देशात कोठेही वीज कपात होणार नाही; कोळशाची कमतरता का निर्माण झाली या विषयी केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशासमोर कोळशाचे संकट यावेळी अधिकच गडद होत आहे. देशात वीजनिर्मितीसाठी असलेल्या 135 पॉवर प्लांटपैकी 18 प्लांट्स असे आहेत, जिथे कोळसा पूर्णपणे संपला आहे, म्हणजेच इथे कोळशाचा साठा नाही, तर 20 प्लांट्स असे आहेत जिथे सुमारे 7 दिवसांचा साठा आहे. दरम्यान, कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांचे म्हणणे आहे की,”देशात आता कोळशाची कमतरता भासणार नाही, कारण बुधवारपासून दररोज दोन टन कोळशाचा पुरवठा सुनिश्चित करण्यात आला आहे.”

झारखंडमधील चत्रा येथे पोहोचलेले केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी सांगितले की,”औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये कोळशाची कमतरता नाही आणि यामुळे वीजनिर्मिती संयंत्रांच्या मागणीकडे पूर्ण लक्ष दिले जात आहे जेणेकरून वीज निर्मितीवर परिणाम होणार नाही आणि बुधवारपासून दररोज दोन टन कोळशाचा पुरवठा सुनिश्चित केला गेला आहे.”

केंद्रीय मंत्री म्हणाले की,”सततच्या पडणाऱ्या पावसामुळे कोळशाच्या उत्पादनावर परिणाम होऊन आयात थांबल्याने देशात कोळशाचा तुटवडा निर्माण झाला होता, मात्र आता पुरवठा वाढवण्यात आला आहे आणि सर्व प्लांट्सची मागणी प्राधान्याने पूर्ण केली जात आहे.

रविवारी पत्रकार परिषदेत केंद्रीय ऊर्जा मंत्री आर के सिंह यांनी कोळशाच्या संकटाचा मुद्दा फेटाळून लावला होता. मात्र त्यांनी कबूल केले होते की,”पूर्वी या कारखान्यात 17-17 दिवसांचा साठा असायचा, आता फक्त 4-5 दिवसांचा साठा आहे. आणि लवकरच हे संकट दूर होईल.”

Leave a Comment