बेलापूर विधानसभेची जागा शिवसेना लढणार, आदित्य ठाकरेंचे संकेत

ठाणे प्रतिनिधी | युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा आज नवी मुंबईत दाखल झाली. बेलापूर आणि ऐरोली विधान सभेत यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी भाषण करताना बेलापूर विधानसभा मतदार संघात मी परत सभेसाठी येणार असून निवडणुकी नंतर विजयी मेळावा घेणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या नवी मुंबईत … Read more

युतीसाठी शिवसेनेचा नवीन फॉर्म्युला ; भाजपच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

मुंबई प्रतिनिधी |  भाजप शिवसेना युतीच्या चर्चा सध्या अशा वळणावर आल्या आहेत कि कधी ही युती तुटू शकते अथवा कधीही युती अंतिम होऊ शकते. शिवसेना कमी पणा घ्यायला तयार नाही आणि भाजप शिवसेनेला अधिकच्या जागा देण्यास तयार नाही अशा स्थितीत युतीचे काय होणार हा यक्ष प्रश्न आहे. शिवसेना भाजप युतीचा शिवसेनेने नवीन फॉर्म्युला भाजपसमोर ठेवला … Read more

काँग्रेस सोडलेल्या उर्मिला मातोंडकर शिवसेनेच्या वाटेवर

मुंबई प्रतिनिधी | राजकारण कोणता व्यक्ती कोणत्या पक्षात जाईल याबद्दल काहीच सांगता येत नाही. राजकीय विचारधारा हि बाब कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे. अशाच पक्षांतराच्या वादळात काँग्रेस सोडलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या सोबत फोन वरून चर्चा केल्याचे देखील … Read more

राजकारणात जातीचे कार्ड खेळणाराला गडकरी म्हणतात

नागपूर प्रतिनिधी | भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जातीय राजकारणावर चांगलेच तोंड सुख घेतले आहे. जेव्हा लोक स्वकर्तृत्वावर तिकीट मिळवण्यात अपयशी ठरतात तेव्हा ते जातीच्या आधारावर तिकीट मागू लागतात हे अयोग्य आहे असे ठोक मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. नागपुरात माळी समाजाने आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. महात्मा फुले शिक्षण … Read more

सांगलीत विधानसभा उमेदवारीवरून आयारामांविरुद्ध भाजप निष्ठावान आक्रमक

सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे सांगलीत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या उमेदवारीवरून संघर्ष उफळण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये ऐन वेळी आलेल्यांना आणि आयात केलेल्यांनाच उमेदवारी दिली जात आल्याचा आरोप होत असतानाच आता पक्ष वाढीसाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी आवाज उठवण्यास सुरवात केली आहे. बुधगाव मध्ये भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या महाजानदेश यात्रेबाबत कार्यकर्त्यांची बैठक घेतली … Read more

मुख्यमंत्र्यांनी सातारकरांची मने जिंकली – शिवेंद्रराजे भोसले

सातारा प्रतिनिधी | छत्रपतींनी मागण्या करायच्या नाहीत आदेश द्यायचे असे वक्तव्य काल मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी साताऱ्यात महाजनादेश यात्रेच्या सभे दरम्यान केले होते हे वक्तव्य करून 24 तासाच्या आत मुख्यमंत्र्यांनी छत्रपतींनी केलेल्या मागण्या मान्य करून सातरकरांची मने जिंकली आहेत. सातारच्या हद्दवाढीचे घोंगडे गेली कित्येक वर्षे भिजत पडले होते त्या बाबत या आधी सुद्धा शिवेंद्रराजेंनी मुख्यमंत्र्यांना … Read more

पवारांच्या राज्यव्यापी दौऱ्याच्या शुभारंभाला भुजबळांची दांडी ; राजकीय चर्चाना पुन्हा उधाण

नाशिक प्रतिनिधी |  आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे घोंगावते आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी आतापर्यंत भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला. हे पाहता ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. आता संकटात सापडलेल्या राष्ट्रवादीला नवसंजीवनी देण्यासाठी शरद पवार हे राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. शरद पवार यांच्या दौऱ्याला आज (सोमवार) नाशिकमधुन सुरूवात झाली आहे. एकीकडे … Read more

अर्थमंत्री सीतारमन यांचे ‘ते’ वक्तव्य बेजबाबदारपणाचे – पृथ्वीराज चव्हाण  

पुणे प्रतिनिधी  |‘प्रवासासाठी आता ओला-उबरसारख्या वाहतुकीच्या सुविधांना प्राधान्य दिले जात असल्याने वाहन उद्योगाला विक्रीतील घसरणीला सामोरे जावे लागत असल्याचे’ वक्तव्य गेल्या आठवड्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले होते. यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी केलेल वक्तव्य हे बेजबाबदार असल्याचे म्हटले आहे. सरकारचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी ओला उबर चे नाव पुढे केले जात … Read more

म्हणून उदयनराजेंच्या प्रवेशाला पंतप्रधान उपस्थित राहिले नाहीत : मुख्यमंत्री

सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहतील असे बोलले जात होते. परंतु मोदी उपस्थित राहिले नाहीत आणि सर्वांना चर्चेसाठी एक नवा विषयच मिळाला. त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साताऱ्यात पत्रकारांनी विचारना केली असता त्यांनी पत्रकारांना या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. पंतप्रधान हे पद … Read more

उदयनराजे म्हणतात ‘स्टाईल इज स्टाईल’, कमिटमेंट कायम राहणार

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे यांनी भाजप प्रवेश केल्यांनतर आपली ट्रेडमार्क असलेली कॉलर उडवली नाही, त्यामुळे भाजपमध्ये गेल्यावर राजेंना लगेचच शिस्त लागली की काय अशा चर्चा साताऱ्यात रंगू लागल्या होत्या. या चर्चाना संदर्भात उदयनराजे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, मी कधीच बेशिस्त वागत नाही, प्रत्येक व्यक्तीचा वेगळा विचार असतो. प्रत्येकाला विचार मांडण्याचा हक्क आहे. त्यामुळे कॉलर उडवणे बेशिस्त आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, ‘स्टाईल इज स्टाईल’, ती कायम राहणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांबद्दलही त्यांनी वक्तव्य केले. ते म्हणाले की, ‘मी पवारांचा आज, काल आणि उद्याही आदर करतो. कोणीही माझ्याविरोधात उभा राहू दे त्याची मला भीती नाही. असं उदयनराजे म्हणालेत.

एक बारामती आणि दुसरा कराड असे जिल्हे बनवून सातारा जिल्हा संपुष्टात आणण्याचा त्यांचा डाव होता. तो मी हाणून पाडला आहे असं म्हणत उदयनराेंनी विरोधकांवर टीका केली. तसेच पृथ्वीराज चव्हाण यांनी कुठलीच कामे करण्याचा प्रयत्न केला नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

उदयनराजे म्हणतात स्टाईल इज स्टाईल..