गिरीश महाजनांच्या सेल्फी प्रकरणावर राज ठाकरे म्हणतात

0
42
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | राज ठाकरे यांनी आज गिरीश महाजन यांच्या सेल्फी प्रकरणावर चांगलेच तोंड सुख घेतले आहे. त्यांना परिस्थीतीचे जरा ही गांभीर्य नाही. हे निर्लज्ज लोक आहेत असे राज ठाकरे म्हणाले आहेत. राज ठाकरे याच्या या विधानानंतर पुन्हा राजकीय कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हि प्रतिक्रिया दिली असून त्यांनी पूर स्थिती मुळे निवडणुका पुढे ढकलाव्या अशी देखील मागणी केली आहे. राज ठाकरे यांनी निवडणुका पुढे ढकलून थेट पुढच्या वर्षीच घ्याव्या असे म्हणले आहे. त्याचप्रमाणे या मागणीचे आपण निवडणूक आयोगाला पत्र देखील लिहणार आहे असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील चांगलेच तोंडसुख घेतले आहे. एवढा पाऊस पडेल म्हणून अंदाज नव्हता असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्याच वक्तव्याचा धागा पकडून राज ठाकरे म्हणाले यांना भाजपच्या जागा किती येणार याचा अचूक अंदाज येतो मग पावसाचा अंदाज कसा येत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here