अनेकांना कुत्रा, मांजर असे पाळीव प्राणी पाळण्याची हौस असते. मात्र कर्नाटक मधील एका घटनेने हादरवून सोडले आहे. पाळीव मांजरीने चावा घेतल्यामुळे महिलेला जीव गमवावा लागला आहे. चला जाणून घेऊया काय आहे हे नेमके प्रकरण ?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शिमोगा जिल्ह्यातील शिकारीपुरा ब्लॉक मधील तारला गट्टा येथील आहे. या ठिकाणी 50 वर्षाच्या गंगीबाई नावाच्या महिला आपल्या कुटुंबासह राहत होत्या. त्यांनी एक घरात मांजरही पाळलं होतं या मांजरीला यापूर्वी कुत्र्याने चावा घेतला होता. यानंतर घरी पाळलेल्या मांजरीने या महिलेसह दुसऱ्या एका व्यक्तीलाही चावा घेतला. त्यानंतर या महिलाने डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि त्यानंतर डॉक्टरांनी तिला रेबीज इंजेक्शन घेण्यास सांगितलं.
रेबीज झाल्यानंतर औषधाचा डोस पूर्ण करणं गरजेचं असतं यासाठी रेबीची पाच इंजेक्शन महिलेला घ्यावी लागत होती. मात्र महिलेने एक इंजेक्शन घेतले आणि त्यानंतर तिला बरे वाटू लागल्याने निष्काळजीपणाने ही महिला पुन्हा आपल्या कामांमध्ये व्यस्त झाली मात्र काही दिवसानंतर तिची प्रकृती बिघडत चालली होती. या महिलेची प्रकृती बिघडत असल्यामुळे महिलेला तातडीने शिमोगा येथील मेगन रुग्णालयात दाखल करण्यात आला.
रुग्णालयात देखील उपचार सुरू असताना कोणताही परिणाम महिलेवर झाला नाही. त्यामुळे महिलेच्या शरीरात रिबीजचा विषाणू पूर्णपणे पसरला गेला आणि याच कारणामुळे या महिलेचा मृत्यू झाला. महिलेचा मृत्यूनंतर डॉक्टरांनी याला दुसराही दिला आहे. मांजरीने महिलेला चावा घेतण्यापूर्वी मांजरीला कुत्र्याने चावा घेतल्याचा सांगितलं. कुत्रा मांजरीला चावल्यामुळे मांजरीच्या शरीरामध्ये रेबीज पसरला असावा असा संशय डॉक्टरांनी व्यक्त केलाय. मात्र या घटनेमुळे पाळीव प्राणी पाळणाऱ्यांनी थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे हे मात्र खरे…
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर सुद्धा बांगलादेश मधील हिंसाचार (Bangladesh Violence) सुरूच आहे. हिंसाखोर आंदोलनाकर्त्याकडून खास करून हिंदू नागरिकांना लक्ष्य केलं जात आहे. बांगलादेश मधील हिंदूंवर अत्याचार करण्यात येत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आंदोलनकर्त्यांकडून अनेक ठिकाणी हिंदूंची घरे आणि मंदिरे उध्वस्त करण्यात आली आहेत. या एकूण सर्व घटनांमुळे बांगलादेशमधील हिंदू भयभीत झाला आहे. बांगलादेश मधील हिंदूंच्या छळाच्या बातम्यांनी पुन्हा एकदा जुन्या घटना ताज्या झाल्यात. यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारे बांगलादेश मधील हिंदूंना त्रास सहन करावा लागला होता. फाळणीच्या आसपासच्या अशांत घटनांमुळे बांगलादेशातून लाखो लोक विस्थापित झाले, या नागरिकांनी शेजारीच असलेल्या पश्चिम बंगाल, त्रिपुरा, आसाम आणि मेघालय यांसारख्या भारतीय राज्यांमध्ये आश्रय घेतला होता. आपलं जीवन पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी त्यांनी भारतचा रस्ता धरला होता, मात्र त्यांच्यावर निर्वासितचा शिक्का बसला तो कायमचाच….. आज अनेक दशकांनंतर, बांगलादेशात अराजकता माजली आहे. हिंसाचाराच्या घटनांनी बांगलादेशमधील हिंदूंना असुरक्षित वाटतय. शेजारच्या देशात असलेल्या आपल्याचा भावंडांच्या या वेदना पाहून पश्चिम बंगाल मधील हिंदू चिंता व्यक्त करत आहेत आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आग्रह करत आहेत.
वेदनादायक भूतकाळाच्या आठवणी
या एकूण सर्व घडामोडीनंतर वनइंडियाने भूतकाळातील अत्याचारांचे साक्षीदार असलेल्या अनेक बंगाली हिंदूंशी संवाद साधला. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकून तुम्हीही कल्पना करू शकाल कि सध्या बांगलादेशामधील हिंदूंवर काय आपबिती आली आहे. याबाबत 1971 मध्ये भारतात पळून आलेल्या सुशील गंगोपाध्याय यांनी बांगलादेशातील नोआखली जिल्ह्यातील त्यांच्या सुरुवातीच्या काळातील समृद्ध जीवनाची आठवण करून देत त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. त्या म्हणाल्या, आमचं कुटुंब मोठं होतं आणि आमच्याकडे जमीनजुमलाही जास्त होता. मात्र मुक्तियुद्धादरम्यान, पाकिस्तानी सैन्य आणि रझाकारांनी आमच्यावर हल्ला केला. आमची घरे जाळली गेली आणि अनेकांना क्रूरपणे ठार मारण्यात आले. हे सांगताना सुशील यांचे डोळे पाण्याने भरले. ते पुढे म्हणाले, स्वातंत्र्यानंतर थोड्या वेळाने परतल्यानंतर, बहुसंख्य समाजाच्या सततच्या त्रासामुळे त्यांना बांगलादेश सोडून भारतात कायमचा आश्रय घेण्यास भाग पाडले.
सध्या बांगलादेश मधील हिंदूंवर जे काही संकट ओढवलं आहे त्यावर सुशीलने तीव्र संताप व्यक्त केला. बांगलादेशमध्ये आत्ता जे काही चाललंय, हिंदूंवर जो काही अत्याचार होतोय ते पाहून हृदय पिळवटून जाते. एका गर्भवती महिलेच्या पोटात लाथ मारल्याचे फुटेज मी पाहिलेय, अशा प्रकारची क्रूरता अकल्पनीय आहे. एक भारतीय म्हणून, मी त्यांच्या सुटकेची मागणी करतो. आमच्या मूळ बांधवांवर जर हिंदूंशी गैरवर्तन होत राहिले तर आम्हाला बांगलादेशात ‘छोडो भारत’ आंदोलनाचा विचार करावा लागेल असा इशाराही सुशील यांनी दिला. सुशील यांनी यावेळी १९७१ च्या त्यांच्या कटू आठवणींना सुद्धा उजाळा दिला. ते म्हणाले , त्यावेळी मी फक्त 10 किंवा 12 वर्षांचा होतो, रझाकारांनी आमच्यावर अत्याचार केले, पुरुषांचे मृतदेह नदीत फेकले आणि आमच्या माता- बहिणींवर अत्याचार केला, अनेक महिलांचा पाकिस्तानी सैन्याने गर्भपात केला. इतक्या वर्षांनंतरही त्या जखमा अजूनही कायम आहेत.
अशीच एक हृदय पिळवळून टाकणारी गोष्ट आहे अनिमा दास यांची… अनिमा दास या जेव्हा बांगलादेश मधून पळून भारतात आल्या त्यावेळी त्या गर्भवती होत्या. त्या त्रासदायक दिवसांची आठवण करून देताना अनिमा दास म्हणाल्या, “माझा एक मुलगा तरुण होता, आणि माझी मुलगी माझ्या पोटात वाढत होती. देश संघर्षात बुडाला होता, घरे जाळली गेली होती. भीतीपोटी माझ्या सासरच्यांनी आम्हाला भारतात पाठवले. विशेषतः पुरुषांविरुद्ध व्यापक हिंसाचार पाहण्याच्या आघाताने तिच्यावर अमिट छाप सोडली आहे. या घटनेनंतर अनेकवेळा मी बांगलादेशला भेट दिली आहे मात्र तेथे पुन्हा राहण्याचा विचार मला सहन होत नाही अशा भावना अनिमा दास यांनी व्यक्त केल्या.
सुशील गंगोपाध्याय आणि अनिमा दास यांच्यासारख्याच भावना सीमावर्ती भागातील अनेकांनी व्यक्त केल्या. त्यावेळी अनेकांनी आपली वडिलोपार्जित घरे आणि आठवणी सोडून धार्मिक छळातून पळ काढला होता. आज भलेही त्यांना भारतात विस्थापित म्हणून राहावं लागत असेल पण भारतात मिळत असलेल्या सुरक्षिततेमुळे त्यांच्या मनात कृतज्ञतेची भावना आहे. बांगलादेशातील हिंदूंना त्यांनी हाच एक सल्ला दिला आहे कि तुम्ही भारतात आश्रय घ्या.
यावेळी वन इंडियाने हरधन बिस्वास यांच्याशीही संवाद साधला, ज्यांचे वडील बांगलादेशातून भारतात स्थलांतरित झाले होते. ते म्हणाले, त्यावेळी सततच्या छळामुळे हिंदू समाज हा घाबरलेला होता, त्यामुळे अनेकांनी मायदेशी भारतात जाऊन आश्रय घेतला. बांगलादेशात स्वातंत्र्याच्या काळापासून ते मुक्तिसंग्रामापर्यंत आणि त्यांच्यानंतरही हिंदूंनी अनेक आव्हानांचा सामना केला आहे. तरीही या सर्व आव्हानांचा आणि धोक्याचा सामना करत अनेकांनी बांगलादेशात राहणे पसंत केलं. 1956 मध्ये भारतात आलेल्या परेश दास यांनी वन इंडियाशी बोलताना एक त्रासदायक अनुभव सांगितला. “माझ्या आजोबांचा माझ्या डोळ्यासमोर हल्ला करून खून करण्यात आला. आम्ही भीतीपोटी आमची जमीन सोडून दिली. त्यांनी माझ्या समोरच माझ्या चुलत भावावर सुद्धा प्राणघातक हल्ला केला. आम्ही सध्या भारतात शांततेत राहत असलो, तरी नोआखलीतील आमच्या नातेवाईकांना अजूनही धमक्यांचा सामना करावा लागत आहे. अवघ्या महिन्याभरापूर्वी जमिनीच्या वादातून माझ्या काकांची हत्या झाली होती, मी त्यांना संपत्तीपेक्षा त्यांच्या जीवनाला प्राधान्य देण्यास सांगितले होते असं परेश दास यांनी सांगितलं.
हस्तक्षेपाची विनंती
न्यूटाऊनजवळ राहणारे रशोमोय बिस्वास यांनी 1971 नंतरच्या हिंदूंवरील छळांची आठवण ताजी करून दिली. हिंदू असणे हा गुन्हा होता. स्वातंत्र्यानंतरही आम्हाला दिलासा मिळाला नाही. त्यावेळी पाकिस्तानी लष्कर आणि जमातच्या सैन्याने आम्हाला लक्ष्य केले, हिंदूंच्या घरांवर हल्ले केले. ते पुढे म्हणाले, माझ्या कुटुंबाने अनेकदा अन्न न खाता लपून छपून रात्र काढली. सध्या आम्ही भारतात शांततेत आणि सुखाने राहतोय हे खरय, पण आमचे अनेक नातेवाईक बांगलादेशात राहत आहेत. त्यामुळे तेथील हिंदू निर्भयपणे जगत आहेत का याची खात्री करण्यासाठी भारत सरकारला हस्तक्षेप करण्याची विनंती करतो असं त्यांनी म्हंटल.
Indian Railways : शुक्रवारी झलेल्या एका केंद्रीय कॅबिनेट बैठकीत देशातल्या सात राज्यांमध्ये आठ नवीन रेल्वे प्रकल्प सुरू करण्याविषयी माहिती देण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये महाराष्ट्राला दोन प्रकल्प मिळणार आहेत. सर्वात महत्त्वाचा पहिला प्रकल्प म्हणजे अजिंठा वेरूळ लेण्यांपर्यंत रेल्वेचे जाळे पसरवले जाणार आहे. तर दुसरी एक आनंदाची बाब म्हणजे जालना – जळगाव नवीन रेल्वे मार्गाला केंद्राचे मंजुरी मिळाली आहे. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान आणि रेल्वेमंत्र्यांचे (Indian Railways) आभार मानले आहेत. याबाबत ट्विट करत त्यांनी पोस्ट शेअर (Indian Railways) केली आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की ”केंद्राने महाराष्ट्राला आणखी एक मोठं गिफ्ट दिलं आहे. यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानतो. जालना जळगावच्या नव्या रेल्वे लाईन मुळे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र जोडला जाणार (Indian Railways) आहे”. अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.
Yet another GIFT to Maharashtra ! Thank you Hon PM Narendra Modi ji & Railway Minister Ashwini Vaishnav ji for the approval for Jalna-Jalgaon new railway line, connecting Marathwada & North Maharashtra. ₹7105.52 crore sanctioned for this 174 km line, which will connect Ajanta… pic.twitter.com/HCmbqcvJzj
जालना – जळगाव 174 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पामध्ये राज्य सरकारचा एकूण प्रकल्प किमतीच्या 50% खर्च म्हणजे 7105.43 कोटींपैकी 3552.715 कोटी रुपयांचा हिस्सा आहे. यात जमिनीची किंमत अंतर्भूत असेल. जालना – जळगाव नवीन रेल्वे मार्ग झाल्यास त्याचा फायदा मराठवाडा आणि खानदेश भागातील स्थानिक उद्योजकांना आणि शेतकऱ्यांना होणार आहे. हा रेल्वे मार्ग प्रकल्प जालना- राजुर- सिल्लोड- अजिंठा- जळगाव असा (Indian Railways) आहे.
अजिंठा वेरूळ रेल्वे नेटवर्कने जोडले जाणार
या नव्या प्रकल्पानुसार युनेस्को वारसा स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अजिंठा वेरूळ लेणीला लवकरच रेल्वे नेटवर्कशी जोडले जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात प्रयत्न विकासाला चालना मिळणार आहे. हे ठिकाण पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. रेल्वे सेवा सुरु झाली तर येथील आर्थिक (Indian Railways) विकासाला बळ मिळणार आहे.
Indian Railways : भारतामध्ये सार्वजनिक वाहतुकीमध्ये रेल्वेची महत्वाची भूमिका आहे. भारतभर रेल्वेचे मोठे जाळे पसरले आहे. त्यातच आता रेल्वे नेटवर्क चे जाळे आणखी वाढणार आहे. बिहार-पश्चिम बंगालसह सात राज्यांना मोठी भेट देत केंद्र सरकारने शुक्रवारी संबंधित राज्यांच्या आठ नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यामुळे कनेक्टिव्हिटीशी संबंधित पायाभूत सुविधांना चालना मिळेल, असे पंतप्रधान (Indian Railways) मोदींनी म्हटले आहे. याशिवाय रोजगारही निर्माण होईल.
वाहतुकीची कार्यक्षमता वाढणार (Indian Railways)
या प्रकल्पांबाबत सरकारने माहिती देताना सांगितले आहे की, यामुळे कनेक्टिव्हिटी वाढेल, प्रवास सुलभ होईल आणि तेल आयात आणि कार्बन उत्सर्जन कमी होईल. मंत्रिमंडळाच्या निर्णयाबाबत पत्रकारांना माहिती देताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, प्रस्तावित प्रकल्पांमुळे वाहतुकीची कार्यक्षमता सुधारेल आणि संपर्क नसलेल्या भागांना जोडून वाहतूक नेटवर्क सुधारेल. यामुळे पुरवठा साखळी सुरळीत होईल आणि आर्थिक विकासाला गती मिळेल.
प्रकल्पामुळे कार्बन उत्सर्जन होणार कमी
ते पुढे म्हणाले की, या प्रकल्पांची एकूण अंदाजे किंमत 24,657 कोटी रुपये आहे. या प्रकल्पांमुळे 767 कोटी किलो कार्बन उत्सर्जन (Indian Railways) कमी होईल. हे 30 कोटी झाडे लावण्याइतके आहे. असे वैष्णव यांनी स्पष्ट केले.
कोणत्या राज्यांचा समावेश ? (Indian Railways)
या प्रकल्पांमध्ये ओडिशा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, झारखंड, बिहार, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल या सात राज्यांमधील 14 जिल्ह्यांचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे सध्याचे रेल्वे नेटवर्क 900 किलोमीटरने वाढेल. या प्रकल्पांतर्गत 64 नवीन स्थानके बांधली जातील, ज्यामुळे सहा महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांशी (पूर्व सिंगभूम, भदाद्री कोठागुडम, मलकानगिरी, कालाहांडी, नबरंगपूर, रायगड), सुमारे 510 गावे आणि 40 लाख (Indian Railways) लोकांशी संपर्क वाढेल.
अजिंठा वेरूळ रेल्वे नेटवर्कने जोडले जाणार
महाराष्ट्राच्या बाबतीत सांगायचे झाले तर महाराष्ट्राला सुद्धा मोठी भेट मिळणार आहे. कारण या नव्या प्रकल्पानुसार युनेस्को वारसा स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अजिंठा वेरूळ लेणीला लवकरच रेल्वे नेटवर्कशी जोडले जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात प्रयत्न विकासाला चालना मिळणार आहे. हे ठिकाण पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. रेल्वे सेवा सुरु झाली तर येथील आर्थिक (Indian Railways) विकासाला बळ मिळणार आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आक्रमक भूमिका अजूनही कायम ठेवली आहे. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या या मागणीवर जरांगे पाटील अजूनही ठाम आहेत. जरांगे पाटील सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून आरक्षणाच्या प्रश्नावरून सत्ताधारी भाजप महायुतीवर सडकून टीका करत आहेत. लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा फटका महायुतीला बसला होता, आता विधानसभा निवडणूक तोंडावर असताना जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मात्र शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. जरांगेच्या आडून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) – पवारांचे (Sharad Pawar) राजकारण सुरु आहे असा थेट आरोप राज ठाकरेंनी केला आहे.
राज ठाकरे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असून यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सर्व महत्वाच्या विषयांवर थेट भाष्य केलं. राज ठाकरे म्हणाले, माझा आरक्षणाला विरोध आहे अशा बातम्या पेरण्यात आल्या. मात्र माझ आजही हेच मत आहे कि महाराष्ट्रासारख्या राज्याला आरक्षणाची गरज नाही. शिक्षणापासून ते नोकऱ्यापर्यंत इतकं सगळं आपल्याकडे उपलब्ध आहे, मात्र तरी आपल्याला कमी पडते कारण बाहेरच्या लोकांना या सर्व सोयी- सुविधा मिळत आहेत. त्यामुळे आरक्षण द्यायचं तर ते आर्थिक निकषांवर द्या हीच मनसेची पहिल्यापासून भूमिका आहे. पण आज आपण बघतोय कि जातीच्या आधारवर आरक्षण देण्याची मागणी होतीये आणि यामागे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा हात आहे असा आरोप राज ठाकरेंनी केला.
शरद पवार म्हणतात कि महाराष्ट्राचा मणिपूर होईल म्हणजे यांच्या डोक्यात काय चालू आहे ते समजतंय. हे जे काही सुरु आहे ते सर्व विधानसभेसाठी सुरू आहे. जरांगेच्या मागून मते मिळवण्यासाठी या लोकांचे प्रयत्न आहेत. पुढच्या तीन महिन्यात दंगली घडवण्याचा यांचा प्लॅन आहे. पवारांनी जेव्हा राष्ट्रवादी सुरू केली, तेव्हापासुन जाती- जातीमध्ये द्वेष निर्माण झाला. शरद पवारांनी आरक्षणासाठी मोदींकडे शब्द का टाकला नाही? जर मोदी आणि पवार बारामतीमध्ये एकत्र येत असतील तर मग आरक्षणाच्या मुद्द्यावर का बोलत नाहीत असा सवालही राज ठाकरेंनी केला.
Samrudhi Expressway : राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई -नागपूर समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे काम वेगाने पूर्णत्वास येत आहे. त्यानंतर मुंबई – नागपूर एकूण 701 किमीचा हा महामार्ग पूर्णपणे खुला होईल, मुंबई ते नागपूर हे आंतर या महामार्गामुळे 7-8 तासात गाठता येणार आहे.
मुंबई नागपूर समृद्धी महामार्गातल्या इगतपुरी ते आमने या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्याचे काम आता 99% पूर्ण झाले आहे. या मार्गातलं केवळ एक टक्का अखेरचं काम म्हणजे आठ किलोमीटर लांबीचा बोगदा. हा बोगदा या समृद्धी महामार्गाचा मुख्य आकर्षण ठरणार आहे. या बोगद्यामुळे 12 किलोमीटरच्या कसारा घाटाची गरज उरणार नाही. तसंच हे अंतर अवघ्या ८ ते १० मिनिटांमध्ये कापले जाणार आहे. याबाबतची माहिती एमएसआरटीसी चे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांनी एका माध्यमाशी बोलताना (Samrudhi Expressway) दिली आहे.
99% काम पूर्ण (Samrudhi Expressway)
मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग हा एकूण 701 किलोमीटरचा मार्ग आहे यापैकी 625 किलोमीटरचा महामार्ग हा खुला झाला असून केवळ 76 किलोमीटर मार्गाचे काम सुरू आहे. त्यातही हे काम 99% पूर्ण झाले असून चौथ्या टप्प्यातल्या या महामार्गावर पाच बोगदे आणि 16 पूल असणार आहेत. समृद्धी महामार्गाच्या या चौथ्या टप्प्यातला सर्वात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे आठ किलोमीटरचा बोगदा. या बोगद्यामुळे कसारा घाट लागणारच नाही. तसंच सध्याचे अंतर जे 12 किलोमीटर आहे जे कापण्यासाठी 40 मिनिटे लागतात मात्र हा बोगदा सुरू झाल्यानंतर हे हे अंतर अवघ्या आठ ते दहा मिनिटांमध्ये कापले जाणार आहे. आता या बोगदाचे काम तितकच आव्हानात्मक आहे. सगळी आव्हानं पेलून आम्ही तो तयार केला (Samrudhi Expressway) अशी माहिती देखील अनिल कुमार गायकवाड यांनी दिली आहे.
इगतपुरी – कसारा केवळ 10 मिनिटांत (Samrudhi Expressway)
समृद्धी महामार्गाच्या चौथ्या टप्प्यातला मार्ग हा नाशिक आणि ठाणे जिल्ह्यांना जोडतो. सह्याद्रीच्या खडतर पर्वत रांगांमधून मार्ग काढून हे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पूर्ण केले आहे. पॅकेज 14 हा इगतपुरी येथील आठ किलोमीटरचा बोगदा महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदा आहे. तसेच देशातील सर्वाधिक रुंद असा हा बोगदा आहे. या बोगदाची रुंदी 17.61 मीटर इतकी, तर या बोगद्याची उंची ही 9.12 मीटर इतकी आहे. त्यामुळे इगतपुरी ते कसारा हे अंतर आठ ते दहा मिनिटांमध्ये पार करता येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन नाशिकला जोडणाऱ्या कसारा (Samrudhi Expressway) घाटाला पर्यायी मार्ग झाल्यामुळे वाहतूक आणखी जलद होणार आहे.
बोगदे बांधणे आव्हानात्मक (Samrudhi Expressway)
समृद्धी महामार्गाच्या चौथ्या टप्प्यात व्हॅली पूल बांधणे आणि बोगदे बांधणं हे सर्वात मोठं आव्हानात्मक काम होतं काही ठिकाणी खडकात 30 ते 40 मीटर पर्यंत खोदकाम करावे लागलं आणि या टप्प्यात 16 व्हॅली पूल आहेत. तसेच पॅकेज 15 मध्ये खोल दरी असल्याने पुलाच्या खांबांची उंची 84 मीटर आहे म्हणजे एखाद्या 25 ते 28 मजली इमारती इतकी ही उंची आहे असे देखील गायकवाड यांनी सांगितलं
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शरद पवारांचे अत्यंत विश्वासू म्हणून तशी छगन भुजबळांची (Chhagan Bhujbal) ओळख… शरद पवारांच्या मदतीच्या हातानेच मुंबई सारख्या ठिकाणाहून अगदी नव्या कोऱ्या येवला विधानसभेत भुजबळांनी बस्तान बसवलं… आणि ते येवल्याचेच झाले… राष्ट्रवादीला मानणारा कोअर वोटर असल्याने इथं भुजबळ तसे बिनधास्त झाले… अगदी तुरुंगातूनही निवडणूक लढवून त्यांनी आमदारकीचा गुलाल आपल्या कपाळाला लावला, यावरून राष्ट्रवादी येवल्याच्या नसानसात आहे, वेगवेगळ्या शब्दात सांगायला नको… पण हेच भुजबळ राष्ट्रवादीच्या फुटीत अजित दादांसोबत गेले.. आणि सर्वांनाच धक्का बसला.. मराठ्यांच्या विरोधात घेतलेली भूमिका… शरद पवारांवर सडकून केलेली टीका… या सगळ्यामुळे लोकसभा लढवण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले भुजबळ यंदा आपली येवल्याची तरी सीट वाचवू शकतील का? असं म्हणण्याची वेळ आली आहे… येवल्यात भुजबळांच्या विरोधात वातावरण आहे हे पाहता आता त्यांना कात्रजचा घाट दाखवण्यासाठी अनेक इच्छुक निवडणूक रिंगणात उतरू पाहतायत… त्यात अशी काही मंडळी आहे की ज्यांना उमेदवारी मिळाली की भुजबळांचा करेक्ट कार्यक्रम झालाच म्हणून समजा… म्हणूनच येवल्यात भुजबळांचा पराभव करण्याची धमक नेमकी कोणत्या भिडूमध्ये आहे? शरद पवार येवल्यात भुजबळांना नडण्यासाठी नेमक्या कोणत्या चेहऱ्याला मैदानात आणू पाहता येत? त्याचीच ही इनसाईड स्टोरी…
राष्ट्रवादीतले बिग बी छगन भुजबळ यांचा येवला हा बालेकिल्ला.. खरंतर भुजबळांची येवल्याच्या राजकारणात नेमकी कशी एन्ट्री कशी झाली हे पाहणंही फार इंटरेस्टींगय. मुंबईच्या माझगाव ताडवाडीतून भुजबळांचा पराभव झाला. शिवसेनेच्या बाळा नांदगावकरांनी त्यांना पराभूत केलं. त्यानंतर भुजबळयांनी येवला गाठलं. ते कायमचंच.. इथून त्यांना परंपरेने शिवसेना विरोधात लढत देत आले.., पण २००४ ला ३५ हजाराचं, २००९ ला ५० हजार, २०१४ ला ४६ हजार तर २०१९ ला तब्बल ७० हजारांचं लीड घेत भुजबळांनी येवल्याची सीट काढली यावरुन त्यांची क्रेझ आपल्याला समजू शकते….या चारही निवडणुकीतील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भुजबळांच्या विरोधात चारही वेळा मराठा उमेदवार उभे होते.. पण ओबिसींचे नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भुजबळांच्या विरोधात ओबिसी कार्ड कधीच चाललं नाही.. मागच्या दोन्ही निवडणुकीत त्यांनी संभाजी पवारांना मात देत येवल्याची आमदारकी पटकावली होती… पण २०२४ उजाडताना चित्र सगळं बदललंय… भुजबळ अजित पवार गटात आहेत.. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ते आधीच बॅकफूटला फेकले गेलेत… शरद पवारांनीही पक्षफुटीनंतर येवल्यातूनच पहिली सभा घेतल्यानं आता तुतारीचं टार्गेट भुजबळ असणार हे तर फिक्स आहे… येवल्यात मराठा समाज हा निवडणुकीत हा निर्णायक मतदान करत आलाय. त्यात महाविकास आघाडीने एक्सट्रा एफर्ट लावले तरी भुजबळ यंदा पराभवाच्या काठावर आहेत, असं म्हणायला हरकत नाही…
पण अशातच भुजबळांच्या विरोधात रान तापवलय ते दोन नेत्यांनी.. त्यातलं पहिलं नाव येतं ते दत्ता आव्हाड यांचं…महाराष्ट्र प्रदेश ओबीसी काँग्रेसचे अध्यक्ष दत्ता आव्हाड यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतली… येवल्याच्या मतदारसंघ काँग्रेसी विचाराचा आहे… तसेच मतदार संघातील बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत, त्यामुळे तो काँग्रेससाठी सोडण्यात यावा, असं म्हणून दत्ता आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे भुजबळांना येणाऱ्या विधानसभेत भिडण्याची भाषा बोलून दाखवली… आधीच मराठा समाज हा भुजबळांवर नाराज आहे. त्यामुळे त्यांची विधानसभेची सारी भिस्त ही ओबीसी समाजावर आहे… मुळात ते ओबीसी नेते म्हणूनच नावारूपास आले… त्यामुळे आता हीच व्होट बँक दत्ता आव्हाड येणाऱ्या विधानसभेत फोडू शकले तर भुजबळांसाठी जिंकणं हरणं हे काठावरती येईल एवढं मात्र नक्की…
दुसऱ्या बाजूला महायुतीतील भाजपमधूनच अमृता पवार यांनी भुजबळांना आव्हान कुठे केलंय…माजी खासदार डॉ. वसंतराव पवार आणि मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार यांच्या कन्या अमृता पवार या राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्या… तसेच गोदावरी बँकेचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळलं… मात्र मागच्याच वर्षी त्यांनी राष्ट्रवादीतून भाजपात येत भुजबळांच्या विरोधात लढत देण्यासाठी फिल्डिंग लावली होती… भुजबळ अजित दादांसोबत महायुतीत आल्यावरही काहीही झालं तरी आपणच निवडणूक लढवणार, यावर अमृता पवार ठाम असल्याने आता भुजबळांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत… आधी ज्या भुजबळांना लढत द्यायची म्हटली की भलेभले दिग्गज स्पर्धेतून माघार घ्यायचे… पण त्याच भुजबळांच्या विरोधात दोन हात करण्यासाठी यंदा मात्र ढीगभर इच्छुक तयार आहेत… त्यातही दत्ता आव्हाड हे मैदानात दिसले तर शरद पवार प्लस काँग्रेस प्लस ओबीसी प्लस मराठा प्लस ठाकरे गट अशा सगळ्यांची गोळा बेरीज करून पाहिली तर दत्ता आव्हाड आरामात निवडून येतील अशी परिस्थिती आहे… त्यामुळे महायुतीत राहून… अजित पवार गटात राहून… भुजबळ निवडून येत नाहीत हे आता दिसत असल्यानं भुजबळ आमदारकीच्या तोंडावर काही नवा निर्णय घेतात का? ते पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे…
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेची शॉर्ट सेलर फर्म हिंडनबर्ग रिसर्चने (Hindenburg Research) मागच्या वर्षी भारतातील आघाडीच्या व्यावसायिक समूहांपैकी एक असलेल्या अदानी समूहाविरुद्ध खळबळजनक अहवाल आणून मोठा बॉम्ब फोडला होता. अदानी समूहाविरुद्ध अनेक खळबळजनक आरोप करत हिंडनबर्गने संपूर्ण मार्केटमधील अदानींची पॉवर बघता बघता कमी केली होती तसेच संपूर्ण शेअर बाजार हादरला होता. आता याच हिंडनबर्ग रिसर्चने भारताबद्दल आणखी एक मोठा इशारा दिला आहे. त्यामुळे अदानी नंतर आता कोणाचा नंबर असू शकतो अशा चर्चा सुरु आहेत.
हिंडेनबर्ग रिसर्च (Hindenburg Research) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर केली आहे त्यामध्ये त्यांनी म्हंटल आहे, भारतात लवकरच काहीतरी मोठे घडणार आहे. हे अपडेट शेअर होताच जागतिक व्यावसायिक क्षेत्रात खळबळ उडाली. हिंडेनबर्गने या पोस्टमध्ये थेटपणे कोणाचं नाव घेतलं नाही, परंतु चर्चाना मात्र चांगलंच उधाण आलं. आज सकाळी 9:30 पर्यंत, X वरील Hindenburg च्या या अपडेटला दीड दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले होते आणि सुमारे साडेचार हजार वेळा रिपोस्ट केले गेले होते.
अदानी समूहावर काय आरोप होते? Hindenburg Research
शेअरच्या किमतीत फेरफार करण्यापासून ते व्यवसायात अनुचित पद्धतींचा अवलंब करण्यापर्यंतच्या एकामागून एक अनेक खळबळजनक आरोप हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर केलं होते. या आरोपाचा मोठा फटका आणि तोटा अदानी समूहाला भोगावा लागला. या अहवालामुळे अदानी समूहाच्या सर्व शेअर्सचे भाव कोसळले होते. त्यावेळी अदानी समूहाला बाजार भांडवलात तब्बल $86 बिलियनचे नुकसान झालं होते. हे नुकसान अदानी समूह अजूनही भरून काढू शकलेला नाही. त्यावेळी अदानी समूहाने हिंडेनबर्ग रिसर्चचे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले होते, तसेच हे सर्व आरोप म्हणजे भारतावरील हल्ला असल्याचे सुद्धा अदानी समूहाकडून सांगण्यात आलं होते. महत्वाची बाब म्हणजे हिंडनबर्गने केलेला एकही आरोप सिद्ध झाला नाही. त्यामुळे हिंडनबर्गच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतेय.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मोदीबागेत जाऊन भेट (Bacchu Kadu Meet Sharad Pawar) घेतली. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. बच्चू कडू हे महायुती समर्थक आमदार आहेत, मात्र शरद पवारांच्या भेटीनंतर ते महाविकास आघाडीत सामील होणार का अशा चर्चांना जोर आला आहे. मात्र तूर्तास महायुती सोडून महाविकास आघाडीसोबत जाण्याचा कोणताही हेतू नाही असं म्हणत बच्चू कडू यांनी या सर्व चर्चाना पूर्णविराम दिला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले, शरद पवारांसोबत भेट (Bacchu Kadu Meet Sharad Pawar) हि आधीच ठरली होती. आमचा जो काल मोर्चा झाला त्यासंदर्भांत आम्ही जस राज्य सरकारला निवेदन दिले त्याचप्रमाणे या मुद्द्यावरून शरद पवारांशी चर्चा केली. मुद्द्यांवरच राजकारण झालं पाहिजे शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगबांधव आणि जे कोणी लोक अडचणीत आहेत त्यांच्या मुद्द्यावरून राजकारण झालं पाहिजे. ते मुद्दे घेऊन चर्चा झाली पाहिजे आणि प्रश्न निकाली लागले पाहिजेत असं बच्चू कडू यांनी म्हंटल. १ सप्टेंबरपर्यंत आम्ही महायुती सरकारला वेळ दिला आहे. शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगबांधवांचे प्रश्न महत्वाचे आहेत. मी नाराज नाही तर शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगबांधवांच्या नाराजीचा सूर आम्ही सरकार समोर ठेवत असतो, आमच्या बांधवांच्या मागण्या पूर्ण व्हावेत हीच आमची मागणी आहे असं बच्चू कडू यांनी म्हंटल.
झेंडा नाहीतर अजेंडा महत्वाचा आहे. जाती धर्माचा जसा मुद्दा होतो तसा शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग यांचे मुद्दे राजकारणात चर्चेला आले पाहीजे. करीता आज पुणे येथे खा. शरदचंद्रजी पवार यांची भेट घेतली. pic.twitter.com/m4YGihwtyW
दरम्यान, तुम्ही जे काही मुद्दे मांडले त्या मुद्दांसाठी महाविकास आघाडीत सामील होणार का असा सवाल केला असता शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगबांधवांसाठी आम्ही काहीही करू असं म्हणत बच्चू कडू यांनी थेट संकेत दिले आहेत. जो काही निर्णय असेल तो आम्ही १ सप्टेंबर नंतर जाहीर करू असं म्हणत बच्चू कडू यांनी राज्यातील महायुती सरकारला अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातही राजकारण आणखी बदलण्याची शक्यता आहे.
दरम्यान, बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने राज्य सरकारच्या विरोधात ९ ऑगस्ट क्रांती दिनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आक्रोश मोर्चा काढून सरकारला मोठा इशारा दिला आहे. त्यांनी राज्यातील शेतकरी, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, कामगारांच्या विविध मागण्या निवेदनाद्वारे सरकारपुढे मांडल्या. ५ सप्टेंबर पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास २२ सप्टेंबर ला मुंबईत धडक देणार, असा इशारा यावेळी कडू यांनी दिला
बच्चू कडू यांच्या मागण्या काय? Bacchu Kadu Meet Sharad Pawar
सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, शेतकरी कर्जमाफी, दोन वर्षातील कर्जाच्या व्याज आणि मुद्दलावर ५० टक्के सवलत मिळावी
शेतमजुरांसाठी स्वतंत्र योजना सुरू करावी, स्वतंत्र कांदा निर्यातबंदी धोरण बनवावे, फलोत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज द्यावे.
दिव्यांगांना मिळणाऱ्या मासिक वेतनात वाढ करावी, त्यांच्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ सुरू करावे.
शहरी व ग्रामीण घरकुल योजनांमधील निधीत समानता आणावी, बेघरांना घरे द्यावीत.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्राझील विमान अपघाताची (Brazil Plane Crash)धक्कादायक घटना घडली आहे. हवेत उंचावलेला विमान अवघ्या २ मिनिटात खाली कोसळलं. या विमानात एकूण ६२ प्रवासी होते, या सर्व जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ब्राझीलच्या नागरी सुरक्षा विभागानं अपघाताच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विमान कोसळल्यानं अनेक घरांचं नुकसान झालं आहे. या विमान अपघातानंतर ब्राझीलचे अध्यक्ष लूला डी सिल्वा यांनी दुःख व्यक्त करत मृत प्रवाशांना श्रद्धांजली वाहण्याचे आवाहन केलं आहे.
विमान अपघाताचा व्हिडिओ पहा – Brazil Plane Crash
हे विमान वोपास लिन्हास एरियासकडून चालवण्यात येत होतं. एअरलाइन वोपासनेही विमान कोसळल्याची पुष्टी केली आहे. Voipas Airlines द्वारे संचालित ATR 72-500 हे विमान दक्षिणी पराना राज्यातील कास्केवेल येथून साओ पाउलो येथील ग्वारुलहोस आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे उड्डाण करत असताना विन्हेडो शहरात अपघात झाला. या विमानात 62 लोक होते. यामध्ये 58 प्रवासी आणि 4 क्रू मेम्बर्सचा समावेश होता. हे सर्वजण या विमान अपघातात मृत्युमुखी पडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं. तसेच ज्याठिकाणी हे विमान कोसळलं त्या घराचेही नुकसान झालं. विमान जमिनीपासून १७ हजार फूट उंचीवर होतं. दोन मिनिटांत ते ४ हजार फूट खाली आलं. त्यानंतर त्याचा जीपीएस सिग्नल नकाशावर दिसायचा बंद झाला.
🚨🇧🇷Major plane crash in Brazil!
Expected dead 58 Passengers and 4 crew!
Plane exploded near houses but no people damaged yet on the ground hopefully.
विमान अपघाताचा (Brazil Plane Crash) एक व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तुम्ही त्यात बघू शकता कि हवेत झेप घेतलेलं विमान अवघ्या २ मिनिटातच एखाद्या कागदाच्या पानासारखं हवेत फिरताना दिसत आहे. विमान जमिनीवर कोसळताच आसमतांत काळा धूर पसरताना दिसतो. आणि जमिनीवर कोसळताच त्याला आग लागल्याचे दिसत आहे. या अपघातानंतर ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांनी दुःख व्यक्त केलं. अपघातातील मृतांसाठी एक मिनिट मौन पाळण्याचे आवाहन त्यांनी केले.