एकनाथ शिंदेंच्या बंडावर उदयनराजेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी 40 समर्थक आमदारांसोबत बंड पुकारलं असून राज्यात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. सत्तेसाठी तयार केलेलं हे समीकरण जुळणार नव्हतंच अस ते म्हणाले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना उदयनराजे म्हणाले, महाराष्ट्रात आज जी परिस्थिती निर्माण झाली यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. गेल्या 2 वर्षांपासून ही खदखद होती. फक्त सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले होते. आमदारांना वेळ दिला जात नव्हता, त्यांची कामे होत नव्हती अस उदयनराजे म्हणाले.

खर तर सत्तेसाठी तयार केलेलं हे समीकरण जुळणार नव्हतंच, बारकाईने विचार केला तर शिवसेना व भाजप यांच्या आमदारकी व खासदारकीच्या मतदारसंघात एक तर राष्ट्रवादी किंवा काँग्रेस विरोधक राहिले आहेत. त्यामुळे त्यांची समीकरणे जुळणार नव्हती. अस उदयनराजे म्हणाले.

 

Leave a Comment