देवेंद्र फडणवीस आज सायंकाळी घेणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट; ‘हे’ आहे कारण

मुंबई । विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. आज संध्याकाळी ५.३० वाजता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकात या दोघांची भेट होणार आहे. देवेंद्र फडणवीस हे मागचे २ दिवस निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकण दौऱ्यावर होते. यानंतर आता निसर्ग चक्रीवादळाबाबत भाजपच्या मागण्यांचं निवेदन भाजप मुख्यमंत्र्याना देणार आहे. कोरोनावरील सर्वपक्षीय बैठकीनंतर … Read more

‘निसर्गग्रस्त’ कोकण वासियांच्या मदतीसाठी शरद पवारांनी केल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

रत्नागिरी । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणचा दोन दिवसीय पाहाणी दौरा केला. निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात घरांचं मोठं नुकसान झालं आहे. घरांसह, आंबा, नारळ, सुपारीच्या बागांचं, शेतीचं अतिशय नुकसान झालं आहे. त्यामुळे निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या सर्व घटकांना आर्थिक सहाय्य करा, असं शरद पवार यांनी पाहाणी दौऱ्यानंतर घेतलेल्या पत्रकारपरिषदेत सांगितलं … Read more

भाजप नेत्यांनी लवकर दौरे करून नारळाची झाडं उभी केली, यासाठी अभिनंदन; पवारांचा उपरोधक टोला

रत्नागिरी । भाजपने निसर्ग चक्रीवादळानंतर तातडीने कोकणात मदत पोहोचवली. यानंतर शरद पवारांना जाग आल्याने ते आता कोकण दौरा करत आहेत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. या टीकेची शरद पवार यांनी मंगळवारी रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सव्याज परतफेड केली. शरद पवार यांनी म्हटले की, भाजपच्या लोकांनी लवकर दौरे केले. त्यांनी अनेक नारळाची झाडं … Read more

‘निसर्ग’ चक्रीवादळ नुकसान पाहणीसाठी शरद पवार उद्यापासून २ दिवस कोकण दौऱ्यावर

मुंबई । ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शरद पवार हे २ दिवस कोकण दौरा करणार आहेत. आपल्या कोकण दौऱ्यात शरद पवार रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून ते शेतकऱ्यांच्या भेटी घेणार आहेत. मागील आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

निसर्ग चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील कोणकोणत्या भागांना धोका? जाणुन घ्य‍ा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  अरबी समुद्राच्या आग्नेय दिशेला आणि लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रात आणि लक्षद्विपजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढून कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यास चक्रीवादळ येण्याची भीती होती. हे कमी दाबाचे क्षेत्र येत्या ४८ तासात तयार होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे जे चक्रीवादळ निर्माण होईल त्याला … Read more

रत्नागिरी जिल्हयात थंडीचा जोर वाढला; दापोलीत पारा ९ अंशापर्यंत खाली घसरला

रत्नागिरी प्रतिनिधी । महाराष्ट्राप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस नोव्हेंबरपर्यंत लांबला होता. पाऊस गेला तरीही थंडी नव्हती. दरम्यान जानेवारीच्या पहिल्याच दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दापोलीत पारा ९ अंशापर्यंत खाली घसरला आहे. मात्र पुन्हा वातावरणात झालेल्या बदलांमुळे गुलाबी थंडी गायब झाली. बुधवारपासून (ता.१५) पारा १२ ते १४ अंशापर्यंत खाली आला आहे. त्यामुळे थंडीचा कडाका … Read more

वेंगुर्ला मातोंड-पेंडूर येथील श्री देवघोडेमुख देवस्थानचा जत्रोत्सव उत्साहात पार

वेंगुर्ला मातोंड- पेंडूर येथील स्वयंभू व जागृत देवस्थान अशी ख्याती असलेल्या श्री देव घोडेमुख देवस्थानचा जत्रोत्सव उत्साहात पार पडला. ही जत्रा ‘कोंब्याची जत्रा’ म्हणूनही प्रसिद्ध आहे.या निमित्ताने सकाळपासून केळी ठेवणे, नवस फेडणे,नवस बोलणे आदी कार्यक्रम पार पाडले जातात.

शरद पवारांचा कोकण दौरा अचानक रद्द! सत्तास्थापनेसाठीच्या हालचाली वाढल्या

राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नसताना जाणता राजा म्हणून ओळख असलेल्या शरद पवार यांच्या भूमिकेकडे शेवटपर्यंत सर्वांचेच लक्ष लागून राहिलेलं पहायला मिळतंय. कराड दौऱ्यावर आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केल्यानंतर कोकण दौऱ्यावर निघालेल्या शरद पवार यांनी आपला कोकण दौरा अचानक रद्द केला असून कोकणातील शेतकरी भात काढणीत व्यस्त असल्यामुळे आपण हा निर्णय घेतला असल्याचं पवार म्हणाले.

नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाला दीपक केसरकारांचा अडथळा ; राणेंच्या मुलांवर शिवसैनिक नाराज

नारायण राणेंची मुलं ही अत्यंत तीव्र शब्दांत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतात. शिवसैनिकांना आधीच बाळासाहेबांविरोधी बोललेलं चालत नाही. अशा परिस्थितीत नारायण राणेंना भाजपमध्ये घेतलं तर शिवसैनिक नाराज होतील.

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांना टोल माफ

टीम, HELLO महाराष्ट्र | गणेशोत्सवासाठी मुंबई-कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना ३०ऑगस्ट ते १२ सप्टेंबरपर्यंत टोल माफ करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिली. त्यामुळे यंदाचा गणेशउत्सव कोकणात आपल्या घरी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर घेऊन आला आहे. गणेशोत्सवानिमित्त रस्ते वाहतुकीचा आढावा पाटील यांनी एका बैठकीत घेतला. विनोद तावडे, आशिष शेलार, रवींद्र वायकर, दीपक केसरकर हे … Read more