राहुल गांधी पीडित मुलीच्या नातेवाईकांना भेटायला गेल्यावर भाजप पुढाऱ्यांना संताप का यावा; राऊतांचा रोखठोक सवाल

0
52
rahul gandhi sanjay raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिल्लीत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला. तिला नंतर मारून टाकले. राहुल गांधी त्या मुलीच्या नातेवाईकांना भेटायला गेले. तेव्हा भाजपने विचारले, ‘काँग्रेसशासित राज्यांत बलात्कार होत नाहीत काय?’ बलात्कारांना राजकीय पक्ष निर्माण झाले. हे प्रथमच घडत आहे, अशी टाका करत बलात्कार, महिला अत्याचारास तरी जात, धर्म आणि राजकीय पक्ष नसावेत, अशी अपेक्षा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक या सदरातून व्यक्त केली आहे.

राजधानी दिल्लीजवळ असलेल्या नांगलराय परिसरात नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्या करण्यात आली. दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे व येथील कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्रालयाची आहे. पण ही जबाबदारी घ्यायला भारतीय जनता पक्ष तयार नाही. काही वर्षांपूर्वी दिल्लीत ‘निर्भया कांड’ झाले. एका तरुण मुलीवर बसमध्ये बलात्कार करून तिला फेकण्यात आले. तेव्हा भारतीय जनता पक्षाने दिल्लीसह देशभरात महिलांवरील अत्याचाराबाबत त्यावेळच्या मनमोहन सिंग सरकारला जबाबदार ठरवले. दिल्लीचे रस्ते जाम केले व संसदेचे काम चालू दिले नाही असा इतिहास राऊतांनी दाखवला.

आज नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली. राहुल गांधींसह अनेक नेते पीडितेच्या माता-पित्याच्या सांत्वनासाठी भेटायला नांगलरायला जात आहेत. भाजपला हे सर्व पटत नाही व ढोंग वाटते. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा हे तर सगळयांच्याच दोन पावले पुढे गेले. ‘कांग्रेसशासित राज्यांत बलात्कार होत नाहीत काय?’ असा उलट प्रश्न त्यांनी केला. राजस्थान, पंजाब, छत्तीसगढ़ या राज्यांतील अशा घटनांची आकडेवारी त्यांनी जाहीर केली. काँग्रेसशासित राज्यांत महिलांवरील अत्याचार वाढले म्हणून भाजप राज्यात असे गुन्हे माफ करावे, त्याकडे दुर्लक्ष करावे असे कोणाला वाटत असेल आणि ते राज्यकर्ते म्हणून बसले असतील तर त्यांना कसलेच गांभीर्य उरलेले नाही, असेच म्हणायला हवे.अशी टीका शिवसेनेने केली.

श्री. राहुल गांधी हे त्या बलात्कारपीडित मुलींच्या नातेवाईकांना भेटायला गेले याचा संताप भाजप पुढारयांना का यावा? श्री. राहुल गांधी हे दिल्लीतील बलात्कारपीडित मुलीच्या नातेवाईकांना भेटायला गेले. त्या मुलीची अभागी माता राहुल गांधी यांच्या छातीवर डोके ठेवून आक्रोश करीत असल्याचे चित्र दिल्लीतील मीडियाने ठळकपणे छापले. हे छायाचित्र गांधी यांनी त्यांच्या ‘ट्विटर’वर प्रसिद्ध केले. आता राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने या छायाचित्रालाच आक्षेप घेतला. आयोगाने ट्विटर इंडियाला पत्र लिहिले व राहुल गांधींचा हा फोटो हटविण्याच्या सूचना केल्या. विरोधी पक्षाचा एक प्रमुख नेता नऊ वर्षांच्या बलात्कारपीडित मुलीच्या कुटुंबास भेटतो. त्यानंतर आपल्या भावना व्यक्त करतो. यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे?

राहुल गांधी हे बलात्कारपीडितेच्या कुटुंबांना भेटले तो फोटो ट्विटरवरून हटवा, अशी मागणी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने केली. मग बलात्कारपीडित निर्भयाच्या माता-पित्यांना तेव्हा नरेंद्र मोदीही भेटलेच होते. त्या फ़ोटोला राष्ट्रीय महिला आयोगाने आक्षेप घेतल्याचे दिसत नाही. हे असे आणखी किती काळ चालायचे? बलात्कार, महिला अत्याचारास तरी जात, धर्म आणि राजकीय पक्ष नसावेत! अशी अपेक्षा शिवसेनेने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here