भाजपा- राष्ट्रवादी ट्रोला-ट्रोली

मुंबई प्रतिनिधी| बालभारतीने मराठी संख्याशास्त्र वाचनात बदल केल्या पासून महाराष्ट्रातील राजकीय फड बराच मनोरंजक आणि एकेमेकाना ट्रोल करण्यात व्यस्त आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात बालभारतीतील बदलावरून राष्ट्रवादीनं आधी मुख्मंत्र्यांना फडणवीस च्या ऐवजी फडण दोन शुन्य असं म्हणायचं का असा टोला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी लगावला होता. बालभारतीच्या पुस्तकातलं उदाहरण देत, शरद गवत आण… अशा शब्दातून मुख्यमंत्र्यांनी … Read more

स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सरकारच्या विरोधात अर्धनग्न मोर्चा

औरंगाबाद प्रतिनिधी | राज्य शासनाचे महापोर्टल बंद करण्यात यावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्या मान्य करण्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या विद्यर्थ्यांनी अर्धनग्न मोर्चा काढला होता. औरंगाबाद मधील पैठण गेट पासून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली होती. तर विभागीय आयुक्तांना मागण्यांचे निवेदन देऊन या मोर्चाची सांगता करण्यात आली. या मोर्चात स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. … Read more

महाराष्ट्राचे शिखर : कळसुबाई

प्रवास|कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १६९० मीटर आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून याची ऊंची अंदाजे ९०० मीटर आहे. यातील अर्ध्या ऊंची पर्यंत गावकर्‍यांनी पायर्‍यांची शेती केलेली आहे. कठीण कातळटप्प्यांवर शिड्या बसविलेल्या आहेत. त्यामुळे ३ ते ४ तासात कळसूबाईचे शिखर सर करणे सहज शक्य आहे. भंडारदरा धरण येथून ६ कि.मी … Read more

ह्या पावसाळ्यात कुठे जाताय?

पर्यटन| पाऊस सुरु झाला की लगेचच मित्रमंडळी, कुटुंबियांसोबत या पावसाळ्यात कुठे कुठे जायचे याचे आराखडे बांधाले जातात आणि वेगवेगळ्या स्थळांची माहिती गोळा करण्याची लगबग सुरु होते. परंतु तीच तीच ठिकाणं आणि तिकडची गर्दी आठवली की बर्‍याच जणांचा हिरमोड होतो. म्हणून प्रत्येकाला थोडसं ऑफबीट, वेगळ्या ठिकाणी जायला नक्की आवडेल. महाराष्ट्राचा संपूर्ण प्रदेश नितांत सुंदर आहे.महाराष्ट्राला सुंदर सागरी … Read more

SSC Result 2019 महाराष्ट्राचा निकाल घसरला

मुंबई प्रतिनिधी |आज इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला असून राज्याचा निकाल कमालीचा खाली घसरला आहे. महाराष्ट्राचा निकाल ७७.१० % एवढा लागला असून हा निकाल गांभीर्याने विचार करायला लावणारा आहे. तर राज्यात मुलींनीपुन्हा एकदा मुलांना निकालात मागे टाकले आहे. निकालीतील उचांक कोकण विभागाने नोंदवला असून कोकण विभागाचा निकाल ८८.३८ टक्के एवढा लागला आहे. तर सर्वात कमी निकाल … Read more

म्हणून मुख्यमंत्री कॉंग्रेसच्या आमदारांना फोन करतात

मुंबई प्रतिनिधी | भाजपला लोकसभा निवडणुकीत उत्तुंग यश मिळाल्या नंतर आता कॉंग्रेसचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे भाजपच्या नेत्यांकडून सांगितले जाते. मात्र मुख्यमंत्रीच कॉंग्रेसच्या आमदारांना फोन करतात असा गौप्यस्फोट कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. मुख्यमंत्री कॉंग्रेसच्या आमदारांना फोन करून भाजपमध्ये सामील होण्यासाठी गळ घालत आहेत. तर काही लोकांना मुख्यमंत्र्यांचा फोन आल्यावर देवाचा फोन आल्या … Read more

गिरीश महाजन महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री !

Untitled design

जळगाव प्रतिनिधी |महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना हटवून मुख्यमंत्री बनण्याचा प्रयत्न बऱ्याच लोकांनी केला आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी ते प्रयत्न मुसद्दीपणे परतवून लावले आहेत. मात्र गिरीश महाजन यांच्याकडे राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला अर्थमंत्री पद सांभाळायला जाऊ शकतात. असा कयास बांधून गिरीश महाजन यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री संबोधत त्यांच्या … Read more

#Loksabha महाराष्ट्रात कॉंग्रेसला मिळणार फक्त एक जागा?

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कॉंग्रेसला केवळ एक जागा मिळेल असा अंदाज एका विश्वसनीय एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. वेगवेगळ्या एक्झिट पोलमध्ये वेगवेगळे अंदाज जरी वर्तवले गेले असले तरी राज्यात फक्त एकाच जागी कॉंग्रेस निवडणूक जिंकण्याच्या परिस्थिती मध्ये असल्याचे चित्र आहे. नांदेड मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण निवडणूक लढवत आहेत. तेच फक्त सबंध महाराष्ट्रातून कॉंग्रेसचे उमेदवार … Read more

महाराष्ट्रातील कॉंग्रेसच्या बड्या नेत्याला लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात अटक

Untitled design

चंद्रपूर प्रतिनिधी |काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे आणि राजुरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली आहे. नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीने प्राचार्य गुरुराज कुलकर्णी, सुभाष धोटे आणि अरुण धोटे यांनी आपल्याकडे शारीरिक संभोगाची मागणी केल्याचा आरोप ठेवला आहे. राजुरा वसतिगृह येथील लैंगिक शोषण प्रकरण आणि आदिवासी मुलींबद्दल केलेल्या वादग्रस्त … Read more

नॅशनल हायवेवर भीषण अपघात ; १२ जण जागीच ठार

Untitled design

बुलढाणा प्रतिनिधी | राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर मलरापूर येथे भीषण अपघात झाल्याने १२ जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. मलकापूर येथे एका कारखान्याजवळ मालवाहू ट्रक आणि टाटा मॅजिक या दोन वाहनात हा अपघात झाला आहे. आज सोमवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये टाटा मॅजिक या वाहनातील १२ जण जागीच ठार … Read more