गुड बाय मोदी, खोट्या फकीरासाठी आता फक्त 7 दिवस उरले- राहुल गांधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील लोकसभा (Lok Sabha Election 2024) निडवणुकीचा निकाल ४ जूनला लागणार असून त्यापूर्वीच सर्व राजकीय पक्षांकडून विजयाचे दावे – प्रतिदावे करण्यात येत आहेत. पुनः एकदा देशात मोदी सरकार येणार असं NDA मधील नेते म्हणत आहेत तर दुसरीकडे मोदींना हरवून देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार असा विश्वास विरोधकांना आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विट करत निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. गुड बाय मोदी, खोट्या फकीरासाठी आता फक्त ७ दिवस उरलेत असं राहुल गांधींनी म्हंटल.

राहुल गांधी यांचे ट्विट काय?

4 जूननंतर गुड बाय भाजप, गुड बाय नरेंद्र मोदी, टाटा! जनतेची फसवणूक करणाऱ्या खोट्या फकीरासाठी आता फक्त ७ दिवस उरले आहेत. भारताला मतं मिळत आहेत – नॉक नॉक नॉक! भाजपपासून देशाला स्वातंत्र्य मिळणारच, देशाचे खरे अच्छे दिन येणार आहेत – फटाफट फटाफट असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. तसेच राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील आपलं भाषण सुद्धा शेअर केलं आहे. यात ते म्हणत आहेत कि काँग्रेस पक्ष आणि समाजवादी पार्टी हे आता एकमेकांसोबत आहेत. काँग्रेसच्या पंज्याने समाजवादीची सायकल पकडली आहे त्यामुळे आपला विजय निश्चित आहे. उत्तरप्रदेशात इंडिया आघाडी भाजपला क्लीन स्वीप देणार आहे, जागांची लाईन लागणार आहे खटाखट खटाखट. ४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय नरेंद्र मोदी, टाटा!” असंही राहुल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, निवडणुकीच्या ७ व्या आणि शेवटच्या टप्प्यात म्हणजेच १ जून रोजी उत्तर प्रदेशच्या पूर्वांचलमध्ये १३ जागांवर मतदान होणार आहे. ज्यामध्ये वाराणसी, गोरखपूर, मिर्झापूर, चंदौली, घोसी, गाझीपूर, महाराजगंज, कुशीनगर, देवरिया, बांसगाव, सलेमपूर, बलिया आणि रॉबर्टसगंज जागांचा समावेश आहे. या जागा जिंकून लोकसभेत आघडी घेण्याचा प्रयत्न इंडिया आणि एनडीए आघाडीचा आहे. त्यामुळे दोन्हीकडून जोरदार प्रचार याठिकाणी पाहायला मिळाला.