अयोध्‍या हा श्रद्धेचा विषय आहे, तो कोर्टात सुटणार नाही – संजय राऊत

0
47
Sanjay Raut
Sanjay Raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नंदुरबार | शिवसेना प्रवक्‍ते आणि खासदार संजय राऊत यांनी अयोध्‍येच्‍या मुद्द्यावरून वादग्रस्‍त वक्‍तव्‍य केले आहे. ‘अयोध्‍या हा श्रद्धेचा विषय आहे. तो कोर्टात सुटणार नाही.’ असे राऊत यांनी नंदूरबार येथे पत्रकार परिषदेत म्‍हटले आहे. आगामी जिल्हा परिषद आणि लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पक्षबांधणीसाठी ते नंदूरबारला आले होते.

तसेच ‘अयोध्या हा श्रद्धेचा विषय आहे. मोदी सरकारने राम मंदिरासंदर्भात अध्‍यादेश काढून मंदिराचे काम सूरू करावे’ असे म्हणुन ‘२५ वर्षांपुर्वी आम्ही बाबरी मस्जिदचा ढाचा तोडायला गेलो, तेव्हा सुप्रीम कोर्टाला विचारुन गेलो नाही, बाळासाहेबांच्या आदेशाने गेलो’ असेही राऊत यावेळी म्हणाले.

सुप्रीम कोर्टात सुनावणीद्वारे हा प्रश्‍न सुटणार नाही’, न्यायालय अलीकडे अनेक गोष्टींवर मत मांडते. त्यामुळे भाजप ने त्यापासून दुर रहायला पाहीजे, असे मत राऊत यांनी यावेळी मांडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here