सुखद ! जायकवाडी धरणातील पाणीसाठा ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढला

0
35
jayakwadi damn
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | शनिवारी जायकवाडी धरणात नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून सोडलेले पाणी दाखल झाले आहे. यामुळे जलसाठा 38.35 टक्के एवढा झाला आहे. पहिल्यांदाच नाशिक जिल्ह्यातील पाण्याचे आगमन झाल्यामुळे जायकवाडी परिसरात आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे.

‘नाशिक जिल्ह्यातील ज्या धरणात प्रचलन आराखड्यापेक्षा जास्त जलसाठा झाला अशा धरणातून विसर्ग करण्यात येत असल्याने जायकवाडी धरणात नाशिकच्या पाण्याची आवक सुरू झाली आहे असे दगडी धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले. जायकवाडी धरणाच्या उर्ध्व भागातील धरणामध्ये करंजवण 22.14, वाघाड 47.52,ओझरखेड 25.77, गंगापूर 76.96,गौतमी 56.16, पालखेड 55.76, कश्यपी 47.85, कडवा 61.2, दारणा 76.39, भावली 100, मुकणे 49.21, नांदूर मधमे्श्वर वेअर 96.50, भंडारदरा 82.39, निळवंडे 43.75, मुळा 50, पुणेगाव 7.24, तीसगाव 0.50, वालदेवी 100,आढळा 43.28, वाकी 40.12, भाम 76.42, आळंदी 70.47,आणि भोजापूर 14.98 टक्के एवढा जलसाठा आहे.

नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून होणारे विसर्ग घटविण्यात आले असल्यामुळे जायकवाडीत येणारी आवक घटत असल्याचे दिसून आले. शनिवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास गंगापूर धरणातून 2090 होणारा विसर्ग 524 क्युसेक्स पर्यंत घटविण्यात आला. दारणातून 5540 होणारा विसर्ग 3120 क्युसेक्स व नांदूर मधमे्श्वर मधून गोदावरी पात्रात होणारा 9667 विसर्ग 5778 क्युसेक्स पर्यंत घटविण्यात आल्याने जायकवाडी धरणात येणारी आवक घटणार असल्याचे धरण अभियंता विजय काकडे व बंडू अंधारे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here