामध्ये दहा स्थानक कोणती आहेत ते आता पाहूयात या दहाच स्थानकांमध्ये आरे, सिप्झ, एमआयडीसी, मरोळ नाका, आंतरराष्ट्रीय विमानतळ, टर्मिनल दोन, (Mumbai Metro)सहार रोड ,विमानतळ, टर्मिनल एक, सांताक्रुज, विद्यानगरी आणि बीकेसी या दहा स्थानकांचा यामध्ये समावेश असणार आहे.

Police Recruitment 2024 | राज्यात डिसेंबरमध्ये पुन्हा होणार पोलीस भरती; मुंबई पोलीस दलासाठी भरली जाणार एवढी पदे

Police Recruitment 2024

Police Recruitment 2024 | दहावी बारावी झाल्यानंतर अनेक मुलांना तसेच अनेक मुलं आणि मुली पोलीस होण्याचे स्वप्न पाहतात. यासाठी त्यांना पोलीस भरतीची परीक्षा द्यावी लागते. राज्यात गेल्या वर्षी पोलीस भरतीची प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे. आता पुन्हा एकदा पोलीस भरतीचा स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे आता राज्यामध्ये येत्या डिसेंबर महिन्यात पुन्हा एकदा पोलीस भरती केली जाणार आहे. आणि या भरती अंतर्गत तब्बल साडेसात हजार पदाची भरती केली जाणार आहेत. यातील 1300 पदे ही मुंबई पोलीस (Police Recruitment 2024) दलासाठी आहे. त्यामुळे मुंबईतील तरुणांसाठी ही एक चांगली बातमी आहे.

मागील वर्षी देखील राज्यांमध्ये पोलीस भरती पार पडली होती या भरतीमध्ये दोन वर्षात जवळपास 35 हजार पदांची भरती झालेली होती. परंतु आता पुन्हा एकदा डिसेंबर मध्ये मोठी भरती होणार आहे. 2022 – 2023 मध्ये देखील पोलीस भरती झाली. त्यानंतर आता पुन्हा एकदा ही पोलीस भरती पार पडणार आहे. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली बातमी आहे. त्यांनी लवकरात लवकर तयारीला जागा कारण तुमच्या हातात पुढील चार-पाच महिनेच आहेत.

कोरोना काळात पोलीस भरती रखडली | Police Recruitment 2024

2020 मध्ये करोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान माजवले होते. त्यामुळे सगळे व्यवहार ठप्प झाले होते. या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जवळपास तीन वर्ष पोलीस भरती झाली नव्हती. परंतु सध्या लोकसंख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि पोलिसांची संख्या कमी पडत आहे. त्यामुळे मागील वर्षी ही पोलीस भरती राबवण्यात आलेली होती. आता पुन्हा एकदा डिसेंबर मध्ये पोलीस भरती होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

राज्यामध्ये पोलीस भरतीची (Police Recruitment 2024) प्रक्रिया राबविण्यात काही दिवसांपूर्वी आली होती. त्यावेळी 14 हजार 471 पोलीस पदांची भरती करण्यासाठी गृह विभागाकडून सर्व अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले होते. या भरती अंतर्गत आतापर्यंत 25 जिल्ह्यांमध्ये पोलीस शिपाई, 8 जिल्ह्यात चालक शिपाई आणि 5 जिल्ह्यांमध्ये लेखी परीक्षा घेण्यात आल्या होत्या. आता सप्टेंबरपर्यंत त्यांची भरती प्रक्रिया पूर्ण होणारच नाही करायची आहे. पावसाळ्यामध्ये पोलीस भरतीच्या मैदानासाठी मैदान न मिळाल्यामुळे या प्रक्रियेला उशीर झालेला आहे.

डिसेंबरमध्ये जी पोलीस भरती होणार आहे. त्या पोलीस भरती अंतर्गत मुंबई पोलीस दलासाठी 1300 पदांवर भरती केली जाणार आहेत. मुंबईमध्ये मागच्याच वर्षी 8000 पदांची भरती केली होती. त्यामुळे त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता सप्टेंबरमध्ये ते पोलीस दलात दाखल होणार आहे. या भरतीसाठी पोलिसांकडे आता 5 लाख 69 हजार अर्ज आलेले होते त्यापैकी 2572 पोलीस हवालदार, 917 चालक 717 तुरुंग हवालदार आणि 24 बॅट्समन पदांसाठी अर्ज करण्यात आलेले आहेत.

IRCTC : काशी विश्वनाथ आणि अयोध्येला भेट देण्याची सुवर्ण संधी, IRCTC चे खास बजेट पॅकेज

IRCTC : देशभरात पावसाचा जोर थोडा ओसरत चालला आहे. पाऊस पडून गेल्यामुळे वातावरणात सर्वत्र गारवा पसरतो. शिवाय सर्वत्र सुंदर हिरवळ पसरते. अशा स्थितीत जर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

काशी विश्वनाथ मंदिर आणि अयोध्येतील राम मंदिराला भेट देण्यासाठी भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच IRCTC, कडून एक परवडणारे टूर पॅकेज सुरु करण्यात आले आहे. या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला IRCTC कडून निवास, भोजन, प्रवास, निवास, सर्व काही मिळेल. त्यामुळे तुम्ही बिनधास्त तीर्थस्थानचे दर्शन घेऊ शकता. चला अधिक जाणून घेऊया या टूर बद्दल….

किती दिवसांची टूर ?

IRCTC कडून नियोजित करण्यात आलेली ही टूर 6 दिवस आणि 5 रात्रीची असेल.

पॅकेज बुक करण्यासाठी किती खर्च येईल?

या तुरीचे पॅकेज बुक करण्यासाठी तुम्हाला किमान 15,750 रुपये खर्च करावे लागतील. पण तुम्ही तुमच्या सोयीनुसार वेगवेगळी पॅकेजेस निवडू शकता. याचा पर्याय IRCTC कडून देण्यात आला आहे.

टूर पॅकेजची खास वैशिष्ट्ये

  • पॅकेजचे नाव- कन्फर्म ट्रेन तिकिटासह राम मंदिर दर्शन (EHR133)
  • डेस्टिनेशन कव्हर्ड – वाराणसी आणि अयोध्या
  • किती दिवस चालेल -5 रात्री आणि 6 दिवस
  • कधी निघेल – दर शुक्रवारी
  • प्रवास मोड- ट्रेन

कसे कराल बुकिंग ?

IRCTC वेबसाइट www.irctctourism.com ला भेट देऊन या टूर पॅकेजसाठी बुकिंग करू शकता. बुकिंग आयआरसीटीसी टुरिस्ट फॅसिलिटेशन सेंटर, झोनल ऑफिस आणि प्रादेशिक कार्यालयांद्वारे देखील केले जाऊ शकते. पॅकेजशी संबंधित माहितीसाठी, तुम्ही 8595904074/ 7003125135/ 6290861577/ 8100829002 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

Disney Hotstar | डिज्नी हॉटस्टारवर लवकरच होणार बंद; नेमकं प्रकरण काय?

Disney Hotstar

Disney Hotstar | आजकाल अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म उदयास आलेले आहेत. मोबाईलवर बसूनच अनेक लोक हे चित्रपट, मालिका बघत असतात. अनेक लोक हे मोबाईलवर क्रिकेटची मॅच देखील पाहतात. आणि क्रिकेटची मॅच ही मोबाईलवर डिज्नी हॉट स्टारवर (Disney Hotstar) त्यांना पाहता येते. देशातील कोट्यावधी लोक हे डिज्नी हॉटस्टार वरच लाईव्ह मॅचचा आनंद घेत असतात. परंतु आता क्रिकेट प्रेमींसाठी एक वाईट बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे डिज्नी हॉटस्टार लवकरच बंद होणार आहे. त्यामुळे आता लोकांना लाईव्ह मॅचचा आनंद घेता येणार नाही. परंतु हे नक्की असे का होणार आहे? लोकांना आता क्रिकेटची मॅच लाईव्ह पाहता येणार नाही का? याबद्दलचे अनेक प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झालेले आहे. आता त्याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

अलीकडेच प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी डिज्नी हॉटस्टार खरेदी केलेले आहे. त्यामुळे आता डिज्नी हॉटस्टारचे (Disney Hotstar) सगळे अधिकार त्यांच्याकडे आलेले आहेत. आणि त्यांनी हा ओटीटी प्लॅटफॉर्म बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता ते डिज्नी हॉटस्टार बंद करून केवळ जिओ सिनेमा हे ओटीपी प्लॅटफॉर्म चालू ठेवणार आहे. म्हणजे त्याचा डिज्नी हॉटस्टार हे अंबानींच्या जिओ सिनेमामध्ये एकत्र होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीला दोन वेगवेगळे ओटीटी प्लॅटफॉर्म चालवायचे नसल्याने कंपनीने हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे हॉटस्टार जरी बंद झाले असले, तरी लोकांना जिओ सिनेमावर क्रिकेटची मॅच पाहता येणार आहे.

डिस्नी हॉटस्टार आणि जिओ सिनेमा होणार एकत्र | Disney Hotstar

एका वृत्तपत्रानुसार असे म्हटलेले आहे की, डिस्नी हॉटस्टार आणि जिओ सिनेमा हे एकत्र होण्याची योजना रिलायन्स इंडस्ट्रीकडून करण्यात आलेली आहे. म्हणजेच आता जर तुम्ही डिस्नी हॉटस्टार हे स्वतंत्र डाउनलोड केले असले, तरी ते तुम्हाला चालवता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला जिओ सिनेमा घ्यावा लागणार आहे. गुगल प्ले स्टोअरच्या माहितीनुसार जवळपास डिस्नी हॉटस्टार हे 50 कोटी वेळा डाऊनलोड झालेले आहे. तर जिओ सिनेमा केवळ दहा कोटी डाऊनलोड आहे. त्यामुळे आता डिज्नी हॉटस्टार आणि जिओ सिनेमा एकत्रित करून पाहण्यासाठी लोकांना जिओ सिनेमा हा ॲप डाऊनलोड करावा लागणार आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीने त्यांच्या वार्षिक अहवालात असे देखील म्हटले आहे की, महिन्याच्या आधारावर 22.5 कोटी लोक हे जिओ सिनेमा डाउनलोड करतात, तर डिस्नी हॉटस्टार हे 33.3 कोटी युजर्स मासिक आधारावर डाऊनलोड करतात. त्या हे दोन्ही प्लॅटफॉर्म मार्च केल्याने कंपनीची मोठी बचत देखील होणार आहे. त्यामुळे आता जाहिरातींसाठी देखील युट्युबला या मोठी स्पर्धा लागलेली आहे. तसेच जिओ सिनेमाला आता नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राईमला देखील टक्कर देता येईल. अशी माहिती समोर आलेली आहे.

शरीरातील अचानक दिसणाऱ्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका; व्हाल गंभीर आजाराचे शिकार

Health

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | लोकांची जीवनशैली बदलल्याने त्यांना होणारे अनेक आजार आणि समस्या देखील बदललेल्या आहेत. शरीरात कोणताही आजार होण्याआधी आपले शरीर आपल्याला काही संकेत देत असतात. परंतु आपण त्या अगदी सामान्य आहे, असे समजून त्याकडे निष्काळजीपणाने दुर्लक्ष करत असतो. तसेच त्यांना अगदी किरकोळ समजतो. नंतर हळूहळू तेच पुढे जाऊन एक गंभीर रूप धारण करते. त्यामुळे जर तुमच्या शरीरात काही अस्पष्ट आणि हळूहळू काही बदल दिसत असेल, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. अन्यथा पुढे जाऊन तुम्हाला मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागेल. आता ही लक्षणे नक्की कोणती आहेत? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

वजन कमी होणे

जर तुमचे वजन अचानक झपाट्याने कमी होत असेल, तर ते देखील तुमच्या शरीरासाठी घातक आहे. कारण अचानक वजन कमी होणे. हे मधुमेह, थायरॉईड आणि डिसऑर्डर किंवा कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचे लक्षण देखील असू शकते. तसेच स्ट्रेस डीसऑर्डर, बुलीमिया यांसारख्या समस्यांमुळे देखील वजन कमी होते. त्यामुळे जर अशी लक्षणे दिसत असेल, तर तुम्ही अजिबात वेळ वाया न घालवता. डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यावर उपचार सुरू करा.

श्वास घेण्यास त्रास होणे

तुम्ही अगदी हलके काम केले, असेल आणि तरीदेखील तुम्हाला धाप लागत असेल, किंवा दम लागत असेल तर हे एका गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. जर एखाद्या विशिष्ट ऋतूमध्ये ही समस्या उद्भवत असेल, तर त्याला दमा देखील होऊ शकतो. तसेच बुरशीजन्य संसर्गामुळे देखील श्वास घेण्यास त्रास होतो. त्याचप्रमाणे श्वास घेण्यास त्रास होत असेल तर नंतर जाऊन याचे रूपांतर हृदयविकाराचा झटका यांसारख्या आजारांमध्ये होतो. त्यामुळे जर तुम्हाला सारखी धाप लागत असेल, तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधा.

सातत्याने संक्रमण

जर तुम्हाला सारखे इन्फेक्शन होत असेल आणि एखादी जखम झालेली की, जर लवकर बरी होत नसेल. घसा खवखवत असेल तसेच खूप दीर्घ काळापासून जर खोकला असेल तर याकडे देखील दुर्लक्ष करू नका. कारण पुढे जाऊन यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. तसेच शरीरात पौष्टिकतेची कमतरता आणि अशक्तपणा असल्यामुळे या समस्या उद्भवतात. तसेच एचआयव्ही देखील याचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारे निष्काळजीपणा दाखवू नका.

निद्रानाश

रात्री नीट झोप न लागणे हे देखील एका गंभीर समस्येचे लक्षण असू शकते, जर तुम्ही झोप कमी घेतली तर तुमचा मूड चांगला राहत नाही. चिडचिडेपणा येतो. आणि हृदयाच्या संबंधित समस्या देखील निर्माण होतात. तुम्हाला जर जास्त प्रमाणात तणाव असेल तरी देखील निद्रा नाशाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला जर रात्री नीट झोप लागत नसेल, तर लवकर वेळेतच तज्ञांचा सल्ला घ्या. अन्यथा ती व्यक्ती नंतर जाऊन नैराश्याची शिकार होऊ शकते.