Monday, December 22, 2025
Home Blog Page 539

Liver Damage Signs | रात्री दिसतात यकृत खराब होण्याची ही 5 लक्षणे; दुर्लक्ष केल्यास होईल मोठे नुकसान

Liver Damage Signs

Liver Damage Signs | आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदलली आहे. लोक वाईट सवयींकडे झुकत चाललेले आहेत. परंतु या सगळ्यांचा परिणाम त्यांच्या शरीरावर होत आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, रात्री जास्त वेळ जागायचे. त्याचप्रमाणे उशिरा उठायचे, धूम्रपान करणे. यांसारख्या सवयीचा आरोग्यावर मोठ्या प्रमाणात वाईट परिणाम होतो. आणि त्यामुळे यकृत खराब होण्याचा धोका वाढलेला आहे. आपल्या शरीरातील सगळेच अवयव खूप महत्त्वाचे आहेत. परंतु यकृत्याला झालेली जखम ही लवकर बरी करता येत नाही. परंतु यकृत खराब झाल्याची लक्षणे जर तुम्हाला वेळी समजली, तर तुम्हाला हा धोकादायक आजार टाळता येईल. त्यामुळे यकृत (Liver Damage Signs) खराब होण्याची नक्की लक्षणे काय आहेत? हे आपण जाणून घेऊयात. ही लक्षणे सहसा रात्री दिसतात, त्यामुळे त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

फॅटी लिव्हरचे किती प्रकार आहेत? | Liver Damage Signs

फॅटी यकृत समस्या सामान्यतः जास्त मद्यपान, अल्ट्रा प्रोसेस्ड फूड खाणे आणि शारीरिक हालचाली न केल्यामुळे उद्भवते. फॅटी लिव्हर रोगाचे दोन प्रकार आहेत. पहिला- अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (AFLD) आणि दुसरा- नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD).

पोटदुखी

लिव्हर खराब झाल्यावर पोटदुखी सुरू होते. जेव्हा यकृत खराब होते तेव्हा त्याची कार्य क्षमता कमी होते. त्यामुळे त्याचा आकारही वाढू लागतो. त्यामुळे यकृतावर दाब वाढून वेदना तीव्र होतात.

त्वचेला खाज सुटणे

यकृतामध्ये काही समस्या असल्यास त्वचेवर खाज येण्याची समस्या असू शकते. खाज येणे, जळजळ होणे किंवा पुरळ उठणे यांसारख्या त्वचेच्या समस्या, विशेषतः रात्रीच्या वेळी, त्याकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा समस्या गंभीर होऊ शकते.

चक्कर येणे, मळमळ

मळमळ आणि उलट्या सारख्या समस्या देखील यकृत खराब होण्याचे एक प्रमुख लक्षण आहेत. रात्री अशा प्रकारची समस्या उद्भवल्यास, आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. यामध्ये होणारा विलंब धोकादायक ठरू शकतो. यामुळे यकृत आणि आरोग्य या दोन्ही समस्या उद्भवू शकतात.

मूत्र रंगात बदल

लघवीचा रंग बदलणे हे यकृत खराब होण्याचे लक्षण आहे. जेव्हा यकृत खराब होते तेव्हा शरीरातील बिलीरुबिनची पातळी वाढते, ज्यामुळे लघवीचा रंग गडद पिवळा होतो. असे झाल्यास, आपण ताबडतोब डॉक्टरांशी बोलणे आवश्यक आहे.

सूज येणे | Liver Damage Signs

रात्री पायांच्या खालच्या भागात सूज येत असेल तर सावध राहावे. जास्त सूज आणि वेदना यकृताशी संबंधित समस्यांचे लक्षण आहेत. या स्थितीकडे दुर्लक्ष केले जाऊ नये आणि त्वरित तपासले पाहिजे.

Papaya Benefits | त्वचेसाठी पपई आहे वरदान; डाग, धब्बे आणि वृद्धत्वापासून होईल सुटका

Papaya Benefits

Papaya Benefits | फळे ही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. प्रत्येक फळाचा एक विशिष्ट गुणधर्म आहे. त्यातील पपई (Papaya Benefits) या फळाचा गुणधर्म खूप चांगला आहे. आपल्याला पपईचा खूप फायदा होतो. आपल्या आरोग्यासाठी नाही तर त्वचेसाठी देखील पपई खूप फायदेशीर आहे. पपईचा अर्क हा अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापरला जातो. पपईमध्ये विटामिन ई, बी, सी आणि पेपीन असते. जे त्वचेला खूप फायदे देतात. आता स्किन केअरमध्ये पपईचा समावेश कसा करायचा? याची आपल्या त्वचेला काय फायदे होतात हे आपण जाणून घेऊया.

पपईचा वापर कसा करायचा? | Papaya Benefits

पपईला त्वचेवर लावण्यासाठी प्रथम पपईचा अर्क काढून त्यातील बिया वेगळे करा. नंतर त्यात थोडे मध आणि दूध घाला. पॅच चाचणीसाठी आपल्या हातावर किंवा कानाच्या मागे लागू करण्याचा प्रयत्न करा. जर ऍलर्जी नसेल तर चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटांनी पाण्याने धुवा.

त्वचेचा टोन सुधारतो

पपईमध्ये पपेन, व्हिटॅमिन ए आणि सी आढळतात, ज्यामुळे त्वचेचा रंग सुधारण्यास मदत होते. याच्या वापरामुळे चेहऱ्यावरील डाग आणि हायपरपिग्मेंटेशन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे ते लावल्याने त्वचा चमकदार आणि स्वच्छ दिसते.

त्वचा हायड्रेटेड आहे

पपई त्वचेच्या पेशींना हायड्रेट करते. यामुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसत नाही. यामुळे त्वचेच्या त्वचेची समस्याही दूर होते. याशिवाय त्वचाही चमकदार दिसते. याचा फेस पॅक बनवा आणि त्वचेवर लावा आणि निरोगी त्वचा मिळवा.

पुरळ नियंत्रित होते

पपईमध्ये पेपिन आढळते, जे मुरुमांची जळजळ कमी करण्यास मदत करते. याव्यतिरिक्त, ते मृत त्वचेच्या पेशी साफ करते आणि छिद्रांना अडकण्यापासून प्रतिबंधित करते. त्यामुळे मुरुमांची समस्या कमी होते. तसेच मुरुमांचे चिन्ह कमी होण्यास मदत होते.

अतिनील किरणांपासून संरक्षण करते

पपई सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून त्वचेचे रक्षण करते. हे त्यामध्ये असलेल्या अँटी-ऑक्सिडंट्स आणि बीटा कॅरोटीनमुळे होते. हे दोन्ही अतिनील किरणांना रोखून त्वचा निरोगी ठेवतात.

वृद्धत्व कमी होते | Papaya Benefits

पपईमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी कोलेजन तयार करण्यास मदत करतात. त्यामुळे याचा वापर केल्याने वृद्धत्वाची समस्या कमी होते आणि त्वचेवर दिसणाऱ्या सुरकुत्या आणि बारीक रेषाही कमी होतात.

सिद्धेश्वरनाथ मंदिरात चेंगराचेंगरी; 8 भाविकांचा मृत्यू, अनेकजण जखमी

stampede at Siddheshwarnath temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज (12 ऑगस्ट) श्रावणी सोमवार असून या शुभदिनी देशात एक मोठी दुर्घटना घडली आहे. बिहारमधील बाबा सिद्धेश्वर नाथ मंदिराबाहेर मोठी चेंगराचेंगरी झाली (stampede at Siddheshwarnath temple) असून या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. यात महिला आणि पुरुष दोघांचाही समावेश आहे. तर अनेक जण जखमीही झाले आहेत. श्रावणी सोमवार निमित्त देवाला पाणी अर्पण करण्यासाठी मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. त्याच दरम्यान भल्या पहाटे हि दुर्घटना घडली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी बाबा सिद्धेश्वरनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. गर्दी एवढी होती की भाविकांमध्ये धक्काबुक्की सुरू झाली. काही वेळातच चेंगराचेंगरी झाली आणि लोक एकमेकांवर तुटून पडले. या अपघातात आत्तापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना जेहानाबाद सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी झालेल्यांची संख्या पाहता मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे. श्रावण महिन्यात बाबा सिद्धेश्वरनाथ मंदिरात जल अर्पण करण्यासाठी नेहमीच गर्दी पाहायला मिळते. पर्वताच्या शिखरावर एक मंदिर आहे आणि लोक त्यावर चढून येथे जल अर्पण करतात, त्याच दरम्यान चेंगराचेंगरी झाली.

या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. आणि जखमींना मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. एसडीओ विकास कुमार यांनी सांगितले की, ते लवकरच या घटनेबाबत अधिकृत निवेदन देणार आहेत. सुरक्षेत त्रुटी होती का असा सवाल त्यांना केला असता ते म्हणाले, रविवारी रात्री गर्दी जास्त असते, तीन सोमवारनंतर हा चौथा सोमवार होता. आम्ही सावध होतो. दिवाणी, दंडाधिकारी आणि वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली होती. हा अपघात कसा घडला, तपासानंतरच अधिकृत माहिती दिली जाईल

‘या’ एका बेटावरुन अमेरिकेने बांगलादेशमध्ये हिंसाचार घडवला; शेख हसीना यांच्या आरोपाने खळबळ

saint martin island bangladesh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बांग्लादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून अराजकता माजली आहे. पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊनही हिंसाचार, जाळपोळीच्या घटना बांग्लादेशात सुरूच आहेत. वरवर जरी हा विषय आरक्षणाचा वाटत असला तरी यामध्ये कोणत्या तरी परीकय शक्तीचा हात असावा, त्याशिवाय इतकं मोठं आंदोलन पेटणार नाही असा अंदाज लावला जात असतानाच आता शेख हसीना यांच्या एका आरोपाने खळबळ उडाली आहे. बांग्लादेशच्या ताब्यात असलेल्या सेंट मार्टिन द्वीप या एका बेतासाठी हे सर्व षडयंत्र रचण्यात आल्याचे त्यांनी म्हंटल आहे. इकोनॉमिक टाईम्समधील वृत्तानुसार, त्यांनी अत्यंत निकटवर्तीयांकडून हा संदेश पाठवला आहे. त्यात बांगलादेश मधील सर्वग परिस्थितीला अमेरिका जबाबदार असल्याचे म्हंटल आहे.

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना (Shaikh Hasina) यांनी आपल्या जवळच्या सहाय्यकांद्वारे पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे की, “मला मृतदेहांच्या रांगा पाहायच्या नव्हत्या म्हणून मी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. मी जर देशात राहिले असते तर अधिक जणांचे बळी गेले असते. सार्वजनिक मालमत्तांचे अधिक नुकसान झाले असते. अत्यंत कठीण प्रसंगात मी देश सोडण्याचा निर्णय घेतला. पण तुम्ही मला निवडलं म्हणून मी तुमची नेता झाली. जनता हीच माझी ताकद आहे. आवामी लीगच्या अनेक नेत्यांची हत्या करण्यात आल्याचे वृत्त ऐकून माझे काळीज पिळवटून निघाले आहे. मी माझ्या देशातील जनतेला विनंती करते कि कृपया कट्टरपंथीयांच्या दिशाभूलीला बळी पडू नका. मी बांगलादेशातील तरुण विद्यार्थ्यांना पुन्हा सांगू इच्छिते. मी तुम्हाला कधीच रझाकार म्हटले नाही.

जर मी अमेरिकेला सेंट मार्टिन बेट देऊन बंगालच्या उपसागरावर कब्जा करण्याची परवानगी दिली असती तर मी सत्तेत राहू शकली असती. अल्लाहच्या कृपेने मी लवकरच परत येईन. बांगलादेशच्या भविष्यासाठी मी प्रार्थना करेन. हे ते राष्ट्र आहे ज्यासाठी माझे वडील लढले. ज्यासाठी माझ्या वडिलांनी आणि कुटुंबाने आपल्या प्राणांची आहुती दिली आहे अशा भावना शेख हसीना यांनी व्यक्त केल्या.

दरम्यान, शेख हसीना यांनी या वर्षी एप्रिलमध्ये संसदेत सांगितले होते की अमेरिका बांगलादेशातील सत्ताबदल करण्याच्या धोरणावर काम करत आहे. अमेरिका बांग्लादेश मध्ये लोकशाही नष्ट करण्याचा आणि लोकशाही अस्तित्वात नसलेले सरकार आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. चीनविरोधात भक्कम लष्करी तळासाठी अमेरिकेला बांगलादेशच्या ताब्यातील Saint Martin Island बेट गरजेचे आहे. शेख हसीना सरकारवर त्यासाठी दबाव असल्याचा दावा त्यांनी केला. 15 डिसेंबर 2023 रोजी रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने शेख हसीना पुन्हा सत्तेत आल्यास अमेरिका ते सरकार उलथून टाकणार असल्याचा दावा केला होता.

Nandgaon Vidhan Sabha : नांदगाव विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभेला दोघांचाही कस लागणार?

Nandgaon Vidhan Sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षानं इंगा दाखवला आणि सलग दोन टर्म आमदार राहिलेल्या भुजबळ साहेबांच्या चिरंजीवांना पराभवाचा धक्का बसला… हे घडलं होतं नांदगाव मनमाड विधानसभा मतदारसंघात… आणि यामागचे कलाकार होते विद्यमान आमदार सुहास कांदे… भुजबळ गटाला धक्का देत खरंतर निवडणूक जिंकणं हा त्यातल्या त्यात एक पराक्रम होता… यानंतर भुजबळ आणि कांदे यांच्यातला राजकीय विस्तव अनेकदा पाहायला मिळाला… शाब्दिक चकमकी झाल्या… अरे तुरे ची भाषा झाली…. 2024 ला काहीही झालं तरी कांदेंना रडवायचंच यासाठी भुजबळ पिता पुत्रांनी सारी फिल्डिंग लावलेली असताना… येवल्यात वडिलांची तर नांदगावात मुलाची प्रतिष्ठा पणाला लागलीय… पण दुसऱ्या बाजूला कांदेंनी शिवसेनेच्या बंडात साथ दिल्याने त्यांच्याबद्दल नाराजी आहेच… त्यामुळे कांदे आणि भुजबळांच्या भांडणात नांदगाव विधानसभेचा आमदार तिसराच होतोय, अशी परिस्थिती सध्या मतदारसंघात आहे…

महाराष्ट्राच्या पॉलिटिक्स मधले बिग बी छगन भुजबळ यांचे सुपुत्र पंकज भुजबळ यांच्या सलग दोन टर्मच्या विजयाला ब्रेक लावत शिवसेनेचे सुभाष कांदे जायंट किलर ठरले… आणि नांदगावची आमदारकी राष्ट्रवादीकडून काढून घेत मतदारसंघावर पुन्हा भगवा फडकवला…… छगन भुजबळांचं वलय असतानाही पंकज भुजबळ यांचा पराभव हा नक्कीच जिव्हारी लागणारा होता…यानंतर सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यातला वाद तर उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे…पण असं असतानाही शिंदे आणि अजित पवार एकाच गटात आल्यामुळे आता नांदगावचा महायुतीचा उमेदवार कोण? हा मोठा प्रश्न आहे… छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे या जागेसाठी मोठा रस्सीखेच करू शकतात… पण स्टॅंडिंग आमदारांनाच तिकीट द्यायचं असा फॉर्मुला ठरला तर इथल्या निवडणुकीत पाडापाडीचा कार्यक्रम होऊ शकतो… त्यामुळे नांदगाव मनमाडच्या जागेवरूनच भुजबळ आणि कांदे यांच्यात येणाऱ्या काही दिवसात पुन्हा एकदा राजकीय विस्तव पाहायला मिळेल… तसं नांदगाव मनमाड या विधानसभा मतदारसंघाचा इतिहासही बराचसा बदलता आणि इंटरेस्टिंग आहे…

स्वातंत्र्यानंतर सलग सहा वेळा येथून कॉंग्रेसच्या उमेदवारांनी प्रतिनिधित्व केल्याने पूर्वी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदार संघ 1990 मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड माधवराव गायकवाड यांनी आपल्याकडे खेचत आमदारकी मिळवली. मात्र 1995 ला युतीच्या लाटेत शिवसेनेने हा मतदार संघ आपल्याकडे खेचत प्रथमच राजेंद्र देशमुख शिवसेना-भाजपा युतीचे आमदार झाले. 2004 पर्यंत हा मतदार संघ युतीच्या ताब्यात राहिला. त्यानंतर पुन्हा कॉंग्रेसचे अनिल आहेर यांनी शिवसेनेच्या ताब्यातून हा मतदार संघ आपल्याकडे खेचून आणला. 2009 मध्ये मात्र नांदगाव मतदार संघात वेगळाच भूकंप झाला आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत मतदार संघाची अदलाबदल होऊन हा मतदार संघ राष्ट्रवादीने आपल्याकडे मागवून घेत येथून पंकज भुजबळ यांना उमेदवारी दिली… बाहेरचे असूनही या मतदार संघातील जनतेने त्यांना भरघोस मतांनी निवडून दिले…. नांदगाव-मनमाड मतदार संघात एकदा निवडून दिलेले आमदार पुन्हा निवडून येत नसल्याचा इतिहास पाहता 2014 मध्ये पुन्हा एकदा शिवसेनेने मतदार आपल्याकडे खेचण्यासाठी जिवतोडून प्रयत्न केले. त्याचवेळी शिवसेना-भाजपाची युती होऊ न शकल्याने भाजपने आपला उमेदवार या मतदार संघात उभा केला. तिरंगी लढतीत राष्ट्रवादीच्या पंकज भुजबळ यांनी बाजी मारत सलग दुसऱ्यांदा आमदारकीचा मान मिळविला आणि एकदा आमदार झाल्याने दुसऱ्यांदा पुन्हा आमदार रिपीट होत नसल्याच्या दावा फेल ठरला… 2009 मध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना छगन भुजबळ यांनी आपल्या येवला मतदार संघात विकास काम करुन मतदार संघाचा चेहरा बदलला. त्यामुळे नांदगाव खुंटलेला विकास वडिलांच्या पायावर पाय ठेवून पंकज भुजबळ दूर करतील आणि चांगला विकास होईल या आशेवर मतदारांनी त्यांना दोनदा संधी दिली…

पण भुजबळ सुपुत्रांनी विकासाकडे… तर मतदारांनी मताकडे पाठ फिरवली… आणि 2019 ला सारी ताकद पणाला लावूनही पंकज भुजबळ यांचा मानहानीकारक पराभव झाला… खरंतर 2016 मध्ये छगन भुजबळ तुरुंगात गेल्यानंतर अडीच वर्षांनी त्यांची सुटका झाली या काळात आमदार पंकज भुजबळांचे मतदार संघाकडे दुर्लक्ष झाले. सोबत असलेल्या अनेक दिग्गजांनी पक्षांतर केल्याने राष्ट्रवादीची ताकद कमी झाली आणि नगरपरिषद निवडणुकीत मनमाडसह नांदगाव नगरपालिका या शिवसेनेच्या ताब्यात गेल्या तर पंचायत समिती झेडपीमध्येही शिवसेनेने बाजी मारली. त्यामुळे पुन्हा एकदा नांदगाव-मनमाड मतदार संघात शिवसेनेचे वर्चस्व निर्माण झाले…. 2019 च्या निवडणुकीच्या आधीच नांदगाव मध्ये अशी परिस्थिती होती, की अगदी डोळे झाकूनही शिवसेनेचाच उमेदवार निवडून येईल… झालंही तसंच आघाडी कडून पंकज भुजबळ यांच्या विरोधात युतीने शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांच्यावर विश्वास टाकला… आणि कांदे जायंट किलर ठरत निवडून आले…

यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर सत्तेतील छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात झालेली टोकाची भांडण आणि त्याचे मुख्यमंत्री शिंदेंकडून विधानसभेत उमटलेले पडसाद आपण पाहिले असतीलच… महाविकास आघाडीत असताना कांदे आणि भुजबळ यांच्यात खटके उडाले… त्यात भुजबळांचं राजकीय वजन पाहता ते आपल्या मुलाला काहीही केल्या तिकीट मिळवून देणार, याची खात्री कदाचित कांदेंना असावी… म्हणूनच शिवसेना फुटीनंतर कांदे सेफ झोन म्हणून शिंदें सोबत आले… पण ड्रामा अजून बाकी होता… अजितदादा महायुतीत येताना भुजबळांना सोबत घेऊन आले… त्यामुळे आता महायुतीत भुजबळ आणि कांदे यांच्या तिकीट वाटपावरून खडाजंगी पाहायला मिळेल, एवढं मात्र नक्की…

तर दुसऱ्या बाजूला मेरिटनुसार महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार गटाला सुटणं संयुक्तिक असताना काँग्रेसने या मतदारसंघावर दावा केला आहे… नांदगाव हा आपला पारंपारिक मतदारसंघ असून काहीही केल्या तो लढवणारच! असा जणू प्रणच काँग्रेसचे माजी आमदार अनिल आहेर यांनी केल्याने ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातही तिकीट वाटपाचा तिढा पाहायला मिळू शकतो… ज्याचा आमदार तो उमेदवार… असा फॉर्म्युला ठरला तर सुहास कांदेंची आमदारकी फिक्स समजली जातेय… पण या सगळ्यात समीर भुजबळ नेमकी काय भूमिका घेणार? ते पाहणंही तितकच महत्त्वाचं ठरणार आहे… पण नांदगाव मनमाडची निवडणूक शिवसेना विरुद्ध शिवसेना या लाईन अपने चालली, तर निकाल अनपेक्षित वळणावर जाऊन पोहोचेल, एवढं मात्र नक्की….

मला कोणीही मला मेसेज किंवा फोन करून नये; सुप्रिया सुळेंच्या पोस्टने खळबळ

Supriya Suley mobile hack

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या एका पोस्टने खळबळ उडाली आहे. सुप्रिया सुळे यांचा मोबाईल हॅक झाला असून कोणीही आपल्याला कॉल मेसेज करू नका असं त्यांनी म्हंटल आहे. यानंतर सुप्रिया सुळे यांनी कायदेशीर पोलीस तक्रारही केली आहे. पक्ष नेला, चिन्ह नेलं आणि अजून काय काय नेतील याची गॅरंटी नाही. माझ्याकडून ते सर्व घेऊन जाऊ शकतात, फक्त माझे माय-बाप मतदार घेऊन जाऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. सुप्रिया सुळे यांच्यासारख्या बड्या नेत्याचा मोबाईल हॅक झाल्याने चर्चाना उधाण आलं आहे.

काय आहे सुप्रिया सुळेंचं ट्विट?

सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट करत म्हंटल, *** अत्यंत महत्वाचे *** ‘माझा फोन आणि व्हॉटस्अप हॅक झाले आहे. कोणीही मला मेसेज किंवा फोन करून नये. याबाबत मी पोलीस तक्रार करत आहे. कृपया याची नोंद घ्यावी. एकप्रकारे कार्यकर्त्यांना त्यांनी सावध राहण्यास सांगितलं आहे. या ट्विटनंतर सुप्रिया सुळे या शिवस्वराज्य यात्रेत सहभागी झाल्या. त्यावेळी दौंड येथील भाषणात त्यांनी मोबाईल हॅकिंग बाबत सविस्तर घटनाक्रम सांगितला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझा फोन हॅक झाला असून माझ्यासोबत इतर कोणीतरी ऑपरेट करत आहे. इथे आल्यानंतर माझ्या हे लक्षात आले. माझं व्हॉट्सअॅपच सुरु होत नव्हतं. मी जयंत पाटील यांनी मला नमस्कार मेसेज करा असे सांगितले. त्यांनी तो मेसेज केल्यानंतर मी फोनवर काहीही न करता त्यांना ऑटोमॅटिक समोरुन नमस्कार असा मेसेज आला. यानंतर मी माझा फोन बंद केला. मी पुन्हा दोन, तीन जणांना माझ्या फोनवर मेसेज करण्यास सांगितले. त्यांनाही समोरुन मेसेज आला. माझा फोन बंद आहे. मी सिमकार्ड काढलं आहे. पण तरीही जे कोणी मला मेसेज करतात, त्यांच्याशी कोण गप्पा मारतंय, हे मला माहिती नाही. माझा फोन कोणी हॅक केला याबाबत मला कोणतीही कल्पना नाही. खरं तर त्यात लपवण्यासारखे काहीही नाही. पण फक्त माझ्या नवऱ्याला काही चुकीचे मेसेज पाठवू नका, एवढीच त्या हॅकरला विनंती आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हंटल आहे.

X Online Payment Feature : आता X वरूनही करता येणार ऑनलाईन पेमेंट? एलॉन मस्क टाकणार मोठा डाव

X Online Payment Feature

X Online Payment Feature । सध्याच्या या आधुनिक जगात सर्वकाही ऑनलाईन झालं आहे. आजकाल खिशात पैसे ठेऊन कुठं जाण्याची गरज भासत नाही, कारण फोन पे, गुगल पे अशा काही प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने एकमेकांना पैसे पाठवणे सोप्प झालं आहे. त्यातच आता एलॉन मस्क यांच्या मालकीचे प्रसिद्ध अशा X वरूनही ऑनलाईन पेमेंट सुविधा लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे. असं झाल्यास इतर पेमेंट्स अँप साठी हा मोठा खतरा असेल. इलॉन मस्क यांचे एक्सला सुपर अॅप बनवण्याचे स्वप्न आहे. त्या दिशेनं कंपनी काम करत आहे. याच कामाचा भाग म्हणून लवकरच एक्सवर पेमेंटची सुविधा देण्यात येणार आहे.

‘पेमेंट्स’ पर्याय दर्शविणारा एक स्क्रीनशॉट शेअर – X Online Payment Feature

एका रिसर्चरने याबाबत माहिती दिली आहे. एका ॲप संशोधकाने ॲपच्या नेव्हिगेशन बारमध्ये बुकमार्क बटणाच्या खाली एक नवीन ‘पेमेंट्स’ पर्याय दर्शविणारा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्यामध्ये तुम्ही बघू शकता कि, व्यवहार, शिल्लक आणि हस्तांतरणाशी संबंधित अतिरिक्त पर्याय देण्यात आले आहेत. या नव्या फीचरमुळे वापरकर्ते पैसे ट्रान्सफर करू शकतील, त्यांचे बॅलन्स चेक करू शकतील आणि ट्रांजेक्शन हिस्ट्री पाहू शकतील. एक्स पेमेंट्सला आतापर्यंत यूएसमधील 33 राज्यांमध्ये मनी ट्रान्समीटर परवाने देण्यात आले आहेत. TechCrunch च्या अहवालानुसार, देशात पैसे ट्रान्सफर करू पाहणाऱ्या कंपन्यांसाठी हे परवाने आवश्यक आहेत. त्यामुळे ऑनलाईन पेमेंटच्या दिशेनं मस्क यांनी टाकलेलं हे मोठं पाऊल म्हणता येईल.

खरं तर ज्यादिवशी एलॉन मस्कने ट्विटर विकत घेतलं होते त्याच दिवशी त्याने प्लॅटफॉर्मवर यूजर्सना त्यांच्या खात्यांमध्ये पैसे साठवता यावे आणि इतर X वापरकर्त्यांना पैसे पाठवता यावेत या फिचर वर चर्चा केली होती. याआधी एक्स म्हणजे फक्त माहिती शेअर करण्याचे माध्यम होते. पण मस्क आल्यानंतर या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ, ऑडिओ कॉलिंग, सबस्क्रिप्शन अशा अनेक फीचर्स आले आहेत. आता तर ऑनलाईन पेमेंटची सुविधाही (X Online Payment Feature) एक्सवर सुरु झाली तर मस्क यांच्याकडून मारण्यात आलेला हा मोठा मास्टरस्ट्रोक ठरेल. X च्या पेमेंट फीचरला लवकरात लवकर रोलआउटला करून जाहिरातीद्वारे प्लॅटफॉर्मवर कमाई करण्याच्या अलीकडील आव्हानांमुळे कंपनी कमाईचे पर्यायी स्रोत तयार करण्याचा विचार करत आहे.

कराड विमानतळाबाबत केंद्रीय राज्यमंत्र्यांनी दिली मोठी अपडेट; कधीपासून सुरु होणार??

Karad Airport Murlidhar Mohol

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड हे पश्चिम महाराष्ट्रातील एक मध्यवर्ती ठिकाण आहे. गेल्या काही वर्षांपासून कराड विमानतळाचे (Karad Airport) काम रखडलं आहे. मात्र आता केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कराड विमानतळाबाबत मोठी माहिती दिली आहे. कराड विमानतळाचे उर्वरीत भूसंपादनाचे काम येत्या १०-१५ दिवसात पूर्ण होऊन एकदा का हे काम झाले की मग पुढच्या काही महिन्यात कराड विमानतळ सुरु होईल. जवळपास ७० प्रवासी क्षमता असलेल्या विमानाची वाहतूक उड्डाण या ठिकाणाहून होईल असं मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी सांगितलं.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून राज्यात संवाद यात्रा काढण्यात येणार असून त्याच्या जिल्ह्यातील नियोजनासाठी महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या सूचनेनुसार भाजपचे जिल्हास्तरीय अधिवेशन आज कराड येथे पार पडत आहे. या अधिवेशनासाठी मुरलीधर मोहोळ कराडला आले असताना त्यांनी कराड विमानतळाबाबत महत्वपूर्ण अपडेट दिली. मुरलीधर मोहोळ म्हणाले, तुम्ही आता महाराष्ट्रातील माणूस दिल्लीला पाठवलाय आणि योगायोगाने हे खातेही आपल्याकडे आहे. कराड येथील विमानतळाच्या भू संपादनाविषयी जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आलेली आहे. त्याच्याकडून माहिती घेतली असून सुमारे ४८ हेक्टर जागेचं भू संपादन करायचे आहे. त्यातील ३८ हेक्टर जागेचे भूसंपादन झाले असून फक्त १० हेक्टर जागेचे भूसंपादन करायची प्रक्रिया राहिलेली आहे ती आम्ही पुढच्या १० ते १५ दिवसात पूर्ण करू असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्याचे मुरलीधर मोहोळ यांनी म्हंटल.

विमातळाच्या विस्तारीकरणातील भू संपादन हाच एक महत्वाचा मुद्दा असतो. एकदा हे काम झाले की, त्याच्या पुढची कार्यवाही चालू होईल. पुढच्या काही महिन्यात आपलं कराड येथील विमानतळ चालू होऊन एअर स्ट्रीप देखील वाढेल. जवळपास ७० प्रवासी क्षमता असलेल्या विमानाची वाहतूक उड्डाण या ठिकाणाहून सुरु होईल आणि त्यादृष्टीने आपण निश्चित प्रयत्न करत असल्याचे मंत्री मोहोळ यांनी म्हंटले. दरम्यान, मुरलीधर मोहोळ यांनी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी भेट देत अभिवादन केल्यानंतर येथील स्मृतिस्थळाची तसेच कराड येथील विमानतळाची देखील भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

Coimbatore Cricket Stadium : भारतातील ‘या’ शहरात उभारण्यात येणार जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम

Coimbatore Cricket Stadium

Coimbatore Cricket Stadium । आपला भारत हा क्रिकेटप्रेमी देश… देशात क्रिकेटला एखाद्या धर्माप्रमाणे मानाचे स्थान आहे. जसे देशात एकामागून एक दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे त्याचप्रमाणे भारतात क्रिकेट स्टेडियमची सुद्धा काही कमी नाही. देशात जवळपास 52 क्रिकेट स्टेडियम आहेत. यातील गुजरात मधील नरेंद्र मोदी स्टेडियम सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम आहे. या स्टेडियममध्ये 132,000 लोक बसण्याची क्षमता आहे. मात्र आता तामिळनाडू येथील कोईम्बतूरमध्ये भारतातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येणार आहे. तामिळनाडू सरकारने हे मोठे स्टेडियम बांधण्याची आपली योजना जाहीर केली आहे.

सध्या तामिळनाडू मध्ये एमए चिदंबरम स्टेडियम हे एकमेव आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आहे. हे स्टेडियम चेन्नई मध्ये आहे. आता त्यानंतर कोईम्बतूरमध्ये सर्वात मोठं स्टेडियम उभारण्याचा (Coimbatore Cricket Stadium) सरकारचा प्लॅन असून हे दुसरं आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम ठरेल. क्रिकेटच्या पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी तामिळनाडू सरकारने हा उपक्रम हाती घेतला आहे. राज्याचे उद्योगमंत्री टीआरबी राजा आणि युवक कल्याण आणि क्रीडा विकास मंत्री उदयनिधी स्टॅलिन हे दोन मंत्री यात आघाडीवर असून तामिळनाडूमध्ये खेळांना प्रोत्साहन आणि कलागुणांना वाव देण्यावर भर दिला जात आहे.

काय सुविधा मिळणार? Coimbatore Cricket Stadium

हे नवीन स्टेडियम NH 544 वर कोईम्बतूर शहरापासून सुमारे 16 किमी अंतरावर उभारण्यात येणार आहे . स्टेडियममध्ये व्हीआयपी आणि कॉर्पोरेट सुविधा, खेळाडूंसाठी लाउंज, मीडिया सेंटर, सार्वजनिक कॅफेटेरिया, रेस्टॉरंट्स आणि क्रिकेट संग्रहालय यासह अत्याधुनिक सुविधा असतील. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियम, बेंगळुरूचे एम चिन्नास्वामी स्टेडियम आणि लंडनच्या लॉर्ड्स स्टेडियमच्या धर्तीवर या स्टेडियमची रचना असेल असं बोलले जातंय. जगातील सरावात मोठं स्टेडियम असल्याने त्याचा थाट हा वेगळाच असेल. आता या स्टेडियमचे बांधकाम कधी सुरू होते आणि ते कधी पूर्ण होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

चेपॉक स्टेडियम खूप जुनं –

सध्याचे तामिळनाडू येथील एमए चिदंबरम स्टेडियम खूप जुने आहे. हे स्टेडियम 1916 मध्ये उभारण्यात आलं होते. या स्टेडियममध्ये सुमारे 50,000 लोक बसण्याची क्षमता आहे. कोलकात्याच्या ऐतिहासिक अशा ईडन गार्डन्सनंतर भारतातील दुसरे सर्वात जुने क्रिकेट स्टेडियम म्हणून एम ए चिंदंबरम क्रिकेट स्टेडियम ओळखलं जाते. याठिकाणी आत्तापर्यंत एकूण 34 कसोटींखेळवण्यात आल्या आहेत. 1934 मध्ये येथे पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला, जो भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामना होता. इंग्लंडने हा सामना 202 धावांनी जिंकला होता.

मनोज जरांगेची राज ठाकरेंवर टीका, म्हणाले AC मध्ये बसणाऱ्यांना….

JARANGE VS RAJ THACKERAY

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाचा (Maratha Aarakshan) मुद्दा अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रात शांतता रॅली सुरु केली आहे. सर्वच नेते आरक्षण मिळालं पाहिजे असं म्हणत आहेत, मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मात्र महाराष्ट्रासारख्या राज्याला आरक्षणाची गरजच नाही असं मत मांडल्याने मराठा समाजातून राज ठाकरेंविषयी नाराजी पसरली. या पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनीही राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. एसीत बसणाऱ्यांना आरक्षणाची झळ कळणार नाही असं म्हणत जरांगे पाटील यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, आरक्षणाची गरज राज ठाकरेंना नसेल, पण बाकीच्यांना आहे. राज ठाकरेंना जे वैभव मिळालं आहे ते ते मराठ्यांच्या जीवावर मिळाले आहे याचा विचार राज ठाकरेंनी करायला पाहिजे. . एसीत बसणाऱ्यांना आरक्षणाची झळ कळणार नाही पण गोरगरिबांना आरक्षणाची आवश्यकता आहे, त्यामुळे गोरगरिब जनतेच्या भावना जाणून घ्या . प्रत्येक वेळी तुमचेच विचार जनतेवर लादून चालत नाही असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला.

राज ठाकरे काय म्हणाले होते?

महाराष्ट्रासारख्या राज्याला आरक्षणाची गरज नाही. शिक्षणापासून ते नोकऱ्यापर्यंत इतकं सगळं आपल्याकडे उपलब्ध आहे. मात्र महाराष्ट्रात भूमिपुत्रांना नोकऱ्या, चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. मग, तो ओबीसी असो किंवा मराठा. कुठल्याही जातीचा असो, महाराष्ट्रात मुला-मुलींना चांगलं शिक्षण, रोजगार मिळाला पाहिजे. यात जात येते कुठे? मला जातीतील काही कळत नाही. माझ्याकडे याचं उत्तर नाही. महाराष्ट्रात सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात आहेत. त्यामुळे आरक्षणाची गरजच नाही. महाराष्ट्रात किती शैक्षणिक संस्था आहे? तिथे आरक्षण आहे का?. नकिती जातींना मिळणार? किती नोकऱ्या उपलब्ध होणार? हे पण आपण तपासणार आहोत का? असा प्रश्न राज ठाकरेंनी केला. राज्यात सध्या सुरु असलेलं मराठा आणि ओबीसी राजकारण हे फक्त मतांच राजकारण आहे. प्रत्येक समाजाने ही गोष्ट समजून घ्यायला हवी. हे आपल्याला मूर्ख बनवतायत. याने हाताला काही लागणार नाही असं राज ठाकरेंनी म्हंटल. मराठा-ओबीसी हा वाद समाजात विष कालवण्याचा प्रकार आहे असा आरोपही राज ठाकरेंनी केला.