Saturday, December 13, 2025
Home Blog Page 6743

सुनील देवधरांना दोन पदांची लॉटरी

Thumbnail 1533107954505
Thumbnail 1533107954505

नवी दिल्ली | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून पूर्वेकडील राज्यात मोठी कामगिरी केलेले सुनील देवधर यांची भाजप च्या राष्ट्रीय सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांना आंध्र प्रदेशाचे सहप्रभारी म्हणून ही जबाबदारी देण्यात आली आहे. त्रिपुरा राज्यात भाजपचा एकही आमदार नसताना त्याराज्यात भाजपची सत्ता आणण्याचा दिव्य पराक्रम सुनील देवधर यांनी करून दाखवला होता. याच कार्याची दखल घेऊन भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने त्यांना ही नवी जबाबदारी बहाल केली आहे.

आंध्र प्रदेशाच्या सहप्रभारी पदी नेमणूक होताच त्यांनी नवीन घोष वाक्य जाहीर केले आहे. “माणिक गए, अब बाबू की बारी है।” आशा घोषणेनिशी त्यांनी आंध्र प्रदेशात जाण्याची तयारी केली आहे. भाजपचा मित्र पक्ष असणाऱ्या तेलगू देशम पक्षाने भाजपा पासून फारकत घेतली आहे. तसेच लोकसभेत मोदी सरकार वर अविश्वास प्रस्ताव ही याच पक्षाने आणला होता. त्याचा पुरेपूर बदला घेण्यासाठी भाजप सज्ज झाला असून आगामी विधानसभा निवडणुकीत चंद्राबाबूला सत्तेतून पाय उतार होण्यासाठी भाग पाडणार असल्याची भाजपची हालचाल दिसत आहे.

भाजपचे रणनीतीकार म्हणून ओळख असलेले अमित शहा यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून सुनील देवधर गणले जातात. सुनील देवधर मूळचे कोकणातील असून पुणे आणि मुंबईत त्यांचा बरीच वर्षे सहवास होता.

कंत्राटीकरण हा परमेश्वराला पर्याय, दरवर्षी सव्वा कोटी युवकांची फौज बेरोजगार – प्रा.हरी नरके

Thumbnail 1533094037405 1
Thumbnail 1533094037405 1

भारत हा तरूणाईचा देश आहे. जगातले सर्वाधिक तरूण आपल्या देशात आहेत. दरवर्षी आपल्या देशात सुमारे दोन कोटी युवक युवती शिकून नोकरी – व्यवसायाच्या शोधात बाहेर पडतात. त्यातील सुमारे ७५ लक्षांना खाजगीत, कंत्राटी किंवा शासकीय छोट्या मोठ्या नोकर्‍या मिळतात किंवा ते सटरफटर व्यवसाय करू लागतात.

मात्र उरलेले सव्वा कोटी नवे कोरे बेरोजगार तरूण-तरूणी डोक्यात वादळं, वीजा, उर्मी आणि सळसळ घेऊन जंगलात भुकेला वाघ किंवा सिंह फिरावा तसे रानोमाळ फिरू लागतात. “कोणी काम देता का काम” असं विचारित. जात, धर्म, राजसत्तेचे ठेकेदार त्यांना द्वेषाचे असे काही डोस पाजतात की या झुंडींचे हात सदैव कापू की मारू यासाठी सळसळत असतात. १९७० च्या दशकात ह.मो.मराठे यांनी एका बेरोजगार युवकाचं जगणं “नि:ष्पर्ण वृक्षावर भर दुपारी” मध्ये टिपलं होतं. शंकरची “जनअरण्य” तर ग्रेटच होती.

आज शेती पुर्ण उध्वस्त झालीय. शेतकरी भुकेकंगाल बनतोय. सरसकट सर्व खेड्यांना शहरात यायचंय. शहरी रोजगार, व्यापार, सेवाक्षेत्र आकसतय. कंत्राटीकरण हा परमेश्वराला पर्याय बनलाय. जागतिक बाजारपेठ, वर्ल्ड बॅंक, जागतिक शेयर बाजार, गुंतवणूक आदींची एलपीजीची धोरणं भारतावर बंधनकारक असल्यानं भारताची घुसमट होतेय. नैसर्गिक साधन संपत्ती भारतात अमाप आहे. बुद्धीमत्ता अफाट आहे. पण जातीयता, लिंगभाव आणि धर्मांधता यांनी हा देश पोखरला जातोय.

अंबानी -अदानी जगातल्या आघाडीच्या श्रीमंतांमध्ये गणले जाताहेत आणि ३० कोटींना धड दोन वेळचं खायला मिळत नाहीये. देशाच्या निम्म्या म्हणजे ६५ कोटी लोकसंख्येला झोपडपट्टी किंवा कच्च्या निवार्‍याचा आसारा घ्यावा लागतोय. पालावर, पाड्यावर राहावं लागतंय. शिक्षण, रोजगार, आरोग्याचे धिंडवडे निघालेत.

प्रत्येक जातीत, अगदी अनु.जाती, जमाती, ओबीसी, भटके यातही वर्ग निर्माण झालेत. ज्यांचं थोडं बरं चाललंय ते आप्पलपोटे बनलेत. धार्मिक पर्यटन हाच देशातला सगळ्यात मोठा टुरीझम आहे. अंधश्रद्धा, अडाणीपणा, अज्ञान, सरंजामी मानसिकता, भ्रष्टाचार, जातीय व्होट बॅंका हेच इथल्या सर्व पक्षीय राजकारण्याचं भांडवल आहे.

बरं आपला कॉमन मॅन पण असा भारीय की त्याला शाळा, दवाखाना, सारं काही खाजगीचं हवंय. पण नोकरी मात्र सरकारी हवीय. लग्नाच्या बाजारात आज उघडपणे बोललं जातं की, “मुलाला/मुलीला पगार तसा फार नाहीये, पण वरकमाई मजबूत आहे.” वसाहतवादी मानसिकता इतकी पुरेपुर भिनलीय की आमचं सारंकाही संकरिताय. पण गुलामी हाडीमाशी भिनलेली असल्यानं तिचाही आम्हाला अभिमानच वाटतो.

सरकार तर सगळं काही खाजगी करायला निघालंय. लाल किल्ला खाजगी कारखानदाराला चालवायला दिला. रेल्वे, विमानतळं, बंदरं, रस्ते, दवाखाने, शाळा, सगळंच खाजगीच्या ताब्यात द्यायचा सपाटा चालूय. त्यामागे जागतिक अर्थकारणाय. व्यापारी आणि राजकीय हितसंबंध आहेत.

अनुदानं, अत्याचारविरोध आणि आरक्षण यात बहुतेकांची डोकी गुंतून पडलीयत. राजकारणी बेरोजगार लोकांना गॅंगवॉरला प्रवृत्त करताहेत.

आपल्या प्रत्येक सार्वजनिक अपयशाचं खापर फोडायला कोणी तरी दगड हवाय. मग सांगा आम्ही अमूक तमूक असल्यानं आमचा विकास झाला नाही, ब्लेम गेम. सार्वत्रिक तक्रार मोहीमा. पावसाळ्यात कुत्र्याच्या छत्र्या उगवाव्यात तशी वाहिन्यांवरून पेड कॅंपेन रंगवली जातात. प्राईम टाईमला कोंबडे झुंजवले जातात.

जमीन, हवा, पाणी, उर्जा, खनिजं ही सारी संसाधनं ही निसर्गाची देणगी. पण तिचं वाटप सर्वांना समान व्हावं हे देशाच्या मालक लोकांना मान्य नाही. त्याबद्दल ओपीनियन मेकर्स, बुद्धीजिवी आणि माध्यम सैनिक तोंडात मिठाची गुळणी धरणार. अमक्याच्या पोटी जन्मलो हीच मालक होण्यासाठीची पात्रता.

आरक्षणाला तीव्र विरोध करणारे, मॅनेजमेंट कोटा, कॅपिटेशन फी देऊन शुन्य मार्कांवरही प्रवेश घेतलेल्यांबद्दल चकार शब्द बोलत नाहीत. धार्मिक क्षेत्रातील आरक्षणावर अळी मिळी गुप चिळी. ज्ञान, संपत्ती, प्रतिष्ठा, मानमान्यता, सत्ता, सारं काही मोजक्यांच्या मालकीचं. त्याबद्दल कोणाचीही तक्रार नाही. श्रेणीबद्ध समाज रचनेतले तळचे थर प्रगती करताहेत आणि आम्ही मात्र मागे पडतोय तर करा सुलभीकरण. उथळ मांडणी आणि सुमारांची सद्दी. सगळीकडे प्लॅस्टीकची रद्दी.

जातीनं व्यवसाय ठरवून दिले होते. व्यवसायवर उत्पन्न अवलंबून असतं. म्हणजे जातीसंस्था ही मुलत: अर्थव्यवस्था होती. आणि रिलिजियस पॉवर इज बेसिकली पोलिटिकल पॉवर! राजकारणी, माध्यमं, प्रशासन, न्यायव्यवस्था आणि धर्मसत्ता यांची बेरोजगारांना कसं वापरायचं याबद्दल महायुती किंवा महाआघाडी आहे. सारा प्रवास उलट्या पावलांचा! पुर्वी जाती होत्या, पण जातीनिर्मुलनाची चळवळ जोमात होती. आता जाती संघटना जोशात आहेत नी प्रागतिक विचार कोमात गेलेत.

माफिया माजलेत नी बेरोजगार बिनडोकपणानं आपल्या जगण्याची सारी सुत्रं चोरांच्या हातात देताहेत! एकुण काळ मोठा कठीण आलाय !

हे असं तरी हे असं असणार नाही….

वो सुबह कभी तो आयेगी, वो सुबह कभी तो आयेगी
इन काली सदियों के सर से, जब रात का आंचल ढलकेगा
जब दुख के बादल पिघलेंगे , जब सुख का सागर छलकेगा
जब अम्बर झूम के नाचेगी, जब धरती नग़मे गाएगी
वो सुबह कभी तो आयेगी …

– प्रा. हरी नरके

दगडूशेठ मंदिराला अंगारकी चतुर्थी निमित्त आकर्षक सजावट

Thumbnail 1533045167477
Thumbnail 1533045167477

पुणे | नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती असणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीची आज अंगारकी चतुर्थी निमित्त विशेष पूजा करण्यात आली. अंगारकी निमित्त हजारो भाविकांनी आपल्या लाडक्या दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. मंदिर परिसर लक्ष लक्ष फुलांनी नंदनवनात बदलून गेला होता.
ब्रँडेड गणपती, व्हीआयपी गणपती अशी प्रसिद्धी असलेला पुण्याचा दगडूशेठ गणपती पुण्याची शान मानला जातो. शहराच्या मध्यमागी असणारे गणपतीचे मंदिर गणेश भक्तांना आकर्षून घेते. या अंगारकी चतुर्थीला फुलांची खास सजावट करण्यात आली होती. घागरीतून पाणी पडते आहे असे दृश्य फुलांच्या साहाय्याने मंदिराच्या शिखरावरती साकारण्यात आले होते.
पहाटेची काकड आरती होऊन मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. भल्या सकाळी सहा वाजता दर्शन रांग जोगेश्वरी मंदिराला वळसा घालून नगरकर तालीम चौकापर्यंत विस्तारली होती. दुपारी बाराच्या आरतीला तर भक्तांनी मंदिरा समोरील रस्ता व्यापून टाकला होता. दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाने अंगारकी चतुर्थीच्या उपवासाचे सार्थक भक्तांच्या चेहऱ्यावर पाहण्यास मिळत होते.

नांगरे पाटलांनी केले भावनिक आवाहन अन हिंसक जमाव झाला स्तब्ध

Thumbnail 1533036640528 1
Thumbnail 1533036640528 1

चाकण | मराठा आंदोलकांकडून काल दिनांक ३० जुलै रोजी पुणे जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले होते. चाकण परिसरात आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्याठिकाणी पोलिसांच्या गाड्यांची अक्षरशः राख करण्यात आली. अजय भापकर नावाचे पोलीस शिपाई गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. दाखल केल्यानंतर दोनच तासात ते कोम्यात गेले. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने कोल्हापुर परिक्षेत्राचे म्हानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील चाकण मध्ये रिक्षांने फिरुन आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन करू लागले. व्यवस्थेची वाताहत पाहून नांगरे पाटील ही भावनिक झाले आणि आंदोलकांना म्हणाले मोठा भाऊ समजून माझं ऐका! असे म्हणताच आंदोलक शांत झाले आणि शहरात शांतता प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली.
चाकण औद्योगिक वसाहतीचा पट्टा असल्याने तेथील लोकसंख्या झपाट्याने वाढलेली आहे. औद्योगिक वसाहत पट्टा असल्याने या भागात शांतता प्रस्तापित होणे अत्यंत आवश्यक आहे. चाकण परिसरात पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी अतिरिक्त कुमक मागवून शांतता राखण्यास मोठी कसरत केली. आज दिवस भरात काही अपवाद वगळता शांततेत सर्व नागरी कारभार सुरळीत पार पडले.

आंदोलनामुळे महाराष्ट्र बदनाम : राणे

Thumbnail 1533035974706
Thumbnail 1533035974706

मुंबई | आरक्षणाच्या हिंसक स्वरूपाने महाराष्ट्र बदनाम होत चालला आहे असे मत नारायण राणे यांनी मांडले आहे. तसेच सत्तेत असताना पवारांनी आरक्षण का दिले नाही असा सवाल ही राणें यांनी केला आहे. शिवसेना कधीच आरक्षणाच्या बाजूने नव्हती, मराठा जनाधार आपल्या बाजूने रहावा ही सेनेची मनीषा आहे असे म्हणत राणे यांनी सेनेवर यावेळी तोफ डागली आहे. आंदोलमामुळे महाराष्ट्र बदनाम होत आहे असे म्हणुन आंदोलन थांबवण्याचे आवाहन राणें यांनी मराठा आंदोलकांना केले आहे.

आरक्षणासाठी घटनादुरुस्तीची गरज नाही.

मराठा आरक्षणाच्या संदर्भात वेगवेगळ्या नेत्यांनी घटनादुरुस्ती करण्याचे आवाहन केले असले तरीही राणेंनी मात्र घटनादुरुस्तीची गरज नसल्याच म्हणनं आहे. तो राज्यापुरता मर्यादित विषय असल्याचही त्यांनी स्पष्ठ केल.

आंदोलकांच्या मारहाणीत तो पोलीस गेला कोमात

Thumbnail 1533035407850
Thumbnail 1533035407850

पुणे | मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान चाकण पोलिस स्टेशनची तोड़फोड़ करण्यात आली होती. त्यावेळी चाकण पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई अजय भापकर यांना आंदोलनकर्त्यांनी जबर मारहाण केली होती. त्यांची प्रकृति चिंताजनक असल्याची माहिती येत आहे. तसेच त्यांना काल दवाखान्यात दाखल केल्यापासून दोन तासात ते कोमात गेले आहेत.

अजय भापकरांना पाहण्यासाठी कोल्हापूर पोलीस परिक्षेत्राचे महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील रुबी हॉल क्लिनीकला भेट देणार आहेत. मराठा आरक्षणाचे आंदोलन दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे. यावर तोडगा काढण्याची मागणी समाजाच्या सर्व स्तरातून पुढे येत आहे. राज्याचे जनजीवन विस्कळीत होत चालले असून सामान्य लोकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते आहे.

मुंबईकरांनो समुद्र किनाऱ्यावर जाताय सावधान!

Thumbnail 1533033273054
Thumbnail 1533033273054

मुंबई | मुंबईच्या किनाऱ्यावर ब्लू बॉटल (जेली फिश ) ची इंट्री झाली आहे. सध्या हा मासा अरबी समुद्रात धुमाकुळ घालतो आहे. ब्लू बॉटल नामक जलचर प्राणी पैसिफिक, अटलांटिक, अरबी समुद्रात मुंबईच्या गिरगाव, जुहू चौपाटीवर दहशत माजवत आहे. हा मासा पाण्याच्या उथळ भागांत राहत असल्याने तो सहज किनाऱ्यावर येतो.

ब्लू बॉटल हा प्राणी मनुष्य जमातीसाठी घातक ठरू शकतो. अनेक सागरतज्ञांनी नागरिकांना धोक्याचा इशारा दिला असून समुद्रापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. ब्लू बॉटल उभयलिंगि प्राणी असल्याने याला जोड़ीदाराची आवश्यकता नाही. ब्लू बॉटल हा जरी दिसायला सुंदर असला तरी तो मुंबईकरांची झोप उडवू शकतो.

मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये एका तरुणाची आत्महत्या

Thumbnail 1532952410506
Thumbnail 1532952410506

बीड | मराठ्यांना आरक्षण मिळावे या कारणासाठी बीड मध्ये एका तरुणाने आत्महत्या केली आहे. अभिजित देशमुख असे मयत तरुणाचे नाव असून त्याचे वय ३५ आहे. विज्ञान शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतलेला हा तरुण असून नोकरी नमिळाल्याने त्रस्त होता. त्याने घराजवळ झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपवले. त्याने जीव देताना एक चिठ्ठी लिहली आहे. त्याने मराठ्याना आरक्षण मिळावे म्हणून आपण आपला जीव देत असल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे. दरम्यान या चिठ्ठीची पोलिस चौकशी केली जाईल असे संबंधित तपास अधिकाऱ्याने सांगितले आहे.
मराठा आरक्षणासाठी झालेली ही सातवी आत्महत्या असून सरकारने आरक्षणाच्या प्रक्रियेचा ठोस कार्यक्रम जाहीर करण्याचे निर्देश आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहेत. मराठा आंदोलकांनी आरक्षण प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर करण्याचा २४ तासाचा ऑल्टीमेंटम सरकारला दिला आहे.

आसाम एनआरसी मुद्यावर संसदेत मंथन, कॉग्रेसने दिली स्थगन प्रस्तावाची नोटीस

Thumbnail 1533024422924 1
Thumbnail 1533024422924 1

नवी दिल्ली | संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज नववा दिवस आहे. कॉग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे आणि अन्य दोन सदस्यांनी आसाम एनआरसी मुद्यावर स्थगन प्रस्तावाच्या नोटिसा दिल्या आहेत. तसेच तृणमूल कॉग्रेसने संसदीय काम काजाच्या नियम २६७ नुसार राज्यसभेत चर्चेची नोटीस दिली आहे. कालच्या दिवशी याच मुद्यावर राज्यसभा दिवस भरासाठी तहकूब करण्यात आली होती.
लोकसभेत प्रश्नउत्तरच्या तासातच सरकारला घेरण्यासाठी विरोधक सज्ज झाले होते. बीएसएफ आणि असाम राइफल्स तुकड्या रोहिंग्यांना सीमेवर अटकाव करण्यासाठी तैनात करण्यात आल्या असल्याचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत सांगितले.
पूर्वोत्तर सीमेकडून रोहिंग्याचे अर्कमन रोखण्यात सरकारने कडक पावले उचलली असून भारतात घुसलेल्या रोहिंग्याना मॅनमारमध्ये परत पसठवण्यासाठी तेथील सरकार बरोबर बोलणी चालू असल्याची माहिती किरण रिजिजू यांनी सदनाला दिली.

गुण वाढले, पण गुणवत्तेचं काय ? – राजेंन्द्र मोहिते

Thumbnail 1533018784578
Thumbnail 1533018784578

नमस्कार, मी राजेंद्र मोहिते, १२ वी अकाउंटन्सी चे क्लासेस घेतो. तेही ग्रामीण भागात. पोरं प्राज्ञ भाषेत गावंढळ म्हणावी अशीच. पुढच्या वर्षी क्लासचा रौप्यमहोत्सव होईल. माझे विद्यार्थी अनेक उच्च पदांवर काम करताहेत. दोन, तीन सीए आहेत, काही मोठमोठ्या कंपन्यांत आहेत, उद्योगांत वेगवेगळ्या क्षेत्रांत आहेत, देशाच्या सीमेवर आणि सीमेपलीकडेही आहेत. मी पोरांवर (पोरं म्हणजे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी) संस्कार करण्याचा माझ्या वकुबाप्रमाणे प्रयत्न केला, तो थोडाबहुत का होईना, पण यशस्वी झाल्याचं समाधान आज, मला मिळतंय खरं, पण पुढे मिळेल अशी गॅरंटी वाटत नाही.

पूर्वी साधी, फाटक्या फाटक्या पँटांतील मुलांची आणि सध्या सलवार कमीजच्या मुला-मुलींची जागा आता हाफ मॅनेला वुईथ जीन्स (दोघांनीही) घेतलीय. पूर्वी चालत किंवा सायकलवरून येणारी ही पोरं आता गाड्या ‘उडवत’ कलासवर येतात. (पूर्वीच्या शिकवणीची जागा आता क्लासनं घेतलीय म्हणा!) पिशव्यांची जागा आता ‘सॅक’ नी घेतलीय, डबा आता ‘टिफिन’झालाय, भाजी भाकरीच्या जाग्यावर आता नूडल्स आहेत. टाईमपास आठ आण्याच्या फुटण्याऐवजी एअरपॅक्ड कुरकुरे आलेत. पण ९ चा पाढा येत नाही, हेही तितकंच खरं. हातात असलेल्या फोनला ‘अँड्रॉईड पीस’ म्हणायचं हे त्यांना कळतं खरं पण त्या दोन्ही शब्दाचं स्पेल्लिंग नीट लिहिता येत नाही त्याला आपण काय म्हणणार, प्रगती की अधोगती?

मी फार जुन्या काळात जात नाही.पण माझे आई वडील दिडकी, पावकी चा पाढा सहज म्हणून दाखवायचे, अर्थात तो त्यांच्याएवढा मला येत नव्हता नव्हता आणि नाहीही. कारण ‘बीजगणित’ नावाचं भूत आमच्या मानगुटीवर कायम बसलेलं असायचं. (a+b) square = means what? उत्तर पुस्तकातील बघून लिहायचो खरा, पण प्रत्यक्ष व्यवहारात त्याचा उपयोग फक्त ‘डिग्री मिळून नोकरी आणि छोकरी’ साठी होतो, हा शोध खूप उशीरा (!) लागला. तीच गोष्ट भाषेची, संस्कृत बापजन्मात जमलं नाही, पुस्तकातल्या हिंदीपेक्षा सिनेमातली हिंदी जास्त कळायची. आपली वाटायची, अजूनही वाटते. इतिहास आवडायचा खरा पण त्यातल्या सनावळ्या पाठ करता करता गड किल्ले चढण्याइतकी दमछाक व्हायची. त्यातच इंग्रजीचं व्याकरण डोस्क्यावर बसलं पण डोक्यात काही गेलं नाही आणि भूमितीच्या बाबतीत तर वाटोळंच! पण आज बाजारात गेलं की कोणती वस्तू कितीला घ्यायची हे ग्यान माझ्या आईबापाने दिलं. आज हे ‘knowledge’ माझी मुलं त्यांच्या मम्मी पप्पांकडून घेऊ शकतात का?

मूळ प्रश्न असा आहे की ती बाजारात जातात का? ते तर बझारमध्ये जातात! तिथं सगळंच लेबल्ड (आणि या जंजाळात मी पप्पा आणि बायको मम्मी ) कधी झालो हे कळलंच नाही. माझा मुलगा इंग्रजी माध्यमातून शिकतो. मोठ्या दोन्ही मुली मराठी माध्यमातून शिकल्या. तर इंग्लीश मिडीयमचा मुलगा ज्यावेळी ९ वी चा निकाल लागून १० वीत गेला (दोन तीन महिन्यापूर्वीची गोष्ट) त्यावेळी कराडातील कलासवाल्यांचे फोन सुरू झाले.

अशाच एका ‘सरांनी’ मला फोन केला..

क्लासचे सर – अश्वमेध चे पप्पा का?

मी – होय, आपण कोण?

क्लासचे सर – मी xxxx कलासमधून बोलतोय ,xxxx सर

मी – हां बोला.

क्लासचे सर – अहो तुमचा मुलगा खुप छान आहे, तो दहावीत जाणार आहे, नववीला चांगले मार्क्स आहेत. अबाव 90%. त्याला थोडं मार्गदर्शन करायचं होतं.

मी – बरं. काय मार्गदर्शन करायचं आहे ?

क्लासचे सर – आम्ही कौन्सिलिंग घेतो, तुमचा मुलगा पुढे स्टार होईल, आमच्या fees नाममात्र आहेत. एकदा पाठवून तरी बघा.

मी – सर धन्यवाद. फक्त मला एक सांगा तुम्ही बाजारात गेला आणि कोबीचा दर ५ रूपये किलो असेल तर तीन पावशेरचे किती द्याल तुम्ही?

क्लासचे सर – अहो हा काय प्रश्न आहे?

मी – मग सांगा ना?

क्लासचे सर – थांबा. (please wait)… (फोन कट होतो)

आजपर्यंत त्या प्रश्नाचं उत्तर आलेलं नाही.

मग मला प्रकर्षाने प्रश्न पडतो की माझ्या पोरांची किंमत काय? लेबल्ड बझारची की रोकड्या बाजारची?

पोरगं बाजारात जायला पाहिजे…दुनियेच्या ओपन मार्केटमध्ये. तरच त्याला त्याची खरी किंमत (म्हणजे त्यानं स्वतःची लावलेली, त्याला लागलेली आणि लादलेली नव्हे!) कळेल. असं वाटायला लागलं. आणि तेच खरं आहे.

राजेंन्द्र मोहीते
(लेखक कराड तालुक्यामधील रेठरे गावात अकांउंटचे क्लासेस घेतात)