विराट सलामीला, तर रोहित No. 4 वर बॅटिंगला येणार? पहा कोणी दिलाय सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली असून भारतीय संघाचा पहिला सामना ६ जूनला बांगलादेश विरुद्ध आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारी टीम इंडिया कोणत्याही परिस्थिती यंदाचा वर्ल्डकप जिंकायचाच असा चंग बांधूनच अमेरिकेला गेली आहे. त्यादृष्टीने काही बदल संघात पाहायला मिळू शकतात. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे सलामीला येतील असं बोललं जातंय. मात्र ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मॅथ्यू हेडनने मात्र अजब सल्ला दिला आहे. विराट कोहली सलामीला यावा अन्यथा माझ्य संघात त्याला स्थानच नसेल, तर रोहित शर्माने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी असं हेडन म्हणाला.

ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना हेडन म्हणाला, कोहली आणि जैस्वाल यांनी सलामीला उतरावे. तुमच्या डावे- उजवे कॉम्बिनेशन असायला हवं. तुम्ही सलग ५ उजव्या हाताच्या फलंदाजांना घेऊन उतरू शकत नाही. विराट कोहलीने तर सलामीलाच खेळावं अन्यथा तो माझ्या संघात खेळू शकणार नाही. कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि त्याच्यासाठी सलामीला येणं हा एकमेव पर्याय आहे असं हेडनला वाटत. तर कर्णधार रोहित शर्माने कोणताही संकोच न बाळगता चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी अशी इच्छा मॅथ्यू हेडनने व्यक्त केली.

हेडन म्हणाला, “रोहित चौथ्या क्रमांकावर सर्वात योग्य फलंदाज ठरेल. रोहित हा अष्टपैलू खेळाडू आहे आणि तो मधल्या फळीत फलंदाजी करण्यास कोच करत नाही. टी-२० क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याचा रेकॉर्ड सुद्धा सर्वोत्कृष्ट आहे. त्यामुळे रोहित शर्मा हा मधल्या फळीत नेतृत्व करण्यासाठी योग्य ठरेल, रोहित शर्मामुळे भारताची मधली फळी मजबूत होईल असं हेडन म्हणाला.

हेडनने निवडलेल्या 11 खेळाडूंमध्ये त्याने कोहली आणि जैस्वाल यांना सलामीवीर म्हणून संघात स्थान दिले आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव, चौथ्या क्रमांकावर रोहित शर्मा, पाचव्या क्रमांकावर ऋषभ पंत, सहाव्या क्रमांकावर हार्दिक पंड्याची निवड हेडनने केली आहे. याशिवाय शिवम दुबे, जडेजा, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंगचीही निवड हेडनने केली आहे.