थोडं थांबा, दिवाळीनंतर राज्यात आपलेच सरकार येणार; भाजप नेत्याचा दावा

0
36
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर हे सरकार लवकरच पडेल असा दावा सातत्याने भाजपकडून करण्यात येत आहे. आता भाजप खासदार सुजय विखे यांनी दिवाळी नंतर भाजपचे सरकार येईल अस भाकीत केलं आहे.

सुजय विखे-पाटील यांनी अहमदनगरच्या कर्जत येथील एका कार्यक्रमात हा दावा केला आहे. थोडं थांबा, दिवाळीनंतर राज्यात आपलेच सरकार येणार आहे, असा दावा डॉ. सुजय विखे-पाटील यांनी केला आहे. त्यानंतर मात्र त्यांनी घुमजाव केलं. कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी मी तसं विधान केलं, अशी सारवासारव त्यांनी केली आहे. यापुढेही असं बोलत राहू असही ते म्हणाले.

दरम्यान, भाजप नेत्यांकडून यापूर्वी देखील हे सरकार जास्त काळ टिकणार नसून लवकरच पडेल असे अनेक दावे करण्यात आले होते. यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठं विधान केलं होतं. आम्ही चार वर्षे विरोधात बसण्याची तयारी केली आहे, मात्र हे सरकार काही चार वर्षे चालणार नाही असे त्यांनी म्हंटल होत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here