दिल्ली | काल शशी थरूर यांनी भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या वर जबर हल्ला चढवला होता. ”२०१९च्या निवडणूकीत जर भाजप सत्तेत आले तर भारताचा हिंदू पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही” असे सनसनाटी वक्तव्य थरुर यांनी केले होते. भारताचे माजी उपराष्ट्रपती महम्मद हमीद अन्सारी यांनी आज थरूर यांच्या त्या विधानाला पाठिंबा दर्शवला आहे. ‘शशी थरूर हे शिकले सवरलेले व्यक्ती आहेत त्यामुळे ते बोलले ते योग्यच बोलले असावेत’ असं म्हणुन अन्सारी यांनी थरुर यांच्या विधानाला पाठिंबा दर्शवला आहे. परंतु ‘मी त्यांचे विधान ऐकले नाही’ अशी पुष्टीही यावेळी अन्सारी यांनी जोडली आहे.
सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर येणार बॉलिवूडमध्ये?
मुंबई | मास्टर बॉस्टर सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर बॉलिवूडमध्ये येण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. काही दिवसांपासून सारा तेंडुलकरचे फोटो सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल होत आहेत.
बॉलीवूड मध्ये साराची एन्ट्री होताच जानवी कपूर आणि आलीया भट यांना प्रतिस्पर्धी निर्माण होईल असे बोलले जात आहे. बॉलिवूड मधील सिनेतारकांसोबत साराचे फोटो व्हायरल होत आहेत. यावरून हा अंदाज लावला जातो आहे की आगामी काळात सारा बॉलिवूडमध्ये झळकू शकते.
मागील वर्षी साराने एक चित्रपट साइन केल्याची आणि त्या चित्रपटाचा शाहिद कपूर हिरो असल्याची बातमी झळकली होती. त्यावर सचिन तेंडुलकर यांनी स्पष्टीकरण दिले होते आणि ही अफवा असल्याचे सांगितले होते. तसेच साराला एका व्यक्तीने फोन करून लग्नाची मागणी घातली होती आणि नकार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याव्यक्तीला पोलिसांनी अटक केली होती.
मुकेश अंबानींचा मुलगा आकाश याच्या सारखरपुड्यात सारा आई वडिलांच्या सोबत आली होती तेव्हा या चर्चेला आणखीच उधाण आले होते. परंतु सारा तेंडुलकर बॉलिवूड मध्ये येणार या बाबतीत साराकडून कोणतेही स्पष्टीकरण अद्याप देण्यात आलेले नाही.
नवाज शरीफ उद्या मायदेशी येताच त्यांना होणार अटक
कराची | पनामा पेपर लिक घोटाळ्यात अडकलेल्या नवाज शरीफ यांना मायदेशी येताच लाहोर विमानतळावर अटक केली जाणार आहे. त्यांच्या सोबत त्यांची मुलगी मरियम नवाज यांनाही अटक होणार असल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुकांची राळ उडाली असताना नवाज शरीफ यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न त्यांच्या विरोधकांकडून केला जात आहे.
पाकिस्तानी सैन्य दलाच्या इंटर-सर्विस पब्लिक रिलेशन चे डायरेक्टर जनरल आसिफ गफूर यांच्या वार्तालाबाला नवाज शरीफ यांनी लंडनमध्ये पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले आहे. ‘निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही रणनिती केली जात आहे. मी सत्तेत असताना सैन्याची मुजोरी खपवून घेत नाही. त्यामुळे मला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी हा खेळ सुरु आहे’ असे शरिफ यांनी म्हटले आहे.
नवाज शरीफ उद्या दुपारी चारच्या सुमारास लाहोर विमानतळावर उतरताच त्यांना अटक करून हवाईमार्गाने रावळपिंडीला घेऊन जाण्याचा पाकिस्तान सरकारचा इरादा असल्याची चर्चा आहे. न्यायालयात शरिफ यांच्यावर खटला चालू आहे. उद्या अटक झाल्यानंतर नवाज शरीफ यांना रावळपिंडीलाच न्यायालयीन कोठडीत ठेवले जाणार आहे.
पेट्रोल, डिझेलच्या किंमती होणार कमी, इराण करणार सर्वतोपरी मदत
नवी दिल्ली|भारतातील तेलाच्या किंमती काबुत ठेवण्यासाठी इराण सर्वतोपरी मदत करणार आहे. इराणचे दिल्लीस्थित राजदूत मसूद रिजवानियन रहागी यांनी आज त्यासंबंधी आपली भुमिका स्पष्ट केली आहे. भारतातील उसळलेल्या तेलाच्या किंमती काबूत ठेवण्यासाठी इराण सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
यापूर्वी इरानचे उपराजदूतांनी ‘भारताने तेला संबंधी अमेरिकी निर्बंध स्वीकारले तर इराण देत असलेल्या विशेष सुटीला भारताला मुखावे लागेल’ असे वक्तव्य केले होते. तसेच भारताने सऊदी अरब, रूस, इराक, अमेरिका या देशाकडे तेलाची मागणी केल्यास भारत इराण तेल संबंध खराब होऊ शकतात असेही त्यांनी म्हटले होते. परंतु आज त्यांनी आपली सुधारित भुमिका मांडली आहे.
परमाणू डील मधून बाहेर पडलेल्या इराण वर अमेरिकेने कडक निर्बंध लादले होते. तसेच भारतासहीत अनेक देशांना नोव्हेंबर पर्यंत इराण कडून तेल खरेदी करू नये असे निर्देश दिले होते. परंतु भारताने यावर अद्याप कोणतीच भूमिका घेतली नव्हती. भारताने अमेरिकी निर्बधावर कसलीच भूमिका घेऊ नये यासाठी इराणने मंगळवारची तंबी दिली होती. इराणने भारताला तेलाच्या किंमती काबूत ठेवण्यासाठी मदत केल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पाकिस्तानच्या राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्यातून काश्मीरचा मुद्दा गायब
टीम HELLO महाराष्ट्र | सध्या पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुका ज्या मुद्द्यावर लढल्या जात होत्या त्या काश्मीरच्या मुद्दयाला कोणत्याच राजकीय पक्षाने शिवण्याचे धाडस या निवडणुकीत केलेले नाही. कारण देश सध्या गरिबी आणि आर्थिक चनचणीतून बाहेर निघत नसताना काश्मीरच्या मुद्दयावर निवडणूका लढवल्यावर रोगापेक्षा इलाज भयंकर होईल हे पाकिस्तानी नेत्यांना चांगलेच ठाऊक आहे. तसेच काही कट्टरवादी सोडले तर इतर पाकिस्तानवासीयांना काश्मीर मुद्द्याबाबत कसलाच रस नाही.
पाकिस्तानात ‘पाकिस्तान मुस्लिम लीग’ (नवाज) म्हणजे पीएमएल-एन, पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआई) आणि पाकिस्तान पिपल्स पार्टी (पीपीपी) हे तीन प्रमुख राष्ट्रीय राजकीय पक्ष आहेत. पीटीआई हा पूर्व क्रिकेटपटू इमरान खान यांचा पक्ष. त्या पक्षाच्या जाहीरनाम्यात कश्मीर मुद्दयाचा उल्लेख नाममात्र केला असून त्यात त्यांनी म्हटले आहे की आमच्या पक्षाला कश्मीरचा मसला संयुक्त राष्ट्र संघाच्या चौकटीत राहूनच सोडवायचा आहे. संयुक्त राष्ट्र संघाशी वाटघाटी करून काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी ब्ल्यू प्रिंट तयार करण्याचे जाहीरनाम्यात म्हटले आहे. त्यातील पीएमएल-एन हा नवाज शरीफ यांचा पक्ष असून तो पाकिस्तान मधील सर्वात मोठा पक्ष आहे त्यांच्या जाहीनाम्यात चीन सोबत संबंध सुधारण्यावर भर दिला असून पाकिस्तानच्या परमाणू रक्षणाला महत्व दिले आहे. परराष्ट्र धोरणात काश्मीरचा मुद्दा नवव्या स्थानी असून त्यात फक्त दगडमरी करणाऱ्या कश्मिरी नागरिकांच्या बद्दल सहानभूती दर्शवली आहे.
भारता संबंधित चांगला उल्लेख फक्त पाकिस्तान पिपल्स पार्टी (पीपीपी) या पक्षाच्या जाहीर नाम्यात आढळतो. पी पी पी पक्ष हा पाकिस्तानच्या पूर्वपंतप्रधान बेनजीर भुट्टो यांचा आहे.बेनजीर भुट्टो पंतप्रधान असनाताना भरतासोबत त्यांचे सलोख्याचे संबंध होते. परंतु २००७साली त्यांची रावपिंडीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पीपीपी या पक्षाच्या जाहीरनाम्यात मात्र स्पष्ट शब्दात असा उल्लेख आहे की जर आम्ही सत्तेत आलो तर भारता सोबत आम्ही संबंध सुधारू आणि दोन्ही देशातील सीमेवरील वातावरण निवळण्यासाठी प्रयत्न करू.
सुरज शेंडगे
आध्यात्मिक गुरु दादा वासवानी यांचे निधन
पुणे : आध्यात्मिक गुरु दादा वासवानी यांचे पुणे येथे आज सकाळी निधन झाले आहे. वयाच्या ९९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुणे येथील साधू वासवानी मिशनचे ते आध्यात्मिक प्रमुख होते. दादा वासवानी यांनी शाकाहारीचा नेहमीच पुस्कार केला. प्राण्यांच्या हक्कांसाठी ते कार्यरत होते. त्यांनी आजवर एकुण १५० हून अधिक पुस्तके लिहीली आहेत. आध्यात्मावरती त्यांनी जगभर व्याख्याने दिली आहेत. त्यांचे पार्थीव दर्शानाकरता साधु वासवानी मिशन, पुणे येथे ठेवण्यात येणार आहे.
….नाहीतर ताजमहाल उद्ध्वस्त करा – सर्वोच्च न्यायालय
दिल्ली : ‘तुम्ही ताजमहालाकडे लक्ष दिलेलं नाही. ताजमहालचं संवर्धन करण्याची तुमची इच्छाशक्तीच दिसत नाही. तुम्हाला ताजमहालाचा संभाळ करता येत नसेल तर तसं सांगा, ‘आम्ही त्याला टाळं ठोकू किंवा तुम्ही तो उद्ध्वस्त करा’ अशा कडक शब्दात आज सर्वोच्च न्यायालयाने केन्द्र सरकार व भारतीय पुरातत्व विभागाला सुनावलं आहे. ताजमहालाच्या संवर्धनाच्या संदर्भातील एका खटल्यावर सुनावणी देताना न्यायालयाने ही टीपणी केली आहे.
‘तुम्ही ताजमहालाकडे नीट लक्ष दिलं असतं तर तुमची परकीय गंगाजळीची समस्या सुटली असती. तुमच्या हेळसांडीमुळे देशाचं किती नुकसान झालंय तुम्हाला माहित आहे का?’ असा सवालही न्यायालयानं यावेळी उपस्थित केला आहे. न्या. दीपक आणि न्या. मदन लोकुर यांच्या खंडपीठानं ही सुनावणी दिली आहे. ताजमहालाच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी केंन्द्र सरकारने कोणती पावले उचलली आहेत त्याबद्दलची माहीती केंन्द्र सरकारने देण्याचे निर्देश यावेळी न्यायालयाने दिले आहेत.
ज्ञानोबांची पालखी जेजुरीत दाखल.माऊलीच्या पालखी पालखीवर भंडाऱ्याची मुक्त उधळण
जेजुरी : आज ३९ किलोमीटरचा पल्ला पाई चालून माऊलींची पालखी जेजुरीत जाऊन पोहचली आहे. जेजुरीच्या वेशी पासूनच माऊलीच्या पालखीवर भांडाऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली. अनेक वर्षाची या मागे परंपरा असल्याचे बोलले जाते. माऊलीच्या चांदीच्या रथावर सोनेरी भंडारा उधळल्याने सोन्याचा झाल्याची अनुभूती वैष्णवांनी अनुभवली. पालखीचा जेजुरीत आज मुक्काम असणार आहे. माऊलीच्या मुक्कामासाठी जेरुरीकरांनी जय्यत तयारी केली असून वैष्णवांच्या सेवेसाठी जेजुरीकर तण मन धन अर्पण करत आहेत.
माऊलींच्या पालखी वरील भांडाऱ्याची उधळण शैव आणि वैष्णवांचे मिलन मानले जाते.
पाकिस्तानात आवमी नॅशनल पार्टीचे नेते हारुन बिलौर यांची भर सभेत हत्या
पेशावर : पेशावरच्या याकातूत भागात आवमी नॅशनल पार्टीचे नेते हारुन बिलौर यांची भर सभेत हत्या करण्यात आली आहे. अज्ञात अतिरेक्यांनी भर सभेत स्फोट घडवून हारुन बिलौर यांची हत्या केली आहे. बिलौर पाकिस्तानातील आवमी नॅशनल पार्टीचे मुख्य नेते होते. पक्षाच्या सभेसाठी ते पेशावरला गेले असता अतिरेक्यांनी त्यांना ठार केले आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री पेशावर येथे पक्षाची बैठक आयोजीत करण्यात आली होती. बैठकीचे रूपांतर छोटेखानी सभेत झाले. साधारण ३०० लोक सभेला आले होते. सभा सुरु असताना अचानक मोठा आवाज झाला आणि सर्वत्र पळापळ सुरू झाली. दरम्यान पक्षाचे नेते हारून बिल्लौर यांना कोणीतरी खाली कोसळताना पाहिले. अतिरेक्यांनी भर सभेत स्फोट घडवून बिलौर यांची हत्या केली. त्यानंतर बिल्लौर यांना तातडीने लेडी रीडिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू रुग्नालयात डाॅक्टरांनी बिल्लौर यांचा मृत्यु झाला असल्याचे घोषीत केले.
पाकिस्तानात सध्या सार्वत्रिक निवडणुका सुरू आहेत. त्यात हारून बिल्लौर यांची ‘आवम नॅशनल पार्टी’ ही मुख्य तीन राष्ट्रीय पार्ट्यापैकी एक आहे. निवडणुकीच्या या घोडदौडीत हारून बिल्लौर हे पेशावरला आले होते पण तेथेच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. त्यांच्या सह हल्ल्यात अन्य १४ लोक मारले गेले आहेत. तसेच ६५ लोक गंभीर जखमी झाले आहेत.
हारून बिल्लौर यांचे वडील बशीर अहमद बिल्लौर हे सुध्दा आवमी नॅशनल पार्टीचे राष्ट्रीय नेते होते. त्यांचा ही तालिबान दहशतवादी संघटनेने असाच भर सभेवर हल्ला करून खून केला होता. बाप आणि मुलाला एकसारखेच मरण आले ही दुर्दैवी दुर्मिळ घटना आहे.
संजू मोडू शकतो अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड. कमाई जाणार ३००कोटीच्या घरात
मुंबई : २९ जून रोजी पूर्ण देश भर प्रदर्शित झालेल्या संजू चित्रपटाने बॉक्सऑफिसवर कल्ला उडवून दिला आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी ३४ कोटी रुपयांची कमाई केली तर पहिल्या रविवारी चित्रपटाने ४६ कोटी रुपये कमावले आहेत. संजू प्रदर्शित होण्याअगोदर प्रचारा पेक्षा अपप्रचार खूप करण्यात आला पण लोकांनी कसलीही अस्पृश्यता नबाळता कलाकृतीला मनस्वी दाद दिल्याचे चित्रपटाची कमाई सांगते आहे. संजू चित्रपट खरोखर संजय दत्तची बायोग्राफी आहे का कल्पनेचा आधार घेतला आहे या बद्दल संभ्रम असला तरी लोक चित्रपटास पसंद करत आहेत. चित्रपटाची कमाई काल मंगळवार अखेर २६५.४८ कोटी रुपये झाली असून रविवार पर्यंत हा आकडा ३००कोटी पर्यंत जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास संजू अनेक चित्रपटाचे रेकॉर्ड मोडेल. सिने क्षेत्रात संजू चित्रपटाबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे तर रणबीर कपूर यांच्या अभिनयाचे तोंड भरून कौतुक केले जाते आहे.