RCB New Captain : इंडियन प्रीमियर लीगच्या लोकप्रिय फ्रँचायझींपैकी एक असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पुढील हंगामासाठी आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. अपेक्षेप्रमाणे संघ व्यवस्थापनाने ही जबाबदारी रजत पाटीदार याच्यावर सोपवली आहे. विराट कोहलीने कर्णधारपद सोडले तेव्हापासून दक्षिण आफ्रिकेचा फाफ डू प्लेसिस संघाचे नेतृत्व करत होता. गेल्या वर्षी, मेगा लिलावापूर्वी आरसीबीने डू प्लेसिसला सोडले होते.
RCB ला IPL 2025 साठी नवीन कर्णधाराची गरज आहे. कोहलीला तार्किक निवड वाटते कारण त्याने यापूर्वी दीर्घकाळ फ्रेंचायझीचे नेतृत्व केले आहे. विराट कोहली संघाचा कर्णधार म्हणून पुनरागमन करू शकतो, असे म्हंटले जात होते. मात्र या सगळया चर्चांवर अखेर पाणी फेरले गेले असून संघाच्या कॅप्टन पदाची जबाबदारी अखेर रजत पाटीदार याच्यावर सोपवली आहे.
एवढेच नाही तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा स्टार खेळाडू आणि माजी कर्णधार विराट कोहली याने रजत पाटीदारला संघाचा नवा कर्णधार झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. त्याने त्याच्या चाहत्यांना त्यांच्या नवीन कर्णधाराला पाठिंबा देण्याची विनंती केली आहे.
The next captain of RCB is…
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) February 13, 2025
Many greats of the game have carved a rich captaincy heritage for RCB, and it’s now time for this focused, fearless and fierce competitor to lead us to glory! This calmness under pressure and ability to take on challenges, as he’s shown us in the… pic.twitter.com/rPY2AdG1p5
तर प्रतिक्रिया देताना आरसीबीचे क्रिकेट संचालक मो बॉबट म्हणाले, रजत हा अतिशय शांत आणि साधा खेळाडू आहे. यामुळे तो आयपीएलमध्ये चांगला कर्णधार म्हणून प्रस्थापित होईल. त्याच्यातील शांत आणि साध्या स्वभावाचा त्याला स्पर्धेत भरपूर फायदा होईल. मध्य प्रदेशचे कर्णधारपद भूषवताना रजतला आम्ही खूप जवळून पाहिले आणि आम्हाला त्याची गुणवत्ता आवडली.तो स्वभावाने एक शांत व्यक्ती आहे परंतु त्याच्या सभोवतालच्या लोकांची काळजी घेतो. तो लगेच इतरांचा आदर आणि काळजी घेईल. नेता म्हणून हे गुण महत्त्वाचे आहेत.