Monday, December 8, 2025
Home Blog Page 6713

लुल्लानगर चौकात रिक्षाने घेतला पेट

burning rikshaw
burning rikshaw

कोणतीही जिवितहानी नाही

पुणे | सुरज शेंडगे

रविवारी दुपारी १:३० च्या सुमारास लुल्लानगर चौकात अचानक रिक्षाने पेट घेतला. सीएनजी असलेल्या या रिक्षेच्या गॅस गळतीमुळे हा प्रकार घड़ला. सदर रिक्षा चालक लुल्लानगर चौकातुन बिबवेवाडीच्या दिशेने जात असताना हा प्रकार घडला , त्याचे नाव नासीर बागवान आहे. दरम्यान या घडनेच्या १० मिनिटांच्या आत अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. काही मिनीटांत त्यांनी आग आटोक्यात आणली. आग विझवताना काही वेळासाठी रस्ता बंद करण्यात आला होता म्हणून वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान आग पाहण्यासाठी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

म्हणून अमेरिकेने पाकिस्तान सोबतचे संबंध तोडले..!!

us pak
us pak

वॉशिंग्टन | पाकिस्तानचे दहशतवादी संघटनांसोबत असलेल्या संबंधामुळे आता पाकिस्तानला त्याची चांगलीच किंमत मोजावी लागणार आहे. दहशतवादाचा समूळ नायनाट करण्याचा विडा उचललेल्या अमेरिकेने पाकिस्तानला मदतीच्या रूपाने देण्यात येणारे २१०० कोटी डॉलर रोखले आहेत. एवढी मोठी मदत रोखण्यामागे पाकिस्तानचे दहशतवादी संघटनांशी असलेले संबंध आम्हाला खटकत असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव कोण्ही फोकनर यांनी माध्यमांशी संवाद साधून याबद्दलची स्पष्टोक्ती दिली आहे.
या अगोदर ही अमेरिकेने ३३ कोटी डॉलरची मदत पाकिस्तानला दिली होती तसेच दहशदवादी संघटनांशी संबंध असल्याचा संशय आल्याने ५० कोटी अमेरिकी डॉलरची मदत रोखून धरली होती. अमेरिकेने ही मदत रोखल्याने पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर त्याचे गंभीर परिणाम होणार असल्याचे जाणकारांनी म्हटले आहे.

लोकराज्य हे व्यक्तित्व घडविणारे मासिक – जिल्हाधिकारी, सातारा

program
program

सातारा | लोकराज्य हे फक्त करियर घडविणारे मासिक नसून ते व्यक्तित्व घडविणारे मासिक आहे. लोकराज्यतर्फे प्रकाशित झालेले ‘विशेषांक’ हे तर संग्राह्य शिदोरी आहेत, असे प्रतिपादन साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी लोकराज्य वाचक अभियान या कार्यक्रमामध्ये केले.

लोकराज्य अभियानाचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.

‘गर्जा महाराष्ट्र माझा’च्या शाहीर साबळे यांचा आज जन्मदिन

shahir sabale
shahir sabale

सांस्कृतिक नगरी | अमित येवले

महाराष्ट्रशाहीर कृष्णराव साबळे तथा शाहीर साबळे यांचा आज जन्मदिन. चलेजाव व संयुक्त महाराष्ट्र चळवळ,गोवा,हैदराबाद मुक्ती संग्राम यामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. लोकप्रिय ठरलेल्या “गर्जा महाराष्ट्र माझा” या गीतातून त्यांनी महाराष्ट्र देशाची महती घराघरांत पोहोचविली.

भारताच्या स्वातंत्र मिळण्याच्या दशकात शाहीरांचे योगदान अमूल्य ठरले आहे. शाहिर हे तत्कालीन वेळेस त्यांच्या शाहिरींच्या माध्यमातून जनजागृती करीत व लोकांना योग्य संदेश, राष्ट्रभक्ती वा चळवळीसाठी तयार करीत असत.

कोन बनेगा करोडपती आज पासून होणार सुरू

kbc
kbc

मुंबई | सुरज शेंडगे

टेलिव्हिजन जगतात सर्वोच्च टी.आर.पी कमावणाऱ्या टिव्ही शो ला आज पासून सुरुवात होणार आहे.आज पासून सुरू होणाऱ्या कोन बनेगा करोडपती कार्यक्रमाचा हा दहावा अध्याय आहे. अमिताभ बच्चन यांच्या अनोख्या सूत्रसंचालनातून साकार होणारा कार्यक्रम लोकांच्या अत्यंत पसंतीला उतरला आहे.आज रात्री ९ वाजता सोनी वाहिनी वर हा कार्यक्रम सर्वांच्या भेटीला येतो आहे.या अध्यायात कोन बनेगा करोडपतीचे सर्वोच्च बक्षीस ७कोटी रुपये आहे.हॉट सीट वर आलेल्या व्यक्तीला करोडपती बनण्यासाठी १६ प्रश्नांची अचूक उत्तरे द्यावी लागणार आहेत.
मागील अध्यायात समाजातील अत्यंत गरीब लोकांना कोटींची बक्षिसे मिळवून दिली होती. विशेष म्हणजे या पर्वात महिलांनी मोठी कामगिरी केली होती.या कार्यक्रमात करोडपती झालेल्या महिलांसोबत अमिताभ बच्चन यांनी स्त्री पुरुष समतेचा संदेश दिला होता.करोडपती बनण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक मुंबईला येतात.अत्यंत गरीब घरातील लोक एका क्षणात करोडपती झाल्याचे बघण्याची पर्वणी आज पासून सुरू होणार आहे.

सरन्यायाधीशपदी रंजन गोगोई यांची वर्णी ?

ranjan gogoi
ranjan gogoi

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायाधीश असलेले रंजन गोगोई हे पुढील सरन्यायाधीश म्हणून पदभार स्विकारतील अशी शक्यता आहे. कारण, विद्यमान सरन्यायधीश दीपक मिश्रा यांनी याबाबत त्यांच्या नावाला पसंती दिली असून , तसे शिफारस पत्र त्यांनी विधी मंत्रालयाकडे पाठवले आहे. त्यामुळे येत्या ०३ ऑक्‍टोबर रोजी ते सरन्यायाधीशपदी विराजमान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, या वर्षीच्या सुरवातीला सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयातील चार वरिष्ठ न्यायाधीशांनी उघडपणे पत्रकार परिषद घेऊन बंड पुकारले होते, त्यात रंजन गोगोई यांचा देखील समावेश होता.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची व्यथा

adivasi hostel
adivasi hostel

नवनाथ मोरे | ९९२१९७६४६०

आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या विकासासाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. याच विभागामार्फत आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात यावे,शिक्षण घेता यावे. यासाठी राज्यभरात ४९१ वसतिगृहे चालवली जातात.या वसतिगृहांमध्ये ५८ हजारहून अधिक विद्यार्थी वास्तव्य करतात.
वसतिगृहांमध्ये जेवण,नाष्टा,शैक्षणिक साहित्य,बेडिंग साहित्य,निर्वाह भत्ता इ. सुविधा पुरविल्या जातात. आदिवासी समाजाच्या सामाजिक प्रगतीत आश्रमशाळा,वसतिगृह यांचा महत्वाचा वाटा राहिला आहे. ज्या समाजाच्या उन्नती आणि शैक्षणिक प्रगतीसाठी वसतिगृह महत्वाचा दुवा ठरली आहेत. त्यांची अवस्था गंभीर आहे.
महाराष्ट्र राज्याचे आयुक्तालय ज्या नाशिक शहरात आहे.त्याच शहरातील आणि जिल्ह्यातील वसतीगृहांची परिस्थिती गंभीर आहे. पेठरोड येथे मुलींच्या वसतीगृहांची परिस्थिती पाहिल्यास पंखे तुटलेले आहे,कधी लाईट जाते,खिडक्याच्या काचा तुटलेल्या आहेत.(पिण्यासाठी फिल्टरच्या पाण्याची व्यवस्था नाही,मुलींना आंधोळीसाठी गरम पाणी नाही,सफाई कर्मचारी नाही) येथीलच मुलांच्या वसतिगृहाची परिस्थिती तर भयानकच आहे. पिण्याचे फिल्टर पाणी नाही,एक रूमांमध्ये १०-११ तर काही ठिकाणी जास्तही संख्या,रूममधून येणार कुबट वास कारण संख्याच तेवढी असल्याचा हा परिणाम.संडास बाथरूमचे तुटलेले दरवाजे,त्यातून नाकाला सहऩ न होणार वास.सगळीकडे दिसणारे घाणीचे साम्राज्य.यावरून कर्मचारी असून हे साफच केले जात नाही हे दिसते.वसतिगृहात घुसतानाच येथील घाणीची आणि दुर्गंधीची प्रचिती येते. अशी अवस्था हकेच्या अंतरावर आयुक्तालय असलेल्या वसतिगृहांची आहे.मग ग्रामीण भागातील विचारच सोडून द्या.मग याला जबाबदार कोण?
वसतिगृह प्रशासन मात्र याकडे लक्ष देण्याच तयार नाहीच.मात्र आयुक्तालय झोपी गेल्याचे यावरून दिसत आहे. ज्या समाजाच्या उन्नतीसाठी जनतेच्या पैशावर प्रगतीसाठीचा डोलारा उभा केला आहे. तो उद्देश खरेच किती प्रमाणात साध्य होतो हा मुद्दा आहेच. अधीच आदिवासी विभागाला भ्रष्टाचाराची कीड लागल्याची प्रतिमा आहे.त्यातून याची प्रचिती येतेच.परंतु ही आवस्था पाहून प्रशासन किती ढिंम आहे हे दिसून येते.मुले वसतिगृहात येतात,राहतात, परिस्थितीवर मात करत दोन ते पाच वर्षे काढतात.येथे असताना काही समस्या, प्रश्न निर्माण झाल्यावर गृहपालांकडे सांगायला गेला तर घरी एवढे तरी मिळते का? ही भाषा वापरली जाते.हे गृहपालांचीच भाषा नाही तर आधिकारी पण बोलतात.परंतु ज्यांच्या कल्याणासाठी हे सगळे उभे केले आहे.कोट्यावधी रूपये खर्च केला जातो,ते त्यांना मिळणे हे हक्कचे आहे.पण ही वसतिगृहे आहेत की कोंडवाडे हे पाहिल्यानंतर लक्षात येते.त्यात विद्यार्थ्यांचा अभ्यास कितपत होणा हा प्रश्न आहे.एकीकडे आम्ही स्पर्धेची भाषा करत आहोत.परंतु येथे स्पर्धेत येण्याअगोदरच जर घोडे निकामी केले जात असतील तर कसे होणार? आज कुठे आदिवासी समाजातील २ ते ३ टक्के विद्यार्थी उच्च शिक्षणात येत आहे.जर येणारा निधी आणि दिल्या जाणाऱ्या सुविधाच मिळत नसेल तर उपयोग काय? जर समाजकल्याणची आणि आदिवासी विभागाच्या वसकिगृहांची तुलना केली तर जमीन असमानाचा फरक आहे.तेथे शासन चांगल्याप्रकारे अंमलबजावणी करू शकते तर येथे का नाही? आदिवासाी वसतिगृहातीव बहुतांशी पदे रिक्त आहे.मग येथील कामे करणार कोण? समाजकल्याणला सर्व कर्मचारी दिले जातात मग येथे का नाही? काही शतकानंतर आदिवासी वसतिगृहांसाठीतील जेवणासाठीचा ११ नोव्हेंबर २०११ चा शासन निर्णय निघाला परंतु त्यानंतर त्यामध्ये अनेक बदल करण्यात आले त्यानंतर ४ महिन्यात ४ वेळा नवीन परिपत्रक काढले गेले. तसेच गेल्यावर्षी दि. १५/१०/२०१७ रोजी शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंयोजना चालू करून वीस हजार विद्यार्थ्यांना वसतीगृहा बाहेर काढण्याचा डाव रचला होता. त्यानुसार शहरी भागातील भाडेतत्वावर असणाऱ्या इमारतींमधील शासकीय वसतिगृहे बंद करण्याचे परिपत्रक प्रकल्प कार्यालयातून काढण्यात आले.परंतु विद्यार्थी आणि एसएफआय सारख्या संघटनांने विरोध करून शासनाला हा निर्णय मामागे घेण्यास भाग पाडले.
आजमितीला ज्या मुलभूत समस्या आहेत,त्या सोडविणयाचे सोडून आदिवासी विभागाने वसतिगृहातील मेस बंद करून जेवनासाठीचे पैसे विद्यार्थ्यांना आधार लिंक खात्यामध्ये हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. शासन निर्णयामध्ये जी कारणे दिले आहे त्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की स्वत:च्या जेवणाची सोय स्वत:करू शकतील व आत्मनिर्भर बवतील,आवडी निवडी प्रमाणे जेवण्याची मुभा मिळेल,आवडीप्रमाणे भोजन ठेकेदारांची निवड करता येईल हे सर्व पर्याय हे हास्यस्पद आहेत.मुळात यावरून शासन वसतिगृह व्यवस्थेतून अंग काढू घेत आहे.मग विद्यार्थ्यांनी शिकायचे की नाही? हा शासन निर्णय वसतिगृह बंदीच्या दिशेने जाणारे पाऊल ठरणार आहे यात शंका नाही. एकीकडे प्रशासकीय आधिकारी कौशल्यविकास,तंत्रद्यान,नवनवीन प्रयोगाची भाषा बोलतात.परंतु आजवरच्या पध्दती ,यंत्रणा सुधारण्यासाठी आणि पायाभूत सुविधांची वनवा दूर करण्यासाठी नवे प्रयोग राबविण्याची गरज आहे.प्रशासकिय यंत्रणा इतकी ढिंम झाली आहे की तीला वेग देण्यासाठी प्रयोगाची गरज आहे य.परंतु ती व्यवस्थाच नेस्ताबूत करण्याचे प्रयोग होणार असतील तर ते धोक्याचे आहे.
आता कुठे आदिवासी समाज प्रवाहात येतो आहे.कुठे पहिली-दुसरी पिढी शिक्षण घेत आहे.जर ती मुख्य प्रवाहात येण्याअगोदर जर शिक्षणाच्या बाहेर फेकले जाणार असतील तर हे शिकू शकणार आहेत का? कोणत्याही य़ोजना ह्या समाजाचे सामाजिक आणि आर्थिंक अंग लक्षात घेऊन अवलंबिल्या पाहिजेत.विद्यार्थी कल्याणाचा विचार करत पैसा हे सर्वस्व ठरत असेल तर उपयोग काय? पैसा एक तर सुधारतो की बिघडवतो.याचा विचार होणे गरजेचे आहे.आजचे सरकार ज्या पध्दतीने कल्याणकारी योजनांना कात्री लावत आहे.त्याचाच हा परिपाक दिसत आहे.
खरे तर आदिवासी वसतिगृहांची अवस्था पाहून आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात येण्यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आज विकासाचा भूलभूलया दाखविला जात आहे.परंतु या योजना राबवताना आधिकारी लक्ष देताना दिसत नाहीत हे सर्व परिस्थितीवरून दिसत आहे.
मग एकीकडे शासन म्हणत आहे, आमच्याकडे पैसा नाही.तर दुसरीकडे आदिवासी विभागाचा निधी खर्चच होते नाही किंवा तो इतरत्र वळविला जात आहे. मग या भयानक परिस्थितीला प्रशासकिय यंत्रणा आणि शासनच जबाबदार आहे.
सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले आहे हे दिसत होते.आदिवासी विभागाचे प्रशासन कशा पध्दतीचे आहे हे जाणवते.या परिस्थितीवरून असेही वाटते की ही फक्त त्या समाजाला खुश करण्यासाठी हा डोलारा उभा केला आहे का? प्रशासन असे असते का? प्रशासन भ्रष्ट झाले का? सुस्तावलेत? का प्रशासनालाच झोप आली आहे? याचा विचार करणार आहोत की नाही.एकीकडे अच्छे दिनाची स्वप्ने दाखविले,मग हे अच्छे दिन कुणासाठी? मल्ल्या,निरव मोदीसाठी का?
वसतिगृह व्यवस्था ही आदिवासी समाजाच्या उन्नतीचा पाया आहे.जर ती व्यवस्थाच नष्ट केली जात असेल तर ही धोक्याची घंटा आहे. याचा विचार करणे गरजेचे आहे.

उंदराला मारण्यासाठी गोळीची काय गरज – प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar
Prakash Ambedkar

पुणे | सुनिल शेवरे

अनेक पुरोगाम्यांना शहरी नक्षलवादी म्हणून अटक झाल्यानंतर देशभर डाव्या संघटनानी निषेध नोंदवला आहे. त्यात भर पडली आहे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची. मोदींच्या हत्येचा कटासंदर्भात प्रश्न विचारला असता,
उंदीर मारण्यासाठी गोळीची काय गरज? अशी कडवट प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद होण्याची शक्यता आहे.

आशियाई स्पर्धेत भारताची आजपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी

Indians
Indians

जकार्ता | १५ सुवर्ण, २४ रौप्य व ३० कांस्यपदक मिळवत भारताने आशियाई स्पर्धेत आपली आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. यातील सर्वात जास्त पदके ही अॅथलेटिक्स या क्रीडाप्रकारात मिळाली आहेत. यातील अनेक क्रीडाप्रकारांत भारताला पहिल्यांदाच पदक मिळाली आहेत. २०१० सालच्या भारतीय चमूने एकूण ६५ पदकांची कमाई केली होती. सर्व पदकविजेत्या खेळाडूंचे क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

अल्पवयीन मुलीवरील बलात्काराप्रकरणी पित्याला फाशी

child rape
child rape

राजस्थान | घरातील बाकी लोकांच्या अनुपस्थितीत आपल्याच मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला राजस्थान उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. बापाने स्वतःहून या गुन्ह्याची कबुली पोलीस स्टेशनला दिली होती. अवघ्या २० दिवसांत या गुन्ह्यावर शिक्षेची कारवाई करण्यात आली. विनोद बंजारा असे या आरोपीचे नाव असून पोस्को कायद्याअंतर्गत त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पब्लिक प्रोसिक्युटर नंद किशोर यांनी या गुन्ह्याबद्दल तातडीने कारवाई होण्यासाठी प्रयत्न केले.