आज ‘या’ वेळेत उघडणार जायकवाडीचे दरवाजे; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – परतीचा पाऊस संकट म्हणून येईल, असं मराठवाड्याला वाटलं नव्हतं. पण गेल्या सात दिवसांत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत पावसाने धुमाकूळ घातलाय. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेलाय. तुफान पावसाने लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. धरणांतल्या पाणी पातळीतही वाढ झालीय. मराठवाड्याची तहान भागवणारे जायकवाडी धरण 92 टक्के भरलं आहे. आणखीही आवक सुरुच आहे. जर पाण्याची अशीच आवक सुरु राहिली तर अवघ्या काही तासांत मराठवाडा धरण 100 टक्के भरणार आहे. त्यामुळे सकाळी 11 वाजेच्या सुमारास जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. भरीस भर म्हणजे आजही मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.

जायकवाडी धरणातून आज सकाळी 11 पाणी सोडण्यात येणार आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा तब्बल 92 टक्क्यांवर पोहोचला आहे. जायकवाडी धरणात 96 हजार क्यूसेक पाण्याची आवक सुरु आहे. पाण्याची आवक अशीच राहिली तर अवघ्या काही तासात 100 टक्के धरण भरण्याचा अंदाज आहे.

तरी जायकवाडी प्रकल्पाच्या खालील गोदावरी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात उतरू नये, गुरेढोरे, विदुयत साहित्य, वैगरे असल्यास लागलीच काढून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment