Tuesday, December 16, 2025
Home Blog Page 5261

दीपिकासोबत चौकशीच्या वेळी उपस्थित राहू द्या; रणवीरची NCB ला विनंती दिलं ‘हे’ कारण

मुंबई । NCB एनसीबीकडून दीपिका आणि बॉलिवूडमधील काही आघाडीच्या कलाकारांना समन्स बजावण्यात आलं आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी जोडून चौकशी सुरु असणाऱ्या ड्रग्ज कनेक्शनबाबतच्या चौकशीअंतर्गत हे समन्स या कलाकार मंडळींना बजावण्यात आलं आहे. ज्यानंतर आता शनिवारी दीपिकाची चौकशी होणार आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणला (Deepika Padukone) अखेर एनसीबीचं समन्स मिळाल्यानतंतर ती पती रणवीर सिंग (Ranveer Singh) हे गोव्यातून मुंबईत दाखल झाले.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दीपिकाचा पती अर्थात अभिनेता रणवीर सिंग यानं तिच्या चौकशीच्या वेळी सदर ठिकाणी तिच्यासोबतच उपस्थित राहण्याची विचारणा एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. दीपिकाला अशा प्रसंगी अत्यंत भीती आणि नैराश्याचा सामना करावा लागतो. शिवाय तिचा गोंधळ उडतो त्यामुळं तिच्यासोबत चौकशीदरम्यान उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी, अशी विचारणा त्यानं आपल्या अर्जात केली आहे.

कायद्याबाबत आपल्याला आदर असून, चौकशीदरम्यान त्याच ठिकाणी उपस्थित राहण्यास परवानगी दिली जात नसल्याचं आपल्याला पूर्ण कल्पना असल्याचंही त्यानं म्हटलं आहे. असं असलं तरीही, आपल्याला एनसीबीच्या कार्यालयात येण्यास अनुमती द्यावी यासाठी तो आग्रही दिसत आहे. रणवीरनं केलेली ही विचारणा पाहता एनसीबी यावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

 

कशी घ्याल मुलांच्या मौखिक आरोग्याची काळजी

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । प्रत्येक आई हि आपल्या मुलांची चांगल्या पद्धतीने काळजी घेण्याचा प्रयत्न करत असते. कधी कधी मुलांच्या तोंडाचा वास हा अतिशय घाण येत असतो. त्याच वेळी आई वडिलांनी मुलांना आपल्या मौखिक भागाची कशी काळजी घ्यावी हे सांगितले जाते. लहान मुलांना दात न येण्याअगोदर पासून च्या मुखाची काळजी घेतली गेली पाहिजे.

लहान वयातच मुलांना योग्य पद्धतीने सांगितले गेले तर ते मोठ्या पणी सुद्धा खूप चागल्या पद्धतीने आरोग्याची काळजी घेतात. लहान वयात मुलांना येणारे दुधाचे दात सुद्धा त्याच्या आरोग्यासाठी महत्वाचे असतात. हे दात जास्त दिवस टिकले तर पुढील आरोग्यास त्यांना धोका निर्माण होत नाही. लहान वयात मुलांना चुकीच्या पद्धतीने खाण्याची सवय असते. तसेच ते योग्य प्रमाणात आहार घेतल्यानंतर पाणी पित नाहीत. त्यामुळे त्याच्या तोंडामध्ये खाल्लेल्या पदार्थचे कण तसेच राहतात. त्यामुळे दातांना कीड लागू शकते. त्यामुळे दात अनेक वेळा किडतात. अनेक वेळा लहान मुलांचे दात किडलेले दिसतात.

आई आणि बाळाच्या शरिराची एकमेकांशी संबंध आहे. आई आजारी पडली तरी लहान बाळ आजारी पडते. त्यामुळे आईने आपल्या आरोग्याची सर्वात जास्त काळजी घेतली पाहिजे. दिवसातून कमीत कमी दोनदां दात घासावेत तसेच तोंडाचा खूप घाण वास येत असेल तर दररोज सकाळी उठल्या उठल्या बेकिंग सोडा याच्या साहाय्याने चूळ भराव्यात. यासाठी गोड खाणे कमी करावे. त्यामुळे सुद्धा जास्त प्रमाणात दात किडतात. हिरड्यांमधून जर मोठ्या प्रमाणात रक्त येत असेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

मोदी सरकारच्या कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांचे आज देशव्यापी भारत बंद आंदोलन

नवी दिल्ली ।मोदी सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांवरुन देशभरात शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. देशातील जवळपास 250 शेतकरी संघटना या विधेयकांच्या विरोधात आज रस्त्यावर उतरल्या आहेत. अखिल भारतीय किसान सभा व संलग्न शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. या आंदोलनात ३०हून अधिक शेतकरी संघटना सहभागी होणार आहेत. याशिवाय, सीटू, हिंद मजदूर सभा, नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस आदी १० कामगार संघटनांनीही पाठिंबा दिला आहे. या संघटनाही बंदमध्ये सहभागी होतील.

कृषी विधेयके राज्यसभेत मंजुरीला आल्यापासून उत्तर भारतात शेतकऱ्यांकडून तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडून राष्ट्रीय महामार्ग रोखून धरले जात आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षानेही केंद्राच्या धोरणांविरोधात काँग्रेसने पुढील २ महिने जनआंदोलन करण्याचे ठरवले आहे. त्याअंतर्गत देशभर पत्रकार परिषदा घेऊन शेतकऱ्यांची बाजू मांडली जाईल. काँग्रेससह १५ विरोधी पक्षांनीही या शेती विधेयकांना विरोध केला असून राष्ट्रपतींना या विधेयकांवर स्वाक्षरी न करता ती पुर्नरविचारासाठी परत पाठवण्याची विनंती केली आहे.

तर महाराष्ट्रातही हे आंदोलन तापण्यास सुरुवात झाली आहे. केंद्राने बहुमताच्या जोरावर शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या दावणीला बांधणारी प्रक्रिया पुढे रेटली आहे. केंद्राची ही भूमिका शेती, माती व शेतकऱ्यांशी द्रोह करणारी आहे. केंद्र सरकारचे जमीन अधिग्रहण बिलात बदल करण्याचे प्रयत्न ज्याप्रकारे उधळण्यात आले त्या प्रकारे कृषी कायद्याचा अंमल करण्याचे सरकारचे प्रयत्न शेतकरीच उधळून लावतील, असे अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी सांगितले. त्यामुळे आता भाजप या सगळ्याला कशाप्रकारे सामोरे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

 

सर्वसामान्यांना दिलासा! राज्यात प्लाझ्मा दर निश्चित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वसामान्य रुग्णांसाठी दिलासा देणारी बातमी आली आहे. राज्य सरकारने सिटीस्कॅन आणि प्लाझ्माचे दर निश्चित केले आहेत. सिटीस्कॅनचे दर 12 हजारावरुन 3 हजारांवर आणले आहेत. तर कोरोनाबाधीत रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीद्वारे उपचार करण्यासाठी प्लाझ्मा अफेरॅसिस पध्दतीने संकलित केलेल्या प्रति डोस प्लाझ्मा बॅगसाठी (200 मि.ली.) खाजगी, विश्वस्त रक्तपेढ्या, रुग्णालयांना रुग्णाकडून साडेपाच हजार इतका कमाल दर आकारण्यास मान्यता दिली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्वीट करत याची माहिती दिली आहे.

एचआरसीटी चाचणी १६पर्यंत स्लाईसच्या मशीनवर चाचणीकरिता २ हजार रुपये, १६ ते ६४ स्लाईसच्या मशीनवरील चाचणीकरिता २ हजार ५०० रुपये आणि ६४ ते २५६ स्लाईसच्या मशीनवरील चाचणीसाठी ३ हजार रुपये असे दर समितीने निश्चित केले आहेत. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी यासंदर्भात समिती गठित करण्याचे निर्देश दिले होते.

कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार करण्यासाठी प्लाझ्मा अफेरॅसिस पद्धतीने संकलित केलेल्या प्रति डोस प्लाझ्मा बॅगसाठी (२०० मि.ली.) खासगी, विश्वस्त रक्तपेढ्या, रुग्णालयांना रुग्णाकडून साडेपाच हजार रुपये इतका कमाल दर आकारण्यास मान्यता दिली आहे. यापेक्षा अधिक दर आकारल्यास त्यांनी आकारलेल्या अतिरिक्त रक्कमेची परतफेड संबधित रुग्णांना करणे अनिवार्य राहील अन्यथा संबंधित रक्तपेढीचा परवाना रद्द करण्याबाबतची कारवाई संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत करण्यात येईल,असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

स्वच्छ इंधन वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारने उचलले नवीन पाऊल, काय बदल केले आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वच्छ इंधन वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने हायड्रोजन इंधन सेल-आधारित वाहनांच्या (Hydrogen fuel cell-based vehicles) सुरक्षा मूल्यांकन मानकांना अधिसूचित केले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने बुधवारी केंद्रीय मोटर वाहन अधिनियम 1989 मध्ये दुरुस्ती करून हायड्रोजन इंधन पेशीद्वारे चालविलेल्या मोटार वाहनांच्या सुरक्षिततेचे मूल्यांकन करण्यासाठीच्या निकषांची माहिती दिली आहे.

प्रदूषणामुळे पर्यावरणाचे नुकसानही कमी होईल
मंत्रालयाने याबाबत असे म्हटले आहे की,’ स्वच्छ उर्जेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली असून त्याअंतर्गत नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.’ यासंदर्भात माहिती देताना मंत्रालयाने म्हटले आहे की,’ या पावलामुळे देशातील हायड्रोजन इंधन सेल आधारित वाहनांना चालना मिळण्यास मदत होईल आणि पर्यावरणास अनुकूल अशी उर्जा वापरणार्‍या वाहनांच्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान देखील कमी होईल. अशा वाहनांचे उत्पादक आणि पुरवठा करणारे यांच्याकडे वाहन चाचणीसाठी आंतरराष्ट्रीय मानके उपलब्ध केली गेली आहेत.’

व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसी आणण्याची सरकार करत आहे तयारी
यासह जुन्या वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसी आणण्याचीही तयारी केंद्र सरकार करीत आहे. या संदर्भात रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने एक प्रस्ताव सादर केला असून त्यावर मंत्रिमंडळाकडून विचार केला जात आहे. 2018 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली-एनसीआरमध्ये 10 वर्षापेक्षा जुन्या डिझेल आणि 15 वर्षांपेक्षा जुन्या पेट्रोल वाहनांवर बंदी घातली. तेव्हापासून या पॉलिसीचा विचार केला जात होता. जुन्या वाहनांची विल्हेवाट लावण्याबाबत अद्याप भारतात कोणतेही स्पष्ट अशी वाहनांची पॉलिसी नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

आता खिशात डेबिट कार्ड जरी नसले तरी आपण पेमेंट करू शकाल, ‘ही’ बँक लवकरच घेऊन येत आहे नवीन सुविधा; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFC First Bank) सेफपे सुविधा सुरू करणार आहे. या डिजिटल सुविधेच्या माध्यमातून ग्राहक पॉईंट ऑफ सेल (POS) टर्मिनलद्वारे मान्यता प्राप्त नेयर फील्ड कम्युनिकेशन (NFC) वर त्यांच्या स्मार्टफोनद्वारे पेमेंट करू शकतील. NFC ला सेफपेद्वारे आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या मोबाइल अॅपमध्ये समाविष्ट केले जाईल, ज्याद्वारे बँकेने जारी केलेल्या डेबिट कार्डद्वारे सुरक्षित पेमेंट केले जाऊ शकते. यानंतर, आयडीएफसी फर्स्ट बँकेचे कार्ड असलेल्या ग्राहकांना POS मशीनला स्पर्श करावा लागणार नाही किंवा कार्डही वापरावे लागणार नाही. ही प्रोसेस कॉन्टॅक्टलेस, वेगवान आणि सुरक्षितही असेल.

मोबाइल अॅपद्वारे उपलब्ध होईल
हे असे पहिलेच तंत्रज्ञान आहे जे मोबाइल अॅप्ससह जोडले जात आहे. सेफपेच्या फीचर्सची यशस्वीरित्या चाचणी आणि सत्यापित केली गेली आहे. पुढील एका आठवड्यात ते बँकेच्या मोबाइल अॅपद्वारे ग्राहकांना उपलब्ध होईल.

लिमिट किती असेल?
सेफपेद्वारे प्रत्येक व्यवहारासाठी 2000 रुपयांपर्यंत पैसे दिले जाऊ शकतात आणि त्याचे डेली लिमिट 20,000 रुपयांपर्यंतचे आहे. याद्वारे दररोजची खरेदी देखील सुलभ केली जाऊ शकते.

कसे वापरायचे?
सेफपे चालू करण्यासाठी ग्राहकांना एकदा त्यांचे आयडीएफसी फर्स्ट बँक डेबिट कार्ड हे मोबाईल अॅपशी लिंक करावा लागेल. एकदा अॅक्टिव्ह झाल्यानंतर ग्राहक व्यापाऱ्याच्या NFC द्वारे व्हेरिफाय केलेल्या POS टर्मिनलवर त्यांचा फोन अनलॉक केल्यानंतर पेमेंट करू शकतात. याद्वारे, एनक्रिप्टेड कार्डची माहिती वायरलेस टर्मिनलवर पाठविली जाते. या मोबाइल अॅपद्वारे डेबिट कार्डे जोडली जाऊ शकतात आणि आवश्यकतेनुसार ते हटविली देखील जाऊ शकतात. पेमेंट देण्यासाठी, NFC व्हॅलिड स्मार्टफोनला अनलॉक केल्याच्या 30 सेकंदात टर्मिनलवर फिरवावे लागेल.

हे फीचर्स त्या बचत खातेधारकांना उपलब्ध आहे ज्यांच्याकडे NFC वर व्हिसा कार्ड आणि आयडीएफसी फर्स्ट मोबाइल अॅप आहे आणि ज्याने OS-5 आणि त्यावरील वरील Android डिव्हाइस सक्षम केले आहेत.

सेफपे कसे अॅक्टिव्ह करावे:
1. आपले डेबिट कार्ड आयडीएफसी फर्स्ट बँक मोबाइल अॅपसह लिंक करा.
2. पेमेंट देण्यासाठी NFC सक्षम स्मार्टफोन अनलॉक करा
3. NFC व्हॅलिड POS टर्मिनल समोर फिरवा, एन्क्रिप्टेड कार्डची माहिती वायरलेस टर्मिनलवर पाठविली जाईल.

आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या रिटेल लायबिलिटीचे प्रमुख अमित कमर म्हणाले, “वायरलेस जगातील लोकांना पेमेंटची पद्धत बदलण्याची इच्छा आहे. आतापर्यंत ही सुविधा डिजिटल पेमेंट स्वीकारण्यासाठी चालू आहे. आता साथीच्या रोगाने आपला वेग वाढविला आहे. डिजिटल जगात आपल्याला असे वाटते की, NFC तंत्रज्ञानाची भूमिका जगात विशेष बनत चालली आहे. ” ते म्हणाले, “सेफपेद्वारे पेमेंट देण्याचा अनुभव ते अधिक चांगले करते. यामुळे कार्ड गहाळ होण्याची चिंता देखील दूर होते. तसेच ग्राहक काही क्षणात पैसे भरू शकतात आणि स्टोअर सोडू शकतात.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

श्रेय घेण्यावरून मुंडे बहीण-भावात पुन्हा चढाओढ; आता ‘या’ मुद्दयावर रंगला सामना

बीड । राज्य सरकारने अडचणीत असलेले साखर कारखाने सुरू व्हावेत यासाठी थकहमी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महाविकास आघाडी सरकारने राज्यातील अडचणीत असलेल्या ३४ सहकारी साखर कारखान्यांना ३९१ कोटी रुपयांची थकहमी दिली आहे. या ३४ कारखान्यांमध्ये सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांबरोबर विरोधातील भाजप नेत्यांच्या कारखान्यांचाही समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यातील परळी येथील वैद्यनाथ साखर कारखान्याच्या थकहमीवरुन भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांच्यात आता जुंपली आहे. परळीतल्या वैद्यनाथ कारखान्याला दिलेल्या थकहमीवरुन धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे भावाबहिणीत पुन्हा श्रेयाची लढाई दिसून येत आहे.

सुडाचे राजकारण न करता शेतकऱ्यांसाठी ११ कोटी रुपयांची थकहमी दिल्याचा दावा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे. त्या कारखान्याला मदत कशी दिली गेली असा प्रश्न येतो. पण जेव्हा मदत दिली गेली तेव्हा आम्ही सूडाचे राजकारण केलेले नाही. भलेही ५ वर्ष आम्हाला या सूडबुद्धीच्या राजकारणाचे बळी व्हावे लागले, तरीसुद्धा आम्ही सत्तेत आल्यानंतर असे राजकारण करणार नाही हे आम्ही ठरवलं आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांचा दावा पंकजा मुंडे यांनी फेटाळला आहे. वैद्यनाथला मिळालेल्या थकहमीचे श्रेय इतरांनी घेऊ नये असा टोला पंकजांनी लगावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सहकार मंत्री, ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि साखर कारखाना संघाकडे आपण वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळेच वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला राज्य सरकारने १० कोटी ७७ लाख रुपयांची थकहमी मंजूर केली आहे. यात इतरांनी श्रेय घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे पंकजा म्हणाल्या.

तर दुसरीकडे पंकजा यांच्या या वक्तव्यावर धनंजय मुंडे यांनीही त्यांना प्रतिसवाल केला आहे. त्यांनी पाठपुरावा कसा केला, कुठून केला, इथून केला की परदेशात बसून केला हे मला सांगता येणार नाही. पण तिथल्या पाठपुराव्याने ही थकहमी मिळते, की मंत्रिमंडळात एक मंत्री म्हणून कामकाजात पाहताना सकारात्मक बाजू घेऊन त्या कारखान्याची शिफारस करतो, त्यावेळी थकहमी मिळते एवढे समजायला महाराष्ट्रातील जनता ज्ञानी आहे, असा टोला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी हाणला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

 

केवळ वीस दिवसांत ३० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला २ हजाराचा हप्ता 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकण्यात आला आहे. दरम्यान नोव्हेंबरपर्यंत बहुधा सर्वच बँक खात्यात हप्ता जमा होणार आहे. मागील वीस दिवसात ३० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २ – २ हजार रुपये टाकण्यात आले आहेत. ऑगस्ट महिन्यात जवळजवळ ८ कोटी ८१ लाख लाभार्थ्यांना  योजनेचा लाभ मिळला असून आपल्या बँक खात्यात पैसे आले नसतील तर एकदा आपल्या जवळील बँक शाखेत जाऊन आपल्या खात्याविषयी चौकशी करु घ्यावी असे सांगण्यात आले आहे. या योजनेच्या अंतर्गत ३० ऑगस्टपर्यंत साधरण १० कोटी ५० लाख शेतकऱ्यांनी आपली नोंदणी केली आहे. अर्जदारांनी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अर्जासह पुरविणे गरजेचे आहे.

या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या नावावर शेत जमीन असणे आवश्यक आहे. पण जर तो व्यक्ती कुठे सरकारी नोकरीवर किंवा सेवानिवृत्त कर्मचारी असेल तर तो व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरणार नाही. जर व्यक्ती माजी आमदार, खासदार किंवा मंत्री असेल तेही या योजनेसाठी पात्र नाही आहे.  जर अर्ज करणारा  व्यक्ती हा परवानाधारक डॉक्टर असेल, अभियंता, वकील, चार्टट अकांउंटट असेल तर तोही या योजनेस पात्र ठरत नाही. या योजनेच्या लाभ घेणाऱ्या व्यक्तीच्या नावावर जमीन असणे आवश्क असते. जर शेत जमीन आजोबांच्या  किंवा शेतकऱ्याच्या वडिलांच्या  नावावर असेल तर योजनेचा लाभ मिळत नाही.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना ही अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी असून त्यांना या योजनेतून आर्थिक साहाय्य दिले जाते.  साधारण १४ कोटी शेतकऱ्यांना या योजनेतून निधी दिला जात आहे.  शेतकऱ्यांच्या उत्पन्न दुप्पट करण्यासाठी ही योजना खूप फायदेशीर आहे.  यातून शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची मदत केंद्र सरकारकडून केली जाते. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत ६ हजार रुपये तीन टप्प्यात दिले जाते. प्रत्येक टप्प्यात २ हजार रुपये दिले जात असून हा पैसा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातात.  पैसे आपल्या खात्यात आल्याची माहिती मोबाईलवर मेसेसच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले जाते. योजनेची नोंदणी करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. भारत सरकारचे संकेतस्थळ www.pmkisan.gov.in/ वर जाऊन नोंदणी करू शकता.  किंवा https://www.pmkisan.gov.in/RegistrationForm.aspx येथे आपण नोंदणी आणि अर्ज भरून आपली नोंदणी करु शकता.  याशिवाय तुम्ही राज्य सरकार द्वारे नियुक्त करण्यात आलेल्या पीएम – योजनेच्या नोडल अधिकाऱ्यासी संपर्क करु शकता. किंवा आपल्याजवळील सामान्य सेवा केंद्रावर जाऊन आपला अर्ज करू शकता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

कृषी क्षेत्रामुळे सरकारला जीडीपी मध्ये थोडासा दिलासा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने  जाहीर केलेल्या आकडेवारीने संबंध देशात जीडीपी च्या घसरणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. जूनमध्ये संपलेल्या पहिल्या  तिमाहीत  सकल राष्ट्रीय उत्पन्न हे -२३% ने  घटले  आहे. स्वातंत्र्यानंतर  पहिल्यांदाच जीडीपीमध्ये  एवढी घट  नोंदवण्यात आली आहे. सगळी क्षेत्रे कोलमडत असताना कृषी क्षेत्रात मात्र ३.४% वाढ  झाल्यामुळे मोदी सरकारला थोडासा दिलासा मिळाला आहे.

कोरोनाच्या संकटामुळे देशातील अनेक उद्योग व्यापार अडचणीत आले आहेत. देशाची  आर्थिक स्थिती रुळावर आणण्यासाठी कृषी क्षेत्र मह्त्वाची भुमिका निभावणार अशी बतावणी अनेक जणांनी केली होती. याचीच प्रचिती या अहवालातून आली आहे. आपण जीडीपीचे आकडे पाहिल्यास मोदी सरकार  देशाची अर्थव्यवस्था  हाताळण्यास सपशेल अपयशी  ठरले आहे.  कोरोनाच्या आगोदर  देशाची अर्थव्यवस्था मंदावली  होती. आता  मात्र  कोरोनामुळे हि  परिथिती अधिक बिकट होत गेली. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर  शेती  क्षेत्राने ३.४% एवढी समाधानकारक वाढ नोंदवली  आहे.

कृषी  क्षेत्राला  ताळेबंदीच्या काळात मिळालेली सूट आणि ग्रामीण भागाची असलेली स्वतंत्र  अर्थव्यवस्थेची  समांतर व्यवस्था यामुळे  कृषी क्षेत्राने हि प्रगती साधली आहे. मागच्या महिन्यात  शेती क्षेत्राच्या संबंधित  अनेक उद्योगानी वाढ नोंदवली होती.  त्यामुळे अर्थव्यस्थेला चालना   मिळाली.  येणाऱ्या तिमाहीतही जेव्हा  इतर क्षेत्रे हळूहळू प्रगती करत असतील तर शेती मात्र या सगळ्याच्या  पुढे असेल आणि   पुढच्या तिमाहीतही कृषी  क्षेत्र देवाच्या अर्थव्यस्थेला चालना देईल. मागच्या महिन्यात  वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी   या कोरोनामसारख्या महामारीच्या काळात  कृषिक्षेत्र आपल्याला वाचवू  शकते त्यामुळे त्यासाठी अधिक गुंतवणुकीची आवश्यकता आहे असे  म्हटले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’