कधीपर्यंत पूर्ण होणार समृद्धी महामार्ग ? MSRDC च्या अधिकाऱ्याने दिली माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Samruddhi Mahamarg : राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई नागपूर महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. 701 किलोमीटरचा असलेला हा मार्ग येत्या वर्षाअखेरपर्यंत पूर्णत्वास येणार आहे. त्यामुळे मुंबई नागपूर प्रवास सुखकर (Samruddhi Mahamarg) होणार आहे.

आतापर्यंत समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा इगतपुरी ते आमने गाव हा अदयाप पूर्णत्वास आलेला नाही. हे काम सुरू आहे. मात्र महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कार्पोरेशन म्हणजेच एम एस आर डी सी कडून उर्वरित काम येत्या वर्षाअखेर (Samruddhi Mahamarg) पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती मिळाली आहे.

MSRDC च्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत 90% काम पूर्ण झालेले आहे. उरलेले काम १. ८ किलोमीटर लांबीचे कासरा येथील खर्डी ब्रिज चे आहे जे प्रामुख्याने आव्हान असेल. याशिवाय आठ किलोमीटरच्या लांब बोगद्याचे (Samruddhi Mahamarg) काम सुद्धा पूर्णत्वास आलेले आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. खरंतर 701 किलोमीटरचा मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग हा सहा पदरी मार्ग आहे मात्र खर्डी पुलावर हा मार्ग केवळ चार पदरी राहणार असून थोडासा अरुंद होणार असल्याची माहिती देखील या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

7-8 तासांत पूर्ण होणार प्रवास (Samruddhi Mahamarg)

एकेकाळी मुंबई ते नागपूर हे अंतर कापण्यासाठी 16-20 तास लागत होते. मात्र, समृद्धी महामार्गामुळं हे अंतर 7-8 तासांत पूर्ण होणार आहे. समृद्धी महामार्गाने मुंबई आणि नाशिककरांना इगतपुरीतून येथून येणाऱ्या वाहनांना थेट नागपूरपर्यंत आठ तासात पोहोचणे शक्य होणार. हा मार्ग खुला झाल्याने विदर्भ मराठवाड्याला मुंबईच्या वेशीपर्यंत वाहने जलद गतीने प्रवेश करण्याचा मार्ग (Samruddhi Mahamarg) सुकर झाला आहे.