Covishield च्या दोन डोसमधील अंतर कमी केले जाऊ शकते, केंद्र सरकार करत आहे विचार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोना लस Covishield च्या दोन डोसमधील अंतर कमी केले जाऊ शकते. इंडियन असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन (IAPSM), आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेने, सध्या कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर कमी करावे, असे सुचवले आहे. IAPSM ने सांगितले की,” केंद्र सरकार या सूचनेवर विचार करत आहे.” संस्थेने आपल्या सूचनेत म्हटले आहे की,” ज्यांना एकदा संसर्ग झाला आहे त्यांना लगेचच लस देऊ नये.”

IAPSM या संस्थेने म्हटले आहे की,”अंतर कमी करून लोकं कमी वेळेत दोन्ही डोस लागू करू शकतील. यामुळे संसर्गाचा धोका कमी होईल.” असे लक्षात आले आहे की, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना एक डोस घेतलेल्या लोकांपेक्षा संसर्गाचा धोका कमी आहे. तज्ञांचा असाही विश्वास आहे की, डेल्टा व्हेरिएन्टमुळे खूप लोकांना संसर्ग झाला आहे. आता वेळेनुसार, लसीच्या डोसचे पुनरावलोकन करण्याची गरज आहे.

IAPSM च्या अध्यक्षा डॉ.सुनीला गर्ग यांनी म्हटले आहे की,”आम्ही लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याची सूचना केली आहे. जास्तीत जास्त लोकांना लसीकरण करणे ही आमची प्राथमिकता आहे. ज्यांना संसर्ग झाला आहे त्यांना लस देऊ नये अशी देखील आमची शिफारस आहे.”

आरोग्य तज्ञांचा असा युक्तिवाद आहे की,” जेव्हा कोविडशील्डच्या दोन डोसमधील अंतर जास्तीत जास्त 16 आठवड्यांपर्यंत वाढवले ​​गेले होते, तेव्हा देशात लसीचा तुटवडा होता आणि आता देशात सहा कंपन्यांच्या लसीला मान्यता देण्यात आली आहे. जर अंतर कमी केले तर जास्त लोकांना लस दिली जाऊ शकते आणि कोरोनाचे रुग्ण गंभीर होण्यापासून किंवा रुग्णालयात दाखल होण्यापासून वाचवले जाऊ शकतात.”

Leave a Comment