“पंतप्रधान गतिशक्तीमुळे कमी खर्चात प्रकल्प वेळेत पूर्ण होत आहेत” – पियुष गोयल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पीएम गति शक्तीच्या मदतीने, जिथे योजना पूर्ण करण्यासाठी कमी वेळ लागतो, तिथे खर्च देखील कमी होतो. वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी एका कार्यक्रमात बोलताना हा दावा केला. गोयल म्हणाले की,” गती शक्ती देशातील योजना एकत्रित करण्यात मदत करत आहे. त्यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यास मदत होते.”

वाणिज्य मंत्र्यांनी सांगितले की,”पीएम गति शक्तीमध्ये देशातील प्रत्येक गोष्टीचे भूस्थानिक मॅपिंग (Geospatial Mapping) तसेच विविध स्तरांवर नकाशांवर भर देण्यात आला आहे. परिणामी योजना एकत्रित केली जाते आणि असे केल्याने वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होते.” पियुष गोयल म्हणाले की,”जंगल किंवा रेल्वे मार्गामुळे रखडलेले प्रकल्प याची उदाहरणे आहेत. पण पीएम गती शक्तीमुळे हे चित्र आता बदलले आहे आणि प्रकल्प लटकत नाहीत.”

भारत एक मोठी आर्थिक शक्ती बनला
फोर्ब्स इंडिया लीडरशिप अवॉर्ड्स 2022 ला संबोधित करताना, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले की,” केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे भारताची अर्थव्यवस्था आता “नाजूक अर्थव्यवस्थेतून विश्वासार्ह अर्थव्यवस्था” बनली आहे.जागतिक अर्थव्यवस्थेत भारताला महत्त्वाचे स्थान देण्यात सरकारला यश आले आहे. भारताकडे आता जगभरात एक विश्वासू मित्र म्हणून पाहिले जात आहे.”

Leave a Comment