Saturday, December 6, 2025
Home Blog Page 6762

कर्नाटकच्या शेतकऱ्यांना मिळणार कर्ज माफी

thumbnail 1530802013781
thumbnail 1530802013781

बंगळुरु : निवडणुकीत घोषित केल्या प्रमाणे कुमारस्वामी सरकारने कर्नाटकामधे शेतकरी कर्ज माफीचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या कर्जमाफीची कार्यवाही केली जाणार आहे. शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याकडे कुमारस्वामी सरकार लक्ष देत असून एका नंतर एक धडाकेबाज निर्णय घेऊन सरकारची कुशलता दाखवली जात आहे. २०१९ च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कुमारस्वामी सरकार दमदार कामगिरी करू पाहत आहे. त्यादृष्टीने आज त्यांनी कर्नाटक विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ३४००० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कर्जमाफीद्वारे २ लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार असल्याचे समजत आहे. एकंदर लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कॉग्रेस आणि जनता दल कर्नाटकात कामाला लागले आहे.

कठुआ बलात्कार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

thumbnail 1530801534518
thumbnail 1530801534518

दिल्ली : देशाला हादरवून टाकणारे कठुआ बलात्कार प्रकरण अजुनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. कठुआ प्रकरणी सुनावनी देताना सर्वोच्च न्यायालयाने आरोपी परवेज कुमार पौढ असल्याचा निर्वाळा दिला आहे. आरोपीने आपण अज्ञान(अल्पवयीन) असल्याचा दावा कोर्टा समोर केला होता. त्यासंबंधी खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने आरोपी पौढ असल्याचे म्हणले आहे. कोर्टाने यासंबंधी वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यावर आज पठाणकोट कोर्टात सुनावणी करण्यात आली. आरोपीची बोन टेस्ट करण्यात आली असुन आरोपी परवेज कुमार हा सज्ञान(प्रौढ) असल्याचे टेस्ट मधून समोर आले आहे.
कठुआचे प्रकरण घटना घडल्या नंतर दोन महिन्याने उजेडात आले होते. पोलिसांच्या दिरंगाईचे गालबोट सदर खटल्यास लागले होते. लोकांच्या आणि माध्यमाच्या दबावाने खटला राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. १०जानेवारी २०१८ रोजी कठुआ येथून एका अल्पवयीन मुलीला गायब करण्यात आले होते. मुलीवर अनेक दिवस बलात्कार केला जात होता. त्यानंतर तिचे शरीर मृत अवस्थेत आढळून आले होते. सुप्रीम कोर्टाने सदरील खटला बालक न्यायालयात चालवण्याचे निर्देश दिले होते. परंतु आरोपी सज्ञान असल्याचे सिद्ध झाल्याने आता खटला सामान्य कोर्टात चालवला जाईल असे पठाण कोट कोर्टाने जाहीर केले आहे.

पुण्यातील एम.आय.टी. स्कूलवर चौकशी करुन कारवाई करणार – विनोद तावडे

thumbnail 1530783286633
thumbnail 1530783286633

मुंबई : पुणे येथील माईर्स एम.आय.टी. स्कूल प्रशासनाने बुधवारी विचित्र फतवा काढला होता. विद्यार्थ्यांवर आणि पालकांवर अनेक निर्बंध लादण्याचा प्रयत्न संस्था प्रशासनाने केला होता. त्यावर बोलताना संबंधित शाळेवर योग्य ती कारवाई केली जाईल असे राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी म्हणले आहे. पुण्याच्या सहाय्यक शिक्षण संचालकांना सदरील प्रकरणाबाबत कमिटी नेमूण योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे यावेळी तावडे यांनी सांगितले आहे.
विश्वशांती एम.आय.टी. स्कूलने फतवा काढून विद्यार्थी आणि पालक यांच्यामधे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यासंदर्भात काही पालकांनी याची शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे दाद मागीतली होती. विद्यार्थ्यांनी पांढर्या किंवा फिक्कट रंगांची अंतर्वस्त्रे खालावीत, मुलींनी लिपस्टीक लावू नये, स्कर्टची लांबी प्रमाणात असावी, इंग्रजीव्यतिरिक्त इतर भाषा बोलल्यास प्रवेश रद्द केला जाईल अशा प्रकारचे विचित्र नियम फतव्यात नमुद करण्यात आले होते.

शशी थरुर यांना आता परदेशात जाऊन गर्लफ्रेंन्ड्ना भेटता येणार नाही – सुब्रह्मन्यम स्वामी

thumbnail 1530781410219
thumbnail 1530781410219

दिल्ली : नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमूळे चर्चेत असणारे सुब्ह्रमन्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा सनसनाटी वक्तक्य केले आहे. काँग्रेसचे नेते शशी थरुर यांना आता परदेशात जाऊन त्यांच्या गर्लफ्रेंन्ड्ना भेटता येणार नाही असे त्यांनी ए.एन.आय. वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हणले आहे. दिल्लीच्या पटीयाला हाऊस न्यायालयाने सुनंदा पुष्कर खटल्यासंबधी निकाल देताना शशी थरुर यांना परदेशी जाण्यास मज्जाव केला आहे. न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय थरुर यांनी परदेशात जाऊ नये असे न्यायालयाने निकालात म्हणले आहे. दिल्ली न्यायालयाने दिलेल्या निकालावर बोलताना सुब्र्हमन्यम स्वामी यांनी सदरील विधान केले आहे. “होय, आता शशी थरुर देशाबाहेर जाऊन जगातील विविध भागात असलेल्या त्यांच्या गर्लफ्रेंड्सना भेटू शकणार नाहीत” असे स्मामी यांनी म्हणले आहे.

शशी थरुर यांना परदेशी जाण्यास दिल्ली न्यायालयाचा मज्जाव

thumbnail 1530782290534
thumbnail 1530782290534

दिल्ली : काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांना परदेशी जाण्यास न्यायालयाने मज्जाव केला अाहे. सुनंदा पुष्कर प्रकरणासंबधी निकाल देताना दिल्लीच्या पटीयाला हाऊस न्यायालयाने थरुर यांना परदेशी जाण्यास मज्जाव केला आहे. न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय थरुर यांनी परदेशात जाऊ नये असे न्यायालयाने निकालात म्हणले आहे. यामुळे शशी थरुर यांच्या परदेश दौर्यांवर निर्बंध आले आहेत. शशी थरुर यांनी सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणातील पुरावे आणि साक्ष यांच्यात लुडबूड करु नये असेही न्यायालयाने म्हणले आहे.

या ३६ हजार पदांसाठी होणार मेगा भरती

thumbnail 1530770827941
thumbnail 1530770827941

टीम HELLO महाराष्ट्र : मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी मागील २० वर्षांतील सर्वांत मोठी मेगा भरती जाहीर केली आहे. या मेगा भरतीमधे एकुण ७२ हजार रिक्त पदे भरली जाणार असल्याचे समजत आहे. भरती प्रक्रीया दोन टप्प्यांमधे राबवली जाणार असून पहिल्या टप्प्यात यंदाच्या वर्षी ३६ हजार रिक्त पदे भरली जाणार आहेत अशी माहीती आहे.

पहिल्या टप्प्यात भरण्यात येणाऱ्या ३६ हजार जागा खालीलप्रमाणे –

ग्रामविकास विभाग – ११ हजार पदे
सार्वजनिक आरोग्य विभाग – १० हजार ५६८ पदे
गृह विभाग – ७ हजार १११ पदे
कृषी विभाग – २ हजार ५७२ पद
पशुसंवर्धन विभाग – १ हजार ૪७ पदे
सार्वजनिक बांधकाम विभाग – ८३७ पदे
जलसंपदा विभाग – ८२७ पदे
जलसंधारण विभाग – ૪२३ पदे
मत्स्यव्यवसाय विकास विभाग – ९०
नगरविकास विभाग- १ हजार ६६૪ पदे

आली रे आली..मेगा भरती अाली. बेरोजगार युवकांसाठी खूशखबर!

thumbnail 1530769899119
thumbnail 1530769899119

मुंबई : बेरोजगार युवकांसाठी मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी खूशखबर जाहिर केली आहे. मागील २० वर्षांतील राज्यातील सर्वांत मोठी मेगा भरती मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. एकुण ३६ हजार जागांसाठी ही मेगा भरती होणार आहे. ३१ जुलै पर्यंत सर्व विभागांच्या जाहिराती प्रसिद्ध होतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगीतले आहे. ग्रामविकास, सार्वजणीक बांधकाम, आरोग्य, कृषी, जलसंपदा आदी विभागांतील रिक्त पदांसाठी जाहिरात दिली जाईल. ‘शासनाच्या सर्व विभागांनी ३१ डिसेंबर २०१८ अखेर होणार्या एकुण रिक्त पदांची माहीती राज्य सरकाला १७ जुलै पर्यंत द्यायची आहे. त्यानंतर या महिणअखेरीस साधारण ३६ हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर केली जाईल’ अशील माहीती देण्यात आली आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या परिक्षा एकाच वेळी घेण्यात येतील असेही सांगण्यात आले आहे.

आषाढी वारीचा सोहळा आज पासून सुरु, संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूवरुन प्रस्थान

thumbnail 1530767104213
thumbnail 1530767104213

देहू : आज पासून आषाढी वारीचा सोहळा सुरु झाला आहे. श्री क्षेत्र देहूहून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. देशभरातील वारकरी विठ्ठलाचा गजर करत सोहळ्यात दाखल होत आहेत. यंदा पावसाने दमदार हजेरी लावली संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होऊन निगडीमार्गे पालखी ६ जुलैला आकुर्डीमधे मुक्कामास असणार आहे. ७ जुलै रोजी पुण्यातील निवडुंग विठ्ठल मंदिरात पालखीचे आगमन होणार असून ९ तारखेला पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान हिणार आहे.

मुलींनी कोणत्या रंगाची अंतर्वस्त्रे घालायची ते आता महाविद्यालय प्रशासन ठरवणार, पुण्याच्या एम.आय.टी. स्कुलचा अजब फतवा

thumbnail 15307262206531
thumbnail 15307262206531

पुणे : एम.आय.टी. संस्था प्रशासनाने विद्यार्थी आणि पालकांसाठी अजब आचारसंहिता लागू केली आहे. संस्थेने घालून दिलेले जगावेगळे नियम वाचल्यानंतर आपण भारतात आहोत की तालिबानमध्ये असा प्रश्न आचारसंहिता वाचणार्याला पडतो आहे. या नियमावलीत एका पेक्षा एक सरस नियम लागू करून विद्यार्थी आणि पालकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न महाविद्यालय प्रशासनाने केला आहे.
”मुलींनी पांढरी किंवा क्रीम रंगाची अंतर्वस्त्रे घालावीत.” हा पहिला नियम. यातून त्यांना काय साध्य करायचे आहे हे त्यांनाच माहीत. मुलींनी लिपस्टिक/लिपबाम लावून शाळेत यायचे नाही. कानातील आभूषणे सोडून कोणतीच आभूषणे परिधान करायची नाहीत. असे अनेक नियम आचारसंहीतेत नमुद केले आहेत. यामुळे महाविद्यालयातील मुलींच्या स्वातंत्र्यावरच गदा आली आहे.
मुलांनी कोणत्याच राजकीय सामाजिक धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हायचे नाही. विद्यार्थी जर दहा वेळा इंग्रजी व्यतिरिक्त अन्य भाषेत बोलताना आढळला तर त्याचा प्रवेश रद्द केला जाणार. या अशा नियमांमुळे विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध आले आहेत. आचारसंहितेतील कोणत्याही नियमाचा भंग अथवा शाळेच्या विरोधात आंदोलन केल्यास त्या विद्यार्थ्याच्या पालकांवर फौजदारी खटला भरला जाईल असेही नियमावलीत म्हणले आहे.
विद्येचे माहेरघर म्हणुन ओळख असलेल्या पुण्यामधे अशा प्रकारचा फतवा निघाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विविध विद्यार्थी संघटना एम.आय.टी. प्रशासनाच्या या तालिबानी फतव्याचा विरोधात आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत.

निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, ७२ हजार पदांसाठी मेगा भरती जाहीर

thumbnail 1530717944578
thumbnail 1530717944578

मुंबई : पुढील वर्षी येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांना डोळ्यासमोर ठेऊन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. तरुणाईला आकर्षीत करण्यासाठी व बेरोजगारी कमी करण्यासाठी सरकारने मेगा भरती जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली मेगा भरती ही मागील वीस वर्षांतील सर्वात मोठी मेगा भरती ठरणार आहे.
२०१९ हे निवडणुकांचे वर्ष असल्याने सर्वच पक्ष आता निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. भाजपने बेरोजगारीला उतारा म्हणून सर्व खात्याची मेगा भरती काढली आहे. बेरोजगारी मुळे सरकारवर तरुण नाराज आहेत. या नाराजीला थोडासा दिलासा म्हणून ही मेगा भरती आखली असल्याचे बोलले जात आहे. तसेच या मेगा भरतीची अधिसूचना ३१ जुलै पर्यंत सुटणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. एकुण ७२,००० जागांसाठी मेगा भरती होणार असून ती दोन टप्प्यात होणार असल्याचेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगीतले आहे.