Vashi Creek Bridge : मुंबईला कनेक्टिव्हिटी देणारे महत्त्वाचे प्रकल्प महाराष्ट्रात येऊ घातले आहेत. त्यापैकीच एक महाराष्ट्रात बांधला जाणारा असा पूल आहे जो खरंच महाराष्ट्राच्या दृष्टीने एक माईल स्टोन ठरेल. होय आम्ही बोलत आहोत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे बांधल्या जाणाऱ्या नवीन पुलाबद्दल… वाशी खाडी पुलाबद्दल. तब्बल बारा लेन असलेला महाराष्ट्रातला हा पहिला आणि भारतातला एकमेव खाडी (Vashi Creek Bridge) पूल ठरणार आहे.
वाशी खाडी पूल हा मुंबई आणि नवी मुंबई शहराला जोडणारा एक अत्यंत महत्त्वाचा असा दुवा आहे. मुंबईत यायचं असेल तर वाशी खाडी पुलाशिवाय पर्याय नाही. वाशी खाडीवर दोन पूल आधीपासूनच आहेत पहिला पूल 1973 मध्ये बांधण्यात आला होता. हा दोन लेनचा ब्रिज आहे मात्र सुरक्षेच्या कारणास्तव सुमारे दोन दशकांपासून हा पूल नियमित रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे. दुसरा सहा पदरी पूल सध्या वाहतुकीसाठी अपुरा पडत आहे त्यामुळे या ब्रिजवर नवीन पूल उभारण्यात येणार आहे.
वाहतूक कोंडी फुटणार (Vashi Creek Bridge)
सध्याच्या घडीला सांगायचं झालं तर वाहतुकीसाठी उपलब्ध असलेल्या खाडी पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते विशेषतः टोल नाक्याजवळ मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते. या खाडी पुलावर उभारण्यात येत असलेल्या नव्या तिसऱ्या पुलामुळे वाहतूक कोंडी फुटायला मदत होणार आहे.
खाडीपुलाच्या दोन्ही बाजूंना समांतर अशा प्रत्येकी तीन मार्गिकांचे आणखी दोन पूल एम एस आर डी सी द्वारे उभारले जात आहेत. 1837 मीटर लांबीचे प्रत्येकी तीन मार्गकांचे दोन पूल उभारण्यात येत आहेत. म्हणजेच हा नवा पूल एकूण बारा इंच असणार आहे. हा पूल वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असून सध्या टप्प्याटप्पाने हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येत आहे. हा पूल पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर या मार्गावरून प्रवाशांचा ट्राफिक मुक्त प्रवास व्हायला मदत मिळणार आहे.