अभ्यासाच्या तणावातून बारावीच्या विद्यार्थीनीने घेतला गळफास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – बारावीत शिक्षण घेणाऱ्या १८ वर्षीय तरुणीने परीक्षेच्या तणावातून राहत्या घरात साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजता उघडकीस आली. उषा कृष्णाचंद्र चौधरी (18, रा. शंभूनगर) असे गळफास घेतलेल्या तरुणीचे नाव आहे.

उषा ही देवनागरी परिसरातील एका महाविद्यालयात बारावीत शिकत होती. तिचे वडील कृष्णाचंद्र हे फरशी बसवण्याचे काम करतात, तर आई घरकाम करते. तिला एक लहान भाऊ आहे. दरम्यान उषाला एमबीबीएस करायचे होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती तणावात होती. दरम्यान शुक्रवारी वडील नियमित कामासाठी गेले होते. सायंकाळच्या सुमारास उषाचा लहान भाऊ बाहेर खेळत असताना उषाने आईला अभ्यास करण्यासाठी पेपर आणण्यासाठी दुकानात पाठवले. आई पेपर आणण्यासाठी गेली असता उषाने घरातील फॅनच्या हुकला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. काही वेळाने आई घरी येऊन दरवाजा ढकलून बघितले असता उषाने गळफास घेतला होता.

यावेळी आरडाओरड झाल्याने शेजारील नागरिकांच्या मदतीने तिला तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. दरम्यान उषाने परीक्षेच्या तणावातून आत्महत्या केली असा अंदाज नातेवाइकांनी वर्तवला आहे. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Leave a Comment