2 आठवडे झाले तरी मंत्रिमंडळ विस्तार का नाही? महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा : संजय राऊत

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. “महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटींच्या घरात असून केवळ केवळ 2 सदस्यांचे मंत्रिमंडळ आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत नाही तोवर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी. तसेच शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेले निर्णयही अवैध असल्याचे राऊत यांनी म्हंटले आहे. … Read more

राज्य दोघांच्या भरवश्यावर अन् जनता वाऱ्यावर; एकनाथ खडसेंचा हल्लाबोल

eknath khadse Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नद्या आणि नाल्यांना पूर आला असून काही धरणं ओव्हरफ्लो झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. “पुरामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेक जनावरे, शेती पुरामुळे … Read more

देवेंद्र फडणवीसच आमच्या मनातील मुख्यमंत्री : विनायक मेटे

Vinayak Mete Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. “अडीच वर्ष देवेंद्र फडणवीस भेटले नाहीत, रात्री वेशांतर करून रणनीती करायचे. पण शेवटी स्वतःचं सरकार आणून दाखवलं. आमच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत,” असे विधान मेटे यांनी केले आहे. विनायक मेटे यांनी आयोजित केलेल्या मुंबईतील एका कार्यक्रमास भाजपाचे … Read more

माजी मुख्यमंत्र्यांना पीए म्हणून ठेवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे मनापासून आभार : अमोल मिटकरी

Amol Mitkari Ekanath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. “मुख्यमंत्री शिंदे साहेबांचे मी मनापासून आभार मानतोय, कारण त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांना ‘पीए’ म्हणून ठेवलं,”असा टोला मिटकरींनी फडणवीसांना लगावला आहे. आ. अमोल मिटकरी यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले … Read more

सरपंच कशाला? राष्ट्रपती आणि मुख्यमंत्रीही जनतेतूनच निवडा; अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना टोला

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज बारामती येथील कार्यक्रमांना उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी शिंदे- फडणवीस सरकारने सरपंच, नगराध्यक्ष पदाच्या निवडीच्या घेतलेल्या निर्णयावरून निशाणा साधला. “जनतेतून फक्त नगराध्यक्ष आणि सरपंचच कशाला? राष्ट्रपती आणि मुख्यमंत्रीही थेट जनतेतूनच करावा. फडणवीस व शिंदे या दोघांच्या मंत्रीमंडळाला खूप घाई झालेली दिसते,” अशी टीका पवार यांनी … Read more

संभाजीनगर नामांतराचं श्रेय फक्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचंच; नामांतरावरून चंद्रकांत खैरेंची टीका

Chandrakant Khaire

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राज्य मंत्रिमंडळाच्या तिसऱ्या बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारने संभाजीनगर व उस्मानाबाद शहराच्या नामांतराचे निर्णय घेतले. त्यांच्या निर्णयावरून शिवसेना नेते व औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी टीका केली आहे. “संभाजीनगर शहराच्या नामांतराचे श्रेय घेण्यासाठी शिंदे-भाजप सरकारने पक्षप्रमुखांनी घेतलेल्या निर्णयाला स्थगिती दिली होती, पण टीकेनंतर त्यांना पुन्हा हा निर्णय घ्यावा लागला. आता या … Read more

औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे दि. बा. पाटील, असे नामांतर महाविकास आघाडीने चुकीच्या पध्दतीने केल्याने शिंदे- भाजप सरकारने निर्णयाला स्थगिती दिली होती. या नामांतराच्या निर्णयावर राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज शिक्कामोर्तब करण्यात आले. नामांतर निर्णयावर येणाऱ्या कॅबिनेटमध्ये मंजुरी देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुख्यमंत्री … Read more

शिंदे-फडणवीस सरकारचा लवकरच राजकीय अंत होईल : संजय राऊत

Sanjay Raut Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे- फडणवीस सरकार आणि सेनेच्या बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. “ज्यांनी शिवसेना सोडलेली आहे, त्यांनी शिवसेनेचा वापर करू नये आणि स्वतःचा स्वतंत्र पक्ष तयार करावा,” असा सल्ला राऊतांनी दिला आहे. तसेच “शिंदे-फडणवीस सरकारचा लवकरच राजकीय अंत होईल, असे भाकीतही खा. राऊत यांनी केले आहे. … Read more

केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीसांचा पोपट केला; विनायक राऊतांची टीका

Vinayak Raut Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे-फडणवीसांकडून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विलंब लावला जात आहे. यावरून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघंच शिल्लक राहिलेत. देवेंद्र फडणवीस नाईलाजास्तव उपमुख्यमंत्री झाले असून त्यांची नाराजी मध्येमध्ये दिसते. केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांचा पोपट केला आहे,” अशी टीका खा. राऊत यांनी केली … Read more

शिंदे – फडणवीसांचे सरकार हे ढोंगी; नामांतराच्या मुद्यांवरून संजय राऊतांची टीका

Sanjay Raut Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाकरे सरकारने शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद व उस्मानाबादच्या नामांतराचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाला काल शिंदे – फडणवीस सरकारने स्थगिती दिली आहे. या मुद्यांवरून आज शिवसेना खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे. “ठाकरे सरकारने औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर केले. मात्र, शिंदे- भाजप सरकारने नामांतरच्या निर्णयाला स्थगिती दिली. शिवसेनेनं … Read more