Thursday, December 11, 2025
Home Blog Page 6719

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या बोधचिन्ह व घोषवाक्याचे अनावरण

lokseva
lokseva

मुंबई | नागरिकांना पारदर्शक,गतिमान आणि कालबद्ध सेवा देण्यासाठी पारित केलेल्या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या बोधचिन्ह व घोषवाक्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज अनावरण झाले.

लोकसेवा हक्क कायद्याच्या लोकप्रियतेसाठी घेण्यात आलेल्या बोधचिन्ह स्पर्धेत नरेश अग्रवाल यांच्या बोधचिन्हाची तर उत्कृष्ट घोषवाक्य स्पर्धेत हेमंत कानडे यांच्या घोषवाक्याची निवड करण्यात आली. यावेळी या दोघा स्पर्धकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रत्येकी २५ हजारांचे पारितोषिक देण्यात आले. या प्रसंगी मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधिन क्षत्रिय, प्रधान सचिव भूषण गगराणी, एसव्हीआर श्रीनिवास आदी उपस्थित होते.

पुण्यात पुस्तक दहीहंडीचे आयोजन

initiative
initiative

पुणे | राष्ट्रीय एकात्मता जपण्यासाठी अनेक संस्था नानाविध कार्यक्रमाचे आयोजन करत असतात. परंतु वंदे मातरम संघटनेने आणि फीनिक्स फाउंडेशन यांनी दरवर्षी प्रमाणे पुस्तक दहीहंडीचे आयोजन करत राष्ट्रीय एकात्मता जपली आहे. सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथे जुने पुस्तक स्विकारण्याच्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. गडचिरोली जिल्ह्यात या उपक्रमाअंतर्गत आजपर्यंत ३३ ग्रथालये उभारण्यात आली आहेत, वंदे मातरम संघटनेचे या कार्यक्रमाचे १४ वे वर्ष आहे. जुनी व सर्व प्रकारची शैक्षणिक, वैनिक पुस्तकांचा स्वीकार या वेळी घेण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष वैभव वाघ व प्रदेश कार्याध्यक्ष सचिन जामगे यानी दिली.
१ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता या पुस्तकी दहीहंडी संपन्न होणार आहे.

पूर्व-विदर्भात पावसाचा जोर वाढणार

rain
rain

मुंबई | अमित येवले

पूर्व-भारतात तयार झालेल्या एका कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पूर्व-विदर्भात २७ आणि २८ ऑगस्ट रोजी पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यामुळे या दरम्यान गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

पावसाच्या या स्थितीमुळे नदी-नाल्यांना पूर येण्यासारखी स्थिती उद्भवू शकते ज्यामुळे काही गावांचा संपर्क देखील तुटू शकतो. म्हणूनच नदी-नाल्यांच्या काठी राहणाऱ्या लोकांनी सावध राहावे. या दरम्यान पूर्व विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर उर्वरित विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात हलक्या पावसाची शक्यता असणार आहे.

जम्मू काश्मीरच्या राज्यपालांनी घेतली मोदींची भेट

Satyapal Malik
Satyapal Malik

नवी दिल्ली | जम्मू कश्मीर राज्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. नुकतीच त्यांची जम्मू कश्मीर या राज्याचे राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे.

काश्मीर खोऱ्यात वाढता तणाव व तेथील लागु असलेली राष्ट्रपती राजवट या बाबतीत या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. सत्यपाल मलिक या अगोदर बिहारचे राज्यपाल होते. मेहबुबा मुफ्ती व भाजप यांच्यातील युती तुटल्यानंतर पहिल्यांदाच राजकीय हालचालींना काश्मीरमध्ये वेग आला आहे.

जैवइंधनावर चालणाऱ्या पहिल्या विमानाची चाचणी यशस्वी

biofuel
biofuel

दिल्ली | भारतातील जैव इंधनावर चालणाऱ्या पहिल्या विमानाचे यशस्वी लँडिंग आज पार पडले. देहरादून ते दिल्ली असा या चाचणीचा प्रवास राहिला. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम या संस्थेने यासाठी इंधन निर्मिती केली आहे.
नरेंद्र मोदी यांनी अशा नविकरणक्षम इंधन निर्मितीची देशाला गरज आहे, अशी भावना मागील एका कार्यक्रमात व्यक्त केली होती. त्या धर्तीवर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम संस्थेने यासाठी इंधन निर्मिती केली.

वंचितांना व अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणे हीच उमेशबाबूंना खरी श्रद्धांजली – फडणवीस

umesh choube
umesh choube

नागपूर | ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व प्रसिद्ध पत्रकार उमेश चौबे यांचं नुकतंच निधन झालं. गरीब, वंचित व पीडितांसाठी आयुष्यभर संघर्षरत असलेल्या उमेशबाबूंनी समाजसेवेला वाहून घेतले होते. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यातही उमेशबाबूंनी स्वत:ला झोकून दिले. उमेशबाबूंनी आपल्या विचारांशी आणि सिद्धांताशी कधीही तडजोड केली नाही. त्यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून वंचितांना व अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित म्हणाले, उमेशबाबूंनी आपले सारे आयुष्य गोरगरिबांच्या सेवेसाठी,वंचित व अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी व्यतित केले. समाजातील विविध वंचित घटकांसाठी त्यांनी सतत संघर्ष केला. त्यांनी आपली पत्रकारिताही सडेतोडपणे केली. अतिशय साधेपणाने जीवन जगणाऱ्या उमेशबाबूंनी सिद्धांतांबाबत कधीही तडजोड केली नाही,

वसंतराव देशपांडे सभागृह येथे विदर्भ गौरव प्रतिष्ठान व उमेशबाबू चौबे मित्र परिवार यांच्या वतीने स्व. उमेशबाबू चौबे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित,केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी,खासदार डॉ. विकास महात्मे,आमदार डॉ. आशिष देशमुख, डॉ. मिलींद माने, दत्ता मेघे, सतीश चतुर्वेदी, यादवराव देवगडे, गिरीश गांधी, अटल बहादुर सिंग,महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेता तानाजी वनवे आदी उपस्थित होते.

ट्विटर लिंक –

यंदाच्या पावसात हजार मृत्युमुखी, १७ लाखाहून अधिक विस्थापित

victims
victims

नवी दिल्ली | मुसळधार पाऊस आणि महापुराचा फटका बसल्याने देशभरात यंदा जवळपास १००० लोक मृत्युमुखी पडले आहेत, तर १७ लाखाहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयातील आकडेवारीनुसार केरळसह ५ राज्यांना पाऊस व महापुराचा मोठा फटका बसला आहे. मृतांमध्ये सर्वाधिक ४०० लोक केरळमधीलच आहेत.

पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आसाम व केरळ या ५ राज्यांतील ७० लाख लोकांना या परिस्थितीचा फटका बसला असून वित्तहानीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. मृतांचा आकडा वाढीव असण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. केरळमधील ५४ लाख पुरग्रस्तांपैकी १४ लाख लोकांना शासकीय आधार केंद्रात हलविण्यात आलं आहे. याआधी २००७ साली उद्भवलेल्या आपत्तीत १२०० लोक मृत्युमुखी पडले होते. केंद्र सरकारने अद्यापही राज्य सरकारांना पुरेसा निधी उपलब्ध करुन दिलेला नाही.

क्रिकेटच्या पहिल्या देवाचा आज जन्मदिवस

don bradman
don bradman

सौजन्य – गूगल डूडल

उंच शरीरयष्टी, मैदानावर एन्ट्री केली की झपाझप पीच वर चालत जाण्याची पद्धत, नजाकतदार फटक्यांची लयलूट करण्याची आवड, सरासरीच्या बाबतीत अजूनही कुणाला तावडीत न सापडलेला, क्रिकेटशी अव्यक्त अशी आस्था आपल्या हयातभर जपलेला, उत्तम क्रीडा प्रशासक, निवडक आणि लेखक या भूमिका बजावणारा, देशांच्या सीमा ओलांडून प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेला क्रिकेटचा पहिला देव म्हणजेच सर डॉन ब्रॅडमन यांचा आज ११० वा वाढदिवस.

डोनाल्ड ब्रॅडमन यांचा जन्म ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स इथे झाला. ५ फूट ८ इंच उंचीच्या डॉनची शैली ही उजव्या हाताने फलंदाजी करण्याची करण्याची होती. १९२८ मध्ये पदार्पण केलेल्या डॉन ब्रॅडमन यांची खरी ओळख १९३० साली इंग्लंडसोबत झालेल्या अॅशेस मालिकेतून झाली. शतक, द्विशतक अन त्रिशतकांचा रतीब घालण्याचं काम डॉन करत होते. इंग्लंडची अॅशेस वरील सद्दी संपवण्यासाठीच जणू ब्रॅडमन यांचा जन्म झाल्याचं मानलं जातं होत. १९२९-३० च्या कालावधीत ऑस्ट्रेलिया आर्थिक मंदी आणि बेरोजगारीच्या भयानक संकटातून जात असताना डॉनची फलंदाजी तमाम लोकांना यातून बाहेर पडण्याचं बळ देत होती. अॅलन किपाक्स आणि डोनाल्ड ब्रॅडमन यांच्या जोडगोळीने एक काळ गाजवण्याचं काम १९२८-३३ च्या आसपास केलं. उसळत्या चेंडूंचा सामना करण्यात ब्रॅडमनला येत असलेल्या अडचणींचा विचार करुन गोलंदाजांनी Bodyline (बॉडीलाईन) नावाचं तंत्र विकसित केलं होतं. खेळाडूच्या शरीराला इजा करण्याच्या दृष्टीने चेंडू जाईल अशा पद्धतीने गोलंदाजी करण्याचं हे तंत्र होतं. स्वतःच्या बचावात्मक पवित्र्यात खेळाडू बाद व्हावा असं हे तंत्र होतं. यासोबत लेग थेअरी बॉलिंग तंत्रानेही डोनाल्ड ब्रॅडमनला त्रास दिला होता. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा हळुवार चेंडू टाकून त्याच दिशेला एखादा खेळाडू उभा करुन फलंदाजाला जाळ्यात ओढण्याच हे तंत्र बरंच परिणामकारक ठरलं होतं. या काळात ५ कसोटी सामन्यांत केवळ १३३ धावा काढणारा डॉन ब्रॅडमनही जगाने अनुभवला होता. परंतु हळुवार सुरुवात करून नंतर धावगती वाढविण्याचा प्रयत्न करणारा ब्रॅडमन जगाने शेफिल्ड मधील चौथ्या कसोटीत पाहिला आणि मग तिथून डॉनने मागे वळून पाहिलंच नाही. “माझा सरासरीच्या नियमावर विश्वास नाही, तुम्ही खेळत राहणं महत्वाचं आहे” असं ब्रॅडमन म्हणायचे.

शारीरिक व्याधींबद्दल बोलायचं झाल्यास अपेंडीक्स व पोटदुखीच्या आजाराने डॉन बऱ्याचदा त्रस्त झाला होता. त्याला लागणार रक्त भरण्यासाठी त्या काळी काही पत्रकारांनी ५ वा किंग जॉर्जलाही विनंती केली होती. सुदैवाने या आजारातून टप्प्या-टप्प्याने डॉन बरा झाला.

एकुणात डॉन विषयी लिहायला बरंच काही आहे, याचाच पुढील भाग आपण वाचूया आज रात्री ८ वाजता – डॉनच्या अधिक कारनाम्यांसाहित

 

स्पर्धा परिक्षां‌च्या अभ्यासाचा आवाका, त्रिसुत्री आणि रणनीतीची चौकट | #भाग 3

UPSC
UPSC

स्पर्धापरिक्षा अभ्यासनिती | नितिन ब-हाटे

कोणताही खेळ जिंकण्यासाठीच खेळला पाहिजे, आणि जिंकण्यासाठी त्या खेळाचे सर्व नियम आणि डावपेच माहीती पाहिजेत, मागील लेखात आपण स्पर्धापरिक्षांचा अभ्यास कधी सुरू करावा याबद्दल जाणुन घेतले, आता स्पर्धा परिक्षां‌च्या अभ्यासाचा आवाका, त्रिसुत्री आणि रणनीतीची चौकट समजुन घेऊ

“सुर्य आणि सुर्याखालचे सर्व काही” असा अभ्यास असलेली परिक्षा म्हणुन या परिक्षांकडे पाहिले जाते, या परिक्षांचा आवाका मोठा आहे आवाका समजण्यासच प्रथम काही काळ जातो त्यानंतर हा अतिप्रचंड अभ्यासक्रम आवाक्यात आणण्याचा प्रयत्न केला जातो. हा प्रयत्न वस्तुनिष्ठ आणि नियोजनबद्ध असावा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा परिक्षार्थींनी अट्टाहास कायम ठेवावा परंतु वेळ आणि वेगाच्या मर्यादा लक्षात घेऊन कमी वेळेत जास्त अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी योग्य रणनीती कायम उपयोगी ठरते.

स्पर्धापरिक्षा वेळ, वेग आणि आक्रमकता या त्रिसुत्री मध्ये पार करणारा उमेदवार लवकर यशस्वी होऊ शकतो, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त वेगाने अभ्यासक्रम पूर्ण करणे, जास्तीत जास्त उजळणी करणे, सराव चाचण्या देणे, अपयश आले तरी त्याचं आक्रमकतेने पुन्हा लढत राहणे हेच यशाचे गमक आहे.

स्पर्धा परीक्षांची योग्य रणनीती आखण्यासाठी पुढील चौकट आहे

. आयोगाचा अभ्यासक्रम(UPSC, SSC, MPSC)

. मागील वर्षी विचारलेले प्रश्न आणि चालु घडामोडी

. सराव चाचण्या

. स्वतःच्या क्षमता आणि मर्यादा ओळखुन मार्गक्रमण

आयोगाचा अभ्यासक्रम आणि मागील वर्षी विचारलेले प्रश्न या आधारे स्वतःच्या क्षमता आणि मर्यादा ओळखुन सध्या घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी याआधारे रणनीती बनवायची असते

उदाहरणार्थ जी परिक्षा टार्गेट करावयाची आहे तीचा प्रथम अभ्यासक्रम पाठ करुन घ्यावा ,मग या परिक्षेच्या आधी झालेल्या प्रश्नपत्रिका बारकाईने अभ्यासाव्यात त्यानुसार प्रत्येक घटकाची पुस्तके/अभ्याससाहित्य निवडावे आपल्याला समजणारे आणि न समजणारे यानुसार प्रत्येक घटकाला कमी जास्त (आपल्या क्षमता आणि मर्यादा नुसार) महत्त्व देऊन अभ्यास करावा. सर्व अभ्यास मागील वर्षी विचारलेल्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषण करता करता चालु घडामोडी वर लक्ष ठेवीत करीत रहावा.

स्पर्धापरिक्षांमध्ये चालु घडामोडीनां विशेष महत्व असते त्यामुळे चालु घडामोडी आणि त्याची बेसिक संकल्पना अशा जोडीत अभ्यास असावा

अशारीतीने तीनवेळा व्यवस्थित वाचन आणि बर्याचदा रिव्हीजनस् झाल्यावर जमेल तेवढ्या स्वतःवेळ लावुन सराव चाचण्या दयाव्यात, चाचणी झाल्यावर बरोबर/ चुक प्रश्नांचे पर्यायाने त्या घटकांचे विश्लेषण करावे चुकत असलेले घटक सुधारण्याचा प्रयत्न करीत रहावा. बरोबर घटकांची उजळणी करीत रहावे.

वरील चौकटीमध्ये स्पर्धापरिक्षाच्या अभ्यासाची रणनीती असावी.

“सध्या स्पर्धा परिक्षां मध्ये अभ्यासाच्या विषयानुरूप खोली पेक्षा अभ्यासाचा परिघ विस्तार अधिक आहे म्हणजे तुम्हाला एखाद्या विषयाच्या खोलवर ज्ञाना पेक्षा अधिकाधिक विषयांचे विश्लेषणात्मक ज्ञान असणे अपेक्षित आहे”

“Patience, Persistence and Perspiration make an unbeatable Combination for Success – Nepolean Hill.”

तुमच्या प्रवासात तुमची स्वत:च्या अभ्यासावरील आणि मार्गदर्शकावरील निष्ठा कायम असावी , म्हणजे स्पर्धापरिक्षेतील यश लवकर मिळते.

नितिन ब-हाटे.
9867637685
(लेखक ‘लोकनीति IAS, मुंबई’ चे संचालक/ मुख्य समन्वयक असुन स्पर्धापरिक्षा मार्गदर्शक आहेत.)

“नथुरामां”ची भरती कशी होते”? – थर्ड अँगल

brain program
brain program

विचार तर कराल | कुणाल शिरसाटे

विचारवंतांच्या हत्या करण्यात आरोपी म्हणून पकडलेले सर्व तरुण हे वय वर्ष १८ ते ३० दरम्यानचेच आहेत. त्यांची पार्श्वभूमी पहिली तर ते ओबीसीच्या छोट्या जातींमधून येतात, काबाडकष्ट करणाऱ्या वर्गातून ते येतात. ब्रेनवॉश केलेल्या या तरुणांना हत्या करण्यासाठी नथुराम गोडसे चा आदर्श समोर ठेवला जातो… राम, नरसिंह आणि अर्जुनाचा आदर्श ठेवला जातो…. हे सारं विष पेरण्याची सुरवात कुठून होते? ही पोर हत्यांचे कट रचणाऱ्या संस्थांच्या तावडीत सापडली कशी?

ही सन २०११ ची गोष्ट असेल मी पुण्यात एम.ए च्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला होता आणि गोखलेनगरला राहत होतो. कैलास आणि सुदर्शन असे माझे दोन रूम पार्टनर होते, दोघेही कर्नाटक मधील होते आणि पहिल्यांदाच पुण्यात जॉब करण्यासाठी आलेले होते.

दिवस गणेशोत्सवाचे होते, कैलास आणि सुदर्शन आपण गणेशोत्सव बघायला जाऊ म्हणवून आग्रह करत होते.आम्ही जायचं ठरवलं, सगळीकडे असलेल्या सजावटी आणि गणेशमूर्ती बघून आम्ही बाजीराव रस्त्यावरून एस.पी. कॉलेजच्या दिशेने निघालो.

वाटेत उद्यानप्रसाद कार्यालयाच्या बाहेर कमान लावलेली होती त्यावर पिवळ्या कापडी बॅनर वर हिंदू जनजागरण समिती आणि धर्म जागृती प्रदर्शन असे काहीतरी लिहिलेले होते.

नेमकं काय धर्म जागृती म्हणून आम्ही बघायला जायचं ठरवलं, उद्यान प्रसाद कार्यालयाचे गेट मोठे आणि लंबूळके आहे, दोन्ही बाजूला सनातन आणि हिंदू जनजागरण समितीचे बोर्ड लावलेले होते. आत दोन भागात रचना केली होती एक हॉल आणि त्यात कापडी पडदे बांधून आतील बाजूस एक हॉल, त्या हॉलचे तोंड उद्यान प्रसाद कार्यालयात उजव्या कोपऱ्याला असलेल्या वधू वराच्या रूम कडे उघडत होते. बाहेर जाताना अनेक टेबल मांडलेले होते ज्यावर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला विरोध, मंदिर अधिग्रहण कायद्याला विरोध आणि सनातनची नोंदणी, हिंदू जनजागरण समितीचे सदस्य नोंदणी चालू होती.

प्रदर्शनात जाताना समोर एका देवाचा फोटो होता, आत जाणाऱ्या प्रत्येकाला गंध लावायचाच होता. डाव्या बाजूने आत दोन्ही बाजूला छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई, बाजीराव पेशवा, तात्या टोपे अश्या सगळ्यांचे फोटो लावून त्याच्याखाली त्यांनी हिंदू धर्मासाठी काय केले असे दोन दोन वाक्य लिहिले होते.

तरुण मुलांचा ग्रुप आला की, एक हट्टाकट्टा तरुण तावतावात या लोकांनी धर्मासाठी रक्त सांडलं, धर्मयुद्ध केलं अस सांगत होता आणि वारंवार आजचे हिंदू म्हणजे आपण षंढ आहोत हे अधोरेखित करत होता.

अनेक टीन एजची मुले त्याचे ऐकून उसळत होते, घोषणा देत होते. तो जे जे विष त्या मुलांच्या मनात टाकत होता त्याचा परिणाम होत होता. मुस्लिम लोकांनी किती अनन्वित अत्याचार केले हे तो तरुण डोळ्यात पाणी आणि मग जरा रागावून सांगत होता, त्याच्या या अभिनयाचा परिणाम त्या मुलांवर दिसू लागला. आमच्या घोळक्याच्या मागे मध्यमवयीन दोन कार्यकर्ते उभे होते, ते तरुणांच्या प्रतिक्रिया पाहून त्यांना हेरत होते. अश्या सगळ्या समाजासाठी महान कार्य करणाऱ्या लोकांचा वापर ही मंडळी मुस्लिमद्वेष तयार करण्यात करत होते.

मग तिथून आतील बाजूस जोडलेल्या हॉलमध्ये आम्ही गेलो तिथे मंदिर अधिग्रहण, मंदिरे कशी तोडतात, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा कसा हिंदू धर्माच्या विरोधात आहे वैगेरे वैगेरे पोस्टर लावलेले होते. आणि त्या अनुषंगाने तो तरुण आज आपण हिंदू म्हणून काय क्रांतिकार्य केले पाहिजे ते सांगत होता.

तरुण आता पुरते ब्रेनवॉश झाले होते. हा सगळा प्रदर्शनाचा आणि पोस्टर दाखवत भाषणाचा कार्यक्रम तब्बल 30 मिनिटं चालला.

तरुण एकमेकांमध्ये मुस्लिम कसे नालायक आहेत, गांधींना कशी देशाची वाट लावली याची चर्चा करू लागले. या तरुण मुलाचे प्रदर्शन दाखवायचे काम संपले तो पुन्हा पुढे निघून गेला. तेवढ्यात आम्ही बाहेर जायला निघणार तेव्हा तिथे उभे एक वयस्कर काका आम्हाला हात जोडून विचारू लागले की तुम्हाला आवडलं का प्रदर्शन? मी पण आपलं हो हो छान छान अस म्हणून हात जोडले.

ते काका म्हणाले की आम्ही या रूम मध्ये एक फिल्म लावली आहे अजून फार वेळ नाही फक्त 10 मिनिटांची आहे बघा म्हणून आम्हा 7-8 तरुणाना एका रूम मध्ये घेऊन गेले जिथे टीव्हीवर काश्मीर मधील हिंदू वर होणाऱ्या अत्याचाराची फिल्म लावली होती.

सुदर्शन ते पाहून म्हणाला की, ये सचमूच मे सच है क्या?
मी म्हणालो, प्रॉपगंडा कर रहे है|
पण तिकडे असलेले तरुण मात्र पूर्णपणे भावविवश होऊन ते पाहत होते. फिल्म संपली. काका आत आले म्हणाले “मला माहित आहे की हिंदूंचा हा देश असून त्यांच्यावर होणारा अत्याचार तुम्हाला आवडला नसणार तुम्हाला खूप राग आला असेल, तुम्हाला काहीतरी करावं वाटत असेल”
लगेच दोघे तिघे बोलले की “हो हो”
मग ते काका म्हणाले की शेजारच्या रूम मध्ये आमचे काही साधक आहेत त्यांच्याशी तुम्ही बोला, तुम्ही त्यांच्या रक्षणासाठी काय करू शकता आम्ही तुम्हाला काय मदत करु शकतो याबाबत अजून तुमचे 5 मिनिटे द्या.”

मला आता त्यांचा प्लॅन काहीसा घातक वाटू लागला, उत्सुकता म्हणून आम्ही तिघेही त्या खोलीत गेलो, तिकडे तीन टेबलवर तीन साधक बसले होते. त्यांच्या समोर खुर्च्या होत्या आम्हाला त्यातील एका साधका समोर बसवले आणि आमचा संवाद सुरू झाला-

साधक -” तुम्ही फिल्म पाहिली त्यात हिंदूंवर किती अत्याचार होतो ते तुम्हाला लक्षात आलच असेल, तुम्हाला काय वाटत”

सुदर्शन आणि कैलास बोलण्याआधी मी बोललो
“कश्मीरमध्ये जे पंडित लोकांच्याबाबत घडलं ते खूप दुर्दैवी आहे, त्याची भरपाई त्यांचे योग्य पूर्णर्वसन करून केली पाहिजे”

साधक रागावला – “तुम्ही हिंदू नाही का तुम्ही डोक्याला गंध का लावला नाही”

मी – ” मी हिंदूच आहे पण गंध लावलाच पाहिजे अस काही माझं मत नाही, तुम्ही जबरदस्ती पण नाही करू शकत”

मग त्याने मोर्चा सुदर्शन आणि कैलास कडे वळवला.
साधक – ” हे खरे हिंदू नाहीत, खरे हिंदू असते तर यांचे रक्त उसळले असते, यांच्यासारख्या षंढ हिंदुमुळे हिंदू लोकांवर अनन्वित अत्याचार होतोय…. आपण जशास तसे उत्तर दिले पाहिजे”

कैलास आणि सुदर्शन यांना मुद्दा पटला असावा त्यांनी मान हलवली. त्यामुळे ते आता गळाला लागले असं साधकाला वाटलं,
तो म्हणाला- ” आपल्या धर्माच्या रक्षणासाठी आम्ही युवकांच एक पथक तयार करणार आहे, तुमच्या सारख्या तरुणांची त्यात गरज आहे, तुमचा नंबर द्या,

त्याने नंबर लिहून घेतला, आमचा साधक तुम्हाला कॉल करेल, तुळशीबागेतील श्रीराम मंदिरात आपण सगळे जमणार आहोत तिकडे पुढे धर्मरक्षणासाठी काय काय करता येईल याची चर्चा करणार आहोत, जे चांगले तरुण असतील तर आम्ही प्रशिक्षण पण देऊ म्हणजे आपल्याला आपलं पण रक्षण करता येईल हिंदुद्रोही लोकांपासून”

मी – “हिंदुद्रोही? म्हणजे नेमकं काय करायचं तिकडे येऊन? आपण इतर धर्माचा द्वेष करू नये असं माझं म्हणणं आहे, गांधी, नेहरू आंबेडकर यांनी मिळून देश उभा केला हा”

साधकाचा चेहरा बदलला, उगाच माहिती दिली अस त्याला वाटू लागलं आणि तो अधिक चिडला- “या देशात एकच खरा देशभक्त क्रांतिकारक होऊन गेला तो म्हणजे नथुराम गोडसे,
प्रत्येक हिंदू तरुणाने त्याचा आदर्श समोर ठेवून हिंदू धर्मासाठी कार्य केले पाहिजे, या मुस्लिम लोकांना पाकिस्तान साठी ज्या गांधीने ५५ कोटी दिले त्याला योग्य जागा फक्त नथुराम गोडसेंनी दाखवली”

साधक चिडला होता, तो गांधीजींचा एकेरी उल्लेख करत गोडसेंबद्दल आदरभाव दाखवत होता. काही लोकांना गोडसे आदर्श वाटतात अस फक्त ऐकून होतो, जे आज प्रत्यक्ष पाहून खेद वाटत होता,त्याचा वाढलेला आवाज ऐकून एक साधक माझ्या शेजारी येऊन बसला.

मी- “मग १९३४ पासून नथुरामने गांधींना मारण्याचा प्रयत्न का केला होता, पाकिस्तानला ५५ कोटी देण्याचा मुद्दा तेव्हा नव्हताच! तुम्हाला नथुराम हा क्रांतिकारक वाटतो आणि गांधीजी देशद्रोही वाटतात तुम्हाला इतिहास नीट शिकण्याची गरज आहे”

साधक -“इतिहास तुम्हाला माहीत नाही, या मुस्लिम लोकांनी हिंदू लोकांवर किती अत्याचार केले आणि या गांधीने त्यांना पाठीशी घातले (जी भाषा त्याने वापरली ती इथे देत नाही, भावार्थ हाच होता) हे मुस्लिम आजपण लव्ह जिहाद च्या नावाने आपल्या हिंदू मुलींचा वापर करतात, त्यांना मदरश्यात हे शिकवलं जातं, तुमच्यासारखे हिंदू हे खरे मूर्ख आहेत ज्यांना हे दिसत नाही”

मी – “लग्न करण हे व्यक्तिगत मत असत, माझ्या ओळखीचे अनेक हिंदू मुस्लिम लग्न आहे तिथे तर मला अस काही दिसलं नाही”

माझ्या शेजारी बसलेला साधक उसळला,
दुसरा साधक – “तुम्ही देणार का तुमची बहीण मुस्लिम माणसाला”

मी – ” ती जर मुस्लिम व्यक्तीशी प्रेम करत असेल आणि दोघेही लग्नाला तयार असतील तर मी त्यांना पाठिंबा देईल”

माझं हे मत त्या साधकाला आवडलं नाही, तो लालबुंद झाला आणि जागेवरून उठला आणि म्हणाला – “मी त्याला आणि बहिणीला दोघांनाही जिवंत ठेवणार नाही, माझ्यासाठी माझा हिंदू धर्म श्रेष्ठ आणि महत्वाचा आहे”

मी – “अहो, मी कुठे तुमच्या बहिणीबद्दल बोललो, मी माझं मत सांगितलं….”

त्यांनी माझा नाद सोडला आणि कैलास आणि सुदर्शनशी बोलू लागले. आमच्यातील चर्चा पाहून दोघेही गोंधळले होते.

त्या पहिल्या साधकाने त्यांना सांगितलं की आम्ही हिंदू धर्म रक्षणासाठी आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे नथुराम सारख या पोरासारख नको यांच्यामुळे हिंदू धर्म मागे राहिला.

सुदर्शन आणि कैलास मान डोलवत बाहेर पडले, मी ही सोबत बाहेर आलो.
मनात शंकेची पाल चुककली कोणतं प्रशिक्षण आणि तरुणांच संघटन कशासाठी? करा पण मग बंद खोलीत चर्चा आणि ब्रेनवॉश कशाला? अनेक टिन एज मुले बळी पडले असणार! एकही तरुणी नाही फक्त तरुण मुलेच का असे अनेक प्रश्न पडू लागले.

तो दुसरा साधक आमच्या मागे एस.पी. कॉलेज मध्ये जाऊ पर्यन्त पाठलाग करायला आला. शंका अधिक दाट झाली.

जेव्हा दाभोलकरांचा खून झाला तेव्हा मला हाच प्रसंग आठवला होता. डॉक्टरांसोबत या प्रसंगाची चर्चा देखील झाली होती.

परशुराम वाघमारे, सचिन अणदूरे, शरद कळसकर यांच्यासारखी तरुण या दहशदवादी संघटनेच्या जाळ्यात अशीच सापडली असणार!

कुणाल शिरसाटे (9767599934)