दापोली : आंबेनळी अपघातग्रस्तांना आज दापोली कृषी विद्यापीठाने श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभा घेतली. आपल्या सहकाऱ्यांना श्रद्धांजली वाहताना अनेकांना अश्रु अनावर झाले. शोकसभेतून सहकाऱ्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. तसेच काळजावर दगड ठेऊन विद्यापीठाच्या कामकाजाला सुरुवात करत असल्याचे कर्मचारी वर्गाकडून सांगण्यात आले.
२८ जुलै रोजी दुपारी बाराच्या सुमारास आंबेनळी घाटात मिनी बसचा अपघात झाला होता त्यात ३० व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला होता तर एका व्यक्तीने गाडी तून उडी घेतल्याने तो बचावला होता.एकाच वेळी ३० व्यक्ती ठार झाल्याने दापोली शहरावर शोककळा पसरली होती.
बाळासाहेब सावंत दापोली कृषी विद्यापीठात शोकसभा
मराठा आरक्षणाचा अजुन एक बळी; रेल्वेखाली केली आत्महत्या
औरंगाबाद | मराठा आरक्षणासाठी अजुन एका युवकाने रेल्वेखाली आत्महत्या केली आहे. प्रमोद होरे पाटील अस या युवकाच नाव आहे. मध्यरात्री २:३० वाजता प्रमोदने फेसबुकवर आत्महत्येची पोस्ट लिहून पहाटे ४ च्या दरम्यान मुकुंदवाडी रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याच उघड़ झाले आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात प्रमोदचा सक्रिय सहभाग होता. प्रमोद च्या आत्महत्येने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. तसेच आंदोलनाला तीव्रता आली आहे.
आंदोलकांनी संयम बाळगावा आरक्षणासाठी आत्महत्या करणे इतर समाज बांधवांना दुःख देणारे आहे म्हणून या मार्गाचा अवलंब करू नका असे आवाहन परवा दिवशी छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले होते. तरीही आत्महत्येचे प्रकार थांबत नाहीत एकंदरीत आरक्षणाचा प्रश्न अधिकच गंभीर होत चालला आहे.
मराठा समाजाची आज महाराष्ट्र बंदची हाक
पुणे | मराठा आरक्षणासाठी गेल्या दहा दिवसांपासून महाराष्ट्रभर ठिकठिकाणी आंदोलन सुरु असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २८ तारखेला झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत मागासवर्गीय अहवाल महिन्याभरात येईल अस म्हटले होते. मात्र तरीही अहवाल येईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.
सकल मराठा समाजाच्या वतीने आज महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात आली आहे. यामधे प्रामुख्याने सोलापुर , नांदेड, नाशिक आदी जिल्ह्यांचा विशेष सहभाग आहे. ठिकठिकाणी कार्यकर्ते महामार्ग अडवून व टायर जाळून निषेध व्यक्त करत आहेत. मराठा आरक्षणाच्या मागण्यासहित आंदोलकांच्या वरचे गुन्हे मागे घेण्याची मागणी जोर धरत आहे.
धडक नंतर जान्हवी आणि ईशानला काम नाही
मुंबई | धडक चित्रपटाने आजतागायत ६० कोटीहून अधिक कमाई केल्याने चित्रपट तेजीत आहे. जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांनी दिलेल्या एका मुलाखतीतून त्यांना आगामी काळात काम नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
नजीकच्या काळात दिलेल्या मुलाखतीत आता पुढील प्रोजेक्ट काय आहेत असे विचारल्यावर जान्हवी म्हणाली की, दिग्दर्शकसोबत बोलणी सुरू आहेत. आगामी चित्रपटाची क्रिप्ट तयार होते आहे अशी उत्तरे देऊन तुम्हाला मी खेळवून ठेवणार नाही. तर ईशानने या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले. मी या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही असे म्हणून त्याने या प्रश्नावरून काढता पाय घेतला.
जान्हवी आणि ईशान ने दिलेल्या उत्तरावरून त्यांना आगामी काळात कोणताच चित्रपट नसल्याचे लक्षात येते. तसे पहायला गेले तर जान्हवी कपूरचा धडक चित्रपटातील अभिनय तितकासा चांगला नाही. कारण जान्हवीला संवाद फेक सुद्धा नीट करता आली नाही.
आसामला आले छावणीचे स्वरूप. ‘नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप’ ची यादी आज होणार जाहीर
गुवाहाटी | आसाम मधील बांगलादेशी घूसखोरी हा अनेक दशकापासून चालत आलेला प्रश्न आहे. यावर तोडगा काढण्यासाठी ‘नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप’ (एन.आर.सी.) ची स्थापना करण्यात आली आहे. एन.आर.सी. आपली पहिली यादी आज जाहीर करणार आहे. या संस्थेचा दावा आहे की एकट्या आसाम राज्यात ४० लाख घूसखोर आहेत.
२.८० कोटी लोकसंख्या असलेल्या आसाम मध्ये घूसखोरांची संख्या वाढत गेल्याने त्यावर तोडगा म्हणून एनअारसी ची स्थापना करण्यात आली होती. १९५१ साली आशा प्रकारची यादी पहिल्यांदा बनवण्यात आली होती. सध्या कार्यरत असलेल्या एनअारसी ने १९७१ हे साल मूल नागरिकत्वाचे प्रमाण मानले आहे. १९७१ पूर्वीचा आसाम रहिवासाचा पुरावा नागरिकांना समिती पुढे सादर करावा लागला आहे. त्यानुसार ही यादी बनवण्यात आली आहे. ३० ऑगस्ट पर्यंत ही यादी एनअारसी च्या विविध केंद्रावर प्रकाशित केली जाणार आहे. ज्यांच्या नागरिकत्वाची अडचण आहे त्यांनी आपले नागरिकत्व ३० ऑगस्ट पूर्वी समितीसमोर सादर करायचे आहे.
‘नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप’ ची यादी जाहीर होताच राज्यात हिंसाचार भडकण्याची शक्यता असल्याने राज्यात सीआरपीएफच्या २२० तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
आयुष्यात एकदा तरी पंढरी वारी करावी, नरेंद्र मोदींचे मन की बात मधून आवाहन
नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमात पंढरीच्या वारीवर विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरावर बोलताना हे आवाहन केले आहे. पंधरा दिवस अगोदोर पाई चालत जाऊन लोक चैतन्य परमात्मा विठ्ठलाचे दर्शन घेतात आणि वेगळीच अनुभूती मिळवतात. जेव्हा जेव्हा तुम्ही विठ्ठलाचे दर्शन घ्याल तेव्हा तुम्हाला वेगळी अनुभूती येईल असे पंतप्रधान म्हणाले.
मोदींनी पंढरीच्या वारी बद्दल केलेला उल्लेखाने तमाम मराठी जणांनी आनंद व्यक्त केला आहे. नरेंद्र मोदींनी मागे ही अनेक वेळा विठ्ठला बद्दल उल्लेख केला आहे.२०१३ साली लोकसभेच्या निवडणुकीचा शंख फुंकण्यासाठी पुण्यात आल्यावर पालखी सोहळा सुरू होता त्यावेळी ही त्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या.
भारत’ चित्रपटाला प्रियांका चोप्राची सोड चिठ्ठी
मुंबई | अली अब्बास जफर यांच्या भारत चित्रपटात प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत होती तिने हा चित्रपट सोडल्याने बॉलिवूड जगतात खळबळ माजली आहे. भारत चित्रपटात सलमान खान सोबत प्रियांका चोप्रा अभिनय करणार होती परंतु तिने अचानक घेतलेल्या एक्सिट मुळे अनेकांनी भोवया उंचावल्या आहेत. अली अब्बास जफर यांनी आपल्या ट्विटर वरून या बातमीचा खुलासा केला त्याच बरोबर निक सोबत होऊ घातलेल्या लग्नामुळे प्रियांका चित्रपट सोडत असावी अशी पुष्टी देखील जोडली आहे.
बऱ्याच गोष्टी आत शिजत असतात त्या बाहेर काढता येत नाहीत म्हणून असे बाहेर पडण्याचे प्रकार घडतात.आम्ही केलेल्या जिंजीर चित्रपटात ही असे प्रसंग समोर आले होते. असे मत सलमान खानचे वडिल सलीम खान यांनी या संदर्भात प्रतिक्रिया नोंदवताना म्हटले आहे. तर असे प्रसंग बॉलिवूड मध्ये कायम घडतात असे सलमान खान ने म्हटले आहे.
प्रियांकाच्या सोड चिठ्ठी नंतर तिच्या जागी कॅटरीना आणि क
जॅकलीनचे नाव चर्चेत आहे. भारत चित्रपटाचे निर्माते निखिल नमीत यांनी प्रियंकाच्या कृतीला ‘अनप्रोफेशनल’ म्हणले आहे.
पिंपरी चिंचवड मध्ये नव्या पोलिस आयुक्तालयाची लगबग
पिंपरी चिंचवड | पुण्याच्या पोलीस आयुक्तालयावरील अतिरिक्त भार कमी करण्यासाठी नव्याने तयार करण्यार येणाऱ्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात असलेला भाग हा ३० किलोमीटर पेक्षा अधिक होत असल्याने तसेच पोलीस प्रशासनाला अडथळा निर्माण होत असल्याने नव्या पोलीस आयुक्तालयास गृह खात्याने मान्यता दिली.
भारतीय पोलीस सेवेतील मकरंद रानडे यांची पिंपरी चिंचवडच्या पहिल्या पोलीस आयुक्त पदी नेमणूक झाली आहे. तर नम्रता पाटील आणि विनायक ढाकणे यांची उपायुक्त पदी निवड करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड मधील महात्मा फुले शाळेचा भूखंड पोलीस आयुक्तालयासाठी आरक्षित करण्यात आला होता.आयुक्तालयाचे काम अंतिम टप्प्यात असून १५ ऑगस्ट रोजी आयुक्तालयाचे उदघाटन अपेक्षित आहे. पिंपरी, चिंचवड, निगडी, वाकड,भोसरी, भोसरी एमआयडीसी, हिंजवडी चिकली, दिघी, देहूरोड, आळंदी, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, चाकण,सांगवी आशा १५ पोलिस स्टेशनचा समावेश नव्या आयुक्तालयात करण्यात येणार आहे.
मराठा आंदोलनाचे १ऑगस्टला जेल भरो
मुंबई | राज्यभर एवढी आंदोलने करून पण सरकारला जर आमची मागणी गांभीर्याने घ्यायची नसेल तर आता आम्ही जेल भरो करणार असल्याचा इशारा मराठा समाजाने दिला आहे. मराठा समाजाची मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील यानी माफी मागावी अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली आहे.
आरक्षणासाठी वारकऱ्यांना वेठीस धरणारे शिवाजी महाराजांचे मावळे असू शकत नाही असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले होते. या वक्तव्याचा मराठा आंदोलकांमध्ये संताप आहे. दरम्यान मराठा आरक्षण प्रक्रिया पूर्ण केल्या शिवाय पूर्ण होऊ शकत नाही यावर सर्व राजकीय पक्षांचे एकमत झाले आहे.
मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे आणि आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा यासाठी हे जेलभरो आंदोलन करणार असल्याचे मराठा आंदोलकांनी सांगितले आहे.
मुलांवर लैगिक अत्याचार करणारा मौलवीला अटक
पुणे | मदर्शामध्ये शिक्षण घेणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांवर मदर्शातीलच मौलवीने लैगिक अत्याचार केल्याचा प्रकार पुण्यामध्ये उघड झाला आहे. मुलांवर लैंगिक अत्याचार करून मुलांनी जर कोणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकी मौलवी देत होता. अखेर मुलांनी धाडस करून भारती विद्यापीठ पोलीस चौकीत मौलवी विरोधात फिर्याद दिली. मौलवीला पोलिसांनी अटक केले आहे. सदर प्रकार पुण्यातील कात्रज परिसरात घडला आहे. या मौलवीची शिकार आणखी मुले झाली आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकारा बद्दल सर्व स्तरातून निंदा केली जात आहे.










