नवी दिल्ली | भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली आहे. गडकरी यांनी पत्रकार परिषदेत केंद्राने राज्याला देऊ केलेली मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लागावे यासाठी केंद्र सरकारने भरीव मदत जाहीर केली आहे. या मदतीतून राज्यातील ९१ प्रकल्प मार्गी लागणार आहेत.
केंद्र सरकारच्या वतीने १३,६५१ कोटी रुपयांची भरीव निधी राज्यातील रखडलेल्या प्रकल्पांना देण्यात येणार आहे. तसेच राज्यातील १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांना विशेष पॅकेज जाहीर करत असल्याचे गडकरींनी घोषित केले आहे. राज्यातील रखडलेले प्रकल्प मार्गी लागल्यावर ३ लाख ७७ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. राज्याची सिंचनाची स्थिती पंजाब हरियाणा राज्याच्या तुलनेत फारच कमी आहे म्हणून हा निधी मंजूर केला असल्याचे गडकरी यांनी सांगितले आहे. बळीराजा जलसिंचन योजना या नावाने ही योजना राज्यात राबवली जाणार आहे.
नितीन गडकरींनी केली महत्वाची घोषणा
मुख्यमंत्र्यांची धमकी, कचरा प्रश्न सोडवला नाही तर औरंगाबाद महानगर पालिका बरकास्त करीन
नागपूर | मागील पाच महिन्यांपासून प्रलंबित असलेला औरंगाबाद कचरा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि औरंगाबाद चे मनपा आयुक्त व महापौर यांच्यात नागपूर येथे नुकतीच बैठक पार पडली. सदर बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘कचरा प्रश्न सोडवला नाही तर औरंगाबाद महानगर पालिका बरकास्त करीन’ असा अौरंगाबाद म.न.पा. ला निर्वाणीचा इशारा दिला आहे.
औरंगाबाद मनपावर भाजपचीच सत्ता असून देखील मुख्यमंत्र्यांनी पालिकेला असा इशारा दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मागील पाच महिन्यापासून औरंगाबादचा कचरा प्रश्न गंभीर झाला असून शहरामध्ये १४ लाख टन कचरा साठला आहे. कचऱ्यामुळे शहरात घाणीचे साम्राज्य माजले असून दुर्गंधी, डास अशा समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
मनपाचा नाकर्तेपणा लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे समजत आहे. पुढील काही दिवसात कचरा प्रश्न सुटला नाही तर औरंगाबाद मनपा बरकास्त होणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगीतले आहे.
भाजपच्या खासदारांनी मांडली अशी लक्षवेधी सूचना की त्याचे तुम्हाही हसू येईल | लोकसभा Live
नवी दिल्ली | संसदेचे पावसाळी अधिवेशन आज पासून सुरू झाले आहे. लक्षवेधी सूचना मांडून सरकारचे लक्ष महत्वाच्या विषयावर आकर्षित करून घ्यायचे असते यासाठी लक्षवेधी सुचनेची रचना करण्यात आली आहे. परंतु आज भाजपच्या खासदाराने लोकसभेत मांडलेली लक्षवेधी ऐकून आपणास हसू आल्याशिवाय राहणार नाही.
भाजचे मेरठचे खासदार राजेंद्र अग्रवाल यांनी आज लोकसभेत टीव्ही वर दाखवल्या जाणाऱ्या जाहिराती ह्या स्टंटवर आधारित असतात अशी अजब लक्षवेधी सूचना लोकसभेत मांडली. स्टंटवर आधारित जाहिरातीत जसे दाखवले जाते अगदी तसे स्टंट मुलं करण्याचा प्रयत्न करतात. बनियलची जाहिरात दाखवली जाते त्यात बनियन घातलेला व्यक्ती जशी कृती करते तशी कृती मुले करण्याचा प्रयत्न करतात असे लक्षवेधी सुचनेत अग्रवाल म्हणाले आहेत.
देशामध्ये अनेक प्रश्न आ वासून उभे असताना खासदार या जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तीने असे हस्यपद मुद्दे लोकसभेत मांडल्यावर लोकसभेच्या गरिमेला धक्का बसत आहे.
पहिले ते आठवी इयत्तेसाठी आता होणार परीक्षा | लोकसभा Live
नवी दिल्ली | देशात चौदा वर्षा पर्यंत मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणे शासन संस्थेचे मूलभूत कर्तव्य असेल असे संविधानात नमूद करण्यात आले आहे. यातूनच सर्व शिक्षा अभियान नावाने सरकारने अभियान सुरू केले. अभियानात वेळोवेळी बदल करण्यात आले. मागील काही वर्षांपासून पहिली ते आठवी पर्यंत परीक्षाच घेतल्या जात नव्हत्या. त्यामुळे पहिले ते आठवीचे वर्ग शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्यासाठी स्नेह मेळावे बनले होते. शाळेत या सरकारी भात खा आणि घरी जा असे रूप शिक्षण व्यवस्थेने धारण केले होते. हीच परिस्थिती खांदून काढण्यासाठी सरकारने सर्व शिक्षा अभियानाच्या कायद्यात दुरुस्ती करून पहिली ते आठवीसाठी इयत्तेसाठी पुन्हा परीक्षेची तरतूद केली आहे.
आत्ता या क्षणाला लोकसभेत “सक्तीचे आणि मोफत शिक्षण अधिनियम २०१७ – द्वितीय दुरुस्ती विधयेक” चर्चेसाठी ठेवण्यात आले आहे. मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जवडेकरांनी यावर भाषण दिले असून लोकसभेत यावर सखोल चर्चा होत आहे.
सदरचे विधेयक सम्मत झाल्यास १ ली ते ८ वी पर्यंत परीक्षा घेतली जाणार आहे. तसेच वार्षिक परीक्षेसाठी दोन संधी दिल्या जाणार आहेत. पहिली संधी मार्च महिन्यात तर दुसरी संधी मे महिन्यात दिली जाणार आहे. वाचकांच्या माहितीसाठी, महाराष्ट्र शासनाने हा निर्णय या अगोदरच घेतल्याने महाराष्ट्रात पहिली ते आठवी परीक्षा घेतल्या जातात.
कॉग्रेस आणणार भाजप सरकारवर अविश्वास प्रस्ताव |लोकसभा Live
नवी दिल्ली | कॉग्रेसने भाजपच्या विरोधात रान पेटवले असतानाच भाजप सरकारच्या लोकसभेच्या सदस्य संख्येत घट झाल्याने कॉग्रेसने भाजपवर अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी केली आहे. आज सकाळी ११ वाजता संसदेचे अधिवेधन सुरू झाले. लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी सुरुवातीला शोक प्रस्ताव मांडले. त्यानंतर प्रश्न उत्तराचा तास सुरू झाला. कॉग्रेसने त्या तासाच्या दरम्यान आम्हाला न्याय पाहिजे अशा इंग्रजीतून घोषणा द्यायला सुरुवात केली.
प्रश्न उत्तराच्या तासानंतर लक्षवेधी प्रस्ताव मांडले जाऊ लागले. त्यावर ही कॉग्रेसच्या मल्लिकार्जुन खर्गे यांनी आरोप केला की, सभापतीजी भाजपचे प्रस्ताव अगोदर का घेतले जात आहेत. त्यावर सभापतींनी स्पष्टीकरण दिल्यावर खर्गे शांत झाले.
संसदीय कार्यमंत्री अनंतकुमार यांनी लोकसभेत कॉग्रेसला चेतावणी देत सभापतींना अविश्वास प्रस्तावावर चर्चा घ्यावी असे म्हणले. आज कळू द्या की मोदींच्या मागे किती शक्ती आहे. परंतु सभापतींनी ठरलेल्या वेळेतच प्रस्तावावर चर्चा घेतली जाईल असे सदनात स्पष्ट केले.
कॉग्रेसने आखलेल्या अविश्वास प्रस्तावाला तेलगू देशम पार्टीचा पाठिंबा आहे. तसेच भाजपाच्या मित्र पक्षांना सोबत घेऊन सरकार पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा चंग कॉग्रेसने बांधला आहे. अर्थात हा प्रस्ताव संम्मत होण्याबद्दल खात्री लायक विधान करता येणार नाही.
दूध आंदोलन ठरले फोल, पुण्यात चितळेचे शंभर टक्के वितरण
पुणे | पुण्यात चितळे दुधाला विशेष मागणी आहे. चितळेचे ४ लाख लिटर दुध पुण्यामध्ये रोज वितरित होते. आत्ताच आलेल्या माहिती नुसार चितळे दुधाचे आजच्या दिवशी १००% वितरण झाले आहे. आंदोलकांची नजर चुकवून दूध पुण्याला पोच करण्यात चितळे दूध संघाला यश आले आहे. चितळे दुधाचे संकलन आणि प्रक्रिया सांगली जिल्ह्यातील पलूस या ठिकाणी होते. तेथून पुणे आणि मुंबईला हे दूध वितरित होते. दूध दरवाढ आंदोलनाचा फटका चितळे दूध संघाला ही बसला आहे. काल चितळेंचे ५०% दूध आंदोलकांनी अाडवून रस्त्यावर ओतून दिले होते. दुधाचा संप जर मिटला नाही तर दूधाची भीषण टंचाई येणाऱ्या काळात बघायला मिळणार आहे.
तुकोबांची पालखी सराटीहुन तर माऊलींची पालखी नातेपुत्याहून मार्गस्थ
अकलूज | संत तुकाराम महाराजांच्या पावलांना सराटी येथे नीरा स्नान घालण्यात आले आहे. नीरा स्नानानंतर पालखीने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. अकलूजमध्ये सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रारंगणात गोल रिंगण पार पडणार आहे. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी नातेपुते मुक्कामाहून मार्गस्थ झाली असून माऊलींच्या पालखीचे पहिले गोल रिंगण सदाशिवनगर या ठिकाणी दुपारी पार पडणार आहे.
रिंगण सोहळा पार पडल्यानंतर माऊलींची पालखी माळशिरस येथे मुक्कामी जाणार आहे तर तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज अकलूज येथेच मुक्काम असणार आहे.
सांगलीत झाली पोलिसाचीच हत्या
सांगली | पोलीस हवालदार समाधान मानटे यांचा अज्ञान इसमानी धारदार चाकूने भोकसून खून केला आहे. मानटे सांगलीत आपल्या मित्रांच्या सोबत हॉटेल रत्ना डिलक्स येथे जेवायला गेले असताना हा सगळा प्रकार घडला आहे. हल्लेखोरा सोबत दोन साथीदार होते त्यांनी चेहरे झाकल्याने त्यांची ओळख पटू शकली नाही. तसेच हा खुनाचा थरार सीसीटिव्ही कामेऱ्यात कैद झाला आहे. पोलीस हवालदार जेवण करून घरी परतत असताना हॉटेलच्या गेटवर हल्ले खोराने त्यांच्यावर चाकूने वार केल्याचे सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या चित्रफितीमध्ये स्पष्ट दिसते आहे.
पोलीस म्हणजे रक्षक अशी संज्ञा जरी असली तरी पोलीसांवर होणारे हल्ले महाराष्ट्राला नविन नाहीत. मुंबईत चौदा लोकांनी पोलिसांना डांबून ठेवल्याची घटना ताजी असतानाच सांगलीमध्ये हा पोलिसाचा खून व्यवस्थेला विचार करायला लावणारा आहे.
घटनेचा तपास युद्ध पातळीवर सुरू असून सांगली पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजू शेट्टींनी गुजरात मुंबई सीमेवर दिला ठिय्या
मुंबई | आज दूध आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. सलग तिसर्या दिवशीही आंदोलनात कमालीची सक्रियता बघायला मिळत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी स्वत: महाराष्ट्र गुजरात सीमेवर गुजरात मधील दूध अडवण्यासाठी ठिय्या देऊन बसले आहेत. गुजरातवरुन मुंबईकडे येणार्या दुधाच्या गाड्या माघारी पाठवण्यात आंदोलकांना यश आले आहे. गुजरातचे पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी दुध आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला होता. परंतू ऐनवेळी हार्दिकने काहीच सक्रियता न दाखवल्यामुळे खुद्द शेट्टी यांना गुजरातेतील दुध मुंबईत येण्यापासून रोखण्यासाठी महाराष्ट्र गुजरात सीमेवर ठीय्या मांडून बसावे लागले आहे.
तिसर्या दिवशी ही दुधाचे आंदोलन क्षमले नाही. कोल्हापूर जिल्ह्यात आज आंदोलन उग्र झाले आहे. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात १० पेक्षा अधिक टँकर फोडण्यात आले असून सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यातही आंदोलकांनी टँकर फोडून दूध रस्त्यावर ओतून दिले आहे. तर पुणे मुंबई महामार्गावर अज्ञात लोकांनी दुधाचे तीन टँकर फोडले आहेत. मुंबई पुण्यात आज दुधाची टंचाई जाणवणार आहे. तिसऱ्या दिवशी आंदोलक आक्रमक आहेत. सरकारने लवकर तोडगा काढावा असा सूर जण समन्यातून उमटतो आहे.
रत्नाकर गुट्टे महाराष्ट्राचे निरव मोदी – धनंजय मुंडे
नागपूर | मराठवाड्यात लक्ष्मीपुत्र म्हणून प्रसिद्ध असणारे रत्नाकर गुट्टे हे महाराष्ट्राचे निरव मोदी असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत केला आहे. रत्नाकर गुट्टे यांनी मराठवाड्यात २२कंपन्या नोंदवल्या आहेत आणि या कंपन्यांच्या नावे ५,४६२ कोटी रुपयांचे कर्ज उपसले आहे. रत्नाकर गुट्टे यांच्या जवळ असलेल्या कंपन्यांची एकूण किंमत ४८४ कोटी रुपये होत असताना एवढ्या तफावतीत कर्ज कसे मंजूर करण्यात आले असा सवाल धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत केला आहे.
शेतकऱ्यांना हाताशी धरून त्यांच्या नावावर कर्ज लाटल्याचे आरोप गुट्टेवर करण्यात आले आहेत. मागील अधिवेशनात गुट्टेच्या विरोधात विधान परिषदेत आवाज उठवल्याने सरकार गुट्टेंवर एसआयटी नेमण्यात तयार झाले परंतु या तपासाची गती अतिशय मंद असल्याचे मुंडे म्हणाले.
गुट्टे यांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. अनपेक्षित रित्या या निवडणुकीत गुट्टेना पराभूत व्हावे लागले होते तर याठिकाणी धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय डॉ.मधुसूदन केंद्रे विजयी झाले होते. पुढील निवडणुकीत केंद्रेच विजयी व्हावे यासाठी धनंजय मुंडे रत्नाकर गुट्टे यांच्या मागे लागले असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते आहे.
रत्नाकर गुट्टे हे ना. पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.भाऊ बहिणीच्या शह काट शहाची किनार या आरोपांना असल्याचे नाकारता येत नाही.










