Sunday, December 21, 2025
Home Blog Page 581

श्रावण महिन्यात या गावातील बायका 5 दिवस राहतात विवस्त्र; कारण आहे खूपच भयानक

Shravan
Shravan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या भारतामध्ये अनेक रितीरिवाज असतात. अनेक संस्कृती आणि परंपरा आहेत. अशातच लवकरच श्रावण महिना सुरू होणार आहे. श्रावण महिना सुरू झाला की, सर्वत्र आनंदी आनंद असतो. अनेक सणांना या महिन्यात सुरुवात होते. त्यामुळे श्रावण महिना हा एक आनंदी महिना मानला जातो. परंतु उत्तरेकडे श्रावण महिन्यात काही विचित्र परंपरा पाहायला मिळतात. जे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. श्रावण महिन्यामध्ये हिंदू धर्मातील अनेक लोक हे उपवास करतात. जप करतात देवाची आराधना करतात.

त्याचप्रमाणे श्रावण महिन्यात आहार देखील अत्यंत सात्विक खातात. परंतु उत्तरेकडील भागात अत्यंत विचित्र चालीरीती आहेत. श्रावण महिन्यात भारतातील एका गावात महिला चक्क पाच दिवस कपडे घालत नाही. परंतु या महिला असे का करतात? यामागे नक्की काय परंपरा आहे? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

हिमाचल प्रदेशातील मणिकर्ण घाटातील एका गावात ही एक प्रथा चालत आलेली आहे. पिनी नावाच्या गावात गावात गेल्या हजारो वर्षांपासून ही एक विचित्र परंपरा चालली आहे. श्रावण महिन्यात या गावातील महिला पाच दिवस कपडे घालत नाही. त्याचप्रमाणे या गावात या पाच दिवसात बाहेरील लोकांना येण्यास देखील पूर्णपणे बंदी असते.

महिला असे का करतात ?

हिमाचल प्रदेशातील या गावाचा इतिहास देखील खूपच जुना आहे. या भागातील परंपरा देखील खूप वेगळे आहेत. श्रावणामध्ये पाच दिवस कपडे न घालण्याची परंपरा ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत आलेली आहे. परंतु या परंपरेमागे एक इतिहास देखील आहे. असे म्हटले जाते की, या गावात एकेकाळी राक्षसांनी उच्छाद मांडलेला होता. आणि गावकऱ्यांचे जगणे देखील गंभीर केले होते. त्यावेळी अखेर लाहूला गोंड नावाची एक देवता आली. आणि तिने या राक्षसांचा वध केला आणि या गावातील सगळ्या लोकांना वाचवले. हे राक्षस जेव्हा गावात यायचे, तेव्हा ते नटून-थटून बसलेल्या महिलांना उचलून घेऊन जायचे. आणि याच कारणाने या गावातील महिला श्रावणातील पाच दिवस कपडे घालत नाहीत. तसेच कोणत्याही प्रकारचा साजशृंगार करत नाही.

या गावात आजही अनेक लोक ही परंपरा पाळतात. जया महिलाही परंपरा पाळतात, त्यांना या पाच दिवसात लोकरीने तयार केलेले एक वस्त्र दिले जाते. या पाच दिवस महिला घराबाहेर येत नाही. ही परंपरा खास करून विवाहित महिला जोपासतात.

पुरुषांना काय असतो नियम ?

श्रावणातील या पाच दिवसांमध्ये महिलांनाच केवळ नियम नाही, तर पुरुषांना देखील हे नियम पाळावे लागतात. पुरुषांनी या पाच दिवसांमध्ये मद्य किंवा मांस खाणे चालत नाही. त्याचप्रमाणे काही व्रत देखील करावे लागतात. या पाच दिवसात पती-पत्नी एकमेकांकडे बघून हसत देखील नाही. हे पाच दिवस लोक खूप पवित्र मानतात. आणि एका सणा साजरे करतात. परंतु या दिवसात बाहेरच्या व्यक्तींना गावात पूर्णपणे बंदी असते.

Junk Food Side Effect | जंक फूडमुळे होतात 52 प्रकारचे आजार; लठ्ठपणाने लोक हैराण

Junk Food Side Effect

Junk Food Side Effect | आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. अनेक लोक तासान तास बसून काम करतात. त्याचप्रमाणे फास्ट फूड मोठ्या प्रमाणात खातात. या सगळ्याचा परिणाम म्हणजे लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. आरोग्यासाठी पोषक नसलेले पदार्थ खाल्ल्याने अनेक प्रकारचे रोग वाढलेले आहेत. एका सर्वेक्षणात असे समोर आले आहे की, जे लोक जंक फूड खातात. त्यांना 54 प्रकारचे आजार होत आहेत. तुम्हाला जर लठ्ठपणाच्या समस्यापासून सुटका मिळवायचे असेल, तर तुम्ही निरोगी जीवन शैली जगणे गरजेचे आहे. ताजे आणि सकस अन्न खाणे गरजेचे आहे.

आजकाल अगदी लहान मुले आणि वृद्धांमध्ये देखील लठ्ठपणाची (Junk Food Side Effect) ही समस्या वाढतच चाललेली आहे. जर या समस्यापासून लांब व्हायचे असेल, तर तुम्ही तुमच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. तुमच्या योग्य आहाराला प्राधान्य दिले पाहिजे. त्याचप्रमाणे शारीरिक हालचाली, योगासने आणि व्यायाम देखील केला पाहिजे.

एका मेडिकल अहवालात तसेच सांगण्यात आलेले आहे की, जे प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ असतात. त्याचे सेवन आजकालचे लोक मोठ्या प्रमाणात करतात. तसेच त्यांच्या शारीरिक हालचाली देखील कमी आहेत. या सगळ्याचा परिणाम म्हणजे देशात वजन वाढण्याचे आणि लठ्ठपणाची समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. वृद्धांमध्ये देखील लठ्ठपणा मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

शहरांमध्ये लठ्ठपणात वाढ | Junk Food Side Effect

राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षणानुसार असे लक्षात आलेले आहे की, ग्रामीण भागातील लोकांच्या तुलनेत शहरांमध्ये असणाऱ्या लोकांमध्ये लठ्ठपणा जास्त प्रमाणात वाढत आहे. शहरांमध्ये हा वेग 29.8% आहे तर ग्रामीण भागामध्ये हा वेग 19.3% एवढा आहे. 18 ते 69 या वयोगटातील पुरुषांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण हे 22.9% आहे, तर वर्षाभरापूर्वी हे प्रमाण 18.9% एवढे होते. लठ्ठपणाचे प्रमाण महिलांमध्ये जवळपास 24% इतके झालेले आहे. या सगळ्या गोष्टी आपल्या बदलत्या जीवनशैलीवर अवलंबून आहे. बाहेरचे रस्त्यावर केलेले पदार्थ आपण मोठ्या प्रमाणात खातो. यामुळे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो.

Budget 2024 : युवकांसाठी इंटर्नशिप योजना, मिळेल देशातल्या टॉप कंपन्यांमध्ये नोकरी; PM मोदींनी स्पष्टच सांगितलं

Budget 2024 : मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील अर्थसंकल्प आज संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकरी,महिला, नोकरदार, पर्यटन क्षेत्रासाठी भरभरून घोषणा करण्यात आल्या आहेत. याशिवाय तरुवर्गाला केंद्रस्थानी ठेवून रोजगार निमिर्तीसाठी विशेष भर दिलेला दिसतो आहे. मोदी सरकार वर वारंवार विरोधकांकडून बेरोजगारीबाबत (Budget 2024) भाष्य केले जात होते. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पात युवक वर्गासाठी रोजगारावर भर दिल्याचे दिसून येत आहे.

अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याबाबत भाषण केले. यावेळी हा अर्थसंकल्प पंतप्रधान मोदींनी अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदींबद्दल आनंद व्यक्त करत हा अर्थसंकल्प देशाला समृद्धीकडे घेऊन जाणार असून समाजातील सर्व घटकांची या अर्थसंकल्पात काळजी घेण्यात (Budget 2024) आल्याचे सांगितले.

‘रोजगार आणि स्वयंरोजगार निर्माण करणे

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘या अर्थसंकल्पामुळे व्यापारी आणि लघु उद्योगांना प्रगतीचा नवा मार्ग मिळेल. अर्थसंकल्पात उत्पादन आणि पायाभूत सुविधांवरही भर देण्यात आला आहे. त्यामुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल आणि गतीही कायम राहील.

रोजगार आणि स्वयंरोजगार निर्माण करणे ही आपल्या सरकारची ओळख आहे. आजचा अर्थसंकल्प याला आणखी बळ देणारा आहे. पंतप्रधानांच्या म्हणण्यानुसार, ‘या अर्थसंकल्पात सरकारने रोजगाराशी संबंधित प्रोत्साहनाची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत आयुष्यातील पहिली नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना आमचे सरकार पहिले वेतन देणार आहे. कौशल्य विकास आणि उच्च शिक्षणासाठी मदत असो किंवा एक कोटी तरुणांसाठी इंटर्नशिप योजना असो, हे तरुण, गरीब लोक करतील, माझी मुले-मुली देशातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये काम करतील. त्यांच्यासाठी शक्यतांचे नवे दरवाजे उघडतील. असे मोदींनी आपल्या भाषणात (Budget 2024) सांगितले.

लघु उद्योग देशाचे केंद्र (Budget 2024)

पंतप्रधानांच्या मते, ‘आपल्याला प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात, प्रत्येक घरात उद्योजक घडवायचे आहेत. आम्ही हमीशिवाय मुद्रा कर्जाची मर्यादा 10 लाख रुपयांवरून 20 लाख रुपये केली आहे. याचा फायदा मागासवर्गीय, दलित आणि आदिवासींना होणार आहे. आपण सर्व मिळून देशाला औद्योगिक केंद्र बनवू. देशातील एमएसएमई क्षेत्र हे देशाचे केंद्र बनले आहे. लघुउद्योगांचे मोठे सामर्थ्य हे आपले महत्त्वाचे पाऊल आहे. या अर्थसंकल्पात त्यांच्यासाठी कर्जाची सुलभता वाढवण्याची व्यवस्था (Budget 2024) करण्यात आली आहे.

Budget 2024 : अर्थसंकल्पात शहरी घरांबाबत मोठी घोषणा, गृहकर्जावर मिळणार सबसिडी

Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज दिनांक 23 जुलै रोजी 2024-25 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये शेतकरी ,महिला, पर्यटन, तरुणवर्गासाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. या अर्थसंकल्पात हौसिंग (Budget 2024) क्षेत्रासाठीही घोषणा करण्यात आल्या आहेत. ज्या अंतर्गत शहरी घरांसाठी 2 लाख कोटी रुपये उपलब्ध करून दिले जातील. यासोबतच शहरी गृहनिर्माण कामांसाठी परवडणाऱ्या दरात कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी व्याज अनुदान योजना प्रस्तावित करण्यात आली आहे.

पंतप्रधान आवास योजना (Budget 2024)

पीएम आवास योजनेची सध्याची अंतिम मुदत डिसेंबर 2024 पर्यंत आहे. उद्दिष्ट पूर्ण न झाल्याने सरकारने अंतरिम अर्थसंकल्पात ही योजना पाच वर्षांनी वाढवली होती. यावेळी प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण आणि शहरी भागात तीन कोटी अतिरिक्त घरांची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान आवास योजना (शहरी) 2.0 ची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. याअंतर्गत 10 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून एक कोटी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या घरांच्या गरजा पूर्ण केल्या जातील. यामध्ये पुढील पाच वर्षांत 2.2 लाख कोटी रुपयांच्या (Budget 2024) केंद्रीय मदतीचा समावेश असेल.

14 मोठी शहरे विकसित करण्यात येणार (Budget 2024)

2024 चा अर्थसंकल्प सादर करताना, अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या की, वाढीव उपलब्धतेसह कार्यक्षम आणि पारदर्शक भाड्याने घेतलेल्या घरांसाठी सरकार उपाययोजना करेल.यासोबतच सरकार 30 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या 14 मोठ्या शहरांचा विकास करणार आहे. यासोबतच सरकार सात क्षेत्रांमध्ये डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर ॲप्लिकेशन विकसित करणार आहे. ज्यामध्ये क्रेडिट आणि एमएसएमई सेवा वितरणाशी (Budget 2024) संबंधित क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे.

उद्योग कामगारांसाठी भाड्याच्या घरांची योजना (Budget 2024)

यासोबतच अर्थसंकल्प 2024 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेवरही मोठा भर देण्यात आला आहे. याबाबत अर्थमंत्र्यांनी सांगितले की, पीएम आवास योजनेंतर्गत 3 कोटी अतिरिक्त घरे बांधली जातील. यासोबतच त्यांनी उद्योग कामगारांसाठी भाडेतत्त्वावरील गृहनिर्माण योजना (Budget 2024) जाहीर केली आहे, जी VGF द्वारे PPP मोडवर आधारित असेल. उद्योग कामगारांसाठी भाड्याच्या घरांमध्ये वसतिगृह प्रकारची निवास व्यवस्था असेल.

Budget 2024: अर्थसंकल्पात पर्यटनासाठी काय ? कोणत्या क्षेत्रांचा होणार विकास ?

Budget 2024: मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात आला. 2024 – 25 या आर्थिक वर्षातील या अर्थसंकल्पामध्ये पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या युवक, कृषी क्षेत्र, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी मोठमोठ्या घोषणा केल्या गेल्या. देशाच्या विकासामध्ये पर्यटन क्षेत्राची भूमिका मोठी आहे. पर्यटन क्षेत्राला चालना देणाऱ्या काही घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये केल्या आहेत. त्या नक्की कोणत्या आहेत कोणत्या राज्यांच्या क्षेत्रांना विकासाची (Budget 2024) संधी आहे चला जाणून घेऊयात.

नालंदा विकास

देशाच्या सभ्यतेचा एक भाग म्हणून पर्यटनाचे क्षेत्र महत्वाचे असल्याचे , अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण करता येतील, तसेच इतर क्षेत्रांमध्येही संधी उपलब्ध होतील असेही त्यांनी नमूद केले. त्यांनी बिहारमधील राजगीर आणि नालंदा या क्षेत्राचा विकास करणार असल्याची घोषणा केली. नालंदा पर्यटन केंद्र म्हणून विकसित केले जाईल. नालंदामध्ये अनेक ठिकाणे आहेत ज्यांचा विकास करून पर्यटनाला चालना मिळू शकते. असे त्यांनी नमूद केले. यासाठी नालंदा विद्यापीठात नुकतेच नवीन कॅम्पस सुरू करण्यात आले. आता नव नालंदा महाविहार, सूर्य मंदिर, नालंदा पुरातत्व संग्रहालय, ह्युएन त्सांग मेमोरियल हॉल इत्यादी नालंदा पर्यटन केंद्रांतर्गत (Budget 2024) आणण्याची योजना आहे.

महाबोधी मंदिर (Budget 2024)

काशी विश्वनाथ कॉरिडॉर प्रमाणेच बिहारमधील बोधगया येथे महाबोधी मंदिर बांधले जाणार आहे. युनेस्कोने महाबोधी विहारला जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहे. सरकार या ठिकाणाचा पर्यटनासाठी विकास आणि प्रोत्साहनही देईल.

विष्णुपद मंदिर

बिहारच्या विष्णुपद मंदिरालाही वाराणसीच्या काशी विश्वनाथप्रमाणे मंदिर कॉरिडॉर बनवले जाईल. राजगीरलाही खूप महत्त्व आहे. राजगीरच्या विकासासाठीही मदत (Budget 2024) केली जाईल

ओडिशा पर्यटनाला चालना (Budget 2024)

पुरीचे जगन्नाथ मंदिर, कोणार्कचे सूर्य मंदिर, भुवनेश्वरचे लिंगराज मंदिर यासह अनेक धार्मिक स्थळांसाठी ओडिशा प्रसिद्ध आहे. तथापि, येथे प्राचीन शिल्पे, नैसर्गिक लँडस्केप, वन्यजीव अभयारण्ये आणि प्राचीन समुद्रकिनारे देखील आहेत. या सर्वांना पर्यटन म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी अर्थमंत्र्यांनी ओडिशा येथील पर्यटन विकासाला चालना देण्याची घोषणा (Budget 2024) केली.

असे असताना आज सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये पर्यटनाच्या दृष्टीने महाराष्ट्रासाठी कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. कोकणातल्या समुद्र किनारे , राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या विकासाच्या दृष्टीने कोणतीच घोषणा करण्यात (Budget 2024) आली नाही.

IPL 2025: गौतम अदानी गुजरात टायटन्स खरेदी करणार ? 12,550 कोटींच्या बोलीची शक्यता

IPL 2025: भारत आणि क्रिकेट यांचे नाते काही नव्याने सांगण्याची गरज नाही. भारतामध्ये क्रिकेटचे मोठे चाहते आहे. अशातच क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. अब्जाधीश गौतम अदानी इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये मोठे पाऊल टाकणार असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. गुजरात टायटन्स फ्रँचायझीमध्ये बहुसंख्य स्टेक घेण्यासाठी CVC कॅपिटल्स पार्टनर्सशी बोलणी सुरू असल्याची माहिती आहे.

“द इकॉनॉमिक टाईम्स” च्या मते, CVC कॅपिटल्स पार्टनर्स, यांनी 2021 मध्ये गुजरात टायटन्स फ्रँचायझी 5,625 कोटी रुपयांना ($745 दशलक्ष) विकत घेतली होती. आता या IPL संघाच्या विक्रीसाठी अदानी ग्रुप आणि टोरेंट ग्रुप या दोघांशी बोलणी सुरु असल्याची (IPL 2025) माहिती आहे.

गुजरात टायटन्सच्या संघाशी नवी नावे जोडणार असल्याच्या चर्चा आहेत. सरम्यान या टीमचे मूल्यांकन झपाट्याने वाढले आहे, जे सध्या $1 अब्ज ते $1.5 बिलियन दरम्यान अंदाजे आहे. संघाची तीन वर्षांपूर्वीच्या पहिल्या सत्रातील यशस्वी कामगिरी आणि टीमचा (IPL 2025) परफॉर्मन्स हेच त्यांच्या मूल्य वाढीचे कारण असल्याचे सांगितले जात आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) नवीन संघांसाठी लॉक-इन कालावधी समाप्त करणार आहे. जेणेकरून फेब्रुवारी 2025 पासून त्यांचे स्टेक विकू शकतील. या नियमातील बदलामुळे अदानीसारख्या संभाव्य गुंतवणूकदारांना आयपीएलमध्ये प्रवेश करण्याची किंवा त्यांचा प्रभाव वाढवण्याची संधी मिळेल. त्यामुळे संघ विकत घेणाऱ्यांना संधी मिळणार असून यामध्ये कोणत्या नावांचा समावेश असेल ? याबाबत (IPL 2025) उत्सुकता व्याख्या केली जात आहे.

अदानी समूहाचे क्रिकेट उपक्रम

तसे पाहायला गेल्यास अदानी समूह आधीपासूनच महिला प्रीमियर लीग (WPL) मध्ये भारतीय क्रिकेटशी संबंधित आहे, जिथे त्याची मालकी गुजरात जायंट्स फ्रँचायझी आहे. जी 2023 मध्ये 1,289 कोटी रुपयांना विकत घेण्यात आली होती. अदानी समूह या (IPL 2025)गेममध्ये आपली उपस्थिती वाढवण्यासाठी जोरदार सक्रिय आहे.

2021 मध्ये, अदानी समूहाने गुजरात टायटन्सची मालकी घेण्यासाठी 5,100 कोटी रुपयांची बोली लावली होती, तर टोरेंट समूहाने फ्रेंचायझीसाठी 4,653 कोटी रुपयांची बोली लावली होती. शेवटी, CVC Capitals’ Irelia Sports India ने सर्व स्पर्धकांना मागे टाकून संघ मिळवला.

GT ची कामगिरी

गुजरात टायटन्स ने हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली 2021 मध्ये पहिल्या सत्रातलं आयपीएल जिंकलं होतं. त्यामुळे क्रिकेट विश्वास विशेषतः आयपीएल विश्वामध्ये या संघाने आपलं एक स्थान बाजबूत केलं आहे. त्यामुळे गुजरात टायटन्सचं बाजारातलं मूल्य हे वाढलेले दिसून येत आहे. आयपीएल मधील एक प्रकारची मौल्यवान फ्रॅंचायजी पैकी एक म्हणून गुजरात टायटन्स आपलं स्थान मजबूत केलेलं दिसून (IPL 2025) येत आहे

Budget 2024 : अर्थसंकल्पाच्या घोषणेनंतर शेअर बाजार धडाम !!! सेन्सेक्स 1200 अंकांनी घसरला

Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत त्यांचा सातवा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थमंत्री सीतारामन यांनी 2024 -2025 या आर्थिक वर्षासाठी आणि मोदी सरकारच्या कार्यकाळातील तिसरा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पाच्या घोषणेनंतर शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला (Budget 2024) मिळत आहे.

सेन्सेक्समध्ये दीड टक्क्यांची घसरण पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, ट्रेडिंग सत्रादरम्यान निफ्टी 1 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करताना दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते शेअर बाजारात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 2 टक्क्यांहून अधिक घसरण पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, एसबीआयमध्ये सुमारे दोन टक्क्यांनी घसरण होत आहे आणि एल अँड टीचे शेअर्स 4 टक्क्यांहून अधिक (Budget 2024) घसरत आहेत.

निफ्टीमध्ये मोठी घसरण (Budget 2024)

अर्थसंकल्पाच्या घोषणेनंतर शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स सुमारे 1200 अंकांनी घसरून 79224.32 अंकांवर आला. तथापि, सेन्सेक्स 80,724.30 अंकांवर उघडला होता. दुसरीकडे, निफ्टीमध्येही सुमारे एक टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. निफ्टी 232.65 अंकांच्या घसरणीसह 24,276.60 अंकांवर व्यवहार करताना दिसला. तथापि, निफ्टी 24,568.90 अंकांवर उघडला.

कोणत्या शेअर्समध्ये मोठी घसरण

मुंबई शेअर बाजारातील देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये सुमारे दोन टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे कंपनीच्या शेअरचा भाव 2927.10 रुपयांवर पोहोचला. दुसरीकडे, L&T च्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. ओएनजीसी आणि श्रीराम फायनान्सच्या शेअर्समध्ये ३ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. हिंदाल्को आणि बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये 2.50 टक्क्यांहून अधिक घसरण (Budget 2024) दिसून येत आहे.

Union Budget 2024 | Income Tax बाबत सरकारच्या 2 मोठ्या घोषणा!! तुमच्यावर काय परिणाम होणार??

Union Budget 2024

Union Budget 2024 | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सलग तिसऱ्यांदा NDA इंडिया सरकारचा आर्थिक अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी मोदी सरकारने सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या घोषणा केलेली आहेत. हा अर्थसंकल्प (Union Budget 2024) सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नव्या इन्कम टॅक्स लॅब (Income tax lab) विषयी एक घोषणा केलेली आहे. त्यांनी केलेल्या घोषणेनुसार आता जुन्या प्रणालीनुसार कर भरणाऱ्या लोकांसाठी कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नसणार आहे. त्यामुळे निर्मला सीतारामन यांची ही घोषणा नोकरदार वर्गासाठी खूप महत्त्वाची घोषणा आहे. नव्या कर प्रणालीचा अवलंब करणाऱ्या नोकरदारांचे आता जवळपास 17 हजार 500 रुपये वाचणार आहेत.

तसेच निर्मला सीतारामन यांनी केलेल्या नव्या करप्रणाली स्टॅंडर्ड डिडक्शनची मर्यादा ही आता 50 हजारांवरून 75 रुपये एवढी करण्यात आलेली आहे. म्हणजे जवळपास 25 हजार रुपयांची स्टॅंडर्ड डिडक्शन वाढवण्यात आलेला आहे. तसेच फॅमिली डीडक्शनची मर्यादा 15000 वरून 25 हजार रुपये एवढी वाढवण्यात आलेली आहे.

नव्या करप्रणालीनुसार (Union Budget 2024) किती रक्कम भरावी लागेल. 3 लाख रुपयांपर्यंत कोणत्याही प्रकारचा कर लागणार नाही. त्याचप्रमाणे 3 लाख ते 7 लाख रुपये दरम्यान 5 टक्के कर कर्ज त्याला भरावा लागणार आहे. तसेच 7 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नासाठी 10 टक्के कर भरावा लागणार आहे. तसेच 10 लाख ते 12 लाख उत्पन्नावर 15 टक्के कर भारावा लागणार आहे. त्याचप्रमाणे निर्मला सीतारामन यांनी केलेल्या नवीन घोषणेनुसार आता 12 लाख ते 15 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या लोकांना 20 टक्के कर भरावा लागणार आहे. तसेच 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या लोकांना 30 टक्के एवढा कर भरावा लागणार आहे.

Union Budget 2024 | देशातील 1 कोटी तरुणांना मिळणार नोकरी!! मोदी सरकारची मोठी घोषणा

Union Budget 2024

Union Budget 2024 | आज 23 जुलै 2024 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सरकारचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर आहे. त्यामुळे निर्मला सीतारामन यादेखील मोदींच्या कार्यकाळात सलग तिसऱ्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहे. त्यामुळे आता या अर्थसंकल्पांमध्ये नक्की काय घोषणा केल्या जाणार आहेत .यावर संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. एकेक घोषणा होत आहे. अशातच आता या अर्थसंकल्पामध्ये मोदी सरकार तब्बल 1 कोटी तरुणांना 500 मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी देणार आहे. यामध्ये प्रत्येक महिन्याला तरुणांना 6000 रुपये तसेच अतिरिक्त भत्यासह 5 हजार रुपये भत्ता देखील दिला जाणार आहे. त्यामुळेही तरुणांसाठी एक मोठी संधी आहे.

रोजगार संबंधित प्रोत्साहन अंतर्गत तीन मोठ्या योजना | Union Budget 2024

पहिल्यांदा नोकरी करणारे

जे लोक प्रथमच नोकरी करत आहे. त्यांच्या ईपीएफओमध्ये नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना 15 हजार रुपयांपर्यंत महिन्याला पगार दिला जाणार आहे. या पगाराच्या 3 हप्त्यांमध्ये लाभ मिळणार आहे.

उत्पादन क्षेत्रात रोजगार निर्मिती

जे लोक नोकरीच्या पहिल्या 4 वर्षात कर्मचारी आणि नियुक्त या दोघांनाही त्यांच्या ईपीएफओ योगदानानुसार प्रोत्साहन दिले जाणार आहे.

नियुक्तांना समर्थन | Union Budget 2024

या योजनेमध्ये 2 वर्षासाठी प्रत्येक अतिरिक्त कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या ईपीएफओ योगदानाची प्रति महिन्यात 3 हजार रुपये परतफेड देखील केली जाणार आहे.

मोदी सरकारने अर्थसंकल्पात केलेल्या या घोषणेनंतर या योजनांचा तब्बल 30 लाख तरुणांना फायदा होणार आहे. त्यांना अतिरिक्त रोजगार निर्माण होण्यास देखील मदत होणार आहे. त्यामुळे आता आपल्या देशातील बेरोजगारी कमी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत सरकार ईपीएफओमध्ये योगदानासाठी दरमहा 3000 रुपये देणार आहे. या योजनेचा लाभ जवळपास 50 लाख लोकांना होणार आहे.

Budget 2024 : कृषी क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटींची तरतूद, महिला आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठीही प्रयत्न

Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत त्यांचा सातवा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे. मोदी सरकारच्या काळातील हा सलग तिसरा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात एकूणच सर्वसामान्य माणसाला काय मिळेल ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. असे असताना यंदाच्या बजेट मध्ये शेतकरी , महिला , ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी (Budget 2024) देण्याकडे दिसत आहे.

शेतकरी, महिला, तरुण आणि गरीबांसाठी बजेट

यावेळी भाषणाच्या दरम्यान ,अर्थमंत्री सीतारामन यांनी लोकसभेत सांगितले की, ‘भारतीय जनतेने मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकारवर विश्वास दृढ केला आहे आणि त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले आहे.’ भारताची आर्थिक स्थिती स्थिर असतानाच, धोरणात्मक अनिश्चिततेच्या गर्तेत. यासोबतच त्यांनी सरकारच्या प्राधान्यक्रमांची माहिती दिली आणि सरकारचे (Budget 2024) लक्ष शेतकरी, महिला, तरुण आणि गरीबांवर असल्याचे सांगितले.

कृषी क्षेत्राला 1.52 लाख कोटींची तरतूद

सीतारामन यांनी सांगितल्याप्रमाणे कृषी कृषी क्षेत्राच्या विकासासाठी मोदी सरकारने यंदाच्या बजेटमध्ये 1.52 लाख कोटींची तरतूद केली आहे. यावेळी कृषी क्षेत्राचा विकास हे सरकारची पहिली प्राथमिकता असल्याचा सांगितले गेलं. शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म सरकार आणणार आहे. नैसर्गिक शेतीवर भर देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. याशिवाय भाजीपाला वाहतुकीसाठी विशेष साखळी तयार करणार असल्याचं या बजेटमध्ये सांगण्यात आलं. एवढेच नव्हे तर डिजिटल प्लॅटफॉर्मची सोबत घेऊन शेतकऱ्यांसाठी विविध योजनाही आणल्या (Budget 2024) जातील असं या बजेटच्यादरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं

आतापर्यंतचे ठळक मुद्दे

  • कृषी क्षेत्राचा विकास ही सरकारची पहिली प्राथमिकता
  • कृषी क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटींची तरतूद
  • शेतीसाठी विविध योजना आणणार
  • शेतकऱ्यांना साठी डिजिटल (Budget 2024) प्लॅटफॉर्म
  • नैसर्गिक शेतीवर भर देण्याचा सरकारचा प्रयत्न
  • भाजीपाला वाहतुकीसाठी विशेष साखळी तयार करणार
  • महिलांच्या रोजगार निर्मिती साठी विशेष भर देणार
  • ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न
  • सहकार क्षेत्राचा विकास करून ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारणार
  • रोजगार निर्मिती साठी 2 लाख कोटी खर्च करणार
  • गरीब कल्याण अन्न योजना आणखी 5 वर्ष वाढवली
  • शैक्षणिक कर्जासाठी 3 टक्के व्याजाची सूट मिळणार
  • नव्या व्यवसायासाठी युवकांना कर्ज देणार
  • देशांतर्गत शिक्षणासाठी 10 लाखांपर्यंत सरकार (Budget 2024) मदत करणारपीएम विश्वकर्मा योजनेची व्याप्ती वाढवणार
  • ग्रामीण भागाच्या विकासासाठी 2 लाख कोटींची तरतूद
  • मुद्रा लोणचे कर्ज 20 लाख पर्यंत वाढवण्यात आले
  • इंडिया पोस्ट बँकेच्या 100 शाखा उघडणार
  • EPFO कर्मचाऱ्यांसाठी 3 नव्या योजना
  • 500 टॉप कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना इंटरशिप देणार
  • इंटरशिप करणाऱ्या तरुणांना दरमहा 5000 रुपये देणार