मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव यांच्यासमोर असणार ‘हे’ मोठं आव्हान

महिनाभरापासून सुरु असलेल्या राजकीय सत्ता नाट्यावर अखेर पडदा पडला. बहुमत सिद्ध करू न शकल्याकारणाने भाजपा सरकार कोसळले आणि महाविकासआघाडीला सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला. याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. मात्र मुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर सर्वात मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे.

उपमुख्यमंत्रिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून ‘हे’ नाव निश्चित

मुंबई प्रतिनिधी | राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार हे निश्चित झाले असून मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरेंचे नावही निश्चित झाले आहे. बुधवारी रात्री यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे तर विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे देण्याचे निश्चित झाले आहे. उपमुख्यमंत्रिपदासाठी राष्ट्रवादीत जोरदार रस्सीखेच सुरु असून अजित पवार आणि जयंत … Read more

काँग्रेस ‘या’ पदासाठी उपमुख्यमंत्रिपदही सोडायला तयार, खातेवाटपावरुन वाद कायम

विशेष प्रतिनिधी | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार हे निश्चित झाले असले तरी अद्याप खातेवाटपावरुन खलबते कायम आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील खातेवाटपाच्या वादावर अद्याप तोडगा निघालेला नाही. यशवंतराव चव्हाण सेंटर मधील काँग्रेस राष्ट्रवादीची बैठक तब्बल तीन तासांनी संपली. मात्र खातेवाटपाबाबत कोणत्याही नेत्याने प्रसारमाध्यमांना माहिती दिलेली नाही. काँग्रेस राष्ट्रवादी विधानसभेच्या अध्यक्ष पदाबाबत आग्रही असल्याचं … Read more

आम्ही प्रश्न विचारले म्हणूनच फडणवीस सरकार पडले, प्रकाश आंबेडकर यांचा दावा

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या बाबतीत वेगवेगळी मतांतरे पुढं येत असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नव्या सरकारबद्दल आपली प्रतिक्रिया एक विडिओ जारी करत दिली आहे. या प्रतिक्रियेत अजित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा आधार घेत आंबेडकर यांनी एक मोठ विधान केलं. भाजपसोबत जाण्याचा निर्णय हा निवडणुकीपूर्वीच झाला होता असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं होत. याबाबत ‘आम्ही वारंवार सरकारला प्रश्न विचारात राहिलो त्यामुळंच फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागला’ असा दावा आंबेडकर यांनी दिला.

एकनाथ खडसे यांनी केला फडणवीस यांच्यावर शाब्दिक वार..

शिवसेना उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यान मुख्यमंत्री होणार असल्याचं निश्चित झालं आणि देवेंद्र फडणवीस यांना आपल्या औटघटकेच्या मुख्यमंत्रीपदाचा अखेर राजीनामा द्यावा लागला. ज्या अजित पवार यांच्या पाठिंब्याने फडणवीस रातोरात मुख्यमंत्री बनले होते. त्या अजित पवार याना आपल्यामागे कोणी नाही याची जाणीव झाली आणि अखेर नामूशकीतून त्यांनी राजीनामा दिला. मात्र, त्यामुळं मी पुन्हा येईन असा आत्मविश्वास असणाऱ्या फडणवीस यांचा पुन्हा हिरमोड झाला. आधी विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यानं त्यांच्या नैतृत्वावर पक्षात दबक्या आवाजात टीका होती. परंतु, फडणवीस यांच्या वागणुकीतून दुखावलेले अनेकजण आता फडणवीस यांच्या नाचक्कीनंतर खुलेआम आता त्यांच्यावर शरसंधान साधत आहेत.

पलट के आऊंगी, मौसम जरा बदलने दो – अमृता फडणवीस

मुंबई | भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दुपारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनतर फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी त्यांच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर एक हटके फोटो शेअर केला आहे. पलट के आऊंगी शाखों पे खुशबुएँ लेकर, खिजा की जद में हूँ मौसम जरा बदलने दो! असं कॅप्शम अमृता फडणवीस यांनी दिले आहे. मिस फडणवीस यांच्या … Read more

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांची निवड; शिवतीर्थावर घेणार शपथ

मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा ठराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी मांडला. या ठरावाला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या सर्व आमदारांनी एकमताने अनुमोदन दिले. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची एकमताने निवड झाली. उद्धव ठाकरे यांचा शपथविधी एक डिसेंबर रोजी शिवतीर्थ … Read more

विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे कालिदास कोळंबकर

मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्र विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी विधानसभेतील ज्येष्ठ सदस्य कालिदास निळकंठ कोळंबकर यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शपथ दिली. महाराष्ट्राच्या आजच्या राजकीय घडामोडींचा वेग बघता अनेक गोष्टी ह्या वेग घेत आहेत. कालिदास कोळंबकर हे वडाळा विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. त्यांनी आतापर्यंत आठ वेळा या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीच्या … Read more

राज्यातील सत्तानाट्य संपले; देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा

मुंबई प्रतिनिधी । आजचा दिवस हा राज्याच्या राजकारणातील सर्वाधिक वेगवान घडामोडी घडणारा ठरला आहे. अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला आहे. अजितदादा यांच्या राजीनाम्यानंतर आमच्याकडे बहुमत नसल्याने आम्ही सत्तेमध्ये राहु शकत नाही, असे कारण पुढे करत फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये राजीनाम्याची घोषणा केली. पत्रकार परिषदेमध्ये फडणवीस म्हणालेत, “काही … Read more

अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा

मुंबई प्रतिनिधी । शपथविधी होऊन तीन दिवस होत नाही तोच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीतून बंडखोरी करत भाजप सोबत गेलेले पवार यांनी आज अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आज अनेक वेगवान घडामोडी घडत आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आजच्या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात आता सत्तापेच सोडविण्यासाठी 24 तास बाकी असतांना … Read more