फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांची हायकोर्टात धाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मंत्र्यांचे फोन टँपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांना दोन वेळा समन्स बजावण्यात आला होता मात्र रश्मी शुक्ला यांनी चौकशीला सामोरे जाण्यास नकार दिला आहे. आता याबाबत रश्मी शुक्ला यांनी हैदराबाद कोर्टात धाव घेतली आहे. तसेच चौकशीला स्थगिती देण्याची मागणी केली आहे.

आयुक्त रश्मी शुक्ला यांना मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने चौकशीसाठी बोलावलं होतं 28 एप्रिल रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. पण कोरोनाचे कारण देऊन शुक्ला यांनी येण्यास नकार दिला. त्यानंतर पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आले होते. आपल्याला चौकशीसाठी बोलावण्यात येत असल्यामुळे चौकशी अधिकारी आपला छळ करत आहेत असा आरोप शुक्ला यांनी केला आहे. शुक्ला यांनी हैदराबाद हायकोर्टात 29 एप्रिल रोजी याचिका दाखल केली आहे या याचिकेवर 6 मे रोजी सुनावणी होणार आहे. असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.

काय आहे प्रकरण?

महिला आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या सध्या हैदराबाद येथे अतिरिक्त महासंचालक पदावर कार्यरत आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून त्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत. दरम्यान एम एस आयडी मध्ये कार्यरत असताना त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केले आहेत असा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करत पोलिस दलात बदल्या करण्यासाठी अनेक फोन कॉल केले गेले होते असा आरोप केला होता तसेच त्यांनी एका अहवाल सुद्धा वाचून दाखवला होता एवढंच नाही तर याचा पुरावा केंद्रीय गृह सचिवांकडे देण्यात आला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने या प्रकरणी चौकशी केली असता लक्ष्मी शुक्ला यांच्याकडून माहिती लिक झाल्याचे निदर्शनास आलं होतं. एवढंच नाही तर रश्मी शुक्ला यांनी दहशतवादी प्रकरणासाठी फोन टॅप करण्यासाठी परवानगी घेतली होती पण त्याचा गैरवापर केला. शुक्ला यांनी रितसर फोन टॅप करण्यासाठी परवानगी घेतली होती. दहशतवादी प्रकरणांमध्ये पुरावे शोधून काढण्यासाठी त्यांनी ही परवानगी घेतली होती पण हे करत असताना रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांचे फोन सुद्धा टाईप केले आहे. असा आरोप काही मंत्र्यांनी केलाय. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याबद्दल गंभीर आरोप सुद्धा केले आहेत रश्मी शुक्ला या भाजपासाठी काम करत असल्याचा आरोप मंत्री नवाब मलिक यांनी केला त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन पुराव्यासकट आरोप केले आहेत.

शिरूर चे अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर यांनी महाविकासआघाडी मध्ये न जाता भाजपबरोबर राहावे यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली त्यांना फोन केले व त्यांच्यावर दबाव आणण्याचा देखील प्रयत्न केला होता असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.

Leave a Comment