राजस्थानतल्या सत्तासंघर्षावर वसुंधरा राजेंनी सोडलं मौन; म्हणाल्या..

0
30
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जयपूर । राजस्थानतल्या सत्तासंघर्षावर भाजप नेत्या आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजेंनी मौन सोडत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. राजस्थानात काँग्रेसमध्ये झालेलं बंड जनतेसाठी दुर्दैवी आहे. काँग्रेस त्यांच्या घरातल्या भांडणाचा दोष भाजपाच्या माथी मारु पाहतंय हे असले प्रकार करणं त्यांनी सोडावं. काँग्रेसच्या अंतर्गत कलहाची किंमत राजस्थानच्या जनतेला मोजावी लागते आहे ही बाब दुर्दैवी असल्याचं वसुंधरा राजे यांनी म्हटलं आहे.

सचिन पायलट यांनी बंडखोरी केल्यानं काँग्रेसने राजस्थान प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदावरुन आणि उपमुख्यमंत्रीपदावरुन त्यांची हकालपट्टी केली. काँग्रेसमधला हा वाद आता न्यायालयात पोहचला आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी ही सगळी फोडाफोडी भाजपाने केल्याचा आरोप केला आहे. या सगळ्याबाबत आता वसुंधरा राजे यांनी प्रतिकिया देत काँग्रेस घरातल्या भांडणाचा दोष भाजपाच्या माथी मारु पाहतंय हे असले प्रकार करणं त्यांनी सोडावं असा सल्ला दिला.

दरम्यान १६ जुलैलाच राजस्थानातलं गेहलोत सरकार वाचवण्याचा प्रयत्न वसुंधरा राजे करत आहेत असा दावा भाजपाच्या एका मित्रपक्षाने केला होता. आरएलपीचे अध्यक्ष हनुमान बेनीवाल यांनी केला आहे. बेनीवाल यांनी दोन ट्विट करून हा दावा केला. सचिन पायलट यांच्या बंडानंतर राजस्थानातील काँग्रेस सरकार सध्या संकटात सापडले आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडून बहुमतासाठी आमदारांच्या जुळवाजुळवीचे प्रयत्न सुरू आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here