मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या बेकायदा बंगल्यावर हातोडा

दापोली | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या मुरूड दापोली येथे बेकायदा उभारलेल्या बंगल्यावर जेसीबीने हातोडा मारत कारवाई सुरू केलेली आहे. अनाधिकृत बंगल्याचे बांधकाम तोडण्यास सुरूवात केली असल्याचे भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी व्हिडिअो ट्विट केला आहे. करून दाखविले ! मिलींद नार्वेकर चा बंगलो तोडला आता पुढचा नंबर मंत्री अनिल परब रिसॉर्टचा असे … Read more

मान्सूनचे आगमन : मुंबई- गोवा मार्गावर निवळी घाटात दरड कोसळली तर कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात पाणीपातळी वाढली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मान्सून पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. रत्नागिरी, सिंदुधुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला जोरदार झोडपले आहे. पुढील तीन दिवस मान्सून पावसाचा जोर वाढणार आहे. निवळी घाटात दरड कोसळल्याने मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक थांबली होती. दरड हटविण्याचे काम हाती घेतले असून वाहतूक एकेरी सुरू करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्याला रात्रभर पावसाने झोडपून … Read more

गणेशोत्सवासाठी कोकणात जाताय मग, टोल भरण्याची गरज नाही; मंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

मुंबई । गणेशोत्सवासाठी (ganesh festival) कोकणात जाण्याकरिता आता टोल (toll) भरण्याची गरज नाही. राज्य सरकारने चाकरमान्यांना गणेशोत्सव सुरू होण्याच्या २ दिवस आधी आणि परतीच्या प्रवासात २ दिवस टोलमधून सवलत दिली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, कोकण विभागातील पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्तांची व्हीडीओ … Read more

खुशखबर! गणेशोत्सवाला कोकणात एसटीने जाणाऱ्यांना ई-पासची गरज नाही

मुंबई । अवघ्या काही दिवसांच्या अंतरावर येऊन ठेपलेल्या यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडून प्रवाशांसाठी काही खास व्यवस्था करण्यात आल्या आहेत. कोकणात जाण्यासाठी एसटीने प्रवास करताना ई-पासची गरज लागणार नाही. मात्र खासगी वाहनाने प्रवास करताना ई-पास अनिवार्य असणार आहे. कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना १२ तारखेपूर्वी कोकणात पोहोचावं लागणार आहे. ज्यांना १२ तारखेनंतर कोकणात जायचं … Read more

तुम्हाला खरं नाही वाटणार पण हा लाकडापासून बनवलेला ट्रक आहे; लाॅकडाउनमध्ये सुताराची कलाकूसर

रत्नागिरी । कोरोनामुळे लॉकडाऊन झाले, पण याचाही अनेकांनी सदुपयोग करून घेतला आहे. रत्नागिरीतील सुतार समाजातील कारागीर संतोष यशवंत माचकर आणि त्यांचे सुपुत्र रोहित संतोष माचकर यांनी या लॉकडाऊनच्या काळात हुबेहुब म्हणजे अगदी जसाच्या तसा लाकडी “ट्रक” (लॉरी) तयार केला आहे. यातून या माचकर पितापुत्रांच्या कामातील उच्च दर्जाचे कसब दिसून येत आहे. ओरिजिनल ट्रकला जे बाह्य … Read more

मदत न पोहचायला कोकण हा काही गडचिरोली किंवा नंदुरबार नव्हे! – देवेंद्र फडणवीस

मुंबई । मदत न पोहचायला कोकण हा काही गडचिरोली किंवा नंदुरबार नव्हे. मुंबईपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असूनही कोकणात अजून निसर्ग चक्रवादळातील वाताहतीनंतर मदत पोहोचू शकलेली नाही अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. ते शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. गेल्या महिन्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळात रायगड आणि रत्नागिरी … Read more

पवार साहेबांच्या संदर्भात चंद्रकांतदादा जे बोलतात ते योग्यच – रोहित पवार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकताच कोकण दौरा केला आहे. यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यावर काही आरोप केले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे गुणगान केले होते. “सरकारला सध्या पवार साहेब मार्गदर्शन करतात, असं दिसत नाही. पवारांच्या कामाचा वेग भयंकर असून सर्व … Read more

देवेंद्र फडणवीस आज सायंकाळी घेणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट; ‘हे’ आहे कारण

मुंबई । विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. आज संध्याकाळी ५.३० वाजता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकात या दोघांची भेट होणार आहे. देवेंद्र फडणवीस हे मागचे २ दिवस निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकण दौऱ्यावर होते. यानंतर आता निसर्ग चक्रीवादळाबाबत भाजपच्या मागण्यांचं निवेदन भाजप मुख्यमंत्र्याना देणार आहे. कोरोनावरील सर्वपक्षीय बैठकीनंतर … Read more

‘निसर्गग्रस्त’ कोकण वासियांच्या मदतीसाठी शरद पवारांनी केल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

रत्नागिरी । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणचा दोन दिवसीय पाहाणी दौरा केला. निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात घरांचं मोठं नुकसान झालं आहे. घरांसह, आंबा, नारळ, सुपारीच्या बागांचं, शेतीचं अतिशय नुकसान झालं आहे. त्यामुळे निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या सर्व घटकांना आर्थिक सहाय्य करा, असं शरद पवार यांनी पाहाणी दौऱ्यानंतर घेतलेल्या पत्रकारपरिषदेत सांगितलं … Read more

भाजप नेत्यांनी लवकर दौरे करून नारळाची झाडं उभी केली, यासाठी अभिनंदन; पवारांचा उपरोधक टोला

रत्नागिरी । भाजपने निसर्ग चक्रीवादळानंतर तातडीने कोकणात मदत पोहोचवली. यानंतर शरद पवारांना जाग आल्याने ते आता कोकण दौरा करत आहेत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. या टीकेची शरद पवार यांनी मंगळवारी रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सव्याज परतफेड केली. शरद पवार यांनी म्हटले की, भाजपच्या लोकांनी लवकर दौरे केले. त्यांनी अनेक नारळाची झाडं … Read more