थकीत बिलासाठी स्वाभिमानीचा केन आग्रोवर मोर्चा

0
39
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
 स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने थकीत ऊस बिले तातडीने द्यावीत या मागणीसाठी आज केन ऍग्रो साखर कारखान्यावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी २८ जून पर्यंत बिले देतो असे लेखी पत्र कारखाना प्रशासनाच्यावतीने देण्यात आले. २८ जून पर्यंत बिले न दिल्यास २९ जून पासून कारखान्याचे अध्यक्ष आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या घरासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.
कडेपुर गावातील प्रमुख मार्गावरून हा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर मोर्चा केन ऍग्रो कारखान्यावर आला मोर्चा. कारखाना कार्यस्थळवर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी बोलताना महेश खराडे म्हणाले २०१८-१९ या चालू गळीत हंगामातील १० कोटींची ऊस बिले अद्याप दिलेली नाहीत. यासंदर्भात शेतकऱ्यांनी वारंवार कारखान्यावर जाऊन बिलाची मागणी केली आहे. मात्र बिल देण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत आहे. साखर आयुक्त कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली आहे. त्याचाही काहीही उपयोग झाला नाही.
गाळप हंगाम संपूण चार महिने झाले तरी अद्याप ऊस बिले दिलेली नाहीत. सध्या शाळा, कॉलेज प्रवेश सुरू आहेत त्यातच शेतीची मशागतीची कामे सुरू आहेत यासाठी शेतकऱयांना हक्काचे पैसे मिळणे गरजेचे आहे. मात्र हेलपाटे मारूनही बिले मिळालेली नाहीत. त्यामुळेच तातडीने बिले द्यावीत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच २८ जून पर्यंत पैसे न दिल्यास कारखाना अध्यक्षांच्या घरा समोर २९ जून पासून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा महेश खराडे यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here