महाराष्ट्रात करोनाबाधितांचा आकडा २१५ वर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात करोना संक्रमितांचा आकडा वाढतोय आहे. राज्यात करोनाबाधितांचा आकडा २१५ वर पोहोचला आहे. १२ तासात १२ नव्या रुग्णांची भर पडली आहे. पुणे ५, मुंबई ३, नागपूर २, कोल्हापूर १ आणि नाशिकमध्ये १ नवे रुग्ण सापडले आहेत. पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३९वर पोहोचली असून महाराष्ट्रात एकूण २०७ कोरोनाग्रस्त आहेत. पुण्यात आणखी २ कोरोना … Read more

धक्कादायक! अमेरिकेत १ ते २ लाख लोकांचा मृत्यू होण्याची भीती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनामुळं अमेरिकेतील परिस्थिती किती भयावह आहे, याचा अंदाज तेथील प्रसिद्ध संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. अँथनी फाऊची यांच्या वक्तव्यावरून लावता येऊ शकतो. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या १ ते २ लाखांपर्यंत पोहचू शकते, अशी भीती डॉ. फाऊची यांनी व्यक्त केली आहे. काही दिवसात अमेरिकेतील व्हेंटिलेटर्स संपू शकतात, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. याचे … Read more

केरळमधील तळीरामांना दिलासा; डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर मिळणार दारू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केंद्रानं संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू केला. लॉकडाऊनच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व वस्तूंची दुकानं ही बंद राहणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे केरळमधील तळीरामांची चांगलीच कोंडी झाली. सगळीकडं दारुची दुकानं बंद असल्यामुळे, गेल्या ५ दिवसांमध्ये ५ तळीरामांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली … Read more

‘लॉकडाऊन’ लांबणार? केंद्रानं दिलं ‘हे’ उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रानं कठोर पाऊल उचलत लक्षात घेता २४ मार्चला देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केलागेला. आज या लॉकडाऊनचा सहावा दिवस आहे. करोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढतच आहे अशा परिस्थितीत लॉकडाऊनचा कालावधी आणखी काही दिवसांसाठी किंवा महिन्यांसाठी वाढणार का? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान, केंद्रानं नागरिकांना सतावणाऱ्या या प्रश्नावर … Read more

अमिताभ यांच्यावर कोट्स चोरल्याचा आरोप त्यावर बिग बींनी दिली मजेदार प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनो विषाणूच्या संसर्गाचा धोका टाळण्यासाठी प्रत्येकाने स्वत: ला घरातच ठेवले आहे.आजकाल महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर बरेचसे सक्रिय झाले आहेत. रोजोना कोविड -१९ बद्दल आपल्या चाहत्यांना जागरूक करण्यासाठी ते सोशल मीडियावर काहीतरी शेअर करत राहतात. अलीकडेच त्यांनी आपल्या फेसबुकवर काही कोट शेअर केले.त्यावरून एका वापरकर्त्याने त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला, कारण … Read more

राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या २०३वर; २२ नवीन रुग्णांची नोंद- आरोग्यमंत्री राजेश टोपे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोनाचे २२ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या २०३ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक १० रुग्ण मुंबईचे असून ५ रुग्ण पुण्याचे, ३ नागपूरचे, २ अहमदनगरचे तर सांगली, बुलढाणा आणि जळगाव येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. दरम्यान, कोरोना आजारातून बरे झालेल्या एकूण ३५ रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आलं … Read more

धक्कादायक! करोनाच्या चिंतेने जर्मनीत एका मंत्र्याची आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगात करोना व्हायरसमुळे हजारो लोकांचे बळी घेतले आहे. यानंतरही मृत्यूचा हा सिलसिला सुरूच आहे. करोना साथीच्या आजारामुळे सर्व देश चिंतेत आहेत. दरम्यान, करोनाच्या चिंतेतून जर्मनीच्या एका प्रांत अर्थमंत्र्यांनी रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली आहे. जर्मनीच्या हेसे प्रांताचे अर्थमंत्री थॉमस शॉफर यांनी करोना व्हायरसच्या संसर्गामुळे होणार्‍या आर्थिक नुकसानाच्या विवंचनेतून आत्महत्या केल्याचं म्हटलं जात … Read more

अवघ्या ५ मिनिटात येणार करोना टेस्टचा रिपोर्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगात पसरत आहे. करोनाचा संसर्गाला रोखायचा असेल तर वेळीच लोकांची टेस्ट करणं गरजेचं आहे. मात्र, या टेस्टचा रिपोर्ट यायला बराच वेळ लागत असल्यानं मोठ्या प्रमाणावर लोकांची टेस्ट करणं कठीण होत असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील अ‍ॅबॉट लॅबोरेटरीजने अत्यंत कमी कालावधीत कोरोना चाचणी करणारी टेस्ट … Read more

सरकारनं संपूर्ण लॉकडाऊनपेक्षा वेगळी पावलं उचलावी; राहुल गांधींचा मोदींना सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. मात्र, यामुळे अनेक नव्य समस्या निर्माण झाल्या आहेत. अशा संकटाच्या परिस्थितीत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून काही गोष्टी सुचवल्या आहेत. राहुल गांधी लिहलं आहे कि, , मोदी सरकारला याबाबत विचार करायला हवा की, देशभरात लॉकडाऊन केल्यानं आपल्याच … Read more

मजुरांना थांबवा! राज्यांच्या सीमा सील करण्याचे केंद्राचे राज्यांना आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसमुळे देशभरात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे स्थलांतरित कामगार, मजुरांमध्येमध्ये अनिश्चिततेचे वातावरण आहे. मोठी शहरे सोडून कामगार आपल्या गावी परत जाण्याचा प्रयत्न करताना दिसतात. दरम्यान, लॉकडाऊन दरम्यान स्थलांतरित मजुरांची हालचाल रोखण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांच्या आणि जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या जाव्यात आणि बाहेरून येणाऱ्यांना सीमेवरच्या कॅम्पमध्येच ठेवलं जावं, असे आदेश केंद्राकडून देण्यात … Read more