केंद्रानं लागू केलेला लॉकडाउन पूर्णपणे अपयशी ठरला; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । केवळ २१ दिवसांत करोना विषाणूचा पराभव करू असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते. मात्र, देशातील लॉकडाउनला ६० दिवस झाले असतानाही कोरोना विषाणूचा संसर्ग जलदगतीने वाढतच आहे. देशातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी ठरले आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशातील लॉकडाउनचा उद्देशच असफल झाल्याचे ते म्हणाले.

लॉकडाउनच्या ४ टप्प्यांमध्ये ज्या परिणामांची पंतप्रधान मोदी यांना अपेक्षा होती तसे झाले नाही, असे राहुल पुढे म्हणाले. सरकारने सत्य स्वीकारायला हवे, कारण २१ दिवसांमध्ये सर्वकाही ठीक होईल असे मोदी म्हणाले होते, मात्र ६० दिवसांचा काळ उलटला तरी देखील काही होत नसल्याचे ते म्हणाले. आता लॉकडाउन अपयशी ठरलेला आहे. असे असताना सरकार आता पुढे काय करणार आहे हे आम्ही सरकारला विचारू इच्छितो, असे राहुल यांनी म्हटले आहे.

संपूर्ण जगामध्ये लॉकडाउन उठवला जात असताना तेथील रुग्णांची संख्याही कमी होताना दिसत आहेत. भारतात मात्र लॉकडाउन सुरू असतानाच रुग्णांची संख्या जलदगतीने वाढताना दिसत आहे. आणि लॉकडाउन हटायला लागलेला आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केली. केंद्रातील मोदी सरकार गरीब आणि शेतकऱ्यांसाठी काय करत आहे, याचेही उत्तर राहुल गांधी यांनी मोदी यांच्याकडे मागितले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment