अबकी बार करोडो बेरोजगार; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढलं असून याच मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष केलं आहे. केंद्र सरकारच्या ‘अब की बार मोदी सरकार’ या घोष वाक्याची त्यांनी खिल्ली उडवली आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हंटल की अबकी बार करोडो बेरोजगार, कोण जबाबदार? फक्त आणि फक्त मोदी सरकार” असं ट्वीट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं आहे. त्याचबरोबर ‘अबकी बार करोडो बेरोजगार’ यासाठी हॅशटॅग वापरला.

दरम्यान राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका करत असतात. यापूर्वीही कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी मोदी सरकार वर हल्लाबोल केला होता. यापूर्वीही ‘एक तो महामारी, उस पर प्रधान अहंकारी’ असं ट्वीट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं होतं.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment