RSS ही दहशतवादी संघटना, त्यावर बंदी घाला – राजरत्न आंबेडकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित खळबळजनक वक्तव्य केलं आहे. तुम्ही लोकांनी माझा पाकिस्तानातील व्हिडिओ पाहिला असेलच. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतातील दहशतवादी संघटना आहे असं मी म्हणालो होतो. आरएसएसवर बंदी घाला. माझ्याकडे पुरावे आहेत, असं राजरत्न म्हणाले. #WATCH Rajaratna Ambedkar, Dr BR Ambedkar’s great-grandson, … Read more

CAA विरोधात ठराव मंजूर करणारे पश्चिम बंगाल ठरले पाचवे राज्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोलकाता केरळ, पंजाब आणि राजस्थानानंतर आता पश्चिम बंगाल सरकारने नागरिकत्व कायदा (सीएए) विरोधात प्रस्ताव पास केला आहे. दरम्यान, सीएएविरोधातील ठरावावर ममता बॅनर्जी यांनी विधानसभेत आपल्या भाषणात म्हटले आहे की, ‘क्षुल्लक मतभेद बाजूला ठेवून देश वाचविण्यासाठी एकत्र करण्याची वेळ आली आहे. सीएए हा लोकविरोधी आहे, हा कायदा त्वरित रद्द करावा. ममता बॅनर्जी … Read more

खुशखबर : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकारची नवीन योजना, दहा हजार कोटी रुपये खर्च करणार !

नवी दिल्ली : गेल्या वर्षी त्यांच्या पहिल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी येत्या 5 वर्षात देशभरातील शेतकऱ्यांसाठी एकूण 10 हजार शेतकरी उत्पादक संस्था तयार करण्याची घोषणा केली. तथापि, त्यांनी सरकारच्या या उपक्रमाची माहिती दिली, परंतु कोणताही निधी घोषित केला नाही. आता १ फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात सरकारने या योजनेबाबत सविस्तर माहिती द्यावी अशी अपेक्षा आहे. … Read more

कराटे चॅंपियन बायकोने नवऱ्याचा मोडला पाय; नवरा म्हणतोय, मला बायकोपासून वाचवा….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सोशल मीडियावर एका व्यक्तीने कराटे चॅम्पियन मुलीशी प्रेमळ गप्पा मारल्या, त्यानंतर तिला आपला जीवनसाथी बनविले. पण त्यानंतर त्या व्यक्तीच्या आयुष्यात भूकंप झाला. जेव्हा जेव्हा बायकोबरोबर क्षुल्लक भांडण व्हायचे तेव्हा बायको तिच्या नवऱ्यावर कराटे कौशल्याचा प्रयत्न करीत असे. शनिवारी या दोघांमधील हाणामारी इतकी वाढली की नवऱ्याचा पाय फ्रॅक्चर झाला. नवरा व्हीलचेयरवरुन बहाल्फ … Read more

CAA, NRC लागू होणं हा जिनांचा विजय- शशी थरुर

भारतात नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिकता नोंदणी आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी लागू करण्याचा विचार केला तर ती देशाची दुसरी फाळणी ठरेल अशी भीती शशी थरुर यांनी व्यक्त केली आहे. जयपूर साहित्य संमेलनात ते बोलत होते.

विधानपरिषद बरखास्तीचा आंध्र प्रदेश सरकारचा निर्णय; विधानपरिषदेत संख्याबळ नसल्यामुळे घेतला निर्णय?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आपल्या झुंजार पदयात्रांनी राज्यभर काढलेल्या दौऱ्यांतून आंध्रप्रदेशची सत्ता काबीज केलेल्या वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्या सत्ताधारी वायएसआर काँग्रेस सरकारने राज्य विधीमंडळातील विधान परिषद बरखास्त करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. सोमवारी सकाळी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. वाएसआर काँग्रेसचे आमदार गुडीवडा अमरनाथ यांनी ही माहिती दिली. यापूर्वी मुख्यमंत्री वायएस जगन … Read more

एअर इंडियाची विक्री करणे देशविरोधी; भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी जाणार न्यायालयात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : एअर इंडियाच्या विक्रीची तयारी सुरू झाली आहे. सोमवारी मोदी सरकारने प्राथमिक माहिती असलेले निवेदन प्रसिद्ध केले. भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी सरकारच्या या प्रस्तावाविरोधात उभे राहिले आहेत.भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्वीटद्वारे या निर्णयाला विरोध दर्शवित असे म्हटले आहे की, हा करार पूर्णपणे देशविरोधातील आहे आणि मला कोर्टात जाण्यास भाग पाडले जाईल. … Read more

मला हिंदुहृदयसम्राट म्हणू नका, तो मान बाळासाहेबांचा – राज ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ‘मला हिंदुहृदयसम्राट म्हणू नका, तो मान फक्त बाळासाहेबांचा आहे’, अशी ताकीद राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिली आहे.मुंबईत रंगशारदा येथे आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. पण राज ठाकरे यावेळी बैठकीत केवळ १० मिनिटे उपस्थित होते. राज ठाकरे यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या … Read more

.. तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू- अशोक चव्हाण

सोनिया गांधी यांचा तीन पक्षांच्या सरकारला विरोध होता. परंतु, आम्ही त्यांना राजी केले. मात्र, सरकार स्थापन करत असताना आम्ही घटनाबाह्य काम करणार नाही, असे शिवसेनेकडून लिहून घेतले. सेनेने जर उद्देशिकबाहेर काम केले तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, असा इशारा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिला आहे. नांदेडमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

काँग्रेसकडून पंतप्रधान मोदींना प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधान प्रत भेट

देशात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या पार्श्वभूमीवर तणावाचं वातावरण अद्यापही पहायला मिळत आहे. याचीच परिणीती प्रजासत्ताक दिनादिवशीही पाहायला मिळाली. काँग्रेस पक्षानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संविधानाची प्रत भेट म्हणून पाठवली आहे. नवी दिल्लीतील केंद्रीय सचिवालयाच्या पत्त्यावर अ‍ॅमेझॉनवरून संविधानाची प्रत काँग्रेसने भेट म्हणून पाठवली आहे. या प्रतची किंमत १७० रूपये असून पे ऑन डिलिव्हरीच्या माध्यमातून पाठवल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना ही रक्कम भरावी लागणार आहे.