Saturday, December 6, 2025
Home Blog Page 6763

शिवसेनेची दुटप्पी भूमिका, बुलेट ट्रेनला विरोध पण २५० कोटींच्या पुरवणी मागणीला पाठींबा

thumbnail 1530715695219
thumbnail 1530715695219

मुंबई : राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधी मंडळात निधीचा पुरवणी मागणी प्रस्ताव मांडला आहे. बुलेट ट्रेनला सतत विरोध करणारी शिवसेना या पुरवणी मागणीतील २५० कोटी खर्चाच्या मागणीच्या प्रस्तावर गप्प आहे. मात्र त्याचवेळी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी २५० कोटींच्या मागणीचे समर्थन केले आहे. यामुळे शिवसेनेच्या भुमिकेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे.
‘आमचा बुलेट ट्रेनला विरोध आहे. सभागृहात हा विषय चर्चेला आल्यास आम्ही विरोध करू’ असे शिवसेना नेते अनिल परब याणी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले असूनसुद्धा केसकर यांनी अर्थमंत्र्यांच्या मागणीचे समर्थन केल्याने शिवसेना तोंडावर पडली आहे. यातून शिवसेनेचा दुटप्पीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.

धुळे हत्याकांडा संदर्भात पुण्यात निषेध मोर्चा, भटके विमुक्त संघटना व सुराज्य सेनेचा सहभाग

thumbnail 1530844717216
thumbnail 1530844717216

पुणे : मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून धुळे जिल्हातील साक्री तालुक्यात जमावाने पाच जणांना मारहाण केली होती. त्यामधे गोसावी समाजातील पाच जणांचा बळी गेला होता. मृत्यु झालेले पाचही जण भटक्या विमुक्त जमातीतील होते. त्यांच्या पोशाख आणि दिसण्यावरून ते मुलांची तस्करी करणारे असल्याच्या संशय आल्याने जमावाने त्यांना बेदम मारहाण केली होती. त्या घटनेचे पुण्यात पडसाद उमटले असून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर डवरी, गोसावी, वाल्मिकी समाजाच्या लोकांनी आज मोर्चा काढला. खुनींना तीव्र शिक्षा ठोठावून पीडितांना न्याय मिळवून दिला जावा अशी मागणी या मोर्चाद्वारे प्रशासनाकडे करण्यात आली आहे. याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.

राईनपाडा, धुळे येथील निरपराध भटके विमुक्त भारतीय नागरिकांच्या हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी भटके विमुक्त महिला अधिकार आंदोलन, भटके विमुक्त जाती जमाती मानव सेवा प्रतिष्ठान, सुराज्य सेना आदी समविचारी संघटना एकत्र आल्या आहेत. धुळे हत्याकांडाचे राज्यभर पडसाद उमटत असून समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांतून त्या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे.

बाॅलिवूड अभिनेत्री सोनाली बेंन्द्रे कॅन्सरने ग्रस्त

मुंबई : अभिनेता इर्फान खानच्या आजाराने दुखात असलेल्या बाॅलिवूडला आता आणखीन एक दुख;त बातमी आहे. इर्फान पाठोपाठ आता बाॅलिवूड अभिनेत्री सोनाली बेन्द्रेला कॅन्सर झाला असल्याचे समोर आले आहे. सोनाली बेंन्द्रेनेच यासंदर्भात ट्विट केले आहे. त्यामधे तिला हायपर कॅन्सर झाल असल्याचे तिने म्हणले आहे. सोनाली सध्या न्युयोर्क येथे उपचार घेत आहे. सोनाली बेन्द्रेच्या कॅन्सर विकाराने बोलिवूडला मोठा हादरा बसला आहे. याअाधी मनीषा कोइराला, लीजा रे, अनुराग बासू, मुमताज इत्यादी बाॅलिवूड अभिनेत्रींना कॅन्सर झाला असल्याचे समजते.

नायब राज्यपालांना स्वतंत्र अधिकार नाहीत – सर्वोच्च न्यायालय

thumbnail 1530709006831
thumbnail 1530709006831

दिल्ली : राज्याचा प्रशासकीय प्रमुख कोण यावरुन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि नायब राज्यपाल अनिल बायजाल याच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होता. ‘दिल्लीच्या नायब राज्यपालांना स्वतंत्र अधिकार नाहीत’ असा निकाल देत आज सर्वोच्च न्यायालयाने नायब राज्यपालांना लोकांनी निवडूण दिलेल्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन काम करण्यास बजावले आहे. ‘प्रत्येक गोष्टीसाठी सरकारला राज्यपालांची परवानगी घेण्याची गरज नाही. नायब राज्यपालांना लोकनियुक्त सरकारच्या सल्ल्यानुसारच काम करावे लागेल’ असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल राज्यपालांसोबतच्या संघर्षात जिंकले असल्याचे बोलले जात आहे.

बीडमधे विकास कामाच्या भुमिपूजनावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने, संदिप क्षीरसागर यांनी कार्यक्रमाअाधिच फोडला नारळ

thumbnail 15307072110011
thumbnail 15307072110011

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे संदिप क्षीरसागर आणि त्यांचे चुलते भारतभुषण क्षिरसागर यांच्यातील वाद पुन्हाएकदा चव्हाट्यावर आला आहे. बीड नगरपरिषदेत भारतभुषण यांच्या गटाची सत्ता आहे. चक्रधरनगर भागात सत्ताधारी गटाच्या स्थानिक नगसेवकाने रस्ता – नाले आदी विकास कामांचा भुमिपूजन कार्यक्रम आयोजित केला होता. नगराध्यक्षांच्या शुभहस्ते रस्त्याचे भुमिपूजन होणार होते. परंतु नियोजित कार्यक्रमाच्या काहीवेळ अगोदर काकू नाना विकास आघाडीचे संदिप क्षीरसागर विरोधी गटाच्या नगरसेवकांना घेऊन तेथे दाखल झाले. ‘शहरातील विकास कामांचे श्रेय विरोधकांनाच जाते आणि त्यामुळे अशा विकास कामांचे भुमिपूजनही आम्हीच करणार’ असा पवित्रा घेत संदिप क्षीरसागर यांनी नारळ फोडून रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केला. विरोधकांमुळेच शहराचा विकास होत असल्याचा आरोप यावेळी क्षीरसागर यांनी सत्ताधार्यांवर केला. त्यामुळे परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्मान झाले होते. विकास कामांचे श्रेय लाटण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने येण्याची बीड शहरातील ही पहीलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे.

बार्शी बाजार समितीमध्ये २५ वर्षाची सोपल राजवट संपुष्टात

thumbnail 1530669652421
thumbnail 1530669652421

बार्शी : काळ पुढे जाताना स्वतःत बदल करत जात असतो असे म्हणले जाते. त्याचाच प्रत्यय काल सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत आला आहे. २५वर्ष बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीवर ज्यांनी राज्य केले त्या आमदार दिलीप सोपल यांची राजवट बाजार समितीत संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोपल गटाला ७, भाजपच्या राऊत गटाला ९, तर मिरगणे गटाला २ जागी विजय मिळाला आहे. विशेष चुरशीच्या तीन लढतीत निकाल अनपेक्षित लागले आहेत. उक्कडगाव गणातून दिलीप सोपलांचे पुतणे पराभूत झाले असून जामगाव गणातून राजेंद्र राऊत यांचे पुत्र रणवीर राऊत सर्वाधिक मताने विजयी झाले आहेत. तर शेळगाव गणात शिक्षण सम्राट बाळासाहेब कोरके आणि उद्योगपती राजेंद्र मिरगणे यांच्यात चुरशीची लढत होईल असे मानले जात असताना दोघांचाही पराभव घडवत राऊत गटाने बाजी मारली आहे.
आ.दिलीप सोपल यांनी २५ वर्षाच्या राजवटीत बाजार समितीच्या कारभरावर वचक ठेवला. गेल्या निवडणुकीत भाऊसाहेब आंधळकर यांनी अल्प प्रमाणात लढत देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु राजेंद्र राऊत त्या निवडणुकीत तटस्थ राहिल्याने निवडणुकीत सोपल विजयी ठरले. यावेळी सोपल यांना अस्मान दाखवण्यासाठी राऊत यांनी जंग जंग पछाडले आणि विजयश्री खेचून आणला.

रेल्वेने प्रवास करताय! थांबा. या रेल्वे गाड्या उद्या सुटनार नाहीत.

thumbnail 1530627788459
thumbnail 1530627788459

मुंबई : राज्यात पावसाने दमदार वापसी केल्यानंतर उद्या मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पावसाच्या इशार्याने रेल्वे प्रशासनाने काही गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतका आहे. रेल्वे प्रशासनाने पावसाचा अंदाज आणि रेल्वे ट्रेकवर साचलेले पाणी याचा विचार करून हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्या रेल्वेने प्रवास करणार्या प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. तसेच रद्द झालेल्या गाड्यांमुळे इतर गाड्यांना गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आवश्यकता नसल्यास प्रवास उद्या प्रवास टाळण्याचे अावाहन रेल्वे प्रशासनाने नागरिकांना केले आहे. पुणे मुंबई प्रगती एक्सप्रेस, सिहगड एक्सप्रेस, मनमाड मुंबई राज्यराणी एक्सप्रेस, मनमाड गोदावरी एक्सप्रेस ह्या गाड्या उद्या सुटणार नाहीत असे रेल्वे प्रशासनाने सांगीतले आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद

thumbnail 1530626427720
thumbnail 1530626427720

मुंबई : राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच नागपुर येथे विधिमंडळाचे मान्सून सत्र भरणार आहे. उद्यापासून सुरु होणार्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद बोलावून अनेक मुद्द्यांना वाचा फोडली आहे. मुख्यमंत्र्यांनी आयोजीत केलेल्या सर्वपक्षीय चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकल्याचे प्रकरण गाजत असतानाच मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद बोलवून विरोधकांची बोलती बंद केली असल्याचे बोलले जात आहे.

मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे –
१.बोंडआळी ग्रस्त शेतकऱ्यांना २,१०० कोटी रुपयांची रक्कम वितरित
२.धुळ्यात अफवेतून झालेल्या हत्यांचा खटला जलद गती न्यायालयात चालवला जाणार.
३.शेवटच्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळे पर्यंत कर्जमाफी योजना सुरू राहणार.३१ऑक्टोबर पर्यंत कर्जमाफीची कार्यवाही उरकून घेण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश
४.सिडको भूखंड घोटाळ्या संदर्भात विरोधक मागणी करतील ती समिती नेमुन चौकशी केली जाणार.
५.रेल्वेच्या पुलांचे ऑडिट पूर्ण झालेले नाही त्यातूनच अंधेरी रेल्वे स्थानकाच्या गोखले पुलाची दुर्घटना घडली असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

मुंबईत पूल कोसळल्याने रेल्वे वाहतूक ठप्प, ५ जण जखमी

thumbnail 1530603240478
thumbnail 1530603240478

मुंबई : अंधेरी येथे रेल्वेस्थानकाजवळील पादचारी पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना झाली आहे. विलेपार्ले ते अंधेरी दरम्यान असलेल्या गोखले पूलाचा काही भाग अतिवृष्टीमुळे कोसळला आहे. यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतुक ठप्प झालेली आहे. दुर्घटनेत ५ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सरकारी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. मुंबईतील लोकलवर याचा परिणाम होणार आहे. मुंबईतील वाहतुक सुरळीत चालावी याकरता जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे मदत कार्यात अडथळे येत असून सध्या रेल्वे लाईनवर पडलेला पूलाचा भाग काढण्याचे काम चालू आहे. रेल्वेवाहतूक सुरळीत चालू होण्यास साधारण सहा ते सात तास लागतील असा अंदाज आहे.

धुळे हत्याकांडाला जबाबदार कोण?

thumbnail 1530596764507
thumbnail 1530596764507

टीम HELLO महाराष्ट्र : धुळे जिल्ह्यातील राईनपाडा गावात जमावाने केलेल्या मारहाणीत रविवारी पाच जणांचा मृत्यू झाला होता. लहान मुलांचे अपहरण करत असल्याच्या संशयावरुन जमावाने पाच जणांना बेदम मारहान केली होती. पोलीस घटनास्थळी उपस्थित असूनसुद्धा ते जमावाला रोखू शकले नाहीत. या घटनेने संपुर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकले आहे. या धुळे हत्याकांडाला जबाबदार कोण असा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे. हत्या करणारा जमाव, परिस्थितीवर ताबा न मिळवू शकलेले पोलीस प्रशासन, सोशल मिडियावर अफवा पसरवणारे बिनडोक लोक की बेजबाबदार सरकार? तसे पाहीले तर केवळ शंकेतून मारहान करुन त्या पाच जणांचा जीव घेणारा जमाव प्राथमिकदृष्ट्या दोषी आहे. त्याचसोबत अफवांचे बीज पेरणारेही या घटनेला जबाबदार आहेत. घटनास्थळी दाखल असलेले पण काहीच करु न शकलेले पोलीसही तितकेच दोषी आहेत. अशा घटनांचे पेव सुटलेले असताना आणि राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले असताना गृहखात्याला स्वतंत्र मंत्री नसणे हे पण यामागील एक कारण आहे. त्यामुळे यात सरकारलाही दोषी ठरवायला हवे.

सोशल मिडियावर अफवा पसरवणारे –
लहान मुले पळवणारी एक टोळी पंचक्रोशीत सक्रीया असल्याची अफवा सोशल मिडीयातून पसरली होती. व्हाॅट्सअॅप, फेसबुक अशा सोशल मिडियावर आलेली माहितीची विश्वासार्हता न पडताळता ती तशीच पुढे पाठवण्याने अफवेला आणखीनच खतपाणी मिळाले. शिवाय मेडिया लाईव्ह नावाच्या स्थानिक न्युजपोर्टलने लहान मुले पळवणारी टोळी पंचक्रोशीत सक्रीया असल्याची बातमी केल्याने ती चांगलीच व्हायरल झाली. अफवा वार्यासारखी कमी कालावधीत अनेकांपर्यंत गावोगावी पोहोचली. त्यामुळे साक्री तालुक्यात खबराटीचे वातावरण तयार झाले होते. गावागावातील लोक अशा टोळीवर नजर ठेवून होते. अनोळखी आणि परक्या माणसांबद्दल संशय व्यक्त केला हात होता. यातूनच रविवारी राईनपाडाच्या बाजारात भिक्षा मागायला आलेल्या पाच जणांवर संशय घेतला गेला.

जमाव –
राईनपाडा गावचा बाजार असल्याने रविवारी आसपासच्या गावचे शेकडो लोक बाजाराला आले होते. बघता बघता त्या पाच जणांभोवती बघ्यांची गर्दी गोळा झाली. साक्रीत बोलली जाणारी अहिराणी मुळच्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्याच्या असलेल्या त्या पाच जणांना समजत नव्हती. गोसावी समाजातील त्या पाच जणांची भाषा जमावाला लक्षात येत नव्हती. यातून जमावाचा संशय आणखीनच बळावला आणि गर्दीतील लोकांनी त्या पाच जणांना बेदम मारहान करण्यास सुरवात केली. पुढे गावचे सरपंच व पोलीस पाटील घटनास्थळी आले तरी जमावाची मारहान चालुच होती. शेवटी रक्तबंबाळ झालेल्या त्या पाच जणांना ग्रामपंचायतच्या इमारतीत हलवण्यात आले. परंतु चिडलेला जमाव तेथीही आला आणि दरवाजा खिडक्या मोडून आतमधे शिरला आणि पुन्हा मारहान सुरु झाली. अशात पोलीस तिथे दाखल झाले. परंतु जमावाने पोलीसांना न जुमानता मारहान सुरुच ठेवली. काहींनी पोलींसांनाही मारहान केली. रक्तबंबाळ होऊन विव्हळणार्या त्यांना जमावाने निर्दयपणे मारहान केक्याने त्या पाच जणांचा मृत्यु झाला. इथे जमावाने कायदा हातात घ्यायला नको होता. पोलीसांशी संपर्क न करता लोकांनी थेट कायदा हातात घेऊन मारहान करणे चुकीचे आहे.

पोलीस प्रशासन –
योग्य वेळी घटनास्थळी दाखल होऊनसुद्धा पोलीसांना परिस्थिती आटोक्यात आणता आली नाही. पोलीसांनदेखत सारे घडत असताना त्यांना बघ्याची भुमिका बजावावी लागली. कायदा व सुव्यवस्था राखणे पोलीस प्रशासनाचे काम आहे. परंतु साक्री तालुक्यातील घटनेत पोलीस प्रशासन सपशेल फेल गेले. संतप्त जमावाने पोलीसांना न जुमानता कायदा हातात घेतला.

सरकारचा बेजबाबदारपणा –
अशा घटनांचे पेव सुटलेले असतानासुद्धा सरकारतर्फे त्यावर कोणतीच उपाययोजना केली जात नाहीये. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले आहेत. तरीही गृहखात्याला स्वतंत्र मंत्री देण्यात आलेला नाही. गृहखात्याला स्वतंत्र मंत्री नसल्यामुळे पोलीस प्रशासनावर कोणाचाच वचक राहीलेला नाही.