चिंताजनक : महापालिकेकडे दोन दिवस पुरेल एवढा लसीचा साठा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | महापालिकेने सुरू केलेली मेगा लसीकरण मोहीम संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेकडे दोनच दिवस पुरेल एवढा लसीचा साठा आहे. दर आठवड्याला एक लाख लस देण्याची मागणी पालिकेने शासनाकडे केली आहे. पण या मागणीच्या तुलनेत लसींचा अत्यल्प साठा उपलब्ध होत असल्यामुळे एकूणच यंत्रणेसमोर प्रश्न निर्माण झाला आहे.

सध्या फक्त १८ हजार लसी उपलब्ध असून लसीच्या तुटवड्यामुळे रविवारी लसीकरण बंद राहणार असल्याने त्याचा मोठा परिणाम पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने मनपाने सरकारकडे केली १ लाख लसींची मागणी केली आहे. मात्र अद्याप लसीची उपलब्धता न झाल्याने रविवारी होणाऱ्या लसीकरण मोहिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ग्रामीण भागातील ७ ठिकाणी लसीकरण बंद

लसीच्या तुटवड्याचा परिणाम ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता निर्माण झाल्याने ग्रामीण भागातील ७ ठिकाणी लसीकरण थांबवण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारने शहराप्रमाणेच ग्रामीण भागात लवकरात लवकर लस उपलब्ध करून देणे गरजेचे झाले आहे. मात्र सध्या तरी लसीचा तुटवडा जाणवणार असल्याने ग्रामीण भागातही याचा परिणाम पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Grou

Leave a Comment