एकाच राजकीय पक्षाला न्यायालयाचे दिलासे कसे मिळतात? संजय राऊतांचा थेट सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी न्यायालयाच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले. एकाच राजकीय पक्षाला न्यायालयाचे दिलासे कसे मिळतात असा थेट सवाल संजय राऊतांचा केला आहे.

आमचे राज्यपालनियुक्त १२ आमदार दोन वर्षांपासून वाट पाहत आहेत, राज्यपालांकडे फाईल पडून आहे आणि ते काही निर्णय घेत नाहीत. हा पण त्यांचा अधिकार आहे. त्याच्यात सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करण्यास तयार नाही,” अशी नाराजी संजय राऊत यांनी जाहीर केली.

ते पुढे म्हणाले, राज्यसभेतील आमदारांचंही निलंबन केलं. मागच्या अधिवेशनातील गोंधळाची शिक्षा या अधिवेशनात दिली. हे नियमबाह्य असतानाही त्या खासदारांना कोर्टाने दिलासा दिला नाही. इथे मात्र दिला. यात राजकारणच आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला

Leave a Comment