सातारा जिल्ह्यातील उद्यापासूनचा कडक लाॅकडाऊन मागे घेणे अनिर्वाय : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

साताऱ्यात कडक निर्बंधचा लाॅकडाऊन मागे घ्यावा. प्रशासनाने व्यापाऱ्यांशी संघटनाना विश्वासात घेवून निर्णय घ्यावा. पाच दिवसांत निर्बंध ठेवून बाजारपेठ उघडण्यास परवानगी द्यावी. पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय मागे घेणे अनिर्वाय झालेले आहे, असे आ.शिवेंद्रसिहराजे भोसले यांनी सांगितले.

आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, जिल्हा 100 टक्के बंद ठेवणे उपाय नाही. दुर्देवाने नागरिकही मोठी गर्दी करत आहेत, तेव्हा त्यांनीही नियम पाळले पाहिजेत. नागरिकांनी जबाबदारीने वागले पाहिजे. शासनाकडून सुविधा मिळाल्या पाहिजेत. तालुक्याच्या ठिकाणची रूग्णालयही सक्षम करणे गरजेचे आहे. आम्ही आंदोलन करून जिल्हा प्रशासनाला अडचणीत आणणार नाही. सातारकरांनी प्रशासनाला सहकार्य केले आहे. आता यांचा विचार प्रशानाने करावे. निवडणुकांना विरोध नाही. मार्केट कमिटीच्या निवडणुका चालतायतं, मग बाजारपेठ सुरू का नाही.

साताऱ्यात काल पासून जे निर्बंध लावले आहेत ते अन्यायकारक आहेत. याचा उद्रेक होऊन साताऱ्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. जर इलेक्शनला प्रशासन विरोध करत नाही आणी बाजारपेठ बंद ठेवाताहेत हा साताऱ्यात चर्चेचा विषय बनला आहे. खर तर हा निर्णय हा खुप अन्यायकारक आहे. आताच कुठे व्यापारी लोकांनी आपल्या दुकानात माल भरला होता आणी पुन्हा निर्बंध आल्याने सर्व व्यापारी वर्ग अडचणीत येऊ लागला आहे. जिल्हा प्रशासनाने लवकरच हा निर्णय रद्द करावा अशी मागणी आ.शिवेंद्रसिहराजे भोसले यांनी केले

Leave a Comment